शाळेत जाऊन खरोखरच काहीआर्थिक फायदा होतो का? किंवा शाळेत जाऊन इथे कुणाला काही आर्थिक फायदा झाला आहे का?
डिस्क्लेमर : खालील काही अनुभव हे माझे वैयक्तिक आणि काही कौटुंबिक आहेत. त्यात जराही सरसकटीकरण नाही. चुकुन माकून सरसकटीकरण जाणवल्यास, ती माझ्या लेखनातील किंवा माझे विचार मी व्यवस्थित पणे नी ट मांडू शलो नाही, ह्याची असेल. मी सर्वज्ञ नाही.
आमची प्रेरणा : तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ? http://www.misalpav.com/node/40012
हा वरील धागा (http://www.misalpav.com/node/40012) वाचला आणि मी परत भूतकाळात गेलो.प्रत्येक क्षणी वर्तमान काळात मला तरी जमत नाही.
दहावीला मी कसा काय पास झालो? ह्याही पेक्षा मी शाळेतच का गेलो? ह्याचा मला मूलभूत प्रश्र्न पडला.शाळेतील कुठलेच शिक्षण मला व्यवहारात उपयोगी पडले नाही. शाळे नंतरचे शिक्षण जरी इंजिनियरिंगचे घेतले तरी ते शिक्षण घेतांना माझी मानसीक कुचंबणा मात्र खूप झाली. (ह्या मानसीक त्रासाचा मात्र व्यवहारात खूप उपयोग झाला. आता मी कुठल्याही सार्वजनिक वाहनाची, कितीही वेळ वाट बघू शकतो.नशीबात असेल तर ते वाहन नक्की मिळते.चिकाटी मह्त्वाची.)
डिप्लोमाच्या वेळी नातेवाईक फार चिंतेत असायचे.आता ह्या वर्षी तरी हा बाबा पास होणार का? इतकी वाट आमच्या कुटुंबातील एका हुषार विद्यार्थ्याच्या (तो खरोखरच विद्यार्थी होता.परिक्षार्थी न्हवता.) दहावीच्या निकालाच्या वेळी पण त्यांनी कधी दाखवली नाही. त्याला दहावीला त्या काळी ९०% गूण मिळाले पण बोर्डाच्या मेरीट लिस्ट मधील त्याचा क्रमांक एका गूणाने गेला.त्याच वर्षी मी पण नेमका एका विषयात पास झालो.त्यामुळे त्याच्या दू:खा पेक्षा ही , हा बाबा एक स्टेप पुढे गेला ह्याचाच आनंद बर्याच जणांना झाला.
डिप्लोमा झालो, हातात निकाल यायच्या आत, नौकरी पण मिळाली. पुढे त्यात रस पण निर्माण झाला.अनुभव मिळत गेला आणि मग बर्यापैकी पैसा पण मिळत गेला.अर्थात ह्यात नशीबाचा भागच जास्त.
पण माझी आवड शेतीची हे मात्र मला वयाच्या २७व्या वर्षी समजले. शाळेत जर मी वयाच्या ६व्या वर्षी गेलो असेन तर जवळपास २० वर्षे माझी वायाच गेली.कारण आमच्या पिताश्रीं कडे त्यावेळी पण माझ्या साठी शेती विकत घ्यायला पैसे होते.
मुळात मी शाळेत काय शिकलो....तर फल्त लिहायला आणि वाचायला शिकलो.बरे शाळेत आपल्याला हवे ते विषय घेता येत नाहीत.मला खरे तर भाषा हा विषय आवडायचा.त्याकाळात हिंदी सिनेमे बर्यापैकी बघायला मिळायचे, त्यामुळे हिंदी बर्यापैकी यायची. म्हणजे मी जे काही त्या भाषेत बोलायचो, ते इतरांना समजायचे. म्हणजे , तुम शोधो. आई बाहेर गई है, आज मै और मेरा भाई पिक्चर देखेंगा.....
खरे तर भाषा ही बोलणे-ऐकणे ह्याही व्यतिरिक्त देहबोलीतून पण व्यकत होत असतेच. पण शाळेत व्याकरण शिकवायचाच जास्त प्रय्त्न केला जातो. कर्मणी प्रयोग काय? कर्तरी प्रयोग काय? आणि आता हे दोन कमी म्हणून पण मग परत भावे प्रयोग आहेच.
आपण संभाषण करतांना कधीच ह्या प्रयोगांकडे लक्ष देत नाही. निदान मी तरी नाही.संभाषण होणे महत्वाचे.
जी गोष्ट भाषेची तीच गोष्ट इतिहासाची. मुळात आपला इतिहासच फार वेगळ्या तर्हेने शिकवला जातो. छ. शिवाजी राज्यांना स्वराज्य स्थापन करावे असे का वाटले? संभाजी राज्यांचा वध औरंगजेबाने कसा केला? ह्याचा इतिहास शाळेत शिकवत नाहीत. किंबहूना कुठल्याच शाळेत इतिहासाला महत्व दिले जात नाही.शास्त्र आणि गणित शिकवणारे तेच खरे शिक्षक.बाकी इतर विषयांना काय कुणीही चालतील, अशीच भावना असायची.
पुढे विविध शाळेत भेटी देण्याचा योग आला.
ज्याला काहीच येत नाही तो शिक्षक होतो. असेच माझे आजकाल मत झाले आहे.
ज्याला उत्तम गूण मिळाले आहेत ते डॉक्टर, इंजिनियर्,सी.ए.,वकील,आय.ए.एस.,कारकून होतात आणि ज्याला दहावीत ६०-७० टक्क्याच्या आसपास गूण मिळाले आहेत ते शिक्षक होतात.जो आय.आय.टी.त शिकलेला आहे आणि तरी पण शाळेत शाळेत शिकवत आहे, असा शिक्षक मला तरी दुसरा भेटलेला नाही. (एकमेव उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील भरत करमरकर. आय.आय.टी.ला प्रवेश मिळण्या इतकी बुद्धीची पात्रता असून देखील, बी.एस.सी. करून खेड्यात शिकवणारा.) डोंबिवली सारख्या (सो कॉल्ड) सांस्कृतीक जाग असलेल्या शहरातील ही स्थिती आहे, होती आणि असेल.
आपल्या आय.आय.टी. झालेल्या मुलाला किंवा मुलीला जाणीवपुर्वक शिक्षक करणारे पालक पण अद्याप मला भेटायचे आहेत.
शात्र हे प्रयोगशीलच असते.पण काही ठरावीक विद्यार्थ्यांना हे विषय समजले की, सगळ्याच वर्गाला हे विषय समजले असे शिक्षकांना वाटते. पाचवी पर्यंत मी शंका विचारायचो. मृदा म्हणजे काय? ही मी विचारलेली पहिली आणि शेवटची शंका.त्याचे उत्तर "आले, "गप्प बैस." मुकाट दहावी पर्यंत शिकलो.बरे हे विषय मुद्दाम कठीण का करतात? खरे तर दहावी नंतर शात्रा आधारीत पुढील सगळेच सिक्षण इंग्रजी भाषेतून. मग त्याची पूर्व तयारी आधी पासूनच का करून घेत नाहीत?
उगाच डिस्टिलेशनला उर्ध्वपातन, डायमीटरला व्यास असे नामांतर कशाला? बरे ठीक आहे तुम्ही करा नामांतर पण मग ते शब्द इंग्रजीच्या पुस्तकातून तरी शिकवा. तर इंग्रजीच्या पुस्तकात असते तरी काय? तर सीता, अहमद आणि गोपाळ (ह्या "गोपाळाला" पण म्हणतांना गोपालच म्हणायचे, कारण काय तर इंग्रजांना "ळ" , "ट" आणि "ण" म्हणता येत नाही. इंग्रज गेले पण जातांना गुलामांची मानसिकता मात्र तशीच ठेवून गेले. असे माझे मत.)
माझ्या अकरावीचे पहिले २ दिवस तर सेंटर म्हणजे केंद्र आणि रेडियस म्हणजे त्रिज्या हे समजण्यातच गेले पण मग तिसर्या दिवशी जिमचा पत्ता मिळाला आणि मग मी संपूर्ण ११वी आणि १२वी जिम मध्येच काढली.फक्त प्रयोगा पुरतेच प्रयोगशाळेत जायचो. मित्र जे काही त्यांच्या वहीत उतरवतील ते घरी जावून उतरवून घ्यायचो. जावू दे ते फारच रम्य दिवस होते. बाप जेवू घालत होता आणि मित्र सांभाळून घेत होते.( मित्रांच्या बाबतीत मात्र मी भलतच नशीबवान, देवाने अतिशय उत्तम मित्र दिले.)
("मृदा म्हणजे माती", हे समजे पर्यंत दहावी पास झालो आणि शिक्षणाची माती होणे म्हणजे काय? हे मात्र पुढे शेती करतांना जाणवले.)
एखाद्या विषयात जर एखाद्या मुलाला/मुलीला रस नसेल तर मूद्दाम तो विषय का शिकवला जातो? मी आणि माझा मित्र तर, गणित आणि शात्र ह्या विषयांना फुली-गोळा आणि भेंड्यांचे विषय असेच म्हणायचो. असे करतांना पकडल्या गेलो तर वर्गा बाहेर उभे रहायची मस्त सिक्षा मिळायची. मग बाहेर अजून एका बाहेर उभ्या असलेल्या मुलाला वाकुल्या दाखवायचो. कधी-कधी वर्गात उभे रहायची पण शिक्षा मिळायची.आपण म्हनजे लाई भारी, असेच वाटायचे.
सुरुवाती-सुरुवातीला, शाळेतील सगळ्यात आवडते विषय म्हणजे, संगीत,सारिरीक शिक्षण, चित्रकला,हस्तकला आणि चित्रकला, पण ह्यात देखील पुढे अनावश्यक गणिते आणि सूत्रे आली आणि आमची त्या-त्या विषयातली गोडी पण कमी होत गेली.चंगले खो-खो खेळायचे सोडून (खरे तर खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी हे खेळ १० बाय १२ फूटाच्या खोलीत पण खेळता येतात आणि गाणे तर कुठेही म्हणता येते. रागदारी किंवा रागातील कोमल स्वर म्हायीत नसलेली व्यक्ती पण उत्तम गायक होवू शकते (आणि जर त्या व्यक्तीच्या पालकांना तसे वाटत असले तर योग्य त्या गुरुंकडे त्या व्यक्तीला पाठवतीलच की... (त्या व्यक्तीच्या मनात असले तरी हे असे उफराटे धंदे करायला बरेचसे पालक तयार होत नाहीत) पण मग उगाच आमच्या सारख्या दगडांना हा त्रास कशाला?
त्यामुळे उगाच शाळेत जाऊन माझ्या आयुष्यातली सगळी कुमार वयातली आणि थोडी पौंगडावस्थेतील वर्षे वायाच गेली.
पण ह्याचा फायदा मात्र मला माझ्या मुलांची शेती करतांना झाला. दोघांना एक वाक्य सांगूनच शाळेत पाठवले, तुम्ही कधीही शिक्षण सोडू शकता.शाळा तुम्हाला एखादे सर्टिफिकेट देईल पण कुठलेही व्यावसायिक शिक्षण मात्र घ्या.चपला शिवा किंवा कपडे, पण मिळवलेला प्रत्येक रुपया स्वकष्टाचा मात्र असू दे.
O' Canada...! Oh, Bihar...! What a Contrast...!
Canadian Cabinet : 1) Minister of Health is a Doctor. 2) Minister of Transport is an Astronaut. 3) Minister of National Defense is a Sikh Veteran. 4) Minister of Youth is under 45. 5) Minister of Agriculture and Agri-Food is a former Farmer. 6) Minister of Public Safety and Emergency Preparedness was a Scout. 7) Minister of Innovation, Science and Economic Development was a Financial analyst. 8 ) Minister of Finance is a successful Businessman. 9) Minister of Justice was a crown Prosecutor and is a First Nations leader. 10) Minister of Sport, and Persons with Disabilities is a visually impaired Paralympian. 11) Minister of Fisheries and Oceans, and Canadian Coastguard is Inuit. 12) Minister of Science is a Medical geographer with a PhD. 13) Minister of Immigration, Citizenship and Refugees was an Immigration critic. There are Scientists in the Cabinet, and it is made up of 50% Women...!Now see this...
Bihar Cabinet : A Look at the Bihar Cabinet and the Educational Qualifications of the Ministers : 1) Nitish Kumar - Chief Minister, Home, General Administration - (Bachelor Of Engg.) 2) Tejaswi Yadav - Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare - (Ninth std Fail) 3) Tej Pratap Yadav - Health, Irrigation, Transport - (Twelfth Fail) 4) Abdul Bari Siddiqui - Finance - (Twelfth) 5) Vijendra Prasad Yadav - Electricity - (Tenth Fail) 6) Lalan Singh - Drinking water - (Eighth Std) 7) Manju Varma - Social Welfare - (Twelfth) 8 ) Manmohan Jha - Land development - (Seventh) 9) Madan sahini - Fertilizers - (Tenth Std) 10) Ashok Choudhary - Education & IT (Tenth Std) 11) Vijay Prakash - Labour - (Fifth Standard) 12) Ram Vichar Rai - Agriculture(10th pass) 13) Kapildev Kamath - Panchayati Raj - (Third Std) 14) Santosh Nirala - SC/ST Welfare - (Twelfth) 15) Abdul Jaleel Masthaan - Programme Implementation - (Eighth Std) 16) Abdul Gafoor - Minority Welfare - (Tenth Std) 17) Chandrika Rai - Transport (MA, Patna University) 18) Maheswar Hajari - Urban Development - (Twelfth) 19) Chandrashekar - Disaster Management - (Fourth std) 20) Jaykumar singh - Industries And Science and Technology - (Tenth Std) 21) Anitha Devi - tourism - (Twelfth Failed) 22) Awadesh Singh - Animal Husbandry - (Fifth Standard) 23) Muneshwar Choudhary - Mines and Geology - (Twelfth) 24) Krishnanandan Verma - Law - (Eleventh) 25) Khurshid Feroz Ahmed - Sugarcane Industry - (Fifth std) 26) Shailesh Kumar - Village Administration - (Second Standard) 27) Alok Mehta - Co-operatives - (Third standard) 28) Shravan Kumar - Village Development - (Twelfth Standard) 29) Shivachandra Ram - Arts and Culture - (ILLITERATE)" आता बोला ! मी ताडून पाहिले नाही आणि या संदेशात काहीशी अतिशयोक्ती असू शकते... पण लालूच्या दोन सुपुत्रांची (तेजस्वी यादव, Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare (नववी नापास) आणि तेजप्रताप यादव, Health, Irrigation, Transport (बारावी नापास)) शैक्षणिक पात्रता जगजाहीर आहेच. तेव्हा... जर केवळ आर्थिक फायदा हवा असेल तर फुका शिक्षणात वेळ न घालवता अशिक्षित राजकारणी होणे सर्वात जास्त फायद्याचे ;) :D