डॉ सत्यपाल सिंग :उत्क्रांती सिद्धांत
डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी :
याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे .
या विषयी काही प्रश्न :
१. असं काही आहे का ?
२. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ?
३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ?
४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही )
३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर )
धन्यवाद
विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.सखोल अभ्यास कोणाचाच नाही. सत्यपाल सिंगांच्या विधानानंतर अनिकेत सुळे नावाच्या शास्त्रज्ञाने एक ऑनलाईन पिटीशन तयार करून सत्यपाल सिंहांनी आपले विधान मागे घेण्याची त्यात मागणी केली आहे. एका वाहिनीवर बोलताना अनिकेत सुळे म्हणाले की मी अंतराळ संशोधक आहे. मला जीवशास्त्रातले फारसे कळत नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत पुराव्याने सिद्ध झाला आहे. जीवशास्त्राचा फारसा अभ्यास नसताना एक अंतराळ शास्त्रज्ञ ठामपणे डार्विनच्या सिद्धांताच्या बाजूने बोलू शकतो तर रसायनशास्त्रात द्विपदवीधर व एम फिल असलेले सत्यपाल सिंह डार्विनच्या सिद्धांताच्या विरूद्ध का बोलू शकत नाहीत? मुळात डार्विनचा सिद्धांत म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयासारखा गणिती सिद्धांत नाही जो कोणत्याही प्रकारच्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सिद्ध होतो. डार्विनचा सिद्धांत हे त्याच्या निरीक्षणावर आधारीत एक दावा आहे जो दावा अजून सर्वमान्य नाही व निर्विवाद सिद्ध झालेला नाही. अशा दाव्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असेल तर त्यासाठी एवढा आकांडतांडव करण्याची गरज नव्हती. ऑनलाईन पिटीशन सारखे हास्यास्पद मार्ग चोखाळण्याऐवजी एखाद्या जैवशास्त्रज्ञाने विज्ञानाचा आधार घेऊन सत्यपाल सिंहांचे विधान खोडले असते तर ते जास्त योग्य ठरले असते. असे करण्याऐवजी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून सत्यपाल सिंहांना आपले विधान मागे घेण्याची विनंती करणे ही शुद्ध दडपशाही व झुंडशाही झाली.कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?)सत्यपाल सिंहांना विरोध करणार्यांपैकी किती जणांना या विषयाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास आहे. वर अनिकेत सुळे यांचे उदाहरण दिलेच आहे. त्यांच्या बरोबरीने काही विज्ञानकथा लेखकही आले होते. विज्ञानकथा लेखकांना तरी विज्ञानाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास असतो का? जर सत्यपाल सिंहाचे विधान वायफळ बडबड असेल तर त्यांना विरोध करणारेही तशीच वायफळ बडबड करीत आहेत. जर डार्विनचा सिद्धांत निर्विवाद सिद्ध झाला असेल तर तसे वैज्ञानिक दृष्ट्या दाखवून द्या व सत्यपाला सिंहांना वैज्ञानिक मार्गाने विरोध करा. ऑनलाईन पिटीशन करून, सत्यपाल सिंहांवर आगपाखड करून डार्विनचा सिद्धांत सिद्ध होणार नाही. असे केलेत तर त्यामागे निव्वळ राजकारण आहे असा वास आल्यावाचून राहणार नाही.जावडेकरांनी योग्य केले .कशावरून? जावडेकरांचा या विषयातील अभ्यास व ज्ञान किती?