अंबरनक्षी
अंबरनक्षी
======
सुखाच्या जाणिवेपोटी
निद्रीस्तदामिनी झाली
नेणीवलकेर लहरता
निर्झरली शब्दमाऊली
उरले ना रितेपण रिते
आठवसाठले रांजण
डोळ्यातील आसवांनी
आता भरले गं आंगण
त्या क्षितिजरेषेवरती
झेपावला मानसपक्षी
विलंबित जलदांसाठी
उमलली ही अंबरनक्षी
ही सांज ढळण्याआधी
तेवते गाभारसमई
स्मरणातील उत्सवसंध्या
पांघरते गर्दनिळाई
- सांजसंध्या
4.6.2017
प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली.मग तुम्ही स्वतःच विचारतायं : २)नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ?आता या अर्थव्यक्तीसाठी तुमची शब्दयोजना पाहा : नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली म्हणजे कुठल्या तरी बॅकमेमरी `नेणीवेत लहरल्यामुळे', सुखाच्या जाणीवेनं `झोपलेल्या प्रतिभेतून' ही कविताझरलीआहे ! असा स्टार्टींगलाच घोळ आहे. ३) पुढे अशा ओळी येतात : त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी अर्थविदित करतांना तुम्ही म्हणता कीक्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पनाथोडक्यात, तुमचा मानसपक्षी अनुभवातल्या अमर्याद शक्यता व्यक्त करण्यासाठी ऑलरेडी क्षितीजाकडे झेपावला आहे. तुम्ही पुन्हा त्याला मागे खेचतायं (विलंबित जलदांसाठी) कारण बरेच दिवस पाऊस (कविता) झालेला नाही. शिवाय क्षितीज आणि आकाश या एकमेकांना बिलगून असलेल्या गोष्टी आहेत. आता मन त्या अमर्याद शक्यतांचा वेध घेणार का प्रतिमांची ही गर्दी (अंबरनक्षी) पाहाणार ? याला बॅक-अँड-फोर्थ ऑफ इमॅजिनेशन म्हणतात. थोडक्यात अभिव्यक्त काय करायचं याची निश्चिती नसल्यामुळे अनेक कल्पनांची भाऊ गर्दी होते. मग अशा कल्पना अगम्य शब्दात बसवायचा प्रयत्न होतो. परिणामी कविता अर्थहिन होते. तुम्हाला चांगली कविता करायची असेल तर दोन गोष्टी करा : १) काव्यविषय हा एकसंध उत्कट अनुभव असला पाहिजे आणि कविता त्या अनुभवाशी इमान राखणारी असायला हवी, आणि २) इथल्या लल्लू-पंजू सदस्यांचे ज्यांना कवितेतलं काही गम्य नाही, रिमार्क फाट्यावर मारा.