हा भेदभाव-दुजाभाव का बरं?
💬 प्रतिसाद
(16)
अ
अभिजीत मोटे
Fri, 10/03/2008 - 08:42
नवीन
काल लाल बहाद्दुर शास्त्री यांची पन जयंती होती, पन या आदर्श पंतप्रधानांबद्दल बोलताना कोणीही (राजकीय पुढारी, न्युज चेनल) दिसले नाही.
थोडक्यात काय, घराणेशाही आणी फायद्याचे राजकारण. गांधी घराण्या सारखी बाकिच्यांची घराणी मोठी नाहीत ना.......
आणी बाकीच्यांच्या नावाने राजकारण करायचे म्हणजे तोटाच जास्त.........
............अभिजीत मोटे.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 10/03/2008 - 08:54
नवीन
अभिजीतराव,
लाख बोललात.
केवळ 'माजी पंतप्रधान' म्हणुन उपकार केल्यासारखं बातम्यांमध्ये 'आज भुतपुर्व प्रधानमंत्री, स्व.लाल बहादुर शास्त्री इनकी भी जयंती है| ' फि नी श! ना आदरांजली, ना ह्याउप्पर दोन भलेबुरे शब्द ना काही.
तिकडे राजघाटावर मात्र लंगडत, फाफलत, कोलमडत पुष्पचक्र वाहणार्यांचे टेलिकास्ट्स.
येडा खवीसराव,
तुम्ही वर उल्लेख केलेल्यातल्या एकानं तरी (किंवा त्यांच्या अनुयायांनी) आपल्या विचारांचं, आचाराचं, योग-अयोग्य प्रत्येक गोष्टीचं 'सक्सेसफुल मार्केटींग' केलं आहे का?
सोप्पं आहे राव, 'बोलणार्याची मातीदेखील खपते..' अशा अर्थाची एक म्हण आहे.
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Fri, 10/03/2008 - 10:16
नवीन
तुम्ही वर उल्लेख केलेल्यातल्या एकानं तरी (किंवा त्यांच्या अनुयायांनी) आपल्या विचारांचं, आचाराचं, योग-अयोग्य प्रत्येक गोष्टीचं 'सक्सेसफुल मार्केटींग' केलं आहे का?
सोप्पं आहे राव, 'बोलणार्याची मातीदेखील खपते..' अशा अर्थाची एक म्हण आहे.
सहमत आहे.
(सावरकरभक्त) - इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/03/2008 - 11:16
नवीन
गांधी घराण्या सारखी बाकिच्यांची घराणी मोठी नाहीत
गान्धी आणि गान्धी घराणे हे वेगवेगळे आहेत मोटेसाहेब.राजकारण आणि इतिहास माहीत करुन घ्या.
म.गान्धीना कधीच घराण्याची पार्श्वभूमी नव्हती. केवळ गोपाळ कृष्ण गोखलेंमुळे ते भारतीय राजकारणात आले. म गान्धीनी अफ्रिकेत केलेल्या कार्याची इथल्या जनसामान्याना मिहितीही नव्हती.
म.गान्धीनी स्वातन्त्र्यानन्तर कोणते पद ही घेतले नाही.
टिळकांच्या निधनानन्तर भारतीय राजकारणात एक पोकळी निर्माण झाली. टिळकानीही ब्राम्हणवादाला थोडे जास्त महत्व दिले होते.
सावरकर हे सर्वसामान्य भारतीयांपर्यन्त पोहोचु शकले नाहीत. सर्वाना समावुन घेण्यासारख्या तत्वामुळे गान्धी जनसामान्याना बापु म्हणजे स्वतःच्या वडीलांप्रमाणे वाटत असत.
राजकारण करतानासुद्धा त्यानी व्यक्ती विद्वेष मनात रुजु दिला नाही. हा खरेच मोठेपणाच आहे.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
- Log in or register to post comments
र
रामपुरी
Fri, 10/03/2008 - 23:30
नवीन
म.गान्धीनी स्वातन्त्र्यानन्तर कोणते पद ही घेतले नाही.
थोडेसे बाळ ठाकरेंप्रमाणे. त्याना रीमोट हातातून जाऊ द्यायचा नव्हता त्यामुळे सरदार पटेल जास्त लायक उमेदवार असुनही नेहरू पंतप्रधान होऊ शकले. त्याआगोदर आपले महत्व कमी होऊ नये म्हणुन भगतसिंगची फाशी रोखण्यासाठी या महापुरूषाने काहीच प्रयत्न केले नाहीत. अश्या बर्याच गोष्टी आहेत. (अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत)
टिळकानीही ब्राम्हणवादाला थोडे जास्त महत्व दिले होते.
फक्त ताई महाराज प्रकरणावरून हा निष्कर्ष काढला नसावा अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
म
मैत्र
Sun, 10/05/2008 - 12:35
नवीन
मिपावर वाचलेला गणेश विसर्जनाचा केसरीमधला टिळकांचा लेख वाचला तर ब्राम्हण्यवादापेक्षा बहुजन समाजाला एकत्र कसं आणता येइल आणि पेशवाइनंतर आलेली ब्राम्हण मराठा दुफळि कमी कशी होइल यावर त्यांचा भर होता असं वाटतं..
शाळेत टिळकांना 'तेल्या तांबोळ्यांचे' प्रतिनिधी म्हणत असं इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं आठवतं...
- Log in or register to post comments
ध
ध्रुवतारा
Fri, 10/03/2008 - 08:49
नवीन
ध्रुवतारा
माझ्या देखिल मनात अशिच भावना आली होती कि आपण सगळे जण सुट्ट्या घेउन एका महपुरुषाची जय॑ती का साजरी करावि ?
उलट ह्या दिवशी त्या॑चे गुण अ॑गी कारुन अपल्याल जास्त काम करायला हवे. जसे १४ एप्रिल रोजि नागपुर मध्ये १८ तास अभ्यास करुन विद्यर्थ्या॑नी Dr. बाबासाहेब आ॑बेड्कर या॑ना जय॑ती निमीत्त अभिवादन केले होते. ह्याच प्रेरणेने प्रेरीत होउन आम्ही सगळे जण काल आमच्या कर्यालयात रात्रि १०.०० वाजे पर्य॑त काम करीत होतो. म्हणजे सर्व कमाचा अढावा घेत होतो.
- Log in or register to post comments
च
चक्शु
Fri, 10/03/2008 - 08:52
नवीन
सहमत !
- Log in or register to post comments
छ
छोटु
Fri, 10/03/2008 - 09:48
नवीन
माझ्या देखिल मनात अशिच भावना आली होती कि आपण सगळे जण सुट्ट्या घेउन एका महपुरुषाची जय॑ती का साजरी करावि ?
सहमत !!!!!!
- Log in or register to post comments
श
शुभा
Sat, 10/04/2008 - 08:21
नवीन
आरे येद्या खविसा तुझ्या हतात आसेल तर इन्क्म सेल्स एकसाइस ईत्यादि सर्कारि खात्यानि दुस्रा पर्याय घेत्ला तर बघ नाहितरि ते काम कर्तात त्याचा त्रासच असतो
- Log in or register to post comments
घ
घासू
Sat, 10/04/2008 - 09:53
नवीन
बरोबर आहे तुमच॑. हा भेदभाव का? गा॑धीजी मोठे आणि बाकि सर्व ....अस॑च आजकालच्या राजकारण्याच मत आहे. गा॑धीजी महान आहेतच पण याचा अर्थ असा नाही कि बाकिच्याची देशभक्ती कमी होती. गा॑धीजी॑ना इ॑ग्रजानी मारल॑ नाही तर आपल्याच देशातील एकाने त्या॑ची॑ हत्या केली हे सुद्धा विचार करण्यासारख॑ आहे.
घासू
- Log in or register to post comments
अ
अभिजीत मोटे
Sat, 10/04/2008 - 10:00
नवीन
विजुभाऊ गांधीबद्दल मला पन आदर वाटतो हो. मी ज्या गांधी घराण्याबद्दल बोललो ते इंदीरा गांधी पासून सुरू होते. मूळ गांधी घराण्यातिल कीती लोकं आता प्रसिध्दी झोतात आहेत. तूषार गांधी थोडेफार माहीत आहेत.........
बाकी राजकारण आणि इतिहास माहीत करुन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करेन.
............अभिजीत मोटे.
- Log in or register to post comments
क
कवटी
Sun, 10/05/2008 - 12:55
नवीन
सुट्टी देउ नये अश्या मताचा आहे मी.
काय आहे हे लोक सुट्ट्या देतात आणि ड्राय डे पण ठेवतात. एक तर सुट्टी द्या नाहितर ड्राय डे करा. दोन्ही एकत्र आल्याने फार गोची होते राव.
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Sun, 10/05/2008 - 13:05
नवीन
मग स्टॉक करुन ठेव ना भौ!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 10/08/2008 - 06:13
नवीन
=))
लै जोरात सहमत आहे!
-(जबरदस्तीमुळे ड्राय) ध मा ल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 10/07/2008 - 21:35
नवीन
खवीसराब,
आपले म्हणणे रास्त आहे!
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
- Log in or register to post comments