Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

*पद्मावतीच्या भ्रमाचा भोपळा अन् वर"करणी" धुडगूस*

S
ss_sameer
Sun, 01/28/2018 - 05:49
🗣 125 प्रतिसाद
अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच. माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती. (विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार. या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच. भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.) आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.) भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी". वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती..... सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का? नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात. धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही. आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.

प्रतिक्रिया द्या
35706 वाचन

💬 प्रतिसाद (125)
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 06:18 नवीन
चित्रपट मस्त आहे. ३ डी बघा
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 01/28/2018 - 06:20 नवीन
शूर वीर संस्कृती रक्षकांना विनंती आहे कि संस्कृतीच्या रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने "रंगीला खिलजी" म्हणून चित्रपट बनवून सत्य परिस्थिती काय होती हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगावे. नाही तर घरी बसावे उगाच रस्त्यावर येऊन धिंगाणा घालू नये.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 01/28/2018 - 09:31 नवीन
आम्ही पद्मावत पाहिला, लागलीच मिपावरील एका धाग्यात लिहीलं, की काहीच आक्षेपाहार्य नव्हतं चित्रपटात. एकतर चित्रपट कल्पनेतल्या कथेवर /पात्रांवर, पण त्यावर वास्तवातल्या सत्तेसाठी, अस्मितेवर राजकारण करणारे सो कॉल्ड संस्कृती रक्षक.... मागे बाजीराव मस्तानीच्या वेळेस मिपावरील धाग्यात मी प्रतिक्रिया दिलेली, यांचं (संस्कृती रक्षकांचं) खररखरं दुखणं वेगळंच... पण ते उघडपणे सांगता येत नाही, म्हणून भलत्याच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करत कांगावी विरोध करायचा... असो. या चित्रपटा बाबत पण हेच... या काल्पनिक कथेतील पात्रांच्या अस्मिता तेवढ्या सोयीने वापरायच्या.. पण त्याच कथेतील काल्पनिक पात्रांनी केलेली येडच्यापगिरी मात्र अडचणीची ठरत असल्याने.... विरोध. असो चालायचंच... या कथेतील राजब्राह्मण राघव चेतन, ह्याला पीपिंग टॉम वोयेऊरीजम छापचा मानसिक विक्षिप्तपणा असावा, पद्मावती व तिचा पती रावळ राणा, राजमहालात रात्री प्रणयोत्सुक मनस्थितीत असताना जवळ येतात, तेव्हा भिंतीच्या छिद्रां आडून हा राजब्राह्मण प्रणय पाहण्याचा प्रयत्न करतो, प्रमाद करतो, त्यासाठी तो पकडला गेला असता, रावळ त्याला 'मी ब्रम्हहत्या करू शकत नाही' या सूत्रानुसार राज्याबाहेर तडीपार करतो (मला तर या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या मराठी सिरीयल मधील अफझल खानाच्या छावणीतील प्रसंग आठवला, राजे सुद्धा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या खानाच्या वकिलाने तलवारीने वार केला असता, मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या तलवरीस रोखून धरतात व क्रोधाने म्हणतात 'तुम्ही दूर जा ब्रम्हहत्येचे पातकाचे आम्हांस धनी व्हायचे नाही') असो चित्रपटात राघव चेतनचे लांब केसं नेहमीच मोकळी दिसतात, त्यामुळे शेंडी बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा अगदीच अस्थानी दिसली असती, तर तो उर्मटपणे रावळ यालाच पाय धर म्हणतो... पुढे अल्लाउद्दीन खिलजीला जाऊन मिळतो, व त्याला पद्मावती संदर्भात उत्सुकता निर्माण करून चित्तोडवर आक्रमण करायाला लावतो, व घरभेदयाप्रमाणे पुष्कळ माहिती पुरवतो... युद्ध जिंकणे एवढीच नीती असणारा, व ब्रम्हहत्या वै सूत्र न पाहणारा, हाच खिलजी पुढे पद्मावती दर्शनाच्या अटी साठी एका सेकंदात राघव चेतनचे मुंडके तलवारीने उडवतो. ... आजच्या भारतात, रामजन्मभूमी व पद्मावतीच्या काल्पनिक कथेतील अस्मितेवर सत्ता घेणारे/घेऊ पाहणारे, एखादया कसलेल्या जादूगाराप्रमाणे, हवेतून गोष्टी आणून दाखवण्यासाठी हातचलाखीचे डिसेप्शन दाखवतातच, यात जनतेची नजर दुसरीकडे खिळवून आपले इप्सित साध्य करतात... पिंगा डान्स मधेही तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता, घुमर गण्यातही काही प्रॉब्लेम दिसत नाही, तरी विरोधासाठी या गाण्यांच्या विरोधाचे डिसेप्शन पुढे करून, संस्कृती रक्षक जनतेची नजर गाण्यावर खिळवून, खर्र्याखुऱ्या कारणावरून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 09:33 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/28/2018 - 06:52 नवीन
भन्साळीने भारतीय लोकांची मानसिकता चांगली ओळखली आहे. बाजीराव मस्तानी, आता पद्मावती, पुढे अजून काही इतिहास पुरुष ज्यांच्यामुळे असे वाद होतील असे कोणतेही पात्र पुढे ते रंगवतील. बक्कळ पैसे कमावतील. दलालांना ते काहीएक टक्केवारी देतील. लोकांच्या मानसिकता इतक्या रिकामचोट झाल्यात की विचारु नका. अशा प्रवृत्तींना आवरणे अवघड आहे. अस्मिता, जात, भाषा, पुरुष, महापुरुष, स्त्रीया, या सर्वांनी वाटून घेतल्या आहेत. आता आम्ही सांगूच तसेच चित्रपट आले पाहिजेत. आम्ही सांगू तसेच पात्र रंगवले पाहिजेत. आम्ही म्हणू तसेच गाणी चित्रपटात असली पाहिजेत, आम्ही म्हणू तशीच पुस्तके छापली पाहिजेत. आम्ही म्हणू तशीच कविता लिहिली पाहिजे. आम्ही म्हणू तसेच लोकांनी वागले पाहिजे. रस्त्यावर येणारे आणि व्यवस्थेत धुडगुस घालणारे साले, असे फोडून काढले पाहिजेत की आयुष्यभर त्याचे ठसे शरीरभर दिसले पाहिजेत. आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत. बाकी, रणवीर आणि दीपिकासाठी पद्मावत पाहण्यात येईल. :) -दिलीप बिरुटे (रसिक)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/28/2018 - 08:03 नवीन
फक्त एक वाक्य सोडून.... "रस्त्यावर येणारे आणि व्यवस्थेत धुडगुस घालणारे साले, असे फोडून काढले पाहिजेत की आयुष्यभर त्याचे ठसे शरीरभर दिसले पाहिजेत. आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत." हे असे इंग्रजांनी केले होतेच की.... ज्या देशात, शिक्षकांचीच जिथे हेळसांड होते, त्या देशातील विद्यार्थी उत्तम संस्कारी निपजतीलच, अशी अपेक्षा धरणेच अयोग्य.नंदराजाच्या काळात पण हे झाले (शिक्षकांची हेळसांड) आणि ब्रिटिशांनी तोच कित्ता गिरवला आणि सध्या पण शिक्षणाचा बाजार सुरु आहेच की.... आणि सिनेमांच्या बाबतीत म्हणाल तर, ह्या क्षेत्रातील आर्थिक गणिते देशाच्या उन्नतीला अजिबात मदत करत नाहीत, त्या पाण्यात डुबकी मारणे मला तरी जमणार नाही.सिनेमाचे पैसे सरळ अनाथाश्रमाला द्यायचे आणि मोकळे व्हायचे.निदान ती अनाथ बालके तरी ४ घास घातील. असो, पसंद अपनी-अपनी खयाल अपना-अपना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/28/2018 - 13:40 नवीन
प्रतिसाद आवडला असे कळविल्याबद्दल आभार...! बाकी आपल्या प्रतिसादातील शिक्षणाच्या बाजाराचा आणि धाग्याचा संबंध काही कळला नाही ? या सर्व गोष्टीला शिक्षण जवाबदार आहे असे म्हणायचे आहे का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 01/28/2018 - 17:31 नवीन
हो.... बहूदा, तुम्ही अद्याप "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक अद्याप वाचलेले दिसत नाही.कारण "शिक्षणाचा व शिक्षकांचा प्रभाव किती व कसा पडतो? ह्याचे सखोल मार्गदर्शन त्या पुस्तकात आहे. शिक्षण म्हणजे सर्वांगिण सिक्षण. मानसिक, सामाजिक, शारिरीक आणि अर्थाजन करण्यासाठी लागते ते शिक्षण.केवळ लिहिता-वाचता येते आणि घोकंपट्टी करून पास होणे, ह्याला मी तरी शिक्षण म्हणत नाही. पण.... आपण समाजाचे काही देणे लागतो आणि त्यासाठी क्वचित प्रसंगी पदरमोड पण करायला लागते. ह्याची सामाजिक शिकवण किती शिक्षक देतात? कुठल्याही प्रसंगी तारतम्याने वागावे, उगाच भावनेच्या आहारी जावून निर्णय घेवू नये, ह्याचे "मानसिक" शिक्षण पण शाळेत मिळत नाही.व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी कुठल्याही शाळेत मनापासून प्रयत्न केले जात नाहीत.मनसोक्त खेळा, तब्येत कमवा आणि मग शिका, हे सामान्य तत्व आहे. "शरीरं आद्यं खलू धर्म साधनं." (इथे विद्यार्थांचा धर्म म्हणजे शिक्षण घेणे आणि पालकांचा धर्म म्हणजे अर्थाजन करतांनाच सामाजिक बांधीलकी जपणे आणि ह्या दोन्ही गोष्टींसाठी सुदृढपणा हा हवाच.) आजकालच्या शिक्षण पद्धतीत मुलांचा ८० ते ९०% वेळ शिक्षकांबरोबरच जातो.शाळा आणि क्लास सकट.मग ही सामाजिक जबाबदारी बर्‍यापैकी शिक्षकांवरच येवुन पडते.किती शाळेत "सामाजिक भान" हा विषय आस्थेने शिकवला जातो? शिवाय किती तरी शाळेत शिक्षकांना फक्त "शिकवणे" इतकेच कार्य नसते.मतदारांच्या यादी पासून ते पोलिओचे डोस देइ पर्यंत अशैक्षणिक काम पण शिक्षकांच्याच माथी.ह्यात संस्थेसाठी आर्थिक मदत मिळवण्याचे पवित्र कार्य पण शिक्षकांच्याच माथी.टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. सुदृढ पिढी तयारी करण्यासाठी पालकांच्या बरोबरीने शिक्षकांची मदत ही हवीच.केवळ एका घटकाकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात काय अर्थ?आणि पालक पण फक्त शालेय गुणांनाच महत्व देत असल्याने, ह्या समाजाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या बाबींकडे कानाडोळाच करतात. भारतात सुदृढ पिढी का नाही? हा एका चर्चेचा विषय होवू शकतो.पण ह्या आधीच १८६२ (हो अठराशे बासष्ठच्या सुमारास "गोविंद बाबाजी जोशी" हे गावोगावी जावून सभेत मांडत होतेच.) आज जवळपास १५० वर्षे झाली पण अद्यापही ही स्थिती सुधारलेली नाही आणि सर्वांगिण शिक्षणा बाबतीत पाल्यांची जर अशीच आबाळ होत राहिली तर आता ह्या देशात "चाणक्य" पण होणार नाहीत.मग "चंद्रगूप्त" तर मिळणारच नाही. जमल्यास खालील पुस्तक जरूर वाचा. "गेल्या ३० वर्षांपासूनचे लोक व त्यांच्या समजूती अथवा माझे प्रवासाची हकीकत (रोजनिशी)" लेखक : गोविंद बाबाजी जोशी प्रकाशक : माध्यम प्रकाशन तुम्ही पुस्तक नक्कीच वाचाल अशा अपेक्षेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/28/2018 - 18:14 नवीन
आपल्या विचारांचा आदर आहेच. पण ही मतं अवांतर आहेत असे वाटते. शिक्षण कसे असते, शिक्षणाचे उद्देश,अभ्यासक्रम कसे ठरतात, तो वेगळा विषय आहे. बाकी, शिक्षण आणि पद्मावत यांचा सबंध जोडण्याचा प्रयत्न आवडला. म्हणजे, असाच संबंध जोड़ायचा तर कोणत्याही सामाजिक प्रश्नांचा संबंध कुठल्याही ज्ञानशाखेशी जोड़ता येईल. छान. बाकी जोशीबुवाचं पुस्तक मिळालं तर वाचण्यात येईल. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 01/28/2018 - 20:46 नवीन
त्या त्या देशात हे असले प्रश्र्न कमी प्रमाणात उदभवतात. उदा. जर्मनी, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया.ह्या देशांत प्रायमरी टीचरला पण उत्तम पगार असतो आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात नाही. जर्मनीत तर "वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता कशी राखायची? रस्ता केंव्हा ओलांडायचा?" ह्या सारखे समाजाला उपयुक्त शिक्षण पण शाळेतच देतात. अर्थात, तुम्ही अद्याप तरी "कौटिल्याचे अर्थशास्त्र" पुस्तक न वाचल्याने, उत्तम समाज जर घडवायचा असेल तर शिक्षक उत्तमच हवेतच आणि ज्ञानासारख्या कामात राजकीय हस्तक्षेप नको, ही संकल्पना तुम्हाला पटणार नाही. मना घडवी संस्कार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 20:54 नवीन
इथे शिक्षकाना पगार कमी आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 21:01 नवीन
उगा काहीतरी विचरून टाइमपास करू नका. गृहपाठ करून मग प्रश्न विचारा. गृहपाठ - साहना यांचे सगळे धागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मुक्त विहारि Sun, 01/28/2018 - 21:15 नवीन
काही जण अर्धवट प्रतिसाद वाचतात. "ह्या देशांत प्रायमरी टीचरला पण उत्तम पगार असतो आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात नाही." ह्यापैकी त्यांनी " शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात नाही." हा मूद्दा मात्र लक्षांत घेतला नाही. मोगा, सचिन, उद्दाम. चंपाबाई आणि पोटे इत्यादी मंडळी पण असेच करता-करता हेवनवासी झाले. "manguu@mail.com" ह्या आय.डी.च्या प्रतिसादांना मी तरी जास्त महत्व देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
M
manguu@mail.com Mon, 01/29/2018 - 04:24 नवीन
अशैक्षणिक कामे रोज असतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
M
manguu@mail.com Mon, 01/29/2018 - 05:07 नवीन
आजचा काळ हा नोकरीत पडेल ते काम करा , अन्यथा घरी जा / कारवाईस सामोरे जा , असा आहे. प्रत्येक म्यानेजमेंट सरकारी वा खाजगी , कॉस्ट कटिंगच्या मागे आहे.. एका शिक्षकाने दोन् शाळा बघणे , एक डॉक्टरने दोन् वॉर्ड बघणे , पोलिसानी एक्स्ट्रॉ ड्युटी करणे , पैसे न मिळता ओव्हरटाइम करणे .. हे सर्वच लोक फेस करत आहेत. तरीही कामात क्वालिटी देणे भागच आहे. स्वत: महामहीम त्यांचे प्रधानसेवकाचे काम संभाळून दोन तीन डिपारमेंटचा ॲडिशनल चार्ज धरून असतात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ए
एमी Mon, 01/29/2018 - 03:59 नवीन
गृहपाठ - साहना यांचे सगळे धागे. >> I hope mangu has better choice than that!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/29/2018 - 02:25 नवीन
आपल्या अवांतर प्रतिसादामुळे मूळ धाग्याकडे दुर्लक्ष होत आहे. भन्साळीने कोणती पुस्तके वाचायला पाहीजे त्याचं प्राथमिक शिक्षण कुठे व्हायला पाहिजे होतं, कोणत्या महाविद्यालयात त्याने शिकायला पाहिजे होतं ? त्याच्या संसारावर आणि संस्कारावर कोणाच्या प्रभाव पड़ायला पाहिजे होता ? त्याच बरोबर मिपाकरांनी कोणत्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घ्यायला पाहिजे होते हे सर्व येऊ द्या. उत्तम समाजासाठी कोणत्या पौष्टिक (विचारांचा) आहाराची गरज आहे. उशाला कोणती पुस्तके घेऊन झोपलं पाहिजे हे सर्व तिकडे घेऊ. अवघड आहे हे सर्व !! :) अवांतर : आपली जालशेती काय म्हणते ? भारत देश सोडून जाणार होता त्याचं काय झालं ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 01/29/2018 - 08:30 नवीन
अजिबात नाही... सामाजीक स्तर जर उंचावायचा असेल तर, सर्वांगिण शिक्षणाला पर्याय नाही.तसे झाले नाही तर, हे असे समाजाला घातक प्रसंग वेळोवेळी येणारच. "भन्साळीने कोणती पुस्तके वाचायला पाहीजे त्याचं प्राथमिक शिक्षण कुठे व्हायला पाहिजे होतं, कोणत्या महाविद्यालयात त्याने शिकायला पाहिजे होतं ? त्याच्या संसारावर आणि संस्कारावर कोणाच्या प्रभाव पड़ायला पाहिजे होता ?" ह्यात भन्साळींचा काय संबंध?दंगे काही त्यांनी घडवले नाहीत. "त्याच बरोबर मिपाकरांनी कोणत्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घ्यायला पाहिजे होते हे सर्व येऊ द्या. उत्तम समाजासाठी कोणत्या पौष्टिक (विचारांचा) आहाराची गरज आहे. उशाला कोणती पुस्तके घेऊन झोपलं पाहिजे हे सर्व तिकडे घेऊ." मिपाकरांनीच कशाला पण पालकांनी कुठली पुस्तके वाचली पाहिजेत ह्याचा उल्लेख, "मुलांची शेती" ह्या लेखमालेत केला आहेच. अवांतर : आपली जालशेती काय म्हणते ? भारत देश सोडून जाणार होता त्याचं काय झालं ? हे थोडे वैयक्तिक आहे.शिवाय शेती बाबत म्हणाल तर आर्थिक पाठबळ थोडे कमी पडत आहे. एकाच वेळी ४-४ आर्थिक आघाड्या सांभाळणे मला जमत नाही.शिवाय वडीलोपार्जित शेती नसल्याने, येत्या २-३ वर्षात ते नक्कीच शक्य होईल.जिथे शेती आहे तिथे मत्स्य-शेती आणि मोत्यांची शेती करायची असल्याने आर्थिक बळ मिळाले की, सुरु करीनच. भारत देश सोडण्याबाबत म्हणाल तर, प्रयत्न सुरुच आहेत.सोडला की कळवीनच.चिंता नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अरविंद कोल्हटकर Mon, 01/29/2018 - 04:44 नवीन
बहूदा, तुम्ही अद्याप "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक अद्याप वाचलेले दिसत नाही.कारण "शिक्षणाचा व शिक्षकांचा प्रभाव किती व कसा पडतो? ह्याचे सखोल मार्गदर्शन त्या पुस्तकात आहे.
इति मुक्तविहारी. ह्या विधानासाठी आधार म्हणून अधिकरण/अध्याय/प्रकरण असा सन्दर्भ दाखविलात तर कौटिल्याने नक्की काय म्हटले आहे ते आम्हास पडताळता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/29/2018 - 07:51 नवीन
कौटिल्य वरील आपल्या सन्दर्भीय प्रतिसादानुसार त्या बाबतीत काय म्हणतो ते थोडक्यात समजेल असे इथेच लिहावे असे सुचवतो. म्हणजे वाचकांना आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून येईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
म
मुक्त विहारि Mon, 01/29/2018 - 08:08 नवीन
पुस्तका बद्दल लिहायला हवेच...कारण बर्‍याच जणांना पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
M
manguu@mail.com Mon, 01/29/2018 - 08:29 नवीन
तसे डिटेल सांगणे काही लोकांच्या परंपरेला धरून होत नाही. कुणी काही विचारले की वाचन वाढवा इतके लिहून अंतर्धान पावायचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मुक्त विहारि Mon, 01/29/2018 - 08:40 नवीन
त्यात असंख्य प्रकरणे आहेत.केवळ शिक्षणच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाची कर्तव्ये पण उत्तम सांगीतलेली आहेत. शिवाय पुस्तकाचे किंवा कुठल्याही कलाकृतीचे परीक्षण करतांना, परीक्षक थोडा-फार भेदभाव करणे शक्य होवू शकते.पण पुस्तकाची आणि लेखकाची तोंड ओळख मात्र जरूर करून देईन, तरी पण एक करा, पुस्तक एकदा तरी जरूर वाचा.एक उत्तम पालक तर नक्कीच होवू शकाल. ही १००% खात्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/29/2018 - 12:23 नवीन
मालक, चर्चेत कौटिल्य तुम्ही आणला. त्याचे शैक्षिणिक विचार आणि धाग्याचा सबंध जोडून पाहिला,आता त्याचा आणि धाग्याचा कसा सबंध आहे तितके सांगा ? की फक्त तुम्हाला मी कौटील्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ वाचला आहे इतकं सांगायचं होतं ? आणि तेवढेच सांगायचं असेल तर तुमचं काम झालं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 14:48 नवीन
सिनेमाची आर्थिक गणिते देशाला मदत करत नाहीत .. मग सिनेमाऐवजी संगीत नाटके पाहिली तर आपला ( आणि देशाचा ) उद्धार होईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 17:35 नवीन
शॄंगार पुरे. नाहीतर डुआयडीचं पितळ उघडं पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 17:33 नवीन
याबाबतीत सहमत आहे.. आता पुरोगामी हा चित्रपट म्हणजे त्यांचे पुरोगामित्व मिरवण्याची संधी म्हणून या चित्रपटाला गर्दी करणार.. कुंपणावरचे नेमके आहे तरी काय म्हणून बघायला जाणार आणि संस्क्रुतीरक्शक गुपचुप सगळे बघतात तर एकदा बघायला काय हरकत आहे दीपिकाचं पोट? एकंदरीत १०० कोटी कुठेच जात नाहीत.. बाकी सरकारच्या नावाने गळे काढायला आहेतच विरोधी पक्ष.. त्यांच्याकडून पण मिळेलच काहीतरी चंदा. हा का नाका.. बादवे, करणी सेना काँग्रेसला पाठिंबा देणार अहे असे ऐकतो.. खरे आहे का ते? कोंग्रेसवर इतके वाईट दिवस आले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त
तर्री Sun, 01/28/2018 - 07:43 नवीन
आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत. डायरेक्ट हिंसाचार ? काय आहे काय ? ते किशोरकुमार , संजय गांधी आणि आणि आणीबाणी प्रकरण एकंदरीत बरेच सौम्य असावे नाही ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/28/2018 - 13:35 नवीन
रस्त्यावर येऊन धुडगुस घालणारी ही जी माथेफिरु पब्लिक आणि त्यांचे नेते बेबंद होऊन कृती करतात, जेव्हा आदेश नसतो तेव्हा पोलिस निमुटपणे या प्रकाराकडे दुर्लक्ष करते, पण जेव्हा पोलिसांना आदेश असतात तेव्हा सौम्य लाठीमार होतो त्या ऐवजी ''निब्बर'' ठोकून काढले पाहिजेत. इतकेच म्हणने आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
S
ss_sameer Sun, 01/28/2018 - 08:11 नवीन
https://www.misalpav.com/node/41811
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 09:35 नवीन
त्या काळात सामान्य लोकांच्या स्त्रीया राजाम्हाराजांसमोर नाचायच्या , त्याना वारं घालायच्या , पाय चेपायच्या , आंघोळ घालायच्या ... आज षिनेमात कुठल्या जुन्या ऐतिहासिक किंवा काल्पनिक राण्यांच्या नावाने नाचल्या २-४ नट्या , तर इतके काय आकाश कोसळते ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/28/2018 - 16:34 नवीन
वादग्रस्त चित्रण दाखवून भावना भडकावायच्या आणि नंतर गळे काढायचे. संजय लीला भन्साळ्याला बाजीराव मस्तानीच्या वेळेस चापटवला असता तर ही हिंमत केली नसती. भले पद्मावती काल्पनिक कथा असेल, पण राजपुतांना ती खरी वाटते. कोणी जर प्रेषित महमंदांच्या स्वर्गारोहणावर चित्रपट बनवला तर त्याची किती शकलं उडतील ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 17:37 नवीन
चित्रपटात राजपूत स्त्री व पुरुषांबाबत गौरवोद्गारच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
टवाळ कार्टा Sun, 01/28/2018 - 23:36 नवीन
पिच्चर काढला तर चापटवायचे....मग गडकिल्ल्यांच्या पायथ्यापर्यन्त असलेली बांधकामे दिसत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पगला गजोधर Mon, 01/29/2018 - 02:53 नवीन
पिच्चर काढला तर चापटवायचे....मग गडकिल्ल्यांच्या पायथ्यापर्यन्त असलेली बांधकामे दिसत नाहीत?
टका सहमत, नुसतं चापटवन्यात पुरुषार्थ दाखवणारे, लहान मुलांच्या बसला टार्गेट करतात, कुजबूजी यंत्रणा लगेचच, 'ते मुस्लिम तरुण होते दगडफेक करणारे', अश्या अफवा पसरवतात... बाकी गडकिल्ल्याबाबतीत तर आनंदी आनंद आहे, गडाच्या पायवाटेवर तर काचेच्या चपट्या बाटल्यांचा खच असतो... दुर्दैव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/29/2018 - 10:20 नवीन
कुजबूजी यंत्रणा लगेचच, 'ते मुस्लिम तरुण होते दगडफेक करणारे', अश्या अफवा पसरवतात... हे मला माहित नव्हते, अशी कुजबुज मी तुमच्याकडूनच ऐकली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 01/29/2018 - 11:12 नवीन
टक्या तु नै बे कुजबुजी... उगा कुजबुजी लोकांचं बालंट स्वतावर नको घेऊ.... बाकी तुझ्या माहिती साठी Viral Msg Indicating Muslims Attacked Gurugram School Bus is Fake By Pratik Sinha, Alt News January 25, 2018 at 8:40 PM https://www.thequint.com/news/webqoof/message-claiming-muslims-attacked-school-bus-in-gurugram-is-fake
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 01/28/2018 - 23:37 नवीन
कोणी जर प्रेषित महमंदांच्या स्वर्गारोहणावर चित्रपट बनवला तर त्याची किती शकलं उडतील !
याबाबतीत सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Sun, 01/28/2018 - 17:23 नवीन
कोणी जर प्रेषित महमंदांच्या स्वर्गारोहणावर चित्रपट बनवला तर त्याची किती शकलं उडतील !
१००% सहमत करणी सेनेने अशी करणी करावे की रस्त्यावर जाळपोळ अथवा हिंसक प्रदर्शने करण्या ऐवजी एकदाच त्या भुस्नळ्याची तंगडी तोडून टाकावी . पुन्हा कुणा फुर्रोगाम्याची हिम्मत व्हायची नाहे संस्कॄती अन इतिहासावर थुंकण्याची !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/28/2018 - 17:29 नवीन
संस्कृती आणि इतिहासावर परंपरावाद्याचा कॉपीराइट आहे का ??:) तसे असेल तर हे सर्वात धोकादायक आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 17:37 नवीन
कॉपीराईट नाहीये, पण म्हणून कोणालाही अस्मितांशी खेळ करण्याचं परमिट पण मिळत नाही. (हा प्रतिसाद जनरल अहे, प्रत्यक्षात पद्मावतीत काय झालंय हे आता मला तो चित्रपट टीव्हीवर आल्यावरच कळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टवाळ कार्टा Sun, 01/28/2018 - 23:37 नवीन
तुम्ही पिच्चर बघितला का? का त्याची गरज नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर
प
पगला गजोधर Mon, 01/29/2018 - 03:04 नवीन
शार्ली हेब्दो च्या पुरोगामी पत्रकारांनी दिलेली जीवाची आहुती आठवत असेन, तर त्यांच्यावर भ्याड हल्ला करणारे धर्म मार्तंड प्रवृत्ती बोकाळु नये इथेही, तंगडी मोडायची तर् असल्या धर्म मार्तंडांची....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर
ब
बबन ताम्बे Sun, 01/28/2018 - 18:50 नवीन
आवडला. भावना दुखावण्यासारखं काहीच नाहीये. उलट राजपुतांचा गौरवच केलाय सिनेमामध्ये. राणी पद्मावतीच्या पात्रालाही संयत दाखवलंय. आक्षेपार्ह काहीच वाटले नाही. बरं ही काल्पनिक कथा आहे असा प्रारंभीच डिस्क्लेमर आहे. मग विरोध कशासाठी ?
  • Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Mon, 01/29/2018 - 08:06 नवीन
उद्या डिस्क्लेमर टाकुन आदरणीय थोरल्या महाराजाना त्यांच्या पत्नीबरोबर डान्स करताना भुस्नळ्याने दाखवले तर हिन्दू/मराठे सहन करतील का? किंवा PBUH प्रेषितास सहा वर्‍षाच्या भाचीबरोबर डान्स करताना भुस्नळ्याने दाखवले तर शान्तताप्रिय समाज त्याला जिवन्त सोडील का? काल डिस्क्लेमर चं बोलताय राव ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Mon, 01/29/2018 - 09:53 नवीन
मगच तुम्ही बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 19:15 नवीन
In the film, Jalaluddin Khilji is portrayed as an arrogant, cunning and cruel man. He was actually popular for being a mild mannered and humble monarch. म्हणजे ( हे खरे असेल तर ) थयथयाट खिल्जीच्या वारसानी / चाहत्यानी करायला हवा ! https://en.m.wikipedia.org/wiki/Padmaavat
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 20:59 नवीन
खर आहे, म्हणूनच हिंदूंच्या कोणत्याही मेनस्ट्रीम संघटना यात उतरली नव्हती. करणी सेना, ज्यांनी हे सगळे केले, ते आता कॉंग्रेसच्या गोटात दाखल होतायत.. राजपूतांची आधीच आरक्षणाची मागणी आहेच. बहुधा हा सगळा पटेल आरक्षण आणि मराठा मोर्चा सारखा प्रकार दिस्तोय.. ज्यात नॉन पोलिटिकल प्रकरणात हवा भरून ते आधी तापवून मग आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयत्न कोंग्रेस करतेय. अश्या प्रकारे जातीयवादी प्रकार वाढीला लागणे तितकेसे चांगले वाटत नाही. यामध्ये परवापरवा झालेले कोरेगाव भीमा प्रकरण पण येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 01/29/2018 - 03:56 नवीन
म्हणजे करणीसेना वगळता मेनस्ट्रीममधील इतर हिंदू संघटनाना खिल्जीबद्दल बंधुभाव आहे की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
भ
भंकस बाबा Sun, 01/28/2018 - 21:24 नवीन
पाकिस्तानात शिनेमा बिनाकट रिलीज झाला, गनिमी काव्याने दुश्मन मारला, नायतर क्रुरकपटी, गचाल, स्त्रिलंपट असा मुसलमानी पात्र पाकिस्तानात! आणि वर हिंदू राजाची उदो उदो
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा