अश्वत्थामा
मनाच्या एका खोलवर
अंधार्या कप्प्यामधे कुठेतरी
दडपून टाकलेली तूझी आठवण,....
कधीतरी उफाळून बाहेर येतेच
अचानक, मला नकळत......
आणि मग कोरड्या पडलेल्या
जखमा परत भळभळू लागतात
मनावर मोठा दगड ठेवून
तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र
इतक्या वर्षां नंतरही.... जसेच्या तसे,
डोळ्यांसमोर नाचत असते,
मला आणि फक्त मलाच माहीत आहे
ते पत्र लिहिण्याचे खरे कारण
पत्रात खरे कारण लिहायची हिम्मत झाली नाही
आणि तूझ्याबरोबर खोटं बोलायच नव्हत,
(तू नेहमी प्रमाणे अचूक पकडलेच् असते)
म्हणून मग शेवटी
नाव लिहायचेही टाळले
बर्याच वेळा मी माझी तुलना,
अश्वत्थाम्याशी करतो
पण खरेतर तो सुध्दा,
माझ्या पेक्षा कितीतरी भाग्यवान....
कारण त्याला आपली जखम,
जगापासून लपवावी लागत नाही…
पैजारबुवा,
💬 प्रतिसाद
(9)
प
प्राची अश्विनी
Mon, 11/06/2017 - 06:28
नवीन
क्या बात!:)
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Mon, 11/06/2017 - 08:27
नवीन
आहा!!
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 11/06/2017 - 08:48
नवीन
छानच.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Mon, 11/06/2017 - 13:08
नवीन
शेवटचं वाक्य म्हणजे परमोच्च बिंदु आहे, या कवितेचा. सुंदर!
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Mon, 11/06/2017 - 18:52
नवीन
.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Mon, 11/06/2017 - 18:51
नवीन
झकास हो पैजारबुवा.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 11/07/2017 - 14:14
नवीन
बुवा, डायरेक्ट आत पोहचली.. जियो..
- Log in or register to post comments
म
मेघमल्हार
Tue, 02/19/2019 - 15:09
नवीन
वाह मस्तच!!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 02/19/2019 - 15:13
नवीन
क्या बात!!!
- Log in or register to post comments