स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन?
कोंबडी आधी कि अंड आधी हे न सुटणार कोड सोडवत आपण मोठे झालो....उत्तर मिळणार नाहीच त्यामुळे त्यात वेळ न घालवलेलाच बरा
आता नवीन कोड पडलाय स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन?
भारतभर अनेक शहर स्मार्ट सिटी होण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्याच शहरांमध्ये प्रश्न सारखेच आहेत जसे वाहतूक, घन कचरा, २४ तास शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, खड्डेमय रस्ते इत्यादी. यादी कार्याला गेलं तर खूप मोठी होईल...पण ढोबळमानाने हे प्रश्न सार्वत्रिक आहेत आणि सामान्य माणसाला रोज भेडसावणारे आहेत.
स्मार्ट सिटी मध्ये हे सगळे यक्ष प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे जो अतिशय स्तुत्य आहे, आणि महत्वाचे म्हणजे एका प्रामणिक करदात्याचा तो हक्क पण आहे.
म्हणजेच स्मार्ट सिटी हे एक आपल्याला आदर्श इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देईल.
आता खरी गम्मत आहे. स्मार्ट सिटी होईल देखील तयार कारण काम तर सगळीकडे चालूच आहेत पण बदलेल्या सिटी मध्ये राहायला हि मानसिकता लागेल ती आहे का?
मानसिकता म्हणजे काय? उभारलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा योग्य आदर आणि वापर करायची लायकी आहे का? कि आपण पूर्वीसारखेच वागणार आहोत? जर तसे होणार असेल तर स्मार्ट सिटीचा बोजवारा उदयाला फार काळ नाही लागणार.
स्मार्ट सिटी चा मुख्य घटक हे तिथला आणि एकूणच सगळेच नागरिक आहेत. म्हणूच स्मार्ट सिटीझन हा अतिशय आवशयक आणि अविभाज्य घटक निर्माण करणे हि काळाची गरज आहे.
स्मार्ट सिटीझन म्हणजे काय हो?
सगळेच स्मार्ट फोन वापरतात म्हणून काही सगळे स्मार्ट आहेत असं नाही.
दोन शब्दात सांगायचा झालं तर स्मार्ट सिटीझन म्हणजे ज्याचा “सिविक सेन्स (Civic Sense)” जागृत आहे असा माणूस.
सिविक सेन्स म्हणजे काय तर आजू बाजूच्या वातावरणाचे भान ठेवून केलेले वर्तन. उदा. U Turn मारण्याच्या ठिकाणी आपले पार्किंग कुठे करावे ह्याचा तारतम्य असणे. सिविक सेन्स म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला त्रास तर होत नाही ह्याच भान असणे. अशे अनेक मुद्दे आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना रोज जाणवतात आणि आपण फक्त चरफडतो किवा एवढे निर्ढावलो आहोत कि त्याचा काही वाटेनास झालं आहे....आणि म्हणूनच “चलता है” वृत्ती बळावत जाते.
मग आपण काय करू शकतो?
दिवसातून एका तरी माणसाला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ शकतो का? जसे कि झेब्रा क्रॉसिंग वर उभे राहू नका? किंवा हिरवा सिग्नल लागला असताना पादचारी रस्त्यावर क्रॉस करू नये किंवा अनेक पालक शाळेत मुलांना सोडताना विरुद्ध दिशेने गाडी चालवत जातात....त्यांना हे कळत नाही कि न कळत ते मुलावर चुकीचे संस्कार करत आहेत....अशी अनेक उदाहरणे आहेत.
मला आणि एक नेहेमी वाटत, पुढची पिढी जी खऱ्या अर्थानी स्मार्ट आहे त्यांना ह्या सगळ्यामध्ये सामील केले तरच हे सगळ शक्य आहे.
शाळांमध्ये ह्या विषयी शिकवत असतीलहि पण त्यावर जास्त जोर देणे गरजेचे आहे. त्यांना सिग्नल management, वाहतूक नियंत्रण आणि नियम ह्यांचा शिक्षण, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा वापर इत्यादी गोष्टी समाविष्ट करता येतील. तेच फक्त हे change drive करू शकतात कारण जुने खोड सुधारणे फार अवघड आहे कारण म्हणतात न सुंभ जळाला तरी पीळ जात नाही...महणून ओल्या मातीवर संस्कार केले तर स्मार्ट सिटीझन निर्माण होतील
आपण सगळे ह्या गोष्टीवर नुसते विचार न करता योगदान देऊ शकतो आपापल्या बुद्धी आणि शक्ती प्रमाणे
चला करून बघू या एक प्रयत्न....
प्रतिक्रिया
पुण्याच्या महापुर बाई मीटिंग साठी मानपान खेळत बसल्यातकाय भाषा.. क्रु.ह.घे.