Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'शेतकरी व कॅशलेस व्यवहार'

स
संदीप डांगे
गुरुवार, 12/08/2016 - 23:54
🗣 148 प्रतिसाद
आप्पासाहेब जोगळेकर यांच्या कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण ह्या धाग्यावर म्हात्रेसर व मार्मिक गोडसे यांच्यातल्या 'शेतकरी व कॅशलेस व्यवहार' चर्चेनुसार दिलेला हा प्रतिसाद. अर्धवटराव व सही रे सई यांनी सुचवल्यानुसार वेगळा धागा काढत आहे. थोडं लिखाण अजून जोडलं आहे. काही उडवलं आहे. मूळ प्रतिसादः http://www.misalpav.com/comment/907299#comment-907299 ------------------------------------------------------------------ मे २०१६ ते ऑक्टोबर २०१६ ह्या सहा महिन्यातला सर्व काळ (२४ बाय ७) मी अनेक शेतकर्‍यांसोबत काम केले. तेही एका गावातल्या नव्हे तर नाशिक, नगर, पुणे ह्या तीन्ही जिल्ह्यातल्या सुमारे १६ तालुक्यांतल्या अनेक गावांमधल्या. यात अनेक कोट्याधिश ते कफल्लक असे सर्व प्रकारचे शेतकरी बघितले. शेतकर्‍यांपासून मागे जाणारी व पुढे जाणारी सर्व सप्लाय चेन बघितली. बीयाणे, औषधे, अवजारे, मोटारगाड्या, पंप, वीजपुरवठा, मोबाईल-रेंज, बॅन्कांची उपलब्धता, होणारे व्यवहार हे सर्व ८ नोव्हेंबरचा तमाशा सुरु व्हायच्या आधीच बघितले होते. आपल्या नागरी व्यवस्थेमधे अनेक स्तर आहेत. प्रत्येक स्तर हा दुसर्‍यापेक्षा भयंकर वेगळा, मध्यम वेगळा, किंचित वेगळा ह्या प्रकारात दिसतो. ह्यातल्या कोणत्याही स्तरातल्या व्यक्तिला दुसर्‍याच्या स्थितीकडे 'दुरुन डोंगर साजरे' ह्या उक्तीनुसार बघावे लागते. मजा आणि त्रास हे प्रत्येक स्तरातल्या त्या त्या स्थितीप्रमाणे त्या त्या व्यक्तिला मिळतातच. त्याची तुलना होऊ शकत नसते. त्यामुळे दुसर्‍याची स्थिती प्रत्यक्ष भोगल्याशिवाय, बघितल्याशिवाय समजत नाही हे मागच्या सहा महिन्यात कळलेलं आहे. दोन जिल्ह्यातली, दोन शहरातली, दोन गावातली, दोन वस्तीतली, इतकंच काय तर अगदी आजूबाजूला शेत असलेल्या दोन शेतकर्‍यांचीही परिस्थिती जमीन-आसमान असते. जजमेंटल होण्यात अर्थ नाही. म्हात्रे सर व मार्मिक गोडसे, दोघांच्याही मुद्द्यात अर्धसत्य आहे. ते पूर्ण चुकीचे किंवा पूर्ण बरोबर नाही. आता कोण कोणत्या अ‍ॅन्गलने बघतो इतकंच तिथे बाकी राहतंय. तसेच कोण्या एकाचा अ‍ॅन्गल हा पूर्ण सकारात्मक किंवा पूर्ण नकारात्मक आहे असेही म्हणू शकत नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था (म्हणजे व्यवहाराची पद्धत) शहरी भागापेक्षा कैक बाबतीत वेगळी पडते. तिथे अनेक समस्या आहेत. (त्या समस्या आहेत म्हटले की ७० वर्षांची घाण इत्यादी मुद्दे पुढे केले जातात, पण नवीन धक्काव्यवस्था आणतांना सत्य लक्षातच घ्यायचे नाही का?, हा प्रश्न मला सतत पडत आहे.) पण अनेक सुविधाही आहेत हे सत्यही नाकारले जाऊ शकत नाही. (म्हणजे सत्तर वर्ष झाले तरी सर्वत्र बैलगाड्याच चालू आहेत असे दिसत नाही). पण ढोबळमानाने कोणतंही एक चित्र हे ग्रामीण व्यवस्थेचं मूर्तिमंत उदाहरण आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. उदा. नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किमीवर असलेल्या, वीस वर्षांपासून टोमॅटोचीच शेती करत असलेल्या एका साठ वर्षीय शेतकर्‍याला करप्या रोगामुळे आपला दोन एकर टोमॅटो अर्धा जळेपर्यंत काय अ‍ॅक्शन घ्यावी हे कळु नये हे माझ्या आकलनाबाहेर जाते. त्याच नाशिकपासून दुसर्‍या बाजूला असलेल्या वीस किमी वर एखादा बावळट दिसणारा अर्धशिक्षित शेतकरी कोणतं किटकनाशक नेमकं कसं काम करतं ह्याच्या केमिकल अ‍ॅनॅलिसिसवर अचूक शास्त्रीय चर्चा करुन पीएचडी झालेल्या शेतीतज्ञाला घाम फोडू शकतो हेही बघितलंय. त्यामुळे प्रगत-आधुनिक शेतकरी व आत्महत्या करणारे शेतकरी हे एकाच गावात असू शकतात. एकमेकांचे मित्रही असू शकतात. समस्या व सुविधा हातात हात गुंफून अशा काही फेर धरुन नाचतात की स्तब्ध व्हायला होतं. बी बीयाणे औषधे घ्यायला शेतकरी जवळच्या दुकानात जातात. हे जवळचे दुकान १ किमी पासून २०-२५ किमी इतके असू शकते. (ह्यापेक्षाही जास्त दूर असू शकते, पण ती थोडीशी दुर्मिळ बाब आहे, असत्य नव्हे). सामान आणायला सायकल, बाइक, बस, बैलगाडी, टेम्पो, पिकअप पासून फॉर्चुनर घेऊन जाणारे शेतकरी आहेत. मोठ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याधुनिक व्यवस्था असलेली दुकाने आहेत तशीच अगदी टपरीवजा चालणारी दुकानेही छोट्या-मोठ्या गावांमधे, रस्तोरस्ती आहेत. आधुनिक दुकानात संगणकिकृत बील मिळते, हे संगणक थेट इन्टरनेटशी जोडलेले असतात, दुकानदार थेट नेटबॅन्किंगही करतात, किंवा बॅन्केत जाऊन आरटीजीएस सुविधांचा वापर करुन कंपन्यांना पेमेंट करतात. काही दुकानदार कच्च्या चिठ्ठ्या लिहून पावती देतात, पण असे प्रमाण खूपच कमी आहे कारण नुकसान भरपाई क्लेम करण्यासाठी पक्की बिलं लागतात. पण दुकान कसेही असो, शेतकर्‍यांकडून बीलाचे पैसे घेतांना ९९% केसेस मधे 'रोखच' घेतली जाते हे. अगदी मोठी बीले जी वार्षिक चुकवली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने चुकवली जात असावीत असा अंदाज आहे. देणेकर्‍यांने उधार बुडवू नये म्हणून आजकाल दुकानदार संघटना उधारखाते सुरु करण्याआधी अनामत किंवा ब्लॅन्क चेक ठेवून घेते. (ह्यात दुकानदार काळा-पांढरा पैसा कसा निर्माण करतात हा स्वतंत्र विषय आहे. येणारी-जाणारी सर्व बिले अधिकृत असूनही दुकानदार करचुकवेगीरी करु शकत असतील असे मला वाटते, प्रत्यक्ष कसे होते ते बघितले नाही त्यामुळे सांगु शकत नाही.) नक्की प्रमाण सांगता येणार नाही पण उधार व रोख हे दोन्ही प्रकार दुकानात मजबूत चालतात. बियाणे व खते ह्यासाठी आगावू रोख मोजावी लागते तर वेळोवेळी लागणारी औषधे, दुय्यम खते ह्यासाठी साधारणपणे उधारी दिली जाते. हंगाम सुरु होण्याआधी बियाणे व खते ह्यांच्यासाठी दुकानदाराने कंपन्यांना आगावू रक्कम भरून बुकींग केलं तरच माल दुकानात पोचतो. साधारण सर्वांना मार्चाखेर उधारखाती चुकवावी लागतात. शेतकरी पिक विकले जाईल तसे उधारी चुकवत जातो. जिथे पिके अल्प काळाची व नगदी, चटकन पैसा देणारी (भाजीपाला, फळे इत्यादी) जास्त प्रमाणात होतात तिथे रोख वर जास्त भर आहे, तर जिथे जास्त काळ चालणारी व घुमून फिरुन पैसा देणारी पिके (ऊस, कापूस इत्यादी) आहेत तिथे उधारी जास्त होते. तर ह्या व्यवस्थेत मुद्दा आहे की शेतकर्‍याला मोबाईल-कार्ड-चेक वापरुन व्यवहार शक्य आहेत का? ह्याचे उत्तर 'नरो वा कुंजरोवा' असेच देता येईल. कॅशलेस व्यवहार शक्य आहेतही आणि नाही सुद्धा. सर्वात महत्त्वाची ती सुविधा व क्षमता. काही गोष्टी समर्थक व विरोधक दोन्ही पक्षांनी डोळे उघडे ठेवून पूर्वग्रह बाजूला ठेवून समजून घेतल्याच पाहिजेत. ही आताची चालू परिस्थिती आहे, भविष्यात काय होईल याबद्दल अटकळी बांधणे तूर्तास दोन्ही पक्षांनी सोडले पाहिजे. बॅन्कांचे जाळे पुरेसे नाही, रेंज नाही, साक्षरता नाही, वीज नाही, ह्या गोष्टी आहेतही आणि नाहीपण. मिश्रसत्य. मुख्य गावापासून सुमारे २५-५० किमी दूर असलेल्या गावांमधे लाखोची उलाढाल होत नाही हे सत्य नव्हे. फक्त ती रोज रोज होत नाही हेही सत्य आहे. अशा दुरच्या गावातल्या लोकांना महत्त्वाचे सामान, औषधे, बीयाणे, खते आणायला मुख्य जवळच्या गावात जावे लागते जिथे बॅन्का, रेंज, वीज, सगळं असतं. तिथे ते व्यवहार मोबाईल, कार्डने करु शकतात. स्वतःच्याच गावातले व्यवहार छोट्या रकमेचे मोबाईल रेंज, वीज वगैरे असेल तरच शक्य आहे किंवा नाही. हे बायनरी आहे. तिथे कॅशच लागेल व लोक कॅशच वापरतील. रोख व्यवहारांवर बंदी तर आणलेली नाही तेव्हा तिथे कॅशलेसचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही असे समर्थक लोक म्हणत आहेत. पण ही भविष्यातली नाही, तर आत्ता करंट सिचुएशन बघून म्हणणे योग्य आहे काय हे तपासावे लागेल. बॅन्क कर्मचारी व इतर व्यवस्था खूप वेगाने, पूर्ण जोर लावून काम करत आहे. कोणीही हातावर हात धरुन बसलेलं नाही हेही सत्य आहे. पण बॅन्का तयार नसतांना अचानक हजार स्वाईप मशिनची गरज त्या एखाद्या गावात कशी 'ताबडतोब' पुरवू शकतील? त्यासोबत 'अचानक' लाखभर खातेधारकांना कार्ड-मोबाईल बॅन्किंग शिकवणे कसे शक्य होईल? असे अनेक प्रश्न एका रात्रीतून अचानक सुटतील असे मानणारे इथे कुणी असतील असे वाटत तर नाही. असतील तर गांजाचा अंमल पुरेपुर चढलाय असं समजूया. ठिक आहे, थोडा वेळ लागेल, मग तोवर काय करायचं? उधारी करायची, अमुक तमुक करायचं. किती काळ? महिना, दोन महिने, तीन महिने? सतत नकारात्मक का बोलता असं अनेक जणं इथं विचारतील. 'नुसतं' सकारात्मक 'बोलून'ही उपयोग नाही किंवा 'जग बघा कुठे चाललंय' असं कुत्सितपणे बोलुन अमेझॉन-गो च्या कल्पनेचा (प्रोटोटाईप-कन्सेप्ट) विडियो टाकून उपयोग नाही. ते 'कुठे तरी जाणारं जग' प्रत्यक्षात असेल आणि मग कुणी तक्रार करत असेल तर खरंच त्याला जोड्याने मारण्यालायकच समजले पाहिजे. सरकार आता पूर्ण १४ लाख कोटीची करन्सी आणणार नाहीच असे दिसते आहे, म्हणजे 'लेसकॅश' हे वास्तव असणार. लेसकॅश व सुविधांची कमतरता ह्या दोन्ही अवस्था सद्यस्थितीत वास्तव आहेत. तुम्ही विरोधक असा किंवा समर्थक, हे वास्तव नाकारु शकत नाही. आता मी गेला महिनाभर नाशकातच आहे, बाहेर कुठेही गेलो नाहीये, त्यामुळे इतर ठिकाणी नक्की काय स्थिती आहे ह्यावर मत देणं उचित नाही. पण एवढं इमॅजिन करु शकतो की बॅन्क-चेक-कार्ड-मोबाइल-रेंजही नाही आणि रोख पैसाही नाही, (ग्रामीण भागातील बॅन्केत पुरेसा रोख-पुरवठा होत नाहीये. देशभरातले ३५% एटीएम चालू आहेत - जे अल्पावधीत कॅशलेस होतात) अशा अवस्थेत काय सकारात्मक विचार करता येईल-बोलता येईल. परंतु अशा अवस्थेतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्या-बोलल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे ह्याबद्दल सकारात्मक-वा-नकारात्मक बोलणे योग्य ठरणार नाही. (फोनवर संभाषणं झालेली आहेत पण ती ग्राह्य धरता येत नाहीत, त्या बोलण्यात दोन्ही प्रकारचे पूर्वग्रह डोकावतांना दिसले. संभाषणकर्त्याचे वैयक्तिक मत व त्याचीच प्रत्यक्ष परिस्थिती यात विसंगती दिसत होती. काही लोक सावध राहून बोलत होते हे विशेष.) चेकद्वारे मोठ्या आकड्यांचे व्यवहार. मोठ्या आकड्यांचे व्यवहार चेकद्वारे होत असतात. पण दोन-तीन लाख पर्यंत रकमा साधारण रोख हाताळल्या जातात. दुसरं असे की व्यापार्‍याने चेक देऊन फसवण्याचे प्रकार घडू शकतात म्हणून चेक-आधारित व्यवस्थेवर विश्वास कमी आहे. (त्याचेही अनुभव ह्या सहा महिन्यात दिसलेच आहेत) चेक बाउन्स झाला तर कोर्टकज्जेगिरि करत बसणे परवडत नाही (ह्यात सरकार काय मदत करु शकणार ते माहित नाही). काही चेक क्लिअर व्हायला १५ दिवस लागलेले हा माझा स्वतःचा अनुभव आहे. घोडेगावात एका लोकल बॅन्केचा इशु केलेला चेक चाळीस किमी दूर नारायणगावात आणून भरावा लागतो कारण ती दुसरी प्रायवेट बॅन्क घोडेगावात नाही. तिथून ती प्रा. बॅन्क पुण्याला (लो. बॅन्क सोबत टाय-अप असलेल्या प्रा. बॅन्केला) चेक कुरियर करते. ती प्रा. बॅन्क सर्व तपासून तो चेक घोडेगावला कुरियर करते. असे बरेच उपद्व्याप 'इकडून तिकडे' होतात. १२-१५ दिवसांनी चेक पास होतो व अकाउंटला पैसे दिसतात. (कुणाला विश्वास नसेल तर व्य नि करा. बॅन्केचे नाव व नंबर देतो स्वतः चौकशी करुन खात्री करु शकता.) शेतकरी इतके दिवस नाही थांबू शकत, शेतातलं पीक नाही थांबू शकत, मजूर नाही थांबू शकत, गाडीभाड्यावाला आणि असे अनेक देणेकरी नाही थांबू शकत. गावाखेड्यांमधले व्यवहार असे रेंगाळले तर जीडीपी नक्कीच गटांगळ्या खाईल. दोन चार दिवसांची म्हणून ही अडचण रेटत रेटत लोकांनी महिनाभर काढली. आता पुढे अजून किती शक्य आहे ते कळेलच व त्याचा परिणामही येत्या सहा महिन्यात कळेलच. चेकव्यवहाराची व्यापार्‍यांचीही बाजू आहे पण इमानदारी-हातचलाखीच्या अध्यातमध्यात असल्याने ती मांडत नाही. असे लॉन्ग-रुट-चेक-क्लिअरिंग सारखे अनेक प्रश्न असतात, आहेत जे आपण इथे लॅपटॉप समोर बसून टिकटिक करत नाही इमॅजिन करु शकत. कुणी मांडले तर त्यावर शहाजोगी ओवरस्मार्टगीरी दाखवणे इतकेच सद्यस्थितीत आपल्या हातात असते. समस्यांवर उपाय आपल्याला दिसतात, की अरे हा उपाय आहे, तो उपाय आहे, अमकं करु शकतात, तमकं करु शकतात. हे बोलणे सोपे आहे, पण अचानक पायावर न चालता हातावर चालायला लावण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. कॅशलेस व्यवहारांना माझा विरोध नाही, कधीच नव्हता फक्त अपुरी व्यवस्था असतांना व जनमानसाला काहीच पूर्वसूचना न देता धाडकन तीव्र नोटाटंचाई लादली जाणे व त्याला कॅशलेसचे गोंडस नाव देणे पटलेले नाही. जिल्हा बॅन्का ह्यांच्यात खाते असलेल्या 'ग्राहकां'चे पैसे अडकलेले आहेत असे दिसते. इथे जिल्हा बॅन्केचा मुद्दा जेव्हाही आलाय तेव्हा त्या कशा भ्रष्ट झाल्यात व त्याद्वारे पैसे काळ्याचे पांढरे होतील म्हणून बंदी योग्यच आहे असाच विचार दिसला. परंतु जिल्हा बॅन्केत ज्यांचे खाते ते सर्व सदस्य भ्रष्टाचारीच आहेत, बाकी कोण्या सामान्य माणसाचे तिथे जणू खातेच नाही असे नव्हे. पाच पन्नास संचालक म्हणजे जिल्हा बॅन्क नव्हेत. शेकडो खातेदार आहेत ज्यांचे केवळ ह्याच बॅन्केत खाते आहे व त्यातच त्यांचे सर्व पैसे आहेत. ते पैसे त्यांना मिळत नाही आहेत अशा बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. ह्यातले खरेखोटे कोणाला माहित असल्यास स्पष्ट करावे. पण जिल्हा बॅन्क बंद म्हणजे घोटाळेबहाद्दरांना चाप एवढाच मर्यादित विचार करु नये. असो. ह्या सर्व चर्चांमधे एक प्रकारचा प्रचंड मोठा गॅप आला आहे. खूप खोल व लांब दरी आहे. एकाचे बोलणे दुसर्‍याला ऐकु जात नाहीये. त्यामुळे काही काळ गप्प राहिलेलेच बरे असे मला वाटत आहे. कोणीही कोंबडं झाकलं आणि कोणीही बांग दिली तरी सूर्य उगवायचा राहणार नाही व तो कोणत्या दिशेला उगवेल हे समर्थक-विरोधकांना दिसणारच आहे. इथे व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप-अपमान-धुरळा उडवून प्रत्यक्षप्राप्त समस्यांवर कोणतीही उपाययोजना होणार नाही. शहरी भागातल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या गरजेपुरती माहिती मिळाल्याचा उपयोग सोडता सर्व चर्चांचे फलित मला तरी शून्य दिसत आहे. कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसतांना एकमेकांना मूर्ख सिद्ध करुन दाखवण्याच्या नादात वेळ घालवणे हाच कुठल्याही चर्चेचा केवल उद्देश होत असेल तर थांबावेच. कोणासाठी ते मनोरंजनाचे साधन असेल तर चालुद्या! एन्जॉय! :) तुर्तास, ह्या विषयावरचे हे माझे शेवटचे प्रकटन. आता ह्या विषयावर थोडा काळ जाऊ देऊन, आढावा घेऊन लेखन करणे योग्य राहिल असे वाटल्याने विश्रांती घेत आहे. इतर सदस्यांना चर्चा करावयाची असल्यास करावी. मी भाग घेऊ शकणार नाही, क्षमस्व! (तशीच गरज असल्यास व्यनि व खरडवहीत उपलब्ध असेन) धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
29862 वाचन

💬 प्रतिसाद (148)
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 08:00 नवीन
१००% अडते दलाल प्रामाणिक आहेत तर शेतकर्‍यांची पिळवणूक नेमके कोण करतात? मध्यस्थांकडून होणारे आर्थिक व्यवहार १००% सरकारकडे नोंदले जातात का? ^^^ पिळवणूक व आर्थिक व्यवहारांची नोंद ह्याचा तसा काही संबंध नाही, शेतमालाचे भाव पाडणे, दर्जावरून हातचलाखी करणे ह्या गोष्टी पिळवणुकीत धरल्या जातात. भाव ठरल्यावर तेवढे पैसे न देणे, पावती एक आणि रोख दुसरीच असे होत नाही. त्यामुळे व्यवहार होण्याआधी काय होतं त्यावर पिळवणूक ठरते. एकदा पैसे ठरलेत कि तेवढे दिले जातात. ते चेक ने असो कि रोख, पावती मिळते. आता दोन रुपयांची जुडी घेऊन दहा रुपयाला विकणे ही पिळवणूक आर्थिक व्यवहारांच्या नोंदीशी जोडून काय होईल? दोन रुपये ते दहा रुपये हा प्रवास व्यापारी कसे नोंद करतात हा वेगळा विषय. अडते दलालांना व्यवहार दाखवणे भाग आहेच, 100 टक्के लोक 100 टक्के व्यवहार दाखवतातच असा माझा दावा नाही. पण पिळवणुकीचा करव्यवस्थेशी संबंध नाही तर तो शेतीधंद्याचा एक न टाळता(सद्यस्थितीत) येणारा भाग आहे. मी न लिहिलेले अर्थ प्लीजच चिकटवू नका. ^^^ ते तुमच्यासाठी खास लिहिलेले नाही. एकंदर या विषयावर मांडली जाणारी मते जशी दिसली त्यावर ती टिप्पणी आहे. शेतकर्‍यांना पर्याय नसेल. पण मध्यस्थ सगळे व्यवहार रोखीने का करतात? त्यांनी जर शेतकर्‍यांना सक्तीने पेमेंट बँकेतूनच होईल असे सांगितले असते तर शेतकरी का स्वीकारणार नाहीत? साधारण शिकलेल्या माणासाला लाखो रुपये नकद सोबत ठेवण्यापेक्षा ऑनलाईन, चेक, कार्ड वापरणे सोयीचे हे नक्कीच समजत असावे ^^^ मी आधीच लिहिल्याप्रमाणे जे अधिक सोयीचे flexible असते ते माध्यम व्यवहारासाठी वापरले जाते. लेखात मी फक्त बी बियाणे औषध दुकानदार व शेतकरी यांच्या व्यवहाराबद्दल लिहिलंय, अडते व्यापारी यांच्याबद्दल सविस्तर लिहायचे बाकी आहे. बँकांचे जाळे व इतर सुविधा पुरेशा उपलब्ध आहेत, कार्ड चेकने व्यवहारात काडीचीही अडचण येत नाही, रोखीपेक्षा ऑनलाईन अधिक सोयीचे, सुरक्षित, समाधानकारक आहे असे वातावरण आहे आणि तरीही लोक रोखीनेच व्यवहार करण्याचा हट्ट धरून बसलेत असा काहीसा अर्थ आपल्या प्रश्नातून ध्वनित होतोय. व्यापाऱ्याने हट्टाने चेकच हाती सोपवला तर पैसा प्रत्यक्ष मिळण्यात चार दिवस जाऊ शकतात. ऑनलाईन ट्रान्सफर, मोबाईल ट्रान्सफर होऊ शकते, पण परत तेच होते की शेतकऱ्याच्या बँकेत पैसे पोचले पण त्याला खर्च करायचे असतील तर जिथे खर्च करायचे तिथेही सर्व सुविधा लागतीलच. अशा सुविधा विनाअडचणीच्या उपलब्ध असतील तर कोणी तक्रार करणार नाही जिथे ज्या सुविधा आहेत त्या वापरल्या जात आहेतच, जिथे नाहीत तिथे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. पण सुविधा नसतांना ऑनलाइन व्यवहारांची एकतर्फी जबरदस्ती अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 08:10 नवीन
अजून थोडे: शेतकरी दलाल व्यापारी अडते यांच्यातले व्यवहार सर्व ठिकाणी एकसारखे लिनीअर पद्धतीत होत नाहीत, अनेक ठिकाणी अनेक तऱ्हा बघितल्या आहेत, तरीपण तसे असले तरी रोखीपेक्षा ऑनलाईन व्यवहार होणे सर्वांच्याच दृष्टीने योग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पैसा Mon, 12/12/2016 - 13:49 नवीन
रोखीपेक्षा ऑनलाईन अधिक सोयीचे, सुरक्षित, समाधानकारक आहे असे वातावरण आहे आणि तरीही लोक रोखीनेच व्यवहार करण्याचा हट्ट धरून बसलेत असा काहीसा अर्थ आपल्या प्रश्नातून ध्वनित होतोय.
लातूरला बँकेत काम केलेल्या एकाकडून याबद्दल ऐकले आहे. दलाल, एजंट, शेतकरी सगळ्यांचीच खाती बँकेत असतानासुद्धा फक्त वरच्या थरातला एकजण प्रत्यक्ष रोकड काढतो आणि ती बँकेच्याच दारात इतरांना वाटतो हे नेहमीचे दृश्य आहे म्हणे. खरेतर बँकेला चेक सुद्धा द्यायची गरज नसते. नुसते पत्र दिले तरी बँका ऑनलाईन ट्रान्सफर करतात. त्याला वेळ किंवा चार्जेस काही लागत नाही.
पिळवणूक व आर्थिक व्यवहारांची नोंद ह्याचा तसा काही संबंध नाही,
हे सगळे पटले नाही. अशा व्यवहारात पारदर्शकता नसते. शेतकर्‍याला फक्त रोख पैसे देऊन अर्थविषयक निरक्षर ठेवणे हेसुद्धा मी पिळवणुकीचा एक भाग समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 13:54 नवीन
अशा व्यवहारात पारदर्शकता नसते. शेतकर्‍याला फक्त रोख पैसे देऊन अर्थविषयक निरक्षर ठेवणे हेसुद्धा मी पिळवणुकीचा एक भाग समजते. ^^^ या बद्दल विस्तारपूर्वक सांगाल काय? रोख देणे व तेच पैसे बँकेतून देणे यात कोणता फरक पडतो व ती पिळवणूक कशी ठरते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 14:01 नवीन
पैसे घेणार्‍याला रोख दिले की मोकळे झाले म्हणून अडाणी ठेवण्याचा प्रकार झाला ना तो! हे व्यवहार काही लेखी काँट्रॅक्ट करून होतात का? तोंडी होत असतील तर शंभर वर्षापूर्वी जसे चालू होते तसेच त्या शेतकर्‍याने रहावे असे का आहे? शेतकर्‍याने आधुनिक न होण्यात या अडते आणि दलालांचाच जास्तीत जास्त फायदा वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 14:18 नवीन
मी इथे अडते व्यापारी किंवा शेतकरी यापैकी कोणाची बाजू घेत नाही आहे. पण व्यवहार रोखीने वा बँकेमार्फत होण्यात शेतकऱ्याचे नुकसान होत नाही, होत असेल तर ते व्यवहार ठरण्याच्या आधीच होते. बाजारात विकायला आलेल्या मालाचा व्यवहार होण्यास कोणता लेखी काँट्रॅक्ट आवश्यक आहे ते समजलं नाही. 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा व्यवहारात लेखी कॉन्ट्रॅक्ट चेक व्यवहार ह्यातून फसवणूक होणे शक्य नाही. अमुक भाव ठरला आणि त्यापेक्षा कमी पैसे हातात दिले असं बाजारात होत नाही. भाव ठरण्यामध्येच सगळा घोळ असतो. आजकाल काही शेतकरी ऑनलाईन वरून देशभरातील बाजाराचा अंदाज घेत असतात. झालेच तर फक्त सरकारला कर न मिळण्याचे नुकसान होऊ शकते. पारदर्शकता फक्त सरकारला हवी आहे. एकामेकांसमोर बाजारात उभ्या असलेल्या व्यापारी व शेतकऱ्याला एकमेकांशी थेट व्यवहार करतांना काही लपवण्याची गरज तर दिसत नाही. बँकेद्वारे व्यवहार न केल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व त्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक निरक्षर ठेवणे हा तुमचा दृष्टिकोन एखाद्या उदाहरणातून सांगता येईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 14:32 नवीन
रोखीने व्यवहार करणे ही जुनाट पद्धत झाली. बँकेमार्फत व्यवहार करणे ही त्यापुढची पायरी आहे. शेतकर्‍याला तो पर्याय उपलब्ध आहे हे न सांगणे किंवा निवडीचा अधिकार न देणे हे वंचित ठेवणेच आहे. थोडक्यात म्हणजे पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध असताना बार्टरची सक्ती करण्यासारखे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 14:51 नवीन
रोखीने व्यवहार जुनाट आणि बँकेमार्फत आधुनिक हा दृष्टिकोनाचा भाग आहे पण त्यातून पिळवणूक कशी होते ते कळलं नाही. पैसे मिळणे महत्त्वाचे, ते कसे कोणत्या mode मधून आले ह्याने शेतकऱ्याला नक्की काय फरक पडतो? माझं काही चुकतंय काय समजण्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मार्मिक गोडसे Mon, 12/12/2016 - 15:24 नवीन
मग विमा किंवा इतर योजनांमधे बँकाना आणि सरकारला फसवणारे कोण असतात?
आणि
शेतकर्‍याला फक्त रोख पैसे देऊन अर्थविषयक निरक्षर ठेवणे हेसुद्धा मी पिळवणुकीचा एक भाग समजते.
केवळ गदारोळ करण्याच्य भरात त्या मंदळींना एकाच दमात विरुद्ध अर्थाची विधाने करतोय हे ध्यानात येत नाही का? मात्र, ते इतरांच्या ध्यानात येत आहे हे निश्चित ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पैसा Mon, 12/12/2016 - 16:42 नवीन
केवळ गदारोळ करण्याच्य भरात त्या मंदळींना एकाच दमात विरुद्ध अर्थाची विधाने करतोय हे ध्यानात येत नाही का? मात्र, ते इतरांच्या ध्यानात येत आहे हे निश्चित ! ;) :)
मी कुठे आणि काय गदारोळ केला? तसेही मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेऊन कुठे गदारोळ केलेला आठवत नाही. तुमच्याकडे पुरावे असले तर द्या. मला जिथे ज्या विसंगती दिसतात त्या बोलते. जेव्हा फडणवीसानी मांडवली केल्याचे दिसले तेव्हाही बोलले होते. तेव्हा ते तुम्हाला चान चान वाटले असेल नाही का? विमा घोटाळ्याबाबत त्याच बातमीत लिहिले आहे ते तुम्ही सगळे वाचले नाही. ते त्रोटक आहे म्हणालात. सोयीचे तेवढेच वाचता का? दोन्ही गोष्टी मीच बोलले आहे. तात्पर्य काय आहे? फायद्याचे कलम या शेतकर्‍याना जेव्हा बँकाचे अधिकारी आणि इन्शुअरन्स अधिकारी यानी दाखवून दिले तेव्हा ते त्याचा फायदा घेतात. अडते आणि दलाल त्यांच्यापर्यंत त्यांच्या फायद्याची योग्य ती माहिती पोचू देत नसतील तेव्हा ते त्या बाबत अडाणी राहिले. हे स्पष्ट दिसतंय. मग हे दोन्ही विरुद्ध अर्थाचे कसे? वादासाठी निव्वळ वाद घालाल अशी तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. मी तुम्हाला यापेक्षा बरेच सेन्सिबल समजत होते. दुसर्‍यावर आरोप करताना निदान आजपर्यंतचा माझा ट्रॅक बघितला असतात तर जरा बरे झाले असते. तरीही तुम्हाला जितं मया असे वाटत असेल तर घ्या लाल रंगाचा डबा उपडा करून. इथे फक्त डांगे काही माहिती मिळेल असे लिहीत आहेत, बाकीचे तुम्ही फक्त वादासाठी वाद आणि शाळकरी पोरे भांडतात तसे भांडताना दिसताय. आमचा रामराम घ्या. मला जे काय बोलायचे असेल ते मी डांगेना व्यनि करून विचारीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 16:48 नवीन
हे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत खरे असलेले तुमच्या विरुद्ध वापरून त्यांनी स्वतः गोबेल्सच्या तंत्रात पीएच्डी केली आहे हे सिद्ध केले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 16:54 नवीन
माझा त्यांच्याबाबत नक्कीच अपेक्षाभंग झालाय. मला हा आयडी बराच सेन्सिबल वाटला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 17:11 नवीन
त्यांचे ते ठळक शब्दांतले वाक्यही त्यांनी माझ्या इथल्याच वरच्या एका प्रतिसादातून जसेच्या तसे उचलेले आहे. यावरून त्यांनी प्लॅगॅरिझममध्येही पीएचडी केलेली आहे हे सिद्ध होत नाही काय =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 17:17 नवीन
सगळीकडे आम्ही विरुद्ध ते मानसिकता दाखवलीच पाहिजे असा समज आहे का त्यांचा! असोत बापडे. मग काही बोलून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 17:56 नवीन
ते वाक्य सरळ सरळ तेथून कॉपी पेस्ट केले आहे. कारण, त्यातली "...त्या मंदळींना एकाच दमात..." यातली "द" ही टंकणचूक पण तशीच्या तशीच इथेही आलेली आहे =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पैसा Mon, 12/12/2016 - 18:04 नवीन
जान्देव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 17:02 नवीन
तुम्ही दिलेल्या हा सज्जड पुरावा पाहिल्यावरही त्याला त्रोटक माहिती (?!, खो खो खो) असे म्हणत... त्रोटक माहीती दिल्यामूळे त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही.. ...असा पळ काढावा लागला. त्याचा येनेकेन प्रकारेन वचपा काढणे चालू आहे, इतर काही नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मार्मिक गोडसे Mon, 12/12/2016 - 18:01 नवीन
माफ करा. हे मी तुम्हाला उद्देशून लिहिले नव्ह्ते. तुमच्या पहिल्या विधानात शेतकरी बँकिंग सेवा वापरतात असे सुचीत होते, तर दुसर्‍या विधानात ते बॅकिंग सेवेपासून दूर आहेत असे सुचीत होते. आणि ठळक शब्दातले वाक्यही माझे नाही. ज्यांच्यापर्यंत मला ते पोचवायचे होते ते पोचले. त्यांनी खाली दिलेल्या प्रतिसादातून स्पष्ट होते.
माझा त्यांच्याबाबत नक्कीच अपेक्षाभंग झालाय. मला हा आयडी बराच सेन्सिबल वाटला होता.
नाही, तुम्हाला तसं वाटण्यासाठी प्रयत्न करणारा 'तो' आयडी यशस्वी झालाय. उदा:
तुम्ही दिलेल्या हा सज्जड पुरावा पाहिल्यावरही त्याला त्रोटक माहिती (?!, खो खो खो) असे म्हणत...
विमा घोटाळ्याची लिंक मी व्यवस्थीत वाचली, परंतू त्यात बँक व सरकारी अधिकारी शेतकर्‍याला हाताशी धरून फ्रॉड करताना दिसतात, एकटा शेतकरी बँकांना व सरकारला फसवतोय असे दिसत नाही. गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 18:08 नवीन
ज्यांच्यापर्यंत मला ते पोचवायचे होते ते पोचले. त्यांनी खाली दिलेल्या प्रतिसादातून स्पष्ट होते. "बुंदसे गयी वो हौदसे नही आती", "मिया गिरा लेकीन टांग तो उप्परीच है ना ?", इत्यादी म्हणी आठवल्या !!! =)) =)) =)) त्याच मूळ वाक्यातला... विरुद्ध अर्थाची विधाने करतोय हे ध्यानात येत नाही का? मात्र, ते इतरांच्या ध्यानात येत आहे हे निश्चित ! ;) :) हा भाग इथेही लागू होतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पैसा Mon, 12/12/2016 - 18:10 नवीन
तुम्हाला ज्यांना बोलायचं असेल त्यांना सरळ बोला. एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍याला मारताना आपला निशाणा चुकतोय का हे आधी तपासून बघा. मला तुमच्याकडून हे नक्कीच अपेक्षित नव्हते. दुसरा मुद्दा, शेतकरी बँकापासून दूर आहेत असे अजिबात नाही, त्यांची बँकात खाती आहेत हे सरळ दिसते आहे. जेव्हा फायद्याचे कलम असेल तेव्हा माहिती मिळाली त्याचा ते यथास्थित उपयोग करून घेतात. पण जेव्हा तीच बॅंक खाती वापरता येण्याजोगी असूनही केवळ दलालानी नीट माहिती न दिल्यामुळे तेच शेतकरी अडाणीपणा करतात हे लिहिण्यात काही विरोधाभास नाही. मुद्दा आहे तो केवळ माहिती त्यांच्यापर्यंत पोचते का नाही याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 12/12/2016 - 18:20 नवीन
तुम्हाला ज्यांना बोलायचं असेल त्यांना सरळ बोला. एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍याला मारताना आपला निशाणा चुकतोय का हे आधी तपासून बघा. नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/13/2016 - 07:18 नवीन
बाकीचे तुम्ही फक्त वादासाठी वाद आणि शाळकरी पोरे भांडतात तसे भांडताना दिसताय
तुमच्या बाकीच्या मुद्द्यांशी सहमत पण नम्रपणे आणि खेदाने नमूद करतो कि वरील अनावश्यक वाक्य रुचले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/13/2016 - 07:44 नवीन
त्या क्षणी जे समोर दिसत होते त्यावर मी बोलून गेले. कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. तुम्ही आणि इतर काही लोकांनीही प्रामाणिकपणे चर्चा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. अनवधानाने दुखावले त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/13/2016 - 08:38 नवीन
तुमच्याबद्दल आदर होताच, तो दुणावला! या एवढ्या महत्वाच्या विषयावर तथ्यांवर आधारित चर्चा होणे गरजेचे आहे हि भावना पोहोचली आणि या भावनेशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 08:03 नवीन
भारतातले शेतीचे उत्पन्न एकूण १०० रु. आहे समजा. ते ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत ४ जणांच्या हातातून जात असेल तर एकूण ७०० रुपयाचा व्यवहार झाला. (फायदा एकूण १०० रुपये चौघात विभागून गेला समजा.). यातले शेतकर्‍याचे १०० रुपये सोडले तर १०० रुपये फायद्यावर सरकारला निदान १० रुपये एकूण कर मधल्या चौघांकडून मिळायला पाहिजे. तेवढा मिळत नसेल तर किती उत्पन्न कमी दाखवले आणि किती कर चुकवला गेला याचा अंदाज करता येईल. असा काही अभ्यास किंवा आकडे उपलब्ध आहेत का? (डिस्क्लेमरः मी अभ्यास वगैरे करत नाहीये. सहजच डोक्यात आले ते लिहिते आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/12/2016 - 07:32 नवीन
रोखीने व्यवहार होतो म्हणजे हिशोब ठेवला जात नाही, कर भरला जात नाही असे समजणे चुकीचे.
हे बरोबर असले तरी "हिशेब ठेवायचा नसेल किंवा कर चुकवायचा असेल तर रोखीने व्यवहार केला जातो" हेही तितकेच खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 08:48 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सुबोध खरे Tue, 12/13/2016 - 06:44 नवीन
अडते, दलाल, व्यापारी आयटी रिटर्न, योग्य ते कर भरतात, काय सांगताय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Mon, 12/12/2016 - 08:33 नवीन
मग विमा किंवा इतर योजनांमधे बँकाना आणि सरकारला फसवणारे कोण असतात?
शेतकरी फसवतो असं म्हणायचं आहे का? एखादे उदाहरण ?
शेतकर्‍यांना टॅक्स नसतो हे बहुशः योग्य आहे असे गृहीतक धरले समजा. ते ११४ कोटीचे शेती उत्पन्न वगैरे सध्या बाजूला ठेवू. मग शेतीमालाचे केवळ विपणन करणार्‍या अडते-दलालांनाही कर नसतो का? नसेल तर शेतीचे जे उत्पन्न (जीडीपी च्या सुमारे २०%) कराच्या जाळ्याच्या बाहेर आहे, त्यात हे अडते आणि दलालांचेसुद्धा अंतर्भूत आहे का?
शेतीतले सगळेच उत्पन्न प्राप्तीकरमुक्त नसते, जसे शेळीपालन्,मत्स्यपालन, दुग्ध्वयवसाय इ. अगदी स्वतःच्या शेतातील द्राक्षाचे बेदाने करून विकले तरी त्यावर कर भरावा लागतो. शेतीमालावर प्रक्रिया करून विकले की त्यावर कर भरवा लागतो. छोटे मोठे शेतकरी जेव्हा बँकेत आपल्या ठेवी ठेवतात व त्यावर मिळणारे व्याज १०००० पेक्षा अधिक असेल कर कापला जातो, कारण मिळणारे व्याज हे शेतीउत्पन्न म्हणून पकडले जात नाही. ह्यातून सरकारला महसूल मिळत असतो. अडते आणि दलालही प्राप्तीकर भरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 08:55 नवीन
States with High Levels of Insurance Fraud (Source: Crop Insurance officials) - Maharashtra (Aurangabad and Jalgaon), Gujarat (Saurashtra), Andhra Pradesh (Rayalaseema), Karnataka (Dharwad and Haveri), Tamil Nadu (Nagapattinam and Sivaganga) and Telangana (Mahbubnagar) - Coverage in these regions is high and so is fraudulence - In some districts hundreds of farmers are literally living off fraudulent claims The Modus Operandi: - Networks of farmers, bank officials and agriculture department officials run these rackets - Government officials show a higher loss while bank officials help farmers insure the same land repeatedly Read more at: http://economictimes.indiatimes.com/articleshow/47052185.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 09:06 नवीन
असे पुरावा देऊन लोकांचा मुखभंग नाय करायचा ! इथे फक्त फुगवलेले/बनवलेले दावे फेकून मग पुरावा मागितला की एकतर पळून जायचे, उद्धट बोलायचे किंवा फाटे फोडायचे असतात. पैतै, तुम्ही हा नियम तोडला आहे... आता, आमी नाई जा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मोदक Mon, 12/12/2016 - 09:35 नवीन
...आणि पळून जाण्याला "आम्ही दुर्लक्ष करतो" असे गोंडस नांव द्यायचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Mon, 12/12/2016 - 09:58 नवीन
त्रोटक माहीती दिल्यामूळे त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही.. महाराष्ट्रात नेमकी परीस्थीती उलटी आहे. सरकारी पीक विमा योजनेत सहभाग घेवूनही, दुष्काळामुळे खरोखरचं नुकसान झालेलं असतानाही आणेवारी मोजण्याच्या चूकीच्या पद्धतीमूळे शेतकर्‍यांना १००-२०० रु./एकर इतकी कमी नुकसान भरपाई मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 08:44 नवीन
हे प्रश्न प्राथमिक नसून मूळ दुखणे आहे. "प्रामाणिक" शेतकर्‍याचे उत्पन्न उघड झाले तर त्याला काहीच आर्थिक अथवा कराची समस्या नाही. पण सरसकट तसे झाले तर शेतीप्रणालीच्या साखळीतील इतर "अप्रामाणिक" शेतकरी (बिनशेती उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आहे असे दाखवणारे) व मध्यस्त यांचे उत्पन्नही उघड होईल. या दुसर्‍या प्रकारच्या व्यक्तींच्या हाती आर्थिक व राजकीय नाड्या आहेत. हे नको असल्याने अनेक बागुलबुवा उभे करून शेतकरी आणि सरकारला घाबरावयाचा प्रयत्न केला जातो. याला आपण "खायचे आणी दाखवायचे दात वेगळे असणे" असे म्हणू शकतो ! जर शेतकरी नकद सोडून बँकिंग व्यवहार करू लागले, तर शेतीत होणारी पैशाच्या उलाढालीचे प्रमाण पाहता, अंतर्गत ग्रामीण भागातही बँकांच्या/पोस्टबँकांच्या शाखा उघडणे केवळ शक्यच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या फायद्याचे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 08:57 नवीन
पोस्टबँकांच्या शाखा
हे आपण विसरतोच आहोत! बँक नसेल तरी पोस्ट ऑफिसे प्रत्येक गावात आहेत आणि तिथे पोस्टाच्या बँकेचे काम सुरू असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अमर विश्वास Mon, 12/12/2016 - 10:59 नवीन
शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा हा खालील संस्थांमार्फत होतो : Image removed. प्रत्यक्ष पतपुरवठ्यात पोस्टाचा सहभाग नसतो. हे पतपुरवठ्याचे जाळे उत्तम आहे . प्रश्न हा आहे की किती शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत यायचे पूर्ण माहिती असते ? शेतकऱ्याच्या आर्थिक साक्षरतेची गरज इथेच आहे. येथे शेतकऱ्यांना कमी लेखतोय असे समजू नये . आर्थिक साक्षरता हा प्रॉब्लेम शहरातही आहे. गुंतवणुकीसाठी कुठले Asset class उपलब्ध आहेत याची माहिती अनेक उच्चविद्याविभुषित लोकांना नसते. पण सध्या फक्त शेतकऱ्यांविषयी. एकाच उदहारण देतो : शेतकऱ्यांसाठी "किसान क्रेडिट कार्ड " ही उत्तम योजना स्टेटबँके मार्फत चालवली जाते. शेतकऱ्याचे क्रेडिट लिमिट हे हे त्याच्या सध्याच्या आर्थिक स्थिती पेक्षा भविष्यातील स्थिती वर (Potential Income) अवलंबून असते. तसेच एखाद्या वर्षी पीक बुडाले तर क्रेडिटवर उचलेल्या पैशाची परतफेड ४ वर्षांपर्यंत लांबवता येते. ३ लाखापर्यंत लिमिटला processing fee नाही. इतरही अनेक फायदे आहेत. आता ही योजना किती शेतकऱ्यांपर्यंत पोचली ? अशा अनेक योजना आहेत. पण शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्यात अनेकांचा फायदा असतो. शक्य झाल्यास http://farmer.gov.in/FarmerHome.aspx ही वेब साईट पाहावी. यातील माहिती जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यास साहाय्य करावे. आता दुसरा प्रश्न : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळते का ? व त्याच्यात अडते व इतर मध्यस्थांची क्काय भूमिका असते ? याविषयी पण लिहितो वेळ मिळेल त्या प्रमाणे ..
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 12/12/2016 - 11:03 नवीन
किसान क्रेडिट कार्ड सगळ्याच सरकारी, ग्रामीण, बँकामधे उपलब्ध असते. पोस्टाचे खाते वित्तपुरवठ्यासाठी नव्हे, पण पैसे बचत करण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Mon, 12/12/2016 - 11:27 नवीन
पैताई .. किसान क्रेडिट कार्ड सगळ्याच सरकारी, ग्रामीण, बँकामधे उपलब्ध असते... हे मला माहिती आहे. माझा मुद्दा हा होता कि ज्यांना याची गरज आहे त्या शेतकऱ्यांना याची कितपत माहिती आहे ? जर हे सर्वच बँकांमध्ये सहज उपलब्ध आहे तर हे प्रत्येक शेतकऱ्याकडे का नाही ? तसेच किसान क्रेडिट कार्ड हे एक उदहारण म्हणून दिले.. इतर अनेक अशा योजना आहेत ज्याचा फायदा योग्य लाभार्थींपर्यंत पोचणे गरजेचे आहे पोस्टबँकेही महत्वाची आहे. मुळात पोस्टबॅंक स्थापन झाली दहा वर्षांपूर्वी. आज मनरेगाचे पैसे यामार्गेच वितरित केले जातात. भविष्यात पतपुरवठ्यातही याचा वापर होईल. मी फक्त सद्य स्थिती सांगितली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/12/2016 - 12:03 नवीन
सगळी माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोचत नाही. सरकारी बँका लोकाना माहिती देण्यात नक्कीच हयगय करतात. याचे कारणही सांगू शकते. सरकारच्या दट्ट्यामुळे बँकेच्या साईटवर सगळी माहिती असते पण शेतकरी साईट बघून काही करतील ही शक्यता कमी. शेती किंवा लघूद्योगाना प्राधान्याने वित्तपुरवठा करावा हे कागदोपत्रीच रहाते कारण या प्रकारच्या पतपुरवठ्यात बँकाना नफा फारसा नसतो. अनुत्पादक कर्जांचे प्रमाण लक्षणीय असते. आणि छोट्या रकमांच्या वसूलीसाठी जास्त ताकद खर्च करावी लागते. मग केवळ दिलेले टार्गेट पुरे करण्यापुरती कर्जे देऊन बँका गप्प बसतात. कोणे एकेकाळी म्हशी घेण्यासाठी २००० ते ५००० रु आणि बुरुडकामासाठी १००० रु. ची कर्जे आम्ही देत होतो. तेव्हा ही खाती थेट एन्पीए लेजरमधे ओपन करूया का म्हणून आम्ही हसायचो. तेव्हा त्यातले अर्धे पैसे सबसिडी म्हणून थेट खात्यावर जमा व्हायचे तरी एन्पीए ची हीच परिस्थिती होती. मग यथावकाश क्रेडिट गॅरेंटी कॉर्प. कडे क्लेम फाईल व्हायचे आणि खाती बंद व्हायची. म्हणजे १० टक्क्यानी कर्ज असले तरीही त्याची वसुली होत नसे. आताही काही मोठा फरक पडलाय असे नाही. ग्रामीण बँकेत व्याजाची सबसिडी मिळून वट्ट ७% दराने दोन लाख रुपये किसान क्रेडिट कार्ड मिळते. मग तेवढे तरी भरायला का जड जावेत! तो मॅनेजर नको म्हटले तरी मागे लागतो की पैशाची गरज नसेल तर निदान कर्ज घेऊन एफ्डी करून ठेवा. पण हे बर्‍याच जणांपर्यंत पोचत नसावे ही शक्यता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 16:09 नवीन
किसान क्रेडिट कार्ड सगळ्याच सरकारी, ग्रामीण, बँकामधे उपलब्ध असते... हे मला माहिती आहे. माझा मुद्दा हा होता कि ज्यांना याची गरज आहे त्या शेतकऱ्यांना याची कितपत माहिती आहे ? यात आतापर्यंतची सरकारे कमी पडली आहेत यात वाद नाही. पण (अ) योजना आखायच्या, त्यांचा गाजावाजा करून राजकिय भांडवल वसूल करायचे आणि नंतर (आ) आपण व आपल्या पित्यांकडे त्या योजनेतले किती फायदे आपल्याकडे "गुप्तपणे वळते करून घेता येतील" इकडे सगळे लक्ष केंद्रित करायचे; असा डाव सतत खेळले गेले आहेत. तरीही, अशा योजनांची माहिती "किमान आपल्या मतदारांना तरी" करून देऊन त्यांचा विकास करण्याची दिलेली आश्वासने पुरी करण्याची नैतिक जबाबदारी स्थानिक नेत्यांवर नव्हती का ? पण तसे का केले जात नाही याची कारणे पाहिली की इतर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे सहजपणे पुढे येत जातात ! ;) :( म्हणूनच तर, "रेशन कार्ड (पीडीएस) योजनेतली गळती कमी केल्यास ती एक उत्तम लोकाभिमुख योजना आहे" असे अनेक दशके वारंवार सांगितले जाणारे तज्ज्ञांचे मत डावलून अन्नसुरक्षा कायदा नावाचे एक नवीन कुरण निवडणूकीच्या तोंडावर गाजावाजा करून तयार केले गेले. तसेच, जनधन योजनेसारख्या योजनांची चेष्टा करून लोकांत त्याच्याबद्दल गैरसमज पसरवणे हे पण नजिकच्याच भूतकाळात केले गेले आहेच, नाही का ? विशेष म्हणजे, हे सर्व करत असताना, चांगल्याला चांगले म्हणणार्‍यांना "गोबेल्स नीती वापरत आहेत" असे म्हणताना काहीही न वाटणे, हे सद्य राजकारणाचे अभिमानास्पद मूलभूत लक्षण झालेले आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/12/2016 - 16:26 नवीन
वर ठळक अक्षरात लिहिलेले वाक्य असे वाचावे... तरीही, अशा योजनांची माहिती "किमान आपल्या मतदारांना तरी" करून देऊन त्यांचा विकास करण्याची दिलेली आश्वासने पुरी करण्याची नैतिक जबाबदारी सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांवर नव्हती का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अमर विश्वास Mon, 12/12/2016 - 17:23 नवीन
डॉक्टरसाहेब सहमत ... रेशन कार्ड (पीडीएस) योजनेतली गळती कमी करून त्याची प्रभावी अंमलबजावणी हे रामनसिंग तिसऱ्यांदा निवडून येण्यामागचे प्रमुख कारण आहे ... बाकीच्या मुखमंत्रांनी योग्य तो बोध घ्यावा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Mon, 12/12/2016 - 13:38 नवीन
वरती एक जेन्युईन प्रॉब्लेम लिहिला होता , त्यावर काही उपाय , साधक बाधक चर्चा होइल असे वाटले होते पण ग्राउंड रीअ‍ॅलीटीपेक्षा कल्पनेच्या भरार्‍याच इथे फार दिसतात . _/\_
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 13:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अमर विश्वास Mon, 12/12/2016 - 14:20 नवीन
कपिलमुनी कल्पनेच्या भराऱ्या नक्की कुठे दिसल्या शकाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Tue, 12/13/2016 - 06:16 नवीन
+११११११ सगळी वाद्य वेग वेगळ्या स्वरात लावलेली आहेत त्यामुळे आपला "सा" कोठे लावायचा तेच कळेना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 12/13/2016 - 06:26 नवीन
सहकारी बँकांवर बंदी ह्याच साठी घातली गेली होती.http://www.loksatta.com/desh-videsh-news/income-tax-department-seized-1-crore-38-lacs-from-jaipur-integral-co-operative-bank-1360220/ जयपुर मध्ये १ कोटी ३८ लाख रूपये जप्त
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 12/13/2016 - 06:27 नवीन
एका प्लायवूड वाल्याच्या दुकानात गेलो. त्याने कोणत्याही स्थितीत कार्ड स्वीकारणार नाही असे सांगितले. मग शॉप अ‍ॅक्ट मधे कार्ड ठेवण्याची सक्ती झाली तर या माझ्या प्रश्नावर " देखा जायेगा " असे त्याने उत्तर दिले. चेकने रक्क्म स्वीकारू पण १३ टक्के कर असलेले पक्के बील करावे लागेल. याचा अर्थ असा की पूर्वी हॉटेले असा धंदा करीत पक्के बील कच्चे बील.त्यानी तो बंद केला आहे. आत ओनलाईन बुकिंग ही मोठ्या प्रमाणावर होते. माझ्या न्रिरिक्षणानुसार ज्याचा अन्न व औषध या शी संबंध आहे त्याना बिलाची अ‍ॅलर्जी आहे असे दिसते.उदा. मेडिकल शॉप जनरल प्रॅक्टीशनर ,केटरर्स , ई. तसेच बिल्डिंग मटेरियल हार्डवेअर यानाही ती आहे. खेळणी कपडे यानी पेटीएम चालू केले आहे. बाकी मोदीना प्रशासकीय मार्गाने भ्रष्टाचार मिटणे शक्य नाही असे " साहेबा" नी कानात सांगितले असावे. कारण त्यासाठी न्यायालयीन सुधारणा याकडे त्यांचे काही लक्ष गेलेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा