लेखन आणि लेखकास वाचवावे की वाचवू नये ?
आंतरजालावर मराठी भाषी संस्थळे येण्यास २० वर्षे झाली याच प्रगतीची एक बाजू बरेच जण वेगवेगळ्या मराठी संस्थळांवर पडीक असतात, आणि त्यात वावगे असे काही नाही प्रत्येक संस्थळाच्या एक मंच म्हणून उजव्या बाजू असतात तसे मर्यादाही असतात. जसे एका बाजूस मोठावर्ग पडीक प्रस्थापीत संस्थळाधीपती झालेला आहे, तसे दुसर्याबाजूस आम मराठी नागरीकास वेगवेगळी मराठी संस्थळे आणि विकिपीडिया प्रकार काय आहेत याची काहीच कल्पना नसते, जिथे आधी पोहोचलो तेथे आधी लिहावे एवढेच त्यांना त्या क्षणी समजत असते,
लेखन आणि लेखक टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; त्यांच्या लिहिण्याच्या जागा आणि संस्थळांचे लेखन संकेत पाळले न गेल्यास नवागत लेखकांचे लेखन आणि लेखकास हाकलून लावण्यास क्षणही लागत नाही. नव्या पिढीचा मराठी माणूस मराठीपासून दूर जात असताना हि आलेल्या नव्या होतकरु लिखाणास हाकलून लावण्याची ऐष खरेच परवडणारी आहे का ?
मराठी विकिपीडिया वरुन परिघात न बसणार्या दोन कविता आज इकडे टाकल्या आणि नंतर इमेलने लेखकांपर्यंत संदेश पाठवला, त्यामुळे मिसळ्पाव माहीत नसलेला एक कवि एक लेखक एक नवा मराठी वाचक इकडे जोडला जाईल हा साधासा विचार, पण या कविता धाग्या खाली जे काही छिद्रान्वेषण चाललेले आहे , त्यामुळे नविन कवि लेखक आणि वाचकांचा आणि लेखन वाचवण्याचे कर्म करणार्या माझ्यासारख्या नाचीजचा उत्साह कसा वाढू शकेल ?
मराठी विकिपीडियावर "धोरणी, मुत्सद्दी कोण ? मराठे की इंग्रज?" या बद्दल दोन तीनच परिच्छेद कुणीतरी लेखकाने मुद्देसुदपणे मांडले आहेत पण दुर्दैवाने मराठी विकिपीडियाच्या परिघात बसणार नाही हे निश्चित आहे, ते मराठी विकिपीडियावरुन वगळल्या नंतर त्या लेखकाने त्या लेखनाची स्वतःची प्रत जतन केली आहे नाही केली आहे केली असेल तरी त्याला मिसळपाव सारख्या संस्थळाची लगेच माहिती होईल कि नाही काहीच माहित नसते. तर अशा लेखन आणि लेखकास वाचवावे की वाचवू नये ?
आपण अज्ञात म्हणू इच्छिता ते कसे ?सगळ्यांशी अपरिचित असलो तरी माझ्या लेखनावर मी प्रतिसाद देऊ शकतो तसा तुमचा लेखक / कवी देऊ शकत नाही. समोरची व्यक्ती अज्ञात असल्यामुळे अशा लेखनाशी रिलेट होता येत नाही.अविचारी मठाधिपतींशी वाद नको म्हणून ते आता फिरकतील किंवा कसे या बद्दल शंका असू शकेल-हे कोण ?विचारपुर्ण कृती येथल्या मठाधिपती मिपाकरांनाच करता येतात आणि इतरांना करता येत नाहीत असे काही आहे किंवा कसे ?म्हणजे नक्की काय ? ज्या सदस्यांकडून तुम्हाला प्रतिसाद अपेक्षित आहेत ते जर विचार करु शकत नाहीत असं वाटत असेल तर मग लेखन इथे प्रकाशित करुन उपयोग काय?जसे एका बाजूस मोठावर्ग पडीक प्रस्थापीत संस्थळाधीपती झालेला आहे"समाजाच्या उपगट करण्याच्या प्रवृत्तीपेक्षा" जास्त काही पुरावे आहेत का यासंबंधी ? नसल्यास, ही प्रवृत्ती अटळ वस्तूस्थिती (constrain) आहे असे समजून काम करावे. कुरबूर करून काही सकारात्मक फरक पडणार नाही.लेखन आणि लेखक टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातहे वाक्य शिष्ट (condescending) वाटते आहे. मुळात, एखाद्या लेखकाला वर आणण्यासाठी खास प्रयत्न करणे हे गटबाजी (पक्षी : कंपूबाजीचे) लक्षण नाही काय ? चांगल्या लेखनाचे योग्य तेवढे कौतूक करणे, त्यावर सकारात्मक टीका करणे ठीक आहे. मात्र, लेखनाच्या प्रतीशिवाय इतर कारणांनी लेखनाला टेकू लावणे अनितीकारक व विरुद्धपरिणामी (counterproductive) होईल. लेखनाचे भले इच्छिणार्यांनी, लेखनासाठी व्यासपीठाची संधी खुले करून देणे, हे नक्कीच सकारात्मक व स्पृहणिय पाऊल आहे. अश्या प्रयत्नांचे श्रेय ते प्रयत्न करणार्यांना जरूर मिळायला हवे. त्याचबरोबर, मुळात दम नसलेल्या लेखनाला कितीही टेकू लावला तरी काही काळाने का होईना पण ते कोसळणारच. म्हणजेच, चांगले लेखक/लेखन त्यांच्या लेखनाच्या कसावर आणि प्रयत्नांच्या चिकाटीवर यशस्वी व्हावेत/होतात/होतील हे पण तितकेच खरे आहे, ते त्यांचे श्रेय लेखकांकडेच असू द्यावे. ***************