मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००
मित्रहो,
तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा.
शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना.
शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना.
इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत.
============================
अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं. कोणाला हे रिलेटीव नजरेने पाहायचं असेल, कोणाला संदर्भ पाहायचे असतील, कोणाला देशाचं पडलं असेल, कोणाला संकुचित अस्मितांचं पडलं असेल, कोणाला काही दूरगामी बाबी आवडत असतील. तर मोदी आहेत, असतील, पंतप्रधान झालेत, होतील, काही करताहेत, काही करत नाहीयेत, खरे आहेत, खोटे आहेत, सच्चे आहेत, नाटकी आहेत, सक्षम आहेत, अक्षम आहेत, असायला पाहिजेत, असायला नको होते, इ इ अनेक विचार असणार. या सर्वांचं एकत्रीकरण करून, गेल्या ७० वर्षांत जे पंतप्रधान होऊन गेले आणि येत्या १०-१५ वर्षांत जे होतील (मोदी राजकारणात असेपर्यंत), त्यांच्या तुलनेत वा अशी काही तुलना न करता, -१०० ते १०० पैकी किती मार्क द्यावे वाटते?
===================================
तुम्ही तुमचे मार्क्स या धाग्यात बदलू शकता, एकदा दिलेले मार्क्स लढवायची फार आवश्यकता नाही. वाटल्यास स्पष्टीकरण देऊ शकता. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणत्वात त्या त्या संदर्भात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही कसं ठरवता हे तुम्ही सांगाल तर उत्तमच.
=========================
रेंजच्या बाहेरची उत्तरे बाद. अग्राह्य.
=============================================
ज्यांचे उत्तर ० नाही ते लोक देखिल संतुलित मानण्यात येतील. असल्यास.
====================================
लेखात तुम्ही मार्क दिले मंजे तुम्ही मत देणार असं मानलं जाणार नाही. त्याचा संदर्भ वेगळा असू शकतो.
============================
व्यक्तिशः मला लोक जेव्हा एखाद्या सार्वजनिक व्यक्तिस "खोटा तो खोटा" वा "खरा तो खराच" हे कसे, कधीपासून, का मानायला चालू करतात यात रुची आहे.
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो.खरं तर नेहरूंना उणे इन्फिनिटी गुण द्यायला पाहिजेत. भारतातील सांप्रत सर्व भीषण समस्यांंचे जनक नेहरू आहेत.मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता.परफेक्ट! याची प्रत्यक्ष उदाहरणे म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, अरूण शौरी . . .