पासपोर्ट बद्दल मदत
माझ्या एका मित्राचा पासपोर्ट बद्दल मदत हवी आहे. त्याने सर्व सोपस्कार पार पडले परंतु पोलीस मामांना त्यांची दक्षिण दिली नाही.(याच्यासाठी भरपूर काही लिहायचे आहे पण तूर्तास विषयाकडे वळूयात ) त्यामुळे त्यांनी adverse रिपोर्ट फाईल केला आहे. त्याचे पोलीस वेरिफिकेशन साठी खूपदा फोन करून देखील त्याच्या घरी पोलीस आले नाही. ३-४ वेळेला त्याने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठले आणि चौकशी केली तेव्हा आज येऊ उद्या वेळू अशी थातुर मातुर उत्तरे मिळाली. शेवटी ५ व्य वेळेला त्याचे वेरिफिकेशन झाले आणि ते करण्यासाठी त्याला स्वतःहून पोलीस स्टेशन मध्येजावे लागले. त्याने लागणारे सर्व कागदपत्रे पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कोणतेही इतर कागदपत्र द्या किंवा आहेत या कागदपत्रांमध्ये काही उणिवा आहेत असे काही हि सांगितले नाही. नेहमी प्रमाणे पोलीस मामांनी दक्षिण मागितली तेव्हा त्याने देण्यास नकार दिला. त्यावेळेला तो पोलीस काही हि बोलला नाही.
पुढच्या आठवड्यामध्ये त्याला समजले कि आपल्या पासपोर्ट मध्ये पोलिसांनी adverse शेरा दिलेला आहे.
त्याने पुढे काय करावे? त्याचे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत तसेच कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये. परंतु पोलिसांनी काहीतरी प्रॉब्लेम काढलेला आहे. (सध्या तो नेमका काय आहे ते online समजत नाहीये ) जास्त करून तो रहिवासी पुराव्याशी निगडित असण्याची शक्यता आहे.
तर आता या पुढे त्याने नेमके कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत जेणेकरून पासपोर्ट लवकरात लवकर मिळू शकेल.
मिपावर असा कोणाला काही अनुभव आहे का ?
हि घटना ऐकल्यानंतर नंतर पोलिसांची थोडी स्तुती करण्याची खूप इच्छा होत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त २ शब्द. ..
या आणि अश्या पोलिसांशी निगडित असलेल्या इतर खूप घटना मी फार जवळून पहिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हि च सर्वात मोठी चोरांची टोळी आहे असे माझे वयक्तिक मत आहे. इथे कोणी पोलीस मिपाकर असतील तर त्यांना साष्टांग प्रणाम.
म.पो ( महाराष्ट्र पोलीस ) (मला पोसा)
नव्व्याणव टक्के पोलीस हे लाचखाऊ आणि भ्रष्ट असतात.म्हणजे नोटाबंदीनंतर सुद्धा हे चालूच आहे ? आणि म्हात्रे सरांना याची कल्पनाच नाही ?आणि म्हात्रे सरांना याची कल्पनाच नाही ?संक्षी, तुमच्यासारख्या महान विभूतिला चक्क असे (स्वतःला उत्तर माहित नसलेले) प्रश्न पडतात ???!!! तुम्ही विसरले असल्याचे दिसत असल्याने, कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याच्या तुमच्याच्च कृतीची आठवण करून देत आहे.... नेहमीप्रमाणे, हा प्रश्नही तुमच्या मनाच्या कंप्युटरमध्ये टाकून त्याला बंद करा. म्हणजे त्या बंद (कोण तो म्हणतोय रे... बिघडलेल्या) कंप्युटरमधून नेहमीप्रमाणे "सर्वव्यापी, सर्वकालीन, सर्वसामायक, इत्यादी, इत्यादी, इत्यादी" असे केवळ आणि केवळ तुम्हालाच्च माहीत असलेले आणि तुम्हालाच्च पटणारे उत्तर मिळेल.विसरलात ?!(अतीअतीआश्चर्यदर्शक स्मायली कल्पावी)खास सूचना : १. संक्षी, तुमच्यासारख्या स्वघोषित अध्यात्मिक अधिकार्याला, असा "आपल्या मनातील कलुषितपणा, दुखर्या जखमेसारखा, दीर्घकालापर्यंत कुरवाळत राहणे" आणि ते करताना "दुसर्याच्या एखाद्या गंभीर धाग्याचे असंबंध अवांतर करणारी राळ उडवणे" शोभा देत नाही ! अरेरे, असे मानसिक अधःपतन अध्यात्मिक मनःशांतीचा भंग झाल्याचे लक्षण आहे असे म्हणतात ! हे पाहून तुमच्या बिचार्या (काल्पनिक) चेल्यांच्या मनाला किती यातना होतील याची तरी थोडीशी फिकीर करा !!! २. तुमचा वरचा खवट प्रश्नार्थक प्रतिसादच्च शेवटटाच्च आहे, असे तुमच्या समाधानासाठी जाहीर करत आहे. तेव्हा, उगा अजून काहीबाही लिहून धाग्याचे काश्मीर करण्याचा विनोदी प्रयत्न करू नये. केल्यास त्याला दीर्घकालीन कलुषित मनाचा दुसरा ईनोद असे समजून फाट्यावर मारण्यात येईल. धन्यवाद !
स्वामीजी'ही एकमेकांना संबोधण्याचीकॉमन प्रणालीआहे.ते विशेष नाम नाही.कधीही तिथे जाऊन पाहा किंवा ओशोंच्या कुणाही साधकाला विचारा. तुम्ही निष्कारण व्यथित होतायं.त्या पोलिसाला पण वरती विचारणारे असतात हे विसरू नका.माझ्या मते लाच ही फक्त सरकारी काम लवकरात लवकर व्हावी यासाठी असते. लाच घेतलेली असली तरी काम हे पूर्णपणे कायदेशीर च असायला पाहिजे याची खातरजमा केल्याशिवाय कोणी ही सरकारी अधिकारी/कर्मचारी कोणत्या ही कागदावर सही करणार नाही.हे एकदम बरोब्बरे!तुमच्या मित्राने लाच द्याची नाही हे ठामपणे ठरवलेच असेल तर किती ही वेळ जाऊ द्या शेवट पर्यंत माघारी घेऊ नका.काय बोललात ! आपली चूकच नसेल तर लाचेचा प्रश्नच येत नाही.माझ्या मते लाच ही फक्त सरकारी काम लवकरात लवकर व्हावी यासाठी असते.याच्याशी सहमत आहेच. मी जेव्हा प्रॅक्टीस सुरु केली तेव्हा हा प्लॅक माझ्या चेअरमागे लावला होता :`If you do not have integrity & patience, you have come to a wrong place'आणि त्यामुळे आजपर्यंत आणि कायमच निर्धास्त राहीलोयं !