Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?

अ
अॅस्ट्रोनाट विनय
Fri, 01/13/2017 - 12:31
🗣 88 प्रतिसाद
वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का? मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही. यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे. मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?

प्रतिक्रिया द्या
15919 वाचन

💬 प्रतिसाद (88)
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 08:00 नवीन
तुम्ही अकोल्याचे दिसता ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Mon, 01/16/2017 - 08:09 नवीन
अमरावतीचा हाओ भौ बाकी विनय भौ तुम्ही ऍस्ट्रोनॉट आहात तर चंद्र,मंगळ,बुध,गुरु ग्रहांवर लग्न ठरवायच्या काय पद्धती हायेत ते बघून या की राव...चांगल्या असतीन तर त्याच मांडू पृथ्वीवर...काय म्हणता ? बाकी ते मुलीला/मुलाला मंगळ आहे म्हणतात तसं मंगळावरच्या मुलीला 'पृथ्वी' आहे असं म्हणतात का ते पण बघून या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 08:31 नवीन
अॅस्ट्रोनाट आसल्यन पह्यले तिकडंच हिंडुन आल्तो. पण काय सांगू भाव, तिकडच्या पोरीयनं भावच देला नाय. कदाचित भाषा येगली असल्यानं भाव ना पोहचल्या नसतीन मह्या बरोबर. काहींयन त भाव म्हणून राखी बांधून पाठवून देलं. मंगळावरच्या पोरीले पृथ्वी आहे म्हणणारे ज्योतिषी मागच्याच वर्षी इकडून आयात केले त्यह्यनं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Mon, 01/16/2017 - 09:57 नवीन
असं झालं नाई मंग ते... मंगळाच्या पोरी बी नखरेल असतेत म्हनजे...मंग कायले ते नासा वाले मंगळाच्या मांग लागून टैम बरबाद करतेत काय मालूम ?मी म्हंतो पोरी जर ढूंकून पायनार नस्तीन त कायले येवढा तामझाम करावं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
र
रेवती Sun, 01/15/2017 - 20:00 नवीन
तुमची केस अगदी साधी आहे. ;) आता व डाळ दोन्ही आणायला प्रश्न नाही, तुमचे लग्न तुमच्या मर्जीनेच होईल, प्रेमविवाह नसेल, वेगळा संसार थाटणे ही गरज आहे. मग प्रश्न येतोय कुठे? लग्न करायचे म्हटल्यावर बरे कपडे तर मुलगी काय मुलगाही परिधान करेलच. त्यात सजवून विकायला ठेवलेल्या वस्तूचा विचार मनात आणू नये. पाच दहा मिंटात काय एकमेकांबद्दल जाणून घेणार असं वाटतय तर जास्तवेळ बोला. घरात नको असेल तर गच्चीवर, उपहारगृहात, बागेत, स्काईपवर असं कुठेही कंफर्टेबल असेल तिथे. थोरामोठ्यांच्या सहवासात अवघडल्यासारखं वाटणार नसेल तर घरात बोला. एका भेटीत जाणून घेऊ शकणार नाही असं वाटत असेल तर दहावेळा भेटा. प्रत्येकवेळी कोणी मैत्रिण किंवा मामी, मावशी पढवून पाठवू शकणार नाही. माझं लग्न लै वर्षांपूर्वी झाल्याने आजकालचे फार अनुभव माहित नाहीत पण एवढ्यात भाच्याचे लगीन ठरले तेंव्हा तो जवळजवळ सहा महिने मुलीशी फोन, स्काईप, चॅट असे बोलत होता. भारतवारीदरम्यान भेट झाली. सगळे पटल्यावरच साखरपुडा झाला. दोघांचेही शिक्षण, कामाचा अनुभव, घरची आर्थिक परिस्थिती यात जाणवेल असा फरक असताना त्या दोघांनी बराच पेशन्स दाखवून काम निभावून नेले असे म्हणता येईल. यामध्ये दोन्हीकडील आईवडिलांचा सहभाग एकमेकांची ओळख करून घेण्याइतपत आधी होता. आता लग्न ठरवताना मात्र जास्त आहे हे ओघाने आले कारण हे पारंपारिक अ‍ॅरेंज्ड म्यारेज नाही पण लव्ह म्यारेजही नाही. नवर्‍यामुलाने यात स्वयंपाक करणे, घरसफाई, ईतर घरगुती कामे यातील आपला सहभाग सांगितला व तसेच मुलीनेही केले असावे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/16/2017 - 06:04 नवीन
व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे स्थळ बघायचे की सोयीचे नसले तरी मनाच कौल याला महत्व द्यायचे हा प्रश्न अशा केसेस मधे पडतो खरा पण त्याला काही उत्तर नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/16/2017 - 07:45 नवीन
माझ्या एका मित्राचे नुकतंच लग्न झालंय, गेल्या चार वर्षांपासून तो मुली बघत होता, आणि नेहमी याच गोंधळात अडकायचा. वय जास्त होत चाललंय म्हणून शेवटी उरकावे लागलेच फार विचार न करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 07:58 नवीन
चिंता करू नका, इतका वेळ लावणार नाही मी.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर Mon, 01/16/2017 - 06:28 नवीन
शेवटी जागाच भरायची ना ?
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 08:07 नवीन
रेवतीजी, चपखल बसणारं उदाहरण दिलंत. माझ्या डोक्यात आहे हा पर्याय. परंतु त्यातही एक अडचण आहे. आमच्या भागातली वधूपरीक्षणाची पद्धत सविस्तर सांगतो म्हणजे म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच मुलांची काय समस्या असते हे लक्षात येईल. सर्वप्रथम तर अमूक एक मुलगा लग्नाचा आहे म्हटल्यावर मुलींचे पालक एखाद्या मध्यस्थ नातेवईकामार्फत त्यांचं स्थळ सुचवतात. मुलाची नोकरी आणि घरची परिस्थिती चांगली असेल तर त्याला बरीच स्थळं येतात. मुलाने पालकांना त्याच्या अपेक्षा सांगितलेल्या असतात (उदा: मुलगी इंजिनिअर पाहिजे, नोकरीवाली पाहिजेत, नोकरी करणारी नको, कुठलीही graduate चालेल वगैरे वगैरे) पालक मग आलेल्या स्थळांमधून चाळणी करून अशी स्थळं निवडतात. आता येतो कांद्यापोह्यांचा कार्यक्रम. मुलगी बघायला कोण कोणत्या क्रमाने जाणार याबाबतीत दोन पर्याय आहेत. १. आधी दोनतिन जेष्ठ लोक पहायला जातात.(सोबत मुलगा त्याचे मामा, काका किंवा जे कोणी त्याच्या समविचारी असतील त्यांना पाठवू शकतो) मुलीपेक्षा तिच्या घरचे लोक कसे आहेत याकडे त्यांचं जास्त लक्ष राहतं. मुलगी त्यांना कशी वाटली हे मुलाला सांगतात आणि त्याआधारे काही मुली निवडल्या जातात. त्या मुलींना बघायला नंतर मुलगा सुट्टी टाकून येतो आणि त्याच्या एखाद्या मित्राला किंवा भावाला घेऊन जातो . (हा पर्याय यासाठी वापरला जातो कारण स्थळं खूप असतात. मुलाला बाहेरगावी नोकरी असल्याने तो प्रत्येक येऊ शकत नाही. कारण एक स्थळ आज येतं, एक आठ दिवसांनी, एक अजून एका महिन्यांने वगैरे) २. दुसरा पर्याय म्हणजे मुलीला बघायला मुलगा सगळ्यात आधी जातो. त्याने होकार दिल्यास विषय संपला. घरचे लोक मग नंतर मुलीचं घर वगैरे बघायला जातात.(formality) वरीलपैकी कोणता पर्याय निवडायचा हे मुलाच्या हातात असतं. नव्वद टक्के लग्न हे बघण्याच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दहा पंधरा मिनीट भेटीच्या आधारेच ठरवले जातात. काही अतिहुशार candidate मुलीशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त करतात. दोघेजण एखाद्या दुसऱ्या खोलीत, टेरेसवर किंवा जवळपास कुठेतरी बसून बोलू शकतात. पण हा प्रकार मला हॉरिबल वाटतो. असं दडपणाखाली कुणाला बोलावसं वाटणार. म्हणून मग दुसरा पर्याय म्हणजे ते दोघे नंतर बाहेर भेटू शकतात (आमच्या इकडे सहसा असं कुणी करत नाही, बोलायचंच होतं याला तर घरी का नाही बोलला वगैरे बोल लावले जातात. पण आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे हे पाप स्वीकारायला मी तयार आहे : ) ) पण गोची अशी आहे की मुलाने मुलगी पसंत आहे की नाही हे पुढच्या आठ किंवा पंधरा दिवसांत सांगणं अपेक्षित असतं. कारण मुलाचा नकार असल्यास पालक बाकी मुलं बघायला मोकळे होतात. (त्यांच्या दृष्टीने हे बरोबरही आहे) समजा मुलगा मुली बघायला आला अन त्याने तिन वेगवेगळ्या गावांच्या तिन मुली बघितल्या. त्याला कमी वेळेत निर्णय द्यायचा असल्याने तो प्रत्येक मुलीला एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा भेटू शकेल. आपण तूर्तास एकच भेट पकडू. तीन मुलींना फक्त एकदा भेटून (अधिक शक्य झाल्यास काहीवेळ फोनवर बोलून) त्याला निर्णय द्यायचाय. तर या तिघींपैकी एक मुलगी कशी निवडावी? संक्षि नी म्हटल्याप्रमाणे जिचा सहवास आपल्याला चांगला वाटेल तिला निवडावं पण हे आकलन या वयात इतक्या कमी भेटींमध्ये होणं शक्य आहे का? तरुण मुलांचं मन फार विचित्र असतं. त्याचे विचार कितीही महान असले तरी तो या तिघींपैकी जी अधिक सुंदर असेल, जिचं बोलणं अधिक मधाळ असेल तिलाच निवडणार याची शक्यता अधिक. अर्थात ही सहजप्रव्रृत्ती आहे. सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?(हुश्श )
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/16/2017 - 08:23 नवीन
सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?(हुश्श ) >>> ह्या एकाच प्रश्नात अनेक मुद्दे आहेत राव!!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 08:34 नवीन
या पामराच्या डोक्यात थोडा उजेड पाडू शकाल काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संजय क्षीरसागर Mon, 01/16/2017 - 10:19 नवीन
संक्षि नी म्हटल्याप्रमाणे जिचा सहवास आपल्याला चांगला वाटेल तिला निवडावं पण हे आकलन या वयात इतक्या कमी भेटींमध्ये होणं शक्य आहे का? एकदा वयात आल्यावर ते किती हा मुद्दा गौण आहे. लग्न करायचं म्हटल्यावर निवड अनिवार्य आहे, तिथे ज्येष्ठतेचा संबंध नाही. तुम्ही भेटी किती घेता यापेक्षा तुमची `फील कळण्याची' क्षमता काम करते. फीलच जर कळणार नसेल तर वय कितीही असो आणि भेटी कितीही घडोत संभ्रम कायम राहील. तरुण मुलांचं मन फार विचित्र असतं. त्याचे विचार कितीही महान असले तरी तो या तिघींपैकी जी अधिक सुंदर असेल, जिचं बोलणं अधिक मधाळ असेल तिलाच निवडणार याची शक्यता अधिक. अर्थात ही सहजप्रव्रृत्ती आहे. सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल? आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक फॅक्टर आहे. उगीच गुण आवडले म्हणून लग्न केलं याला अर्थ नाही. त्यामुळे हिचे गुण चांगले आणि तीचं रुप भावतंय अशी दोन होड्यांवर एकावेळी सवारी होईल. मुलगी प्रथम दर्शनी लोभस वाटलीच पाहीजे. आणि हा फार व्यक्तिगत फॅक्टर आहे. उगीच इतरांना तुम्हाला कशी वाटते ? विचारण्याची ती गोष्ट नाही. नंतर मग साधारण तीनेक भेटीत सहवासाचा फील कळतो. खरं तर तो पहिल्या भेटीतच कळतो (म्हणजे आहे की नाही) पण केवळ दैहिक आकर्षणाचा इंपॅक्ट दूर व्ह्यायला आणि कंन्सीसटंसी वेरिफाय करायला पुढच्या तीनेक भेटी पुरेत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
च
चिनार Mon, 01/16/2017 - 10:25 नवीन
पूर्ण सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मराठी कथालेखक Mon, 01/16/2017 - 11:12 नवीन
आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक फॅक्टर आहे. उगीच गुण आवडले म्हणून लग्न केलं याला अर्थ नाही.
बरोबर आहे. आकर्षणाचा अभाव असताना लौकिक अर्थाने लग्न कदाचित 'यशस्वी' होवू शकेल पण मानसिक पातळीवर पुर्णपणे समाधान कधीच लाभणार नाही आणि एक रितेपणाची भावना कायमच राहील. अर्थात किती भेटीनंतर आकर्षण वाटू शकते हे सांगणे कठीण आहे..सुंदर मुलगी पहिल्याच भेटीत आकर्षक वाटेल हे नक्कीच. पण कधी कधी सामान्य भासणारी मुलगीही कधी काही काळाने 'त्या अर्थाने' आवडू लागते असा माझा अनुभव (२ मैत्रीणींच्या बाबतीत) आहे , अर्थात अ‍ॅरेंज्ड मॅरेजमध्ये असा वेळ देता येवू शकणार नाही, त्यामुळे एक दोन भेटीत जिच्याबद्दल आकर्षण वाटले नाही तिला नाकारणेच ठीक... उगाच 'कदाचित भविष्यात आवडू शकेल' असे म्हणत होकार देणे किंवा निर्णय लांबवत राहणे दोन्ही अयोग्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आदूबाळ Mon, 01/16/2017 - 11:41 नवीन
धी कधी सामान्य भासणारी मुलगीही कधी काही काळाने 'त्या अर्थाने' आवडू लागते
The Mermaid Effect.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 01/16/2017 - 13:28 नवीन
याबद्दल माहीत नव्ह्तं हा effect खरा असेलही कदाचित, पण मला वाटतं माझे दोन मैत्रिणींबद्दलचे अनुभव म्हणजे 'दाट मैत्री आणि घनिष्ट भावनिक जवळीकिनंतर वाटू लागलेले शारिरिक आकर्षण' असे काही असावे. असो.. त्या गोष्टी खूप जून्या आणि पुढे न सरकलेल्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मराठी कथालेखक Mon, 01/16/2017 - 14:35 नवीन
दाट मैत्री आणि घनिष्ट भावनिक जवळीकिनंतर वाटू लागलेले शारिरिक आकर्षण
याचं दुसरं एक उदाहरण देता येईल. 'पुकार' चित्रपटात माधूरी ही अनिलची खूप चांगली मैत्रीण असते. ती त्याच्यावर प्रेमही करत असते पण त्याला मात्र तिच्याबद्दल आकर्षण /प्रेम असं काही नसतं. तेच नम्रता मात्र त्याला पाहिल्याक्षणी आवडते, दोघांचं प्रेमही जमतं. पण पुढे संकटे येतात. नम्रता साथ सोडते. संघर्षाच्या, हतबलतेच्या परमोच्च क्षणी त्याला साथ देणारी माधूरी (खरं त्याला खड्ड्यात लोटणारी पण तीच असते पण ते विसरुन) त्याला आवडू लागते, तो प्रेमात पडतो. इथे mermaid effect नाही म्हणता येणार मला वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
र
रेवती Mon, 01/16/2017 - 15:23 नवीन
सहमत आहे. असे थोड्याफार फरकाने अजूनही समाजात असे चालते. तुम्ही या बाबतीत घरच्यांशी बोलू शकताय का? मुलीशी दबावाखाली कुठेतरी बोलणे दोनेकवेळा होऊ शकेल जे आवडणार नाहीच पण नंतर नंतर मोकळेपणा येईल पण तोवर घरचे हरकत घ्यायला लागतील. तुमचा इलाका सोडून दुसर्‍या ठिकाणच्या मुलीशी लग्न करायला तुमची हरकत आहे का? जिथे यापेक्षा जास्तवेळा भेटू देतील. लग्न तुमचं आहे, तुम्ही ठरवा की तसं आवडेल का. मी सांगतिये तसं, संक्षी म्हणतायत तसं, किवा सगळ्यांचं सगळच खरं असतं. सगळ्यातलं थोडं थोडं लागू होतं. बरचसं एका मनुष्यासाठी गैरलागू होवू शकतं. यात चूक बरोबर असं नाही. कदाचित तुमचं लग्न अत्यंत वेगळ्या पद्धतीने ठरेल ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. आमच्या शेजारचे जोडपे आहे त्यांच्या फ्यामिल्यांनी दोन चार वर्षे वधू, वर शोधकार्य जोमाने केलं पण मागच्याच गल्लीत राहणारे उशिराने भेटले व लग्न पाच मिनिटात ठरलं. एरवी आजूबाजूला राहणारे सगळे लोक्स आपल्याला माहीत असतात पण यांना नेमक्या यांच्याच दोन फ्यामिल्या माहीत नव्हत्या. आपल्या अपेक्षा, आपण राहत असलेला भाग, तेथील पद्धती, मर्यादा, मोकळेपणा यांचे गणित घालून साधारण आराखडा ठरवा. काहीजण मान्यता देतील, काहीजण देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
ट
टवाळ कार्टा Mon, 01/16/2017 - 10:18 नवीन
पातेलं परत आलं?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 01/16/2017 - 11:02 नवीन
trial marriage चं बघा
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 01/16/2017 - 11:06 नवीन
आता हे काय नवीन ? (आमच्यावेळी नव्हती असली थेरं!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 01/16/2017 - 11:16 नवीन
अहो नवीन कुठे आहे हे ? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असही म्हणतात ना त्यालाच. अनिल कपूर , काजोलचा हम आपके दिल मे रहते है १९९९ चा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
संजय क्षीरसागर Mon, 01/16/2017 - 14:12 नवीन
काँट्रॅक्ट तरी कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 01/16/2017 - 14:28 नवीन
contract म्हणजे दोघांनी बघायचं की आपण एकमेकांना 'पती-पत्नी म्हणूनआवडतो की नाही' .. कुणा एकाचं उत्तर 'नाही' असलं की contract period नंतर लग्नाचा दी एन्ड, असं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 01/16/2017 - 15:38 नवीन
पण एक स्टेप आणखी पुढे . नुसती कंपेटीबिलीटी ट्राय करायला काँट्रॅक्ट तरी कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संजय क्षीरसागर Mon, 01/16/2017 - 15:39 नवीन
इज इनफ .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शब्दबम्बाळ Mon, 01/16/2017 - 14:06 नवीन
बऱ्याच लोकांनी चांगले सल्ले दिलेत, असेही मिपाकर मदतीला तयार असतातच! या गोष्टीवर सल्ला वगैरे देण्याचं माझं वय नाही पण मग गोष्टच सांगतो! इथे बऱ्याच लोकांना माहित आहे, बघा तुम्हाला काही फायदा होतो का... एकदा एक गुरु त्यांच्या शिष्याला एका बागेतून सगळ्यात सुंदर फूल आणायला सांगतो. बाग मोठ्ठी असते आणि त्यातून एक सरळ रस्ता जात असतो. पण हे काम करताना एक नियम देखील असतो की एकदा एखादे फुलझाडं ओलांडले कि पुन्हा मागे वळून त्याचे फूल घ्यायला यायचे नाही. शिष्य बागेमध्ये जातो. बराच वेळ झाल्यानंतर तो रिकाम्या हाताने गुरुकडे परत येतो. गुरु विचारतात,"रिकाम्या हाती परत का आलास?" त्यावर शिष्य म्हणतो कि," मी बागेत चालायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या झाडांना विविध प्रकारची फुले होती. कोणाचा आकार मोहक होता, कोणाचा रंग, कोणाचा सुगंध छान होता पण दरवेळी मला वाटायचं कि याहीपेक्षा सुंदर फूल मला पुढे मिळेल. मग मी पुढे चालत राहिलो आणि बराच वेळ चालल्यावर बागेच्या शेवटाला पोहोचलो! तेव्हा जाणवले तिथे असलेल्या फुलांपेक्षा आधीची फुले सुंदर वाटत होती. पण आता मागे जाऊ शकत नसल्याने मी रिकाम्या हाती आलो..." गुरु हसले आणि म्हणाले,"आकर्षण असे असत. माणसाला कायम वाटत राहत कि अजून आकर्षक काहीतरी पुढे मिळू शकेल आणि त्याला शोधत राहतो... शेवटी कायम रिताच राहतो! "आता तू असे कर, पुन्हा बागेत जा आणि तुला जे फूल सुंदर वाटेल ते घेऊन ये!" शिष्य पुन्हा जातो. यावेळी परत येताना मात्र त्यांच्या हातात एक सुंदर फूल असते. गुरु विचारतात,"हे सगळ्यात सुंदर आहे का?" शिष्य म्हणतो,"माहित नाही गुरुजी, पण जेव्हा मी हे फूल पाहिलं तेव्हा ते मला आवडले! कदाचित याच्यापेक्षा सुंदर फुले बागे मध्ये असतीलही पण मग मला त्यांच्याकडे बघण्याची गरज वाटली नाही. माझ्यासाठी हेच फुल सुंदर आहे!" गुरुजी हसले आणि म्हणाले "प्रेमाचं असे असते एकदा एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले कि ती तुमची होऊन जाते. मग त्याला गुण किंवा दोष यामध्ये तोलण्याची गरज पडत नाही" असच काहीस लग्नाबद्दल म्हणता येईल... जशी आठवली तशी लिहिलीये बर का! ;)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 01/16/2017 - 14:21 नवीन
फक्त अनुसरायला हवी. अर्थात, लग्नाच्या बागेत पुन्हा चान्सची शक्यता कमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 17:24 नवीन
खूप छान कथा शब्दबंबाळजी. मी ऐकलेली नव्हती. लग्नाच्या बागेत मात्र एकच चक्कर मारायला मिळते पण वरील कथेतला दृष्टीकोन वापरल्यास शोधाशोध सोपी होईल. धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 01/17/2017 - 05:35 नवीन
त्यावर एकच सोल्यूशने. एका वेळी एकच विंडो उघडायची, ती बंद केल्यावर पुन्हा मागे पाहाणे नाही. विंडो बंद केली की विषय संपला, नो कंपॅरीजन. याचं कारण म्हणजे कंपॅरीजन अशक्य आहे. दोन व्यक्ती पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. आणि एकदा निर्णय झाला की पुढची विंडो उघडायची नाही! नाऊ इट इज ऑल डन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Tue, 01/17/2017 - 07:05 नवीन
Yupp. हे गणित लय न्यारं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 17:45 नवीन
रेवती मॅडम, बरूबर हाये तुमचं. सगळ्यांचे विचार आयकून माझ्या टकूळ्यात प्रकाश पडतोय. एक ठोस विचार तयार व्हायला मदत होतीये. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ध्यानीमनीही नसतात अशा पद्धतीने लग्न ठरतात कधीकधी. माझ्या आत्याभावाला एका मुलीचं स्थळ आलं होतं,ती बँकेत नोकरी करायची. पठ्ठ्या गेला बँकेत, दोन तिन तासांत काय observe केलं काय माहीत पण बाहेर येऊन सुमडित मला बोलला की पोरगी पसंद आहे. नंतर मुलगी बघण्याचा फक्त औपचारिक कार्यक्रम. माझा चुलतभाऊ त्याच्या मामाच्या गावी गेला, तिथे त्याच्या लग्नाचा विषय निघाला. नेमकं तेव्हा समोरच्या घरातली मुलगी सडा टाकत होती. त्याची आजी बोलली की ही समोरची पोरगीपण आहे लग्नाची सांग कशी वाटते? गड्याला आवडली की एकाच नजरेत. कशाच बोलणं अन कशाच भेटणं. एकही पोरगी पाहली नाही त्यानं. आता मस्त चालू आहेत की दोघांचे संसार थोडक्यात This is a game of chance :)
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 01/17/2017 - 08:36 नवीन
त्याने आणि तिने थोडावेळ एकमेकांशी बोलून, समजवून घेऊन लग्न करण्याचा धोका पत्कारावा .. किंवा त्याने आणि तिने बरीच वर्षे एकमेकांना स्मजाऊन घेऊन मग लग्न करण्याचा धोका पत्करावा... :-)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 01/17/2017 - 09:16 नवीन
विवाह ही मजा आहे. फुल एंटरटेनमंट आहे. तो सहवासाचा आनंद आहे. एकटा प्रवास करण्यापेक्षा सहप्रवासी असला की जगणं मजेचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Tue, 01/17/2017 - 09:22 नवीन
हं....अहो संक्षि विनोद तरी समजावून घ्या .... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 01/17/2017 - 09:33 नवीन
पण प्रश्नकर्ता लग्नाच्या प्रतिक्षेत आहे त्याला धोक्याचा कंदील कशाला ? म्हणून प्रतिसाद दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
अ
अॅस्ट्रोनाट विनय Tue, 01/17/2017 - 12:07 नवीन
लग्न (मग ते arrange marriage असो की love marriage ) ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे. तुमची वृत्ती खिलाडू नसेल तर कुठल्याही मुलीसोबत लग्न केलं तरी ते फसेल, असेल तर ते टिकेल. अर्थात ऐकानेच समजूतदार असून भागत नाही.तिचीसुद्धा तशीच वृत्ती हवी. याअर्थाने हा धोका आहेच. पण संक्षीजींचा दृष्टीकोन कामात पडणारा आहे. आणि तुम्हाला compromise करत जगायचं नसेल तर त्यांच्या theory ला आणि विवाच्या कथेला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा