राजच्या अटकेमागील 'राज'कारण
💬 प्रतिसाद
(24)
व
विकास
Fri, 10/24/2008 - 17:38
नवीन
या आशयाच्या बातम्या आणि विश्लेषण माझ्याही वाचनात आले आहे. शिवसेना ही सुरवातीस वसंतसेना (वसंतराव नाई़कांच्या अप्रत्यक्ष पाठींब्यावर चाललेली म्हणून)आहे असे म्हणले जायचे ते बर्याचदा आधीपण वाचले आहे.
जरी या बातमीत आणि "वसंतसेना" गृहीतकात तथ्य असले तरी त्यात असा एक सूर येतो की जणू काही पुर्वी बाळासाहेब आणि आता राज हे त्यांचे राजकीय अस्तित्व एखाद्या बांडगुळासारखे राहून मोठे करू शकले.
त्यांचे राजकारण आवडो अथवा न आवडो (आणि तेच इतरांच्या बाबतीतही लागू होऊ शकेल), जेंव्हा ते स्वतःला टिकवतात ("सस्टेन" करतात) तेंव्हा त्यांच्या स्वकर्तुत्वावर ते झालेले असते, कुणाच्या निष्क्रीय राजकारणामुळे नाही असे वाटते. वरील विश्लेषणात अजून एक गृहीत आहे की राज सर्वत्र निवडणूकीसाठी उमेदवार उभे करून सेना-भाजपाची मते फोडणार आहे किंवा किमान तसा प्रयत्न करणार आहे. आणि बाळासाहेब अथवा भाजपाचे जे कोणी सुज्ञ राजकारणी नेते असतील ते, हे निवांत ऐकत बसतील आणि राज पण स्वत:ची वाजवीपेक्षा किंमत वाढली असे समजून निवडणूकांचे राजकारण स्वतःच्या सध्याच्या कुवतीच्या बाहेर खेळेल...
मला जरी राज ठाकर्यांची प्रत्येक "कृती" आवडली नसली (त्याच्या मागचे कारण मान्य असून) तरी त्याचे "राजकीय गुरू" बाळ ठाकरे आहेत हे जाणून घेतले, तर इतकेच म्हणावेसे वाटते की हा "बाळ"कडू मिळालेला राज काही कच्च्या गुरूचा चेला नाही...
- Log in or register to post comments
क
कशिद
Fri, 10/24/2008 - 18:18
नवीन
राजला नकारात्मक प्रसिध्दीचाही फायदा
हे मात्र खर आहे
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Fri, 10/24/2008 - 18:30
नवीन
आपले विश्लेषण सत्याच्या जवळ जाणारे वाटले. माझ्यामते या खेळात देश, प्रामाणिकपणा आणि उदारमतवाद हरणार आहेत.
नशिब राज मुख्यमंत्री होणार असे मत बाहेर आले नाही. नाही तर किणी प्रकरण, जॅक्सन प्रकरण यांचीच पुनरावृती होत राहील असे माझ्या एका मित्राचे मत आहे.
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Fri, 10/24/2008 - 19:17
नवीन
तुमची मी बर्याच प्रतिक्रीया मी वाचल्या.
मला काही प्रश्न पडत आहेत.
१. सध्या जी सरकारे देशात आहेत, त्यामुळे खरोखरच देश जिकंत आहे का?
२. तुम्हाला देश जिकंणे म्हणजे काय अभिप्रेत आहे?
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Sat, 10/25/2008 - 04:40
नवीन
आपण प्रांतवाद वगैरे जो काही करत असतो त्याला लगाम लागला पाहिजे. त्यात राज ठाकरे यांचे बिहारी परीक्षार्थी मुलांना मारहाण करणे आले, लालू फक्त बिहारी लोकांचीच भरती करत असतील तर ते आले, शरद पवार भारतीय कृषीमंत्री असूनही फक्त पुण्यातच राहत असतील आणि राज्याच्या राजकारणाचाच आचार / विचार करत असतील तर तेही आले, बिहारी रेल्वेमंत्री फक्त बिहारच्या रेल्वेचाच विचार / विकास करत असतील तर तेही आले.
थोडक्यात भारताचाच विचार करुन धोरण, प्रयत्न करणारे लोक आले पाहिजे असा विचार झाला पाहिजे.
आजचा सर्वच प्रयत्न पाहिला तर सिंहासन चित्रपटाची आठवण येते.
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Sat, 10/25/2008 - 05:02
नवीन
>>>आपण प्रांतवाद वगैरे जो काही करत असतो त्याला लगाम लागला पाहिजे.
एकदम मान्य
पण प्रांतवाद करतात त्याचे काय? त्याचे काय करायचे?
----
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
- Log in or register to post comments
म
मयुरेशवैद्य
Fri, 10/24/2008 - 19:36
नवीन
देश वगैरे काही हरत नाही, आपण पाकिस्तानाशी युध्द करत नाहीओत.
माझ्यामते या खेळात देश, प्रामाणिकपणा आणि उदारमतवाद हरणार आहेत << राजकारणात हे अस काही उरलं आहे का ?
किणी प्रकरण समजू शकतो .. पण "जॅक्सन प्रकरण" काय आहे ? पैसे सगळेच कमवतात !
असो , आज जर राज मुख्यमंत्री नाही झाला .. तर एकतर पुन्हा हिच काँग्रेस-राष्ट्रवादी. किंवा युती. गेल्या काही वर्षात कॉंग्रेसचा अनुभव आपण घेतला आहे. युतीची ५ वर्षाची "ठोकशाही"/ खंडणीशाही पाहून झाली आहे. अण्णा हजारे काही निवडणूक लढवात नाहीत .. अश्यावेळी पर्याय आहे का कोणी राज व्यातिरिक्त ? असल्यास सांगा.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Sat, 10/25/2008 - 04:55
नवीन
प्रिय मयुरेश,
सध्या दोन / तीन दिवसापासून तुमच्याच विचाराच्या रोखावर / दिशेवर विचार करत आहे. तुम्ही तरुण असाल ( २५च्या आसपास) आणि या वयात असे आदर्श नकळतच मनाची पकड घेतात. मी सुद्धा रामजन्मभुमीचा समर्थक होतो. नंतर राजकारण्यानी कसा आपला उपयोग करुन घेतला हे लक्षात आले. लालजी / प्रमोदजी यांना लाख धन्यवाद.
आपल्या राजकारण्याची एक शासक परंपरा आहे. उदा.यशंवतराव, मोरारजी, कन्नमवार, वसंतदादा इत्यादी. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनही यशवंतरावाचे मुंबईत घर नाही हा त्यांच्या आदर्शाचा पूरावा आहे.
आज मनोहर जोशी, छगनराव, राणे, पवार, देशमुख यांची संपत्ती, व्यवसायाचे जाळे नक्कीच १००० कोटीच्या आसपास असेल असे ऐकतो.
त्यात राज यांनीही पैसे मिळविले तर खरेच काही बिघडत नाही. लालूनी सुद्धा चारा घोटाळा इतक्याच रक्कमेचा असावा असे वाचल्याचे स्मरते.
मला वाईट याचेच वाटते की तुमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते हे मान्य करतात. आशा आहे आपलेही माझ्यासारखेच वयाचा ४२/४३ ला मतपरिवर्तन न होवो. कॉग्रेस, शिवसेना, भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा वापर करुन असे स्वार्थीलोक पुढेच जात असतात.
संभाजीने आपल्या तारुण्यात काही चुका केल्या पण आपला शेवट मात्र दैदिप्त्यमान असा केला तसेच राजचे होवो.
शेवटी आपला हा देश हजोरो वर्षाच्या परंपरेने, भातृभावाने आपल्यापर्यंत आला आहे. त्यात आजच्या विषवल्लीने याचा घात होऊ नये अशीच माझी कळकळ आहे. बाकी खुदा गवाह है....
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
Sat, 10/25/2008 - 17:44
नवीन
फारच छान प्रतिक्रीया
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Fri, 10/24/2008 - 19:12
नवीन
नशिब राज मुख्यमंत्री होणार असे मत बाहेर आले नाही.
का होऊ नये? मला तरी राज मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते. अर्थात त्याकरिता अजून बराच वेळ आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
म
मयुरेशवैद्य
Fri, 10/24/2008 - 19:59
नवीन
शिवसेनेने १००% मराठी माणासाचं (योग्य ) राज कारण केलं असतं तर आज ना उद्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात आलीही असती कदाचित. पण हिंन्दूत्वाच्या नावाखाली त्यांनी पक्ष देशपातळीवर नेण्याचा अतिशय टुकार प्रयत्न केला. देशभर तर पसरले नाहीतच महाराष्ट्रातही तोंडावर आपटलेत. शिवसेनेने मराठी माणसाला "गृहीत" धरलं.
गेली अनेक वर्ष मनपा मध्ये सत्तेत असुनही, त्यांना भैय्यांचा अन्धिकॄत झोपड्या पाडताही आल्या नाहीत आणी नवीन होणार्या रोखताही आल्या नाहीत. ही मंडळी इथे जितकी वाढतील तितकीच आपली व्होटबँक कमी होत जाईल हे ही त्यांच्या लक्षात आलं नाही ?
आज मुंबईत मराठी माणसाचं प्रमाण अमराठींच्या तुलनेने कमीच आहे. अश्यावेळी ज्या आक्रमक पद्धतीने राज ने मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे, त्याबद्दल त्याला दाद द्यावीच लागेल. त्यातच "आम्ही महाराष्ट्राबाहेर जाणार नाही" हे ही स्पष्ट केले आहे. आणी ही गोष्ट महाराष्ट्रासाठी चांगलीच आहे. कारण उद्या महाराष्ट्राच्या कोणत्याही मुद्दयावर मनसेला, आपली कर्नाटकची मत , आपली ऊ.प मधली मतं, आपली बिहारची मत इ.इ ची काळजी नसेल. ह्या असल्या इतर राज्यांच्या मतांच्या चिंतेमुळेच इतर पक्ष महाराष्ट्राची बाजू मांडण्यात कमी पडतात-किंवा मांडतच नाहित. मनसेच्या बाबतीत असले काही "political compulsions" नसतील आणी ह्याचा फायदा पुढे महाराष्ट्राला नक्कीच होईल असे वाटते.
अर्थात, जर का ह्यावेळीस मराठी मतं मनसे -शिवसेने मध्ये फुटलीत, तर मात्र कठीणंच आहे.
मयुरेश वैद्य
- Log in or register to post comments
झ
झंडू बाम
Sat, 10/25/2008 - 12:41
नवीन
शिवसेनेने १००% मराठी माणासाचं (योग्य ) राज कारण केलं असतं तर आज ना उद्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात आलीही असती कदाचित. पण हिंन्दूत्वाच्या नावाखाली त्यांनी पक्ष देशपातळीवर नेण्याचा अतिशय टुकार प्रयत्न केला. देशभर तर पसरले नाहीतच महाराष्ट्रातही तोंडावर आपटलेत. शिवसेनेने मराठी माणसाला "गृहीत" धरलं.
यात थोडी दुरुस्ती करतो. शिवसेनेने नव्हे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला गृहित धरले. मी म्हणेल तेच खरे, ही त्यांची शैली. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभणारीच आहे. पण पुढे पुढे शिवसेना श्रीमंतांच्या दावणीला बांधली गेली. मराठी माणसाचे हित बाजूला पडले. शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख निवडतानाही पक्षाच्या पुढील वाटचालीचा विचार केला गेला नाही. खरे तर राज हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार शोभतात. पण उद्धव यांचा हट्टीपणा आणि अनेक संधीसाधूंचे राजकारण यामुळे राज यांच्याऐवजी उद्धव या अतिशय थंड व्यक्तीकडे ते पद सोपविण्यात आले. या घटनेपासून शिवसेना लोकांच्या मनातून उतरत गेली.
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Fri, 10/24/2008 - 20:35
नवीन
कारण त्यामुळे दोन्ही सेनेतील मते विभागले जाऊन फायदा कॉंग्रेसचाच होईल, असा डाव राजकारणाच्या सारिपाटावर खेळला गेला आहे.
-- हे मत बर्याच वृत्तपत्रात सुद्धा आले आहे. जर दोन्ही सेना हुशार असतील तर त्यांनी आता विवाह गाठ बांधून एकत्र येण्यात त्यांचे शहानपण आहे ... युती अथवा एकाच झेंड्याखाली. जर असे झाले तर काँगेसकडून दुखावला गेलेला मराठी माणूस सेनांच्या बाजूने जाऊ शकतो व काँग्रेसच्या बाबतीत त्यांचेच दात त्यांच्या घशात असे होऊ शकते. बघू यात कोण काय करतात ते.
बाकी कलंत्री साहेब म्हणतात ते काही पटले नाही. कारण आपल्या देशात प्रामाणिकपणा आणि उदारमतवाद राजकारणात जिंकल्याची (असतील तर) खूपच तुरळक उदाहरणे आहेत. राज्यकर्त्यांनी अशा डावांची हीन पातळी केव्हाच गाठलेली आहे. जर देशाचे भले करायचे असेल तर दिल्लीवाल्यांना अगोदर हाकलले पाहिजे.
आपला,
(तटस्थ) भास्कर
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 10/25/2008 - 15:04
नवीन
म्हणजे काय होईल? तर युती सत्ता मिळवेल!!!... एकदा युतीने सत्ता मिळवली की प्रश्न सुटतील असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते का?
काँग्रेस काय, भाजप काय, राष्ट्रवादी काय , शिवसेना काय आणि मनसे काय... सगळे निवडणूक जिंकेपर्यंतचाच विचार करणारे पक्ष. तसेच त्या पक्षांचे नेतेहि. निवडणुकांपलिकडे जाऊन त्यांचे धेय्ये-धोरणे काय असतील, कार्यक्रम काय असतील याचा मागमुस नाहि.
जो निवडणुकींपुर्वी जाहिरनामा निघतो त्यातहि धेय्यापेक्षा खर्या-खोट्या कर्तुत्त्वाचाच मारा असतो.
राजचे विचार कितीही पटले/पटले नाहित तरीही तो मुख्यमंत्री होऊन काहिहि बदल करु शकेलसे वाटत नाहि. राजसारख्या 'नेत्या'पेक्षा महाराष्ट्राला नरेंद्र मोदिंसारख्या 'कार्यकर्त्या'ची (नरेंद्र मोदींच्या विचारांचे अनुकरण करणारा नव्हे तर शासकीय कार्य करणारा अश्या अर्थाने म्हणतोय) गरज आहे असे वाटते. बडबड कमी आणि कृती जास्त
-(कार्यप्रधान) ऋषिकेश
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Sat, 10/25/2008 - 15:15
नवीन
कृती करण्याकरिता आधी संधी मिळायला हवी ऋषीकेशराव!
स्वत राज ठाकरे ही नरेंद्र मोदींच्या विकास कामांची स्तुती करतात आणि असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला हवा असे उद्गार ही त्यांनी पुण्यातल्या एका सभेत काढले होते. आजपर्यंतच्या राजकर्त्यांनी काय दिवे लावले ते माहीत आहे ना सर्वांना, मग राज ठाकरेंना एकदा संधी द्यायला काय हरकत आहे. संधी न देताच त्यांच्यावर टिका करणे माझ्या मते योग्य नाही.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 10/25/2008 - 15:33
नवीन
केवळ संधी द्यायला काहिच हरकत नाहि .. आजपर्यंत आपण अनेकांना संधी दिली त्यात हा एक.. याविषयी आपल्याशी सहमत...
मात्र.. केवळ संधी द्यावी या उद्देशाने असेल तर ठिक.. मात्र त्यामागे जर फार अपेक्षा असतील आणि अपेक्षाभंग झाला तर समाजात न्यूनगंड तयार होतो (आठवा गिरणी संप.. नेत्यांकडून अपेक्षा ठेवल्या आणि शेवट केवळ निराशा पदरात पडली.. त्याचे दूरगामी परीणाम वगैरे)बर्याच वर्षांनी राजने अशी "आशा" जाग्रुत केली आहे..
राजला एक संधी द्यावी यात चुक काहिच नाहि.. मात्र त्याने ठोस कार्यक्रम दिला तर मनापासून मत द्यावेसे वाटेल. तुर्तास कोणाचाहि काहिच कार्यक्रम नसल्याने कोणालाहि मत द्यावेसे वाटत नाहि
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
Sat, 10/25/2008 - 17:49
नवीन
राजसारख्या 'नेत्या'पेक्षा महाराष्ट्राला नरेंद्र मोदिंसारख्या 'कार्यकर्त्या'ची (नरेंद्र मोदींच्या विचारांचे अनुकरण करणारा नव्हे तर शासकीय कार्य करणारा अश्या अर्थाने म्हणतोय) गरज आहे असे वाटते. बडबड कमी आणि कृती जास्त.
कार्य करण्यासाठी सत्ता हवी. मनसे हे फक्त अडिच वर्षांचे बाळ आहे.
- Log in or register to post comments
स
स्वामि
Fri, 10/24/2008 - 22:05
नवीन
राज सेना सोडणार हे राणेला आधि पासुन माहित होते.म्हणुन त्याने घाइघाइत सेना सोडलि.मराठिचा मुद्दा कधि आणी कसा पेटवायचा ते या दोघाच आधिच ठरले होते.याचा फायदा घेउन राणेला विलासरावाचि गोचि करायचि होति.म्हणुन तो एवध्या आरामात विलासरावाला धमकावत होता.पवारांचा यात फायदाच होता.काहि न करता काँग्रेसचि वाट लागताना बघायच सुख त्यांना मिळालं.यातुन मार्ग काढण्यासाठि देशमुखांनि उद्धवचि मदत घेतलि.
- Log in or register to post comments
म
मयुरेशवैद्य
Sat, 10/25/2008 - 00:29
नवीन
हे कळलं नाही.
१) राजच्या सेना सो़डण्यामुळे राणेंना काय फायदा झाला ?
२) यातुन मार्ग काढण्यासाठि देशमुखांनि उद्धवचि मदत घेतलि.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 10/25/2008 - 16:58
नवीन
=)) =)) =)) =)) =)) काहिहि ...
बाकी वरिल सगळ्या प्रतिसादांवरून असं लक्षात येतं की आपल्या इथं क्रिकेट आणि राजकारण ह्यातले आपण मुरलेले लोणचे असल्यासारखा प्रत्येक जण बोलत असतो . ... वाचतोय .. बाकी चालू च्या ...
आम्हाला राज ठाकरेंना मत देण्यात दुमत नाही, आतापर्यंत सगळे सारखे , त्यात आपल्या हक्काचा वापर करायचा म्हणून बोगस मतदान केल्याचं आठवलं .. यंदा मनसे .. चियर्स ...
टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा
- Log in or register to post comments
क
कोदरकर
Sat, 10/25/2008 - 01:38
नवीन
अस्मिता हा मुद्दा राज्यासाठी चांगला आहे.
तुलना करता येत नाही पण काहीशा अश्याच वातावरणात 'मोदी' जन्म झाला.
महाराष्ट्र कणखर करायचा असेल तर 'राज' ला पर्याय नाही.
राणे यांची फजिती महाराष्ट्र पाहतोच आहे.
विलासराव १० 'वर्षा' च्या जॅकपाट वर समाधानी आहेत
बाळासाहेब, शरदराव निवॄत्त होताहेत
ऊध्दवला भाजप साथ सोडता येणार नाही.
ऊध्दव दिल्लीत राज महाराष्ट्रात असे 'मराठी'करण जमायला हवे होते.
- Log in or register to post comments
स
स्वामि
Sat, 10/25/2008 - 16:43
नवीन
राजचे आंदोलन हे देशमुख सरकार साठि डोकेदुखि ठरणार हे राणेंना माहित होतं.आणि राणेंच्या आजारावर एकच उतारा आहे आणि तो म्हणजे शिवसेना.यात शरद पवारांचि ** राजचि प्रसिद्धि बघुन आगिच्या भक्षस्थानि पडलि.म्हणुनच हे आजचे वि . हिं. प. च्या कार्यालयावर हल्ला प्रकरण.
- Log in or register to post comments
ध
धोंडोपंत
Sat, 10/25/2008 - 18:50
नवीन
आजची परिस्थिती पाहता, राज ठाकरे यांच्या अटकेमुळे सर्वसामान्य मराठी माणूस मनसेकडे वळला आहे असे वाटते.
विविध संकेतस्थळांवर ज्या प्रातिनिधिक चाचण्या घेण्यात आल्या त्यात येत्या निवडणूकीत मतदान कुणाला कराल? या प्रश्नाला बहुतेकांनी मनसेला असे उत्तर दिलेले आहे.
मिसळपाववर झालेल्या चाचणीतही ८४ टक्के जणांनी मनसेला पसंती दिलेली आहे .
राज ठाकरे यांच्या प्रत्येक आंदोलनाला जनतेची प्रचंड सहानुभूती आहे. याचे कारण ते लोकांच्या मनातले बोलत आहेत.
पुढील प्रत्येक आंदोलन आणि अटक राज ठाकरे यांना सत्तेच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाईल याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही.
आमच्या त्यांना शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
- Log in or register to post comments
स
स्वामि
Sat, 10/25/2008 - 19:24
नवीन
राणेंवर सहारा प्रकरणात जे आरोप झाले त्यांचि माहिति देशमुखांच्या आशिर्वादाने बाहेर आलि.माणिकराव गावित नावाचे एक मिनिस्टर जेंव्हा आदिवासिंच्या भेटिला गेले त्या वेळि उद्धव तेथे आल्या नंतर अधिकार्यांनि गावितांकडे ढुंकुनहि न बघता उद्धवला सलाम ठोकले.
- Log in or register to post comments