मोदीं सरकारची ३वर्षे
बस हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. टिव्हिवर ही आणि अशाप्रकारच्या बर्याच जाहिराती पाहुन भारावुन गेलो होतो. यावेळेस मत मोदींनाच द्यायचे असे ठरविले.
मिडीयात सातत्याने येणारा गुजरातचा विकास त्याच्या बातम्या, देशाला गुजरातसारखेच प्रगत करणार वैगरे ऐकुन, वाचुन देशाला एक विकासपुरूष मिळणार याची खात्रिच झाली होती.निवडणुकीच्या काळात देशाला मोदींची किती गरज आहे काँग्रेस कशी भ्रष्ट आहे यावरच चर्चा चालायच्या.
काही मित्रांना मोदी हे हिंदुत्ववादी असल्याने आवडत होते. हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असे त्यांचे म्हणने होते. मला मात्र हिंदुत्व वैगरे गोष्टित रस नव्हता. दलित असल्याने हिंदुराष्ट्र या शब्दाची भिती वाटे. हिंदुराष्ट्र झाले तर पुन्हा जुन्या वर्णव्यवस्थेला बळ मिळणार आणि ज्या वाईट अवस्थेतुन आंबेडकर साहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन आम्हाला बाहेर काढले त्याचे खच्चिकरण करण्याचे प्रयत्न होणार याची भिती वाटे. पण मोदींनी संपुर्ण प्रचारात धार्मिक मुद्दे काढले नाहित. सबका साथ सबका विकास यावरच त्यांचा भर राहिला.मोदींनी मनावर मोहिनी केली .
अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार भारतात आले. त्याला आता तिन वर्ष होउन गेली. ह्या तिन वर्षात काही ठोस असे झाले नाही असे वाटतेय. नोटबंदीने जीव नकोसा केला होता.एकीकडे देशातील जनतेला कँशलेस व्यवहार करा सांगायचे दुसरीकडे चारहुन जास्तवेळा बँकेत आलात तर अमुक तमुक रुपये चार्ज द्यावा लागेल अशी व्यवस्था करायची। त्यात आता जिएसटी काय करतोय कुणास ठाउक.
काही मित्रांच्या मते याचे फायदे पुढे दिसतील मोदी योग्य मार्गावर आहेत. काही कळेनासे झाले आहे. मात्र एक गोष्ट नक्की काँग्रेसच्या काळात हा १०००० कोटींचा तो २०००० कोटींचा घोटाळा झालाय असे ऐकायचो पण सामान्य माणसाला झळ लागायची नाही आता मात्र झळा जाणवतायत.
नक्की ह्या सरकारने देशपातळीवर काही चांगले बदल घडवलेत का? भविष्यात आता मोदी जे निर्णय घेतात ते योग्य ठरू शकतील का? याबद्दल मिपाकरांचे काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
💬 प्रतिसाद
(71)
र
राघव
Mon, 07/10/2017 - 16:35
नवीन
अतिशय संयत व संतुलित प्रतिसाद.
बादवे, तुम्ही काही ठिकाणी रालोआ [एनडीए] असा उल्लेख केलेला आहे.. तुम्हाला तेथे संपुआ [यूपीए] असे म्हणावयाचे आहे असे गृहित धरतो. :-)
- Log in or register to post comments
य
योगेश लक्ष्मण बोरोले
Tue, 07/11/2017 - 02:16
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Mon, 07/10/2017 - 09:50
नवीन
काही अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर त्या समस्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी हे सरकार किमान सकारात्मक नक्कीच आहे .
पण काही समस्यांची अपेक्षापूर्ती झाली नाही म्हणून या समस्याच मुळातून ज्यांच्यामुळे चालू झाल्या ते चांगले असे म्हणणे म्हणजे आपल्याकडे लोकशाही अजून किती प्रगल्भ होण्याची गरज आहे याचेच द्योतक आहे.
अर्थात हे सरकार ढिम्म बसून आहे व मागील भ्रष्टाचारी सरकार कित्ती कित्ती चांगले होते असेच ज्याला वाटत असेल तो चाटु खांग्रेससी समजावा . भक्तांपेक्षा ही जमात भयानक
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Mon, 07/10/2017 - 11:22
नवीन
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Mon, 07/10/2017 - 11:22
नवीन
असा धागा काढायचा आणि घडलेल्या कोणत्याही चांगल्या घटनेचा साधा परामर्ष न घेता फक्त हे सरकार कसे अयोग्य आहे अशा आशयाचे लिहायचे .
संपादकांना विनंती की असा मुद्दाम काढलेला खांग्रेस/ विरोधक प्रचारकी धागा उडवण्यात यावा
जमतंय का ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 07/10/2017 - 11:35
नवीन
असल्याच लोकांना हल्ली समतोल, नि:पक्षपाती, मध्यममार्गी वगैरे म्हटले जायची फ्याशन आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 07/10/2017 - 12:39
नवीन
तसेच,
"मिपावर असहिष्णुता वाढली आहे"
"..म्हणून हल्ली मिपावर यावेसे वाटत नाही"
असे बोलणे सोपे जाते
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 07/10/2017 - 17:29
नवीन
सरकारने अजून एक मस्त इंटरेस्टिंग व्यवहार रडारवर घेतला.
२८ जुलै च्या जीआर नुसार भाडेपट्ट्याच्या जागेत व्यवसाय करणार्यांनी भाडेपट्टा करार नोंदणी केल्याशिवाय शॉपअॅक्ट(व्यवसाय परवाना) मिळणार नाही.
.
अब आयेगा मझा. :)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 07/10/2017 - 23:18
नवीन
सौन्दर्य,
तुमचा इथला प्रतिसाद वाचून एक प्रश्न पडलाय : मोदींचं सरकार कोण चालवतो?
मोदी चालवतात हे उत्तर नाही. सरकार नोकरशाहीकडून चालवलं जातं. एक उदाहरण देतो. सैन्याचे नवीन प्रमुख बिपीन रावत आल्यावर मगंच चीनचा थयथयाट सुरू झालाय. त्याआधी दलबीरसिंग सुहाग होते. मोदी निवडून यायच्या दोनतीन महिने आधी काँग्रेसने त्यांना प्रमुखपदी बसवलं होतं. सुहाग प्रमुखपदी असतांना मोदी जास्त धोका पत्करू शकंत नव्हते. कारण सुहाग हा काॅग्रेसचा माणूस असण्याची शक्यता होती. त्यामुळे धोका नको म्हणून मोदींनी अगदी सावधपणे पावलं टाकली.
सैन्यासारख्या अत्यंत संवेदनशील विभागात बदल घडवून आणायला मोदींना तीन वर्षं जाऊ द्यावी लागली. तर उर्वरित भारताची काय परिस्थिती असेल याची केवळ कल्पनाच करता येईल. अशा वेळेस आपण मोदींच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं इतकं मला समजतं. नोकरशाहीस वठणीवर आणायचं असेल तर मोदी पाहिजेत म्हणजे पाहिजेतच.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
द
दीपक११७७
Tue, 07/11/2017 - 12:31
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
य
योगेश लक्ष्मण बोरोले
Tue, 07/11/2017 - 14:47
नवीन
नोकरशाहीवर पक्की मांड आवश्यकच आहे.
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 07/11/2017 - 09:00
नवीन
आज सकाळी झालेल्या बैठकीमध्ये मोदी सरकारची 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जेष्ठ कॉग्रेस सदस्य इव्हा जैन यांनीआपले परखड मत व्यक्त केले. वृतांत लिहणे शक्य नसलेल्याने खालील व्हिडीओ पहा वा ही विंनती!
*Youtube Link
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Tue, 07/11/2017 - 12:24
नवीन
भारता सारख्या मोठ्या देशात नोकरशाही मुजोर आहे.. ते बरयाच प्रमाणात मोदीन्नी शक्य केलय.. हेच त्यान्च मोठ यश मानता येइल.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Tue, 07/11/2017 - 12:26
नवीन
एथे .. मुजोर नोकरशाही ला आवर असा वाचावे
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 07/15/2017 - 06:29
नवीन
रेल्वे प्लँटफोर्म टिकीट 2 , रूपयावरून 20 रुपये झालेय. सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात घालु लागलेय. बस हुई महंगाई की मार म्हणणारे कुठे आहेत?
- Log in or register to post comments
म
मोदक
Sat, 07/15/2017 - 06:42
नवीन
कांही महत्वाचे शब्द लिहायला विसरलात का..?
पुढील लिंकवर तिकीट वाढीची बातमी आहे पण ती निवडक स्टेशन्सवर आणि फक्त सुट्टीच्या दिवसांसाठी (७ ते १० दिवस) आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.
http://irctc-co.in/indian-railways/tag/platform-ticket
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 07/15/2017 - 06:56
नवीन
मुंबईत तरी या निर्णयाचा फार परिणाम होणार नाहीये. लोक २० रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकिट काढण्याऐवजी पुढच्या स्टेशनचे तिकिट काढतील. म्हणजे दादर स्टेशनवर २० रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकिट काढण्यापेक्षा ५ रूपयांचे परळचे तिकिट काढले आणि प्लॅटफॉर्मवर तासभर राहिले तरी तित काही करू शकत नाही. इतर ठिकाणीही सगळ्यात जवळच्या स्टेशनचे तिकिट काढले तरी ते २० रूपयांपेक्षा कमीच होईल. आणि आपण ज्या गाडीवर नातेवाईकांना आणायला/सोडायला स्टेशनवर आलेलो आहोत त्याच गाडीचे तिकिट काढले पाहिजे असे अजिबात नाही. त्या वेळेला स्टेशनात असलेल्या/येणे अपेक्षित असलेल्या कुठल्याही गाडीसाठीचे सर्वात जवळच्या स्टेशनचे तिकिट काढले तरी चालू शकेल . पुणे स्टेशनवर कुणाला कलकत्त्याच्या ड्युरांटो गाडीवर सोडायला आल्यास कलकत्त्याचे तिकिट कशाला काढायचे? कुठली तरी गाडी शिवाजीनगरला जाणारी असेलच ना. मग शिवाजीनगरचे तिकिट काढले तरी काम होईल :)
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 07/15/2017 - 06:50
नवीन
लिंकच काही माहिती नाही. मंगळवारी लो.टि. टर्मिनस येथे 20 रुपये देउन टिकीट घेतले.
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 07/15/2017 - 06:52
नवीन
2014 ला जे भाजपाचे विकासाचे घोषणापत्र होते त्याबाबतही घोर निराशा झाली आहे. काँग्रेस बरी होती असे मनापासुन वाटतेय.
- Log in or register to post comments
म
मोदक
Sat, 07/15/2017 - 08:34
नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 07/26/2017 - 06:53
नवीन
नोटाबंदीच्या काळात पंतप्रधानांनी आपल्या आमदार खासदारांना ८ नोव्हें २०१६ ते ३१ डिसें. २०१६ दरम्यान झालेले त्यांचे बँक व्यवहारांचे तपशील अमित शहांकडे जमा करायला सांगितले होते. असे तपशील दिले गेले असल्यास पुढे त्याचे काय झाले?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2