उद्यानांचे सुशोभीकरण ( संशयास्पद चाल म.न .पा. ची )
फार पूर्वी जर आपल्याला माहित असेल तर महानगर पालिकेच्या उद्यानात कुंपण म्हणून एक कडू वनस्पतीचा वापर केला जायचा .. त्या वनस्पतीचे नाव मला माहीत नाही आता .. पण पूर्वी माझ्या कॉलेजमध्ये मी संशोधन करत असताना एका विद्यार्थी मित्राने त्या वनस्पतीवर भरपूर शोधनिबंध सादर केले होते .. माझी त्यावर त्याच्याशी चर्चा देखील झाली ... त्या वनस्पतीचे फायदे ऐकून तर मी चाट पडलो होतो .. त्यातील एक म्हणजे कित्येक मीटरपर्यंत ती डास आणि माश्याना लांब रोखू शकत होती .. मला अजूनही आठवतंय .. आम्ही सारे आमच्या येथील उद्यानात बिनधास्त खेळायचो ..
आजची परिस्थिती
आज आपण सारे बघतो ते उद्याने निव्वळ बनकामाच्या फुलझाडांनी सुशोभित केलेली असतात .. त्यामुळे काही विषारी कीटकही त्या फुलझाडांमुळे आकर्षित होतात .. मागे लोकसत्तामध्ये वाचताना तर मला चीड आली ... एका मुलीचा विषारी कीटकाने चावा घेतल्याने अकस्मात मृत्यू .. ती फक्त उद्यानात तिच्या वडिलांसोबत बॅडमिंटन खेळात होती ... तिथे तिला काहीतरी चावले .. तिने त्याला मारले देखील .. घरी आल्यावर तिला मळमळु लागले आणि इस्पितळात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू ... काय तर म्हणे त्याचा ऍंटीडोट उपलब्ध नव्हता ... ह्या अश्या विचित्र केसेस पूर्वी तर वाचनात आल्या नव्हत्या ... एक मात्र नक्की .. ती औषधी झाडं का काढली .. का कुणी सोयीस्कर रित्या काढली .. हे सीशोभीकरण आहे कि म . न. पा .ची एक विशेष चाल आहे .. त्यामागे काही अर्थकारण आहे का कि अजून काही ? त्या औषधी झाडांची आजही तेवढीच गरज आहे जेवढी पूर्वी होती .... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
.... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ...-- नक्की कोणत्या विषयावर ??