काका,
फुलवा यांच्या कवितेच्या साच्यातील कविता आवडली.
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......
हे खुपच छान जमले आहे.
:)
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......
काका, माझ्याही मनातलं बोललात!
अदिती
प्रातिनिधिक कविता. जो अनुभव दिवंगत नातेवाईकांबद्द्ल तोच कमी अधिक फरकाने गतकाळाबद्दल इन जनरल असतो. जुन्या स्मृती असतात , परंतु त्या काळाशी असणार्या नात्याचे रेशीमधागे हळुहळू क्षीण होत जातात. प्रस्तरांवर नवे थर चढतात तसे काळ आपल्यावर नवेनवे लेप देत रहातो. प्रसंगी एखाद्या एकेकाळाच्या जिवाभावाच्या व्यक्ती/गोष्टीबद्द्ल सुद्धा आपली अवस्था "हां भई, ऐसा था कुछ कभी" अशी होते.
प्रस्तुत कवितेत आईच्या उल्लेखामुळे एकूण परिणाम गडद होतो.
डांबिसखान , हसवत हसवत रडवता आणि रडू आले की पुन्हा नॉटीनेस करता. त्यामुळे चिमटीत येत नाही. नॉट फेअर हां ! सांगून ठेवतंय् ;-)
भलताच नॉटीपणा.
गुंतागुंतीच्या भावनांना हात घातला आहे.
"आई तुझी आठवण येते, रोज रडू येते", या भावना विरहानंतर लगेच असतात. पण कालांतराने जी अर्धवट विस्मृतीतली हुरहुर असते, त्याचे वर्णन क्वचितच आपण वाचतो, बोलतो.
काहीकाही अगदी जवळच्या असलेल्या गोष्टी काही काळाने 'डिस्टंट पास्ट' असाव्यात अशा दूरच्या आणि आपल्या हृदयाच्या जवळ नसलेल्या अशा वाटू लागतात खर्या!
बोच वाटते, पण दुखतेच असे नाही. वाईट वाटते पण डोळे भरुन येतातच असे नाही. आपलेपण वाटतोही आणि काहीच आपले नाही असेही वाटते.
अशा दुखर्या नसांना हात लावता अधून मधून आणि डांबीस नाव सार्थ करता! [(
चतुरंग
काका, कविता आवडली.
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......
ह्या ओळी तर खासच... काळजाला भिडल्या.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
मी खूपदा आई बाबांना विचारते की तूम्हाला तुमच्या आई बाबांची आठवण येत नाही का?तुम्ही फारस कधी काही बोलत नाही.
ते एवढस म्हणतात ये ते ना.मग काय?
माझ्या प्रश्नाच उत्तर तुमची कविता असेल.
मस्त आहे.
मीनल.
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
खुप छान लिहिलंय पिडाकाका...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
पि डां काका अगदी मनातलं लिवलत भौ.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी