Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटबंदी'च्या चाव्या (IT डिपार्टमेंट) चोरांच्या हातात...!!

व
विशुमित
गुरुवार, 12/08/2016 - 12:28
🗣 89 प्रतिसाद

ज्या कारणासाठी नोटबंदी आणली ती सर्व कारणे आता तरी फोल होताना दिसत आहेत.

१) काळा पैसा- अजून तरी मोठे मासे निवांतच दिसत आहेत. किरकोळ १-२ कोटींची रोकड जप्त होत आहे. एवढ्याच काही कारवाया. उलट ५००-१००० च्या नोटा बदलून देण्यासाठी बऱ्याच जणांनी काळा बाजार केला/करत आहेत. ज्यांच्याकडे सुटते पैसे जमा होत आहेत ते सुद्दा बँकेत भरणा करत नाहीयेत. सुटते पैशाचा चलन साठेबाजी चालू झाली आहे. (३१ डिसेंबर पर्यंत काही सुधारणा होऊ शकते या साठी वाव आहे )
जो बाहेरच्या देश्यांमध्ये काळा पैसा पडून आहे त्याचे काय?

२) भ्रष्टाचार- सरकारी कार्यालय, पोलीस खात्यात अजून ही जोरात चालू आहे.

३) खोट्या नोटा- आकडेवारी नुसार फक्त ४०० कोटी च्या आसपास.

४) दहशतवाद-- काहीच फायदा दिसत नाही. उलट हल्ले वाढलेले आहेत. अतिरेक्यांकडेच रु.२००० च्या नोटा सापडल्या आहेत.

५) अर्थव्यवस्था- नंतर सुधारेल अशी आशा दाखवत आहेत पण कालच्या पत धोरणात व्याजदर जैसे थे च आहे. शेतकरी, छोटे व्यावसायिक यांचा रोजचा संबंध येत आहे, खूप फटका बसत आहे असे बोलत आहेत.

६) रिअल इस्टेट- बिल्डर एक रुपया प्रति square फीट पण कमी करत नाहीयेत.

७) कॅश लेस- ptm चा च जास्त फायदा होतोय की काय अशी भीती आहे.

असे सर्व असताना एक वेळ मानू काळा पैसे वाले आणि बेहिशोबी मालमत्ता असणारे जरी प्राप्तिकर विभागाच्या जाळ्यात अडकले तरी या विभागाचा पूर्व इतिहास पहिला तर

-- या जाळ्यातील सगळ्याच माश्यांची चौकशी होणार का? का आपला तो बाब्या असे काही?
-- प्राप्तिकर खाते खरंच सरसकट सगळ्यांवर सारखीच कारवाई करेल का?
-- न्यायालयात किती वर्षे खटले चालणार?
-- काळा पैशा आणि बेहिशोबी मालमत्ते संबंधित गुन्हा सिद्ध झाला तर किती वर्ष शिक्षा असेल?
-- तुरुंग वास झालाच तर सर्वाना सारखीच वागणूक मिळेल का ?(दिवंगत अम्माना करमत नव्हते म्हणून त्यांचे काही नेते जेल समोर झोपत होते, असे काही. छगन बाप्पाना घरचे जेवण येते म्हणे, संजू बाबाना सगळ्यांना डावलून पेरोल मिळत होता )
-- २.५ लाख पेक्षा जास्त रक्कम कोणी आता बँकेमध्ये जमा केली असेल तर त्याला त्याचे विवरण देण्यासाठी पुढच्या वर्षी नोटिसा जाणार. अशांचा आकडा खूप जास्त असणार यात वाद नाही. यांची चौकशी करण्यासाठी या विभागाकडे तेवढे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध आहे का?
-- या मध्ये जे दोषी आढळतील त्यांची रवानगी करण्यासाठी आवश्यक कारागृहे आहेत का?
-- सेटलमेंट करण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा प्राप्तिकर विभागाच्या कार्यालय समोर रांगा दिसतील का ?
-- प्राप्तिकर खात्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन प्रकरण लांबवता येईल शकते का?

सर्वात महत्वाचं " डोंगर पोखरून उंदीर तर बाहेर येणार नाहीत ना "

" हे सर्व असंच होणार यात तीळमात्र संशय नाही कारण मुळांवर घाव घालायचे सोडून फांद्या तोडण्यातच हे सरकार मुशगुल आहे."

(डिकलमेर : जसे सगळेच राजकारणी चोर आणि भ्रष्टाचारी असतात तसेच प्राप्तिकर विभागावर सुद्दा मला काडीचा ही विश्वास नाही, भले काही इमानदार असतील तरी)


प्रतिक्रिया द्या
24266 वाचन

💬 प्रतिसाद (89)
ख
खटपट्या Wed, 12/28/2016 - 20:30 नवीन
१००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा सिस्टिमॅटिकली बंद करायचा प्लॅन दिला असता कदाचित थोडाकाहीतरी फायदा झाला असता
हा प्लॅन ऐकायला/वाचायला आवडेल. सर्व जण बोलतायत पण प्लॅन कोणी सांगत नाही. पूर्वसूचना देणे या योजनेत शक्यच नव्हते. बाकी पर्याय काय असतील तर ते वाचायला आवडतील. पूर्वसूचना दीली नसताना ही योजना फसली असे मानले तर पूर्वसूचना दीली असती तर काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/29/2016 - 01:04 नवीन
सिम्पल प्लॅन : दर वर्षी एक चलनी नोट बंद केली जाईल. ह्या वर्षी १००० , पुढच्या वर्षी ५०० , असे करत करत ५ वर्षा अखेर २०. चलनात फक्त १० ,५, २, १ चे ठोकळे रहातील. लोकांनी तयारी करावी . ऑनलाईन व्यवहार करा नाहीतर चिल्लर चिल्लर खेळत बसा. =)) पण तरीही नोटा बंदी गंडलीच असती एक खुप मोठ्ठा फॅक्टर अनेक जण लक्षात घेत नाहीयेत की, नोटा बंदी मुळे , कॅशलेल व्यवहार करण्या मुळे सर्वसामान्यांची ब्यँकिंग वरील परावलंबित्व प्रचंड वाढलेले आहे. स्वतः ब्यँकिंग आणि फायनास क्षेत्रात काम करत असल्याने ब्यँका कशा झोल करतात हे मी अगदी जवळुन पहात आहे. ब्यँका झोल करणार नाहीत असे उगाचच एक अ‍ॅझम्शन आहे सर्वांचे जे की ठाम ठाम चुक आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 12/29/2016 - 01:56 नवीन
जर दरवर्षी पूर्वसूचना देउन एकेक नोट बंद केली तर त्या नोटेत साठवलेला काळा पैसा लोक दुसर्‍या नोटेत परावर्तीत करुन निर्धास्त राहतील. त्याने काय फरक पडणार? समजा पहील्या वर्षी १००० ची नोट बंद होणार हे जाहीर केले तर काळा पैसे वाले सर्व काळा पैसा ५०० रु. नोटांमधे बदलून घेतील. कींवा अन्य ठीकाणी गुंतवणूक करतील. Correct me if i am wrong. आताची नोटबंदी गंडली आहे हे आताच कसे ठरवू शकतो आपण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/29/2016 - 03:39 नवीन
Ok. Let's wait and watch. We have all the time in the world :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 03:49 नवीन
It will be a forever condition!! One part of population who will believe it's success, other will believe in failure of demonetization. And no one knows the truth. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 05:28 नवीन
"And therefore, it is important to take note of grievances of the ordinary people who have suffered as a result of this imposition on the country overnight by the Prime Minister. And I say so with all responsibilities, that we do not know what will be the final outcome." माजी पंतप्रधानाचे राज्यसभेतील भाषणातील ही वाक्य-- निर्णय घेण्यापूर्वी निर्णयकर्त्याला फायनल औटकॉम काय असणार आहे हेच माहित होते की नाही हा मूळ मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/29/2016 - 07:10 नवीन
हे असं करता तुम्ही । माजी पंतप्रधान म्हणजे कोण तर मनमोहन सिंग "ते बोलले" इतकं ऐकूनच हसायला येत. अन मग मुद्द्याचे गामभीर्य जातं हसता हसता बघा मला गामभीर्य सुद्धा लिहिता येत नाहीये =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 07:26 नवीन
त्यांना (ममो) बोलायला येतं की नाही हा मुद्दा मला वाटतं गौण आहे. तुम्ही मुद्द्यावर बोलाला तर चर्चेला काही अर्थ राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/29/2016 - 10:00 नवीन
माजी पंतप्रधानाचे राज्यसभेतील भाषणातील ही वाक्य--
ते राज्यसभेत जे काही बोलले त्याला बोलले म्हणण्यापेक्षा बरळले असे म्हणणे समर्पक होईल कारण त्यांच्या तब्बल ७ मिनिटांच्या भाषणात (नोटाबंदीच्या इतक्या महत्त्वाच्या निर्णयावर त्यांना यापेक्षा जास्त बोलता आलं नाही) निव्वळ प्रक्षोभक आरोप (उदा. संघटीत लूट) याशिवाय काहीही नव्हतं. काँग्रेसचा एक निष्ठावान या भूमिकेतून बोलल्यावर यापेक्षा वेगळं ते काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 10:09 नवीन
बाकी काय बोलले हे थोड्या वेळ बाजूला ठेवू पण फायनल औटकॉम बद्दल तुमचे मत काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/29/2016 - 10:48 नवीन
माझे मत (या निर्णयाच्या यशापयाशाबद्दल) अर्थव्यवस्थेतील काळा पैसा पकडला जाणे - बराचसा यशस्वी अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट होणे - बराचसा यशस्वी बनावट नोटा अर्थव्यवस्थेतून बाहेर पडणे - सध्यातरी यशस्वी. अर्थात काही काळाने नवीन ५००/२००० च्या बनावट नोटा बाजारात येतीलच. अतिरेकी कारवाया - सध्यातरी काश्मिरमधील दगडफेक, नक्षलवादी कारवाया बंद आहेत. देशांतर्गत अतिरेक्यांना होणारा अर्थपुरवठा थंडावला आहे. सीमेपलिकडून देशात घुसून लष्करावर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. अर्थात ते ५००/१००० च्या नोटांवर अवलंबून नव्हतेच. सरकारला उत्पन्न - उत्पन्नाच्या विषम प्रमाणात ज्या खात्यात पैसे भरले गेले आहेत, त्या रकमेवर सरकारला आयकर लावता येईल. कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे व्यवहार आता ऑनरेकॉर्ड येऊन त्यातून नक्कीच वाढीव आयकर मिळू शकेल. बँका/व्याजदर - व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. लोकांना त्रास - लोकांना नोटा बदलण्यासाठी, स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी समस्या आल्या. परंतु हे प्रमाण आता कमी झाले आहे व काही काळातच परिस्थिती पूर्वपदावर येईल. चुकलेली स्टेप - २००० ची नोट काढणे हा निर्णय फारसा व्यवहार्य नव्हता. भविष्यात देखील २००० ची नोट वापरणे त्रासदायक ठरणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 11:19 नवीन
१, २, ३ & ५ साठी अधिकृत आकडे येई पर्यंत wait & watch ४. नोटबंदीमुळेच शेतीमालाचे नुकसान या धर्तीवर नोटबंदी मुळे दगडफेक बंद असे ध्वनित झाले. ६. उर्जित भाई आलेत म्हंटल्यावर होयलाच पाहिजेत पण मागच्या आठवड्यातील पत धोरणात थोडेफार कमी केले असते तर बरं झालं असतं. ७. ते २ जानेवारी नंतर कळेलच, किती पूर्व पदावर येते ती. आणि ५० दिवसाचा शब्द दिला होता हे निर्णयकर्त्याने विसरू नये हि अपेक्षा. ८. गुरुजींनी एक चूक थोडीशी मान्य केली हे ही नसे थोडके. (कृपया हा. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रॉजरमूर गुरुवार, 12/29/2016 - 10:29 नवीन
ते तर चोरच आहेत
ब्यँका झोल करणार नाहीत असे उगाचच एक अ‍ॅझम्शन आहे सर्वांचे जे की ठाम ठाम चुक आहे ! प्रतिसाद द्या
असं कुणीही नाही म्हणणार .सध्याची परिस्थिती अशी आहे की ब्यांकाच खातेदारांच्या पैशावर दरोडे टाकत आहेत . आता रूढ अर्थाने दऱोडेखोरांची संख्या कमी झाल्याने ती कमी ह्या भरून काढत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लावून आणि पेनल्टी लावून . एक नंबरचे हरामखोर सगळे. त्यात एस बी आय आणि आय सी सी आय तर जास्तच ............खातेदारांना लुटायला आता पूर्वीसारखा राष्ट्रीयकृत ,खाजगी , कोऑपरेटिव्ह असा काही फरक नाही राहिला . आणि आताची नोटबंदी तर काय यांना जसं वन्स इन अ लाईफटाइम असा मौका मिळाल्याने कित्येक बँक अधिकाऱयांनी पुढच्या पिढीची देखील व्यवस्था करून ठेवली . भयानक झोल केले गेलेत ही वस्तुस्थिती आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 10:43 नवीन
नाही हो बँक वाले सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. त्यांच्या करवीच व्यवहार केले तरच तो व्यवहार उत्तम व्यवहार समजला जाणार आहे. बाकी न करणारे सगळे चोर आणि केलेली सगळी चोरीच म्हणायची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/29/2016 - 07:26 नवीन
. पूर्वसूचना देणे या योजनेत शक्यच नव्हते. बाकी पर्याय काय असतील तर ते वाचायला आवडतील.
बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ५०० च्या जुन्या नोटा बाद करून ५०० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येतील असे जाहीर करून ५०० च्या नोटांचा पुरेसा पुरवठा होईल इतक्या नोटा आहे त्याच आकारात छापल्या असत्या व ८ नोव्हेंबरप्रमाणे अचानक ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली असती तर अगदी पहील्या दिवसापासून लोकांना चलन बदलून देता आले असते, एटीम मशिन कॅलिब्रेट करावी लागली नसती व आजच्यासारखी रोखीची टंचाई जाणवली नसती, आणि मुख्य म्हणजे २०००च्या नोटा छापायची आवश्यकताही भासली नसती व त्यावर होणारा खर्चही वाचला असता. बनावट नोटांना आळा घालणे, त्यावर पोसला जाणार्‍या दहशतवाद्यांची कोंडी करणे व देशातील काळा पैसा नष्ट करणे हा सरकारचा नोटाबंदीचा मुळ उद्देशही सफल झाला असता आणि तेही कुठलीही गुप्तता न पाळता. पूर्वसूचना दिल्यामूळे बनावट नोटा छापणार्‍यांनी १००० च्या बनावट नोटा अधिक छापल्या असत्या आणि काळा पैसा बाळगणार्‍यांनी तो ५००च्या चलनातील काळा पैसा १०००च्या चलनात ठेवला असता व आपसूक जाळ्यात अडकले असते. खरंतर सरकारने गुप्ततेची अट लादून घेतल्यामुळेच चांगल्या निर्णयाची परिणामकारक अंमलबाजावणी होऊ शकली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
स्वधर्म गुरुवार, 12/29/2016 - 07:27 नवीन
नोटाबंदीचा निर्णय ‘काळ्या पैसा नष्ट करण्यासाठी घेतला’ हे मुख्य कारण मानले, तर तो फसलाय, असे अात्ता तरी वाटते. लोकांना जेवढा त्रास झाला, त्या मानाने काळा बाजार करणार्यांचा काहीच पैसा कुजला नाही. अाता आयकर विभाग नक्की काय करतो, ते पहायचे. देशात काळा बाजार करणारे व न करण्याचा रिझनेबल पर्यायच नसलेले लाखो करोडो लोक अाहेत. अायकर विभाग अाहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर त्यांना फार काही काही जरब बसवू शकेल, असे वाटत नाही. पण या नोटबंदीने एक मात्र नक्की झालं. नोकरशाही हालली. अायकर, पोलीस, इ. डी. इ. लोकांनी बर्याच धाडी टाकल्या. नोकरशहात बॅंकवालेही अाले. त्यांना खूप काम पडले. खाजगी क्षेत्रातले लोक अायुष्यभर कसे राबतात, हे तरी या सर्व नोकरशहांना समजले असेल.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 12/29/2016 - 12:22 नवीन
++++ बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ५०० च्या जुन्या नोटा बाद करून ५०० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येतील असे जाहीर करून ५०० च्या नोटांचा पुरेसा पुरवठा होईल इतक्या नोटा आहे त्याच आकारात छापल्या असत्या व ८ नोव्हेंबरप्रमाणे अचानक ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली असती तर अगदी पहील्या दिवसापासून लोकांना चलन बदलून देता आले असते, एटीम मशिन कॅलिब्रेट करावी लागली नसती व आजच्यासारखी रोखीची टंचाई जाणवली नसती, आणि मुख्य म्हणजे २०००च्या नोटा छापायची आवश्यकताही भासली नसती व त्यावर होणारा खर्चही वाचला असता. +++++ एटीम मशिन कॅलिब्रेट करावी लागली नसती हा चुकीचा निष्कर्श आहे. कारण एकाच आकाराच्या ५०० / १००० च्या नोटा ओळखण्यासाठी आकार वजन व ईतर मार्कर्स एटीएम मशिनमध्ये घातलेले असतात. पुर्वीचे (५००/१०००च्या जुन्या नोटांचे) मार्कर्स काढुन त्या जागी नविन नोटांचे मार्कर्स एटीएम मध्ये टाकण्यासाठी कॅलिब्रेशन आवश्यकच होते.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/29/2016 - 13:20 नवीन
पुर्वीचे (५००/१०००च्या जुन्या नोटांचे) मार्कर्स काढुन त्या जागी नविन नोटांचे मार्कर्स एटीएम मध्ये टाकण्यासाठी कॅलिब्रेशन आवश्यकच होते.
ओके. हे माहीत नव्हते. तसं असेल तर ५००च्या नवीन नोटांसाठी एटीमही अगोदर कॅलिब्रेट करता आली असती.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/30/2016 - 05:17 नवीन
तसं नाही हो, त्यांना सगळं आज आता ताबडतोब च करायचं होतं. पंचवार्षिक संपायला दिवस तरी किती राहिलेत म्हणा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ज
जाबाली Fri, 12/30/2016 - 06:29 नवीन
हे सगळं करून सरकार काहीही सिद्ध करू शकलेलं नाही. सर्वसामान्य आणि आमच्या सारख्या अतिसामान्य जनतेला काहीही उपयोग झालेला नाही. मनस्ताप जास्त झालाय आणि सरकारविरोधात चीड वाढलेली आहे. त्यापेक्षा मूलभूत प्रश्नांच्या कडे बघायला हवे. रस्ते, दळणवळण, सुरक्षा, नोकऱ्या यांची कमतरता आहे. त्याबाबतीत सरकारनी काही तरी करायला हवे. नोटा बंदी आणि बदली करून काय साध्य झाले ? आधी च्या काळात सुद्दा हे नोटबंदी प्रकरण झालेले आहे ! एन्ड user च्याआयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. जो त्रास होत होता तो आणखीन वाढलाय. निमूटपणे सहन करणे आणि आशेवर जगणे हेच हाती आहे ! ठेविले अनंते तैसेचि राहावे | चित्ती असो द्यावे समाधान !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 12/30/2016 - 07:26 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 12/30/2016 - 07:43 नवीन
तुम्हाला सामान्य व्यक्तीच्या प्रतिक्रिया ग्राउंड लेवलला बघायच्या असतील तर मी देतो लिंक्स, फक्त निष्पक्षपणे बघू शकत असाल तर सांगा! फक्त रोष व्यक्त करणारे सामान्य लोक असं एक नवीन समीकरण येऊ घातलाय कि काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अप्पा जोगळेकर Fri, 12/30/2016 - 10:37 नवीन
भारतातला सामान्य माणूस इतकाही पिचलेल्या कण्याचा नाही. ते जाबाली यांनी जे लिहिले आहे ते त्यांना स्वतःला लागू असू शकेल. इथे सामान्य माणसे आनंदात आहेत. बाकी काय ते २०१९ मधे कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अर्धवटराव Fri, 12/30/2016 - 10:44 नवीन
एक राहिलंच. सार्वजनीक शौचालयात पाण्याऐवजी कागद वापरायची सोय करायला हवी होती सरकारने. नोटबंदीपेक्षा हे काम जास्त महत्वाचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
व
वरुण मोहिते Fri, 12/30/2016 - 10:55 नवीन
बाकी नोटबंदी चा कोणाला काही फायदा झाला का? हे जरूर कळवावे ह्याच धाग्यावर खूप दिवस आहेत अजून . पण ज्यांना त्रास झाला ते काही बोले तर लोक अंगावर का येतात कळत नाही . स्वतःच म्हणायचं अजून परिणाम कळले नाहीत आणि कोण विरोधी बोल कि अजून नसलेले खात्री झालेले आकडे फेकायचे . बाकी अजूनही काही बिचारी सामान्य माणसं आहेत त्रास होऊनही देशभक्ती इंजेकशन मुळे गप्प आहेत. अजून देशभक्तीचे बरेच डोस आहेत माननीय प्रधानमंत्रांकडे . त्यामुळे जय जय . बाकी भाजप काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारखी ह्यांना कमी वेळ मिळालाय त्यांना जास्त मिळालेला . पद्धती पण वेगळ्या आहेत दोन्ही पक्षांच्या .
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Fri, 12/30/2016 - 11:50 नवीन
बाकी भाजप काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारखी ह्यांना कमी वेळ मिळालाय त्यांना जास्त मिळालेला . पद्धती पण वेगळ्या आहेत दोन्ही पक्षांच्या .
असे रागां पण म्हणत होते,कि नोटबंदी हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, पण वास्तवतः हे विधान अतिशय चुकीचे आहे, विरोधाला विरोध म्हणून काहीही निष्कर्ष काढणे गैर आहे. नोटबंदी आणि त्यानंतर उद्भवलेल्या समस्या हा अल्पअभ्यासाचा परिणाम आहे,सामान्यजणांना त्रास होतोय,आम्हालाही खूप मनस्ताप झाला,अजूनही राग येतो,पण त्यास भ्रष्टाचार असे म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Fri, 12/30/2016 - 11:46 नवीन
सोबतीला अमित शहांसारखे ठग पण आहेत . त्यामुळे भाजप भ्रष्टाचार करत नाही ,कोणाला त्रास झाला नाही , सुरळीत आहे असे पुढील १० वर्ष पण ऐकू . नो प्रॉब्लेम . इतकी जाणती लोक ऐकवत आहेत म्हटल्यावर ऐकलं पाहिजे . बाकी नोटबंदी चा वैयक्तिक फायदा आणि जनधन खात्यात परत एकदा लोकप्रिय घोषणेमुळे काही हजार टाकले तर त्याचा अर्थव्यवस्थेवर होणार दूरगामी परिणाम कोणीतरी सांगा . मोदी बरोबर आहेत ह्यासाठी किती ती कारण..दंगल सिनेमा काय काँग्रेस भ्रष्टाचार काय प्रश्न फक्त आताच्या निर्णयाशी आहे .
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/30/2016 - 12:03 नवीन
जंगल में मोर नाचा, किसने देखा किसने देखा! इथे कोणी त्रास झाला किंवा नाही झाला, फायदा झाला नाही झाला असे सांगितले तर ते कन्फर्म करण्याचा सोर्स काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अप्पा जोगळेकर Fri, 12/30/2016 - 12:20 नवीन
तुम्ही कोणत्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहात ? जसे २ङ, व्यापम इत्यादी स्पेसिफिक नाव सांगितले तर बरे होईल. शिवाय नोटाबंदीत सरकार पातळीवरच्या भ्रष्टाचाराबद्दल काही पुरावे समोर आले आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Fri, 12/30/2016 - 12:42 नवीन
तर नक्की लक्षात येईल . अजून भ्रष्टाचार पुढे आला नाही अहो काँग्रेस चा हि पहिल्या २-४ वर्षात नव्हता आला कधी त्यामुळे अशी स्टेटमेंट जाऊदे .नोटबंदीचे कायदे तोटे कळायला अजून वेळ आहे असे भाजपचं सरकार म्हणताय त्यामुळे ते हि राहूदे . बाकी नोटबंदीच्या समर्थनार्थ आपण भारतीय इतक्या पिचल्या कण्याचे नाही ह्या वाक्यामुळे एक्दम खुश झालोय मी काका .
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 12/31/2016 - 01:11 नवीन
नोटाबंदीचा तोटा झाला तरी देश विकायला काढावा लागला इतका तो नक्कीच झालेला नाही. काय आहे आपल्या देशाला काही किंमत द्यायची संवयच ७० वर्षांच्या स्वातंत्र्याने दिलेली नाही. १९६२ १९६५ व १९७१ व कारगील या युद्धात देखील आपण फार काही किंमत मोजली आहे असे नाही.मी तर म्हणतो ५० दिवसांची उधारी देणे किंवा घेणे इतकी पत ही माझी नसेल तर मी काय कमावले माझ्या आयुष्यात याच विचार होणे ही गरजेचे आहे.नाशवंत वस्तूंच्या कोणत्याही किमती फारशा खाली आलेल्या नाहीत असे जर आपण म्हणालो म्हणून नोटाबम्दी फसली आहे असे कसे ? भाव वाढलेले तरी नाहीत व याचे कारण सरळ आहे पाऊस समाधानकारक झाला आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात काही ना काहीतरी निर्णय जोखीम घेऊन घ्यावाच लागतो. ७० टक्के व्यवहार जरी कार्डाने होऊ लागले तरी हा निर्णय सफलच झाला असे म्हणावेच लागेल.ज्या अर्थी देशात उठाव झालेला नाही ज्या अर्थी सिनेमे, उत्सव, जत्रा, दानपेट्या, ३१ डिसेम्बर सारे मस्त चालू आहे. नोटांचा पुरवठा या ना त्या कारणाचे कमीच करायचे धोरण सरकार ठेवील. कारण सर्वच माणसे स्वत: कर चुकवीत नसली तरी ज्याला आपण रोख पैसे देतो तो कर भरतोच याची आपण खात्री कधीच करू शकत नाही.पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/31/2016 - 09:37 नवीन
कारण सर्वच माणसे स्वत: कर चुकवीत नसली तरी ज्याला आपण रोख पैसे देतो तो कर भरतोच याची आपण खात्री कधीच करू शकत नाही.पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो. +१०० सामाजिक जाणीव म्हणजे आकाशातून पडलेले सोन्याने मढवलेले उत्तुंग असे काहीतरी नसते तर अश्याच छोट्या छोट्या गोष्टींची जाण असणे असते, हे तथाकथित, शिक्षित, समजदार आणि/किंवा विचारवंतांना समजणे कठीण का जाते, हे समजणे कठीण आहे ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मार्मिक गोडसे Mon, 01/02/2017 - 07:26 नवीन
पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो. रितसर खरेदीची पावती घेतल्यास कर बुडवणे टाळता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
B
babubobade Sun, 08/06/2017 - 10:22 नवीन
किती फायदे झाले म्हणे ? १. नोटाबंदीच्या काळात नव्या नोटा सापडल्याची कितीतरी प्रकरणे झाली. सामान्य माणसाला ४००० चे लिमिट असताना इतक्या थप्प्या ह्यांच्याकडे कशा आल्या ? ह्याचे उत्तर मिळाले नाही. २. सरकार अजून पैसेच मोजत आहे म्हणे. ३. काळे किती सापडले ? ४. अतिरेकी हल्ले थांबले का ? ५. कॅशलेस किती प्रमाणात वाढले ?
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 08/06/2017 - 11:44 नवीन
याबाबत मिपावर खूप चर्चा झालीय परंतु त्यावेळी (ज्यावेळी चर्चा चालली होती त्यावेळी ) झालेल्या निर्णयाचे परिणाम पाहायला मिळाले नव्हते, आज ते पाहायला मिळतात, आणि दुर्दैवाने अत्यंत वाईट परिणाम दिसतायत.
१. नोटाबंदीच्या काळात नव्या नोटा सापडल्याची कितीतरी प्रकरणे झाली. सामान्य माणसाला ४००० चे लिमिट असताना इतक्या थप्प्या ह्यांच्याकडे कशा आल्या ? ह्याचे उत्तर मिळाले नाही. ३. काळे किती सापडले ?
जेवढ्या घोषणा केलेल्या जेवढी अपेक्षा ठेवलेली तेवढा काळा पैसा बाहेर आला नाही, डोंगर पोखरून मोदींनी उंदीर बाहेर काडला. जालावर याबाबत विविध अर्थतज्ज्ञांनी लिहलेले लेख वाचा, नोटबंदीचा शेती व्यवसाय, construction, इन्फॉर्मल सेक्टर यावरती भयंकर परिणाम झालाय, देशात २०१७ च्या पहिल्या चार महिन्यात १५ लाख जॉब गेलेत यावर नोटबंदीचा प्रभाव आहेच. मागील वर्षी पाऊस चांगला पडून सुद्धा शेतकरी कर्जमाफी मागू लागलेत याच कारण नोटबंदी मुळे पडलेले शेतमालाचे भाव (संदर्भ : लोकसत्ता आणि कुटुंबाचा अनुभव ). म्हणजे मोदी नि हा तडाखा राज्यांचा अर्थव्यवस्थेला दिलाय. अर्थात मोदी नि हा निर्णय घेताना अर्थतज्ज्ञानं फाट्यावर (अगदी अर्थमंत्रालयालाही) मारून हा निर्णय घेतल्याने, आज जे अर्थतज्ञ् यवरती लेख लिहतायत त्यांना मोदी आणि त्यांचे समर्थक काडीची हि किंमत देणार नाहीत हे स्पष्ट आहे.
२. सरकार अजून पैसेच मोजत आहे म्हणे.
ते मोजतंच राहणार अनंत काळापर्यंत
४. अतिरेकी हल्ले थांबले का ?
अजिबात नाही, काश्मीर मध्ये अतिरेकी बँका लुटाय लागले. मुळात किरेन रज्जू यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार भारतात खोट्या नोटांचे प्रमाण ०. १% हि नव्हते. नाहीतर सरकारने आकडा जाहीर करावा किती खोट्या नोटा सापडल्या
५. कॅशलेस किती प्रमाणात वाढले ?
कॅशलेस च वाढलेलं प्रमाण अगदी कमी आहे. तरीही कॅशलेस प्रमाण वाढावे म्हणू हा निर्णय घ्यायची गरज नव्हती. म्हणजे हे असे झाले कि मासे पकडायचे आहेत म्हणून तळ्यातील पाणी आठवायचे. जगात कोणत्याही देशाने काळा पैसा बाहेर यावा म्हणून किंवा डिजिटल transactions वाढावेत म्हणून असे तुघलकी निर्णय घेतले नाहीत. आता आपल्याला प्रश्न पडेल कि जगात इतर देश जे करतात ते पाहून आपण का करायचे, याच कारण ते देश विकसित आहेत मुक्त अर्थव्यवस्थेची पुढची पायरी त्यांनी गाठलेली आहे. त्यांच्याकडे विविध निर्णय अमलात आणायची आणि त्याचे परिणाम मोजायची यंत्रणा आहे, विविध तज्ञ् आहेत. आपल्याकडे यातील काहीच नसताना हा निर्णय घेण्यात आला आज देश त्याची फळे भोगतोय. नोटबंदीचे आज दोन प्रकारचेच समर्थक उरलेत १. जे पहिल्यांदा दिलेलं समर्थन लाजेखातर मागे घेऊ शकत नाहीत ते २. भाजपचे राजकीय समर्थक. या दोन कॅटॅगोरीतील लोक सोडल्यास नोटबंदीचे कोणीही समर्थक नाहीत. मुळात माझा स्वतःचा प्रवास खालील रित्या झाला नोटबंदी चांगला निर्णय >>>>हेतू चांगला पण अमलबजावणी चुकली >>>निर्णय च चुकीचा. (fullstop) सरकारने स्वतः गोलपोस्ट बदल्या, काळा पैसा बाहेर येणार >>>खोट्या नोटा बाद (हिंसक कारवाया बंद )>>>डिजिटल इकॉनॉमी. आता सरकार मौनात गेलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babubobade
अ
अभ्या.. Sun, 08/06/2017 - 12:13 नवीन
सरकार तर गेलेच आहे मौनात, त्यावेळी तळी उचलणारे स्वयंघोषित देशभक्त पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sun, 08/06/2017 - 12:39 नवीन
अगदी अगदी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभिजीत अवलिया Sun, 08/06/2017 - 15:27 नवीन
अमितदादा आणि अभ्या सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अभिजित - १ Sun, 08/06/2017 - 14:03 नवीन
मी पहिल्या महिन्यातच इथे टाकले होते कि नोटबंदी फसली आहे. तेव्हा मला मुर्खात काढले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा