उपनिषदांत देव पडताळणे
उपनिषदांत देव पडताळ्णे ?
श्री. क्रिप्ट यांनी आस्तिक-नास्तिक या दोघांना देव आहे की नाही हे स्वत:पडताळून पहावयास सांगितले. छान. आजच्या काळात कोणावर विश्वास ठेऊन देव आहे की नाही हे ठरविण्याऐवजी स्वत: जर काही पडताळणे शक्य असेल तर उत्तमच की. पुढे जाण्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री. क्रिप्ट यांनी "देव" याची व्याख्या केली नाही. आपण असे धरून चालू की आज सर्वसाधारण माणुस ज्याला देव म्हणतो, ज्याची देवळे बांधतो, ज्याची पूजा करतो तो देव. मग तो विष्णु असेल, शंकर असेल वा देवी असेल. हा सर्वशक्तीमान देव दयाळू, भक्तांना मदत करणारा, भवसागरातून तारून नेणारा असतो. त्यालाच श्री. क्रिप्ट देव म्हणतात. याहून दुसर्या कशाला श्री क्रिप्ट यांना देव म्हणावयाचे असते तर त्यांनी तसे स्पष्ट केले असते. असो. तर आता ही व्याख्या स्विकारून पुढे सरकू.
आता श्री.क्रिप्ट यांना काय सांगावयाचे आहे ते त्यांच्याच शब्दांत बघू.
गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय?
भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो.
उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.
पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत.
"उपनिषदांचा अभ्यास करून "देव" आहे की नाही हे पडताळता येते" हे न पटल्याने मी त्यांना नम्रतेने विचारले की "असे कोणत्या उपनिषदात आहे त्याचे नाव, अध्याय, मंत्रक्रमांक द्या." प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी "108 उपनिष्दे आहेत; त्यातील ही दहा प्रमुख, या स्वामींचे व्याख्यान ऐका ,अभ्यास करा" असा उपदेश केला. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसल्याने मी परत तोच प्रश्न विचारला. ते तर रागावलेच. त्यांनी सांगितल्यातच माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे त्यांनी सांगितले. पण तरीही त्यांना माझ्या चिकाटीचे कौतुक वाटले असावे. त्यांनी "मांडुक्य व केन " ही उपनिषदे वाचावयास सांगितली "केन" मधील शेवट वाचा हे सांगितले पण हा चुकार विद्यार्थी कष्ट करण्याचे टाळेल म्हणून (त्यांना माहीत असूनही) ’मांडुक्य" मधील मंत्र क्रमांक मात्र दिले नाहीत. मलाच शोधाण्याचे कष्ट घ्यावयास सांगितले ही झाली ह्या लेखाची पूर्वपीठिका.
आता सुरवातीला ’देव" याची व्याख्या का करावी लागली याचे कारण बघा. उपनिषद्काली देव नव्हता. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादि वैदिक देवता होत्या. आज त्यांना कोणी देव म्हणून पडताळून बघावयाचा प्रश्नच नाही. तेव्हा उपनिषदांत देव पडताळता येईल हा पायाच चूकीचा आहे.
पण त्यांनी मांडुक्य उपनिषद पहा असे सांगितले आहे म्हणून तेथे पाहिले तर काय दिसते ? सहाव्या मंत्रात ॐ च्या तिसर्या पादाला लावलेले सर्वेश्वर हे एक विशेषण सोडले तर संपूर्ण बारा वाक्यात कोठेही "देव" हा शब्दच नाही. संपूर्ण उपनिषद ॐ ची महती सांगते. ॐ ला "ब्रह्म" म्हटले आहे. आता ब्रह्म म्हणजे देव नाही हे श्री क्रिप्टही मान्य करतील .
दुसरे उपनिषद "केनोपनिषद". येथे आपणास संपूर्ण उपनिषद बघण्याची खरी म्हणजे गरज नाही कारण श्री. क्रिप्ट यांनी, (माझ्यावर कृपा करून,) शेवट बघावयास सांगितले आहे. पण तेथे जाण्याआधी केनोपनिषदाचा गाभा पाहिला तर असे दिसते की संपूर्ण उपनिषद "ब्रह्म" चे महत्व शिष्याला पटविण्याकरिता आहे. शिष्याने "कोणत्या देवाने डोळे, कान यांचे कार्य सुरू केले " ?
( इथे देव म्हणजे वैदिक देवता) असा प्रश्न विचारल्यावर आचार्य, देवाला कटवून, "ब्रह्म"चे महत्व सांगतात व नीट ध्यानात यावे म्हणून परत सांगतात. हे देव "ब्रह्म "पुढे कसे निर्बळ आहेत हे तिसर्या खंडातील कथेवरून स्पष्ट केले आहे. इंद्र, वायू, अग्नी आदि प्रमुख देवता "ब्रह्म"समोर कस्पटाप्रमाणे आहेत हे स्पष्ट करून
"हे ब्रह्म भजनीय असल्यामुळे त्याची उपासना करतात. जो कोणी त्याची अशी उपासना करतो, त्याला सर्वही प्राणिमात्र आपले मानतात" असे सांगून आचार्य थांबतात.
या नंतर शिष्य त्यांना म्हणतो, "भगवन्, मला उपनिषद म्हणजे उपदेश द्या." आचार्य म्हणतात ,"तुला मी उपदेश दिला आहे. ब्रह्मज्ञान कथन केले आहे." म्हणजे येथे जे काही सांगितले आहे ते देव पडताळण्या करिता नसून "ब्रह्म " संबंधी आहे.
थोडक्यात श्री. क्रिप्ट यांनी सांगितलेल्या दोनही उपनिषदांशी "देव" पडताळून पाहण्याचा किंवा पद्धती स्विकारण्याचा दूरान्वयेही संबंध नाही.
आता वळू पातंजल योगदर्शनाकडे. तिसर्या सूत्रा संबंधी श्री. क्रिप्ट म्हणतात
...... " तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो." श्री. क्रिप्टजी, आम्हाला काय ठरवावयाला सांगता, तुम्हीच सांगा की तुम्हाला देव म्हणावयाचे आहे की शक्ती आणि शक्ती ही काय भानगड आहे ? येथे देव वगैरे काही नाही. द्रष्टा हा द्रष्टा-दृश्य-दर्शन या त्रिपुटीतील द्रष्टा आहे, म्हणजे ब्रह्म (येथे शरीरात आहे म्हणून जीवात्मा) जेव्हा तुम्ही सर्व चित्तवृत्तींचा निरोध करता तेव्हा तुम्ही बाह्य जगाकडे पाहण्याऐवजी दृष्टी अंतर्मनाकडे वळविता. तेथे चित्तनिरोधामुळे काहीच नाही. त्यामुळे त्रिपुटी नाहिशी होऊन आत्मा आता आपल्या "स्व"रूपात असतो. अवस्थित याचा अर्थ "प्रकट होतो" असा करणे योग्य नव्हे. आणि समजा केलात तरी " देव " प्रकट होत नाही, इथेही देव पडताळणे वगैरे काही भानगड नाही.
कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत. काही लोक "बिग बी" रजनीकांत", जयललिता" यांनाही देव मानतात. मग "ब्रह्म"ने काय घोडे मारले आहे ?
असो.
श्री. क्रिप्ट यांनी " थोडे कष्ट घेऊन उपनिषदे वाचण्याची सुरवात करा " हा उपदेश केल्याबद्दल आचार्यांना शिरसा नमस्कार.
शरद.
(समित्पाणी)
💬 प्रतिसाद
(58)
म
माहितगार
Mon, 03/12/2018 - 09:24
नवीन
रोचक चर्चा चालू आहे , त्या सोबत काही नर्म खुसखुशीत आणि तेही प्रत्येक विचारधारेच्या व्यक्तीस काही तरी गवसेल असे वाचावयास मिळाल्यास कसे वाटेल ? खरेतर वेगळा धागा काढावयास हवा पण वेळे अभावी फक्त दुवा देतो आहे.
सुभाषचंद्र बोसांंच्या इतर बर्याच गोष्टी चर्चेत असतात , त्यांचे अपूर्ण राहीलेले आत्मचरीत्र त्याचा हा दुवा An Indian Pilgrim: Autobiography of Subhash Chandre Bose" अपुर्ण असले तरी वाचण्यासाठी एखाद दिडतासाचा तरी अवधी देता येईल असा वेळ काढून वाचा; स्ध्याच्या चर्चेत रस असेल नसेल, अस्तिक असाल नास्तीक असाल, व्हेजीटेरीयन वादी असाल नॉन व्हेजीटेरीयनवादी असाल, पुरोगामी असाल अथवा सनातनी असाल , हे रोचक आत्मचरीत्र वाचले नसल्यास अवश्य वाचावे.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Tue, 03/13/2018 - 06:14
नवीन
मी मंकी नावाच्या एका पुस्तकाचा मधे अनुवाद केला होता. त्यातील हा संवाद मला हे सगळे वाचून आठवला. हे पुस्तक म्हणजे एका पुराणकथाद्वारे बौद्धधर्मातील तत्वांची ओळख.. हे पुस्तक लिहिले गेले अंदाजे १००० ते ११०० साली. याचा पाया ह्युएनसंगचा भारताचा प्रवास हे आहे. असो...
.....आपल्याला आता धर्मामधे नाव मिळाले या कल्पनेनेच वानराने आनंदाने माकडउडया मारल्या आणि सुबोधीला त्याने लवून वंदन केले. त्या ज्ञानी मुनींनी मग इतर शिष्यांना सन् वूकांगला बाहेर घेऊन जायला सांगितले आणि त्याला जमीन स्वच्छ आणि कशी सारवायची हे शिकवायला सांगितले. त्याला हाका मारल्यावर, कशी “ओ” द्यायची आणि मठात कसे वागायचे हे ही समजावून सांगायला सांगितले. त्या सगळ्यांना वंदन करुन वानर मग त्या अमरजीवांबरोबर बाहेर गेला आणि त्यानी त्या तिथे ओसरीवर स्वत:साठी झोपण्याची जागा केली . दुसर्या दिवशी पहाटे सगळ्यांनी उदबत्या पेटवून वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्व विकासाचा , लिपी आणि पवित्र ग्रंथाचा अभ्यास केला. असे अनेक दिवस चालले होते. उरलेल्या वेळात तो केर काढे, बागेची खुरपणी करे, झाडांची देखभाल करे, फुलांची लागवड, आणि वाळलेली लाकडे गोळा करुन ती पेटवून ठेवे. त्याला जे पाहिजे होते ते सर्व त्याला मठात मिळत होतेच. अशी जवळ जवळ सात आठ वर्षं गेली आणि तो दिवस अखेरीस उजाडला. त्या दिवशी सुबोधींनी सर्व शिष्यांना त्यांच्या आसनापाशी बोलावले आणि आसनस्थ होत त्यांनी मोक्षाचा मार्ग सांगायला सुरवात केली.
स्वर्गिय फुलांचा वर्षाव झाला,
जमिनीतून कमळे फुलली,
त्यांनीमोक्षाचे तीन मार्ग सांगितले आणि
दहा हजार धर्मातील त्यांचे स्थान,
ते बोलत असताना जणू त्यांच्या तोंडातून
शब्दांची मौल्यवान हिरे, माणके पडत होती.
त्या सत्यापुढे विजेचा कडकडाट फिका आणि
सप्त स्वर्ग थरथरत होते.
एकदा अर्थ, तर त्याच्या मागे त्याचे ध्यान असे करत
त्यांनी ते तीनही मार्ग एकच आहेत हे सांगितले.
प्रत्येक शब्दाला मग प्राप्त झाला
एक अर्थ.
जन्म कसा टाळावा हे सांगताना सांगितले
मोक्षप्राप्तीचे रहस्य.
ते सत्य उमगल्यावर माकडाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाच्या भरात त्याने सवयीने कान दुमडले, गाल खाजवले आणि दात विचकले एवढेच नाही तर तो उन्मादाने टाळ्या वाजवून जमिनीवर पाय आपटू लागला. ते बघितल्यावर मुनींनी विचारले “मी शिकवतोय त्याकडे लक्ष द्यायचे सोडून तू वेडयासारख्या उडया का मारतो आहेस ?”
“हे मुनीवर तुमचा हा शिष्य तुमचे शिकवणे नीट लक्ष देऊन ऐकतोय याची खात्री बाळगा. पण तुमचे शब्द ऐकून मला इतका आनंद झाला आहे की मी स्वस्थ बसूच शकत नाही. मला कळत नाही आहे की मी काय करु. मला क्षमा करा आणि या क्षुद्रावर रागवू नका.”
“म्हणजे तुला मी सांगतोय त्याचा खरा अर्थ समजतोय ?” सुबोधींनी आश्चर्याने विचारले. “किती दिवस झाले तुला इथे येऊन ?”
“तुम्ही मला मूर्ख म्हणाल, पण मला खरंच माहीत नाही मी इथे केव्हा आलो ते. मला फक्त एवढेच माहिती आहे की जेव्हा मला लाकडे गोळा करायला गुहेच्या मागच्या डोंगरावर पाठवले गेले तेव्हा मी सात वेळा करवंदांनी लगडलेली झाडे खाल्ली आहेत.”
“हंऽऽऽ त्या डोंगराला करवंदाचा डोंगर असेच म्हणतात. तू सात वेळा तो बहर खाल्ला आहेस म्हणजे तुला इथे येऊन सात वर्षं झाली असे म्हणायला हरकत नाही. आता तुला माझ्याकडून कसले ज्ञान मिळवायचे आहे ते सांगतोस का ? सर्व ज्ञानांचा हेतू मोक्षप्राप्ती हाच असतो.”
“आपल्याला माझ्यासाठी जे योग्य वाटेल ते मी शिकायला तयार आहे. माझे सर्वस्व मी त्यासाठी पणाला लावेन”
“कला शिकायला आवडेल का तुला ?”
“ते काय असते ?”
“त्याने तू स्वप्नांच्या दुनियेत रमू शकतोस आणि कल्पनेच्या भरार्या मारु शकतोस. संकटे कशी टाळावीत हे तुला कळेल आणि तुझ्या नशिबाची दारे उघडतील.”
“पण मी मग अमर होईन ना ?” माकडाने अधीर होत विचारले.
“शक्यच नाही” मुनीवर्य म्हणाले
“मग मला त्याचा काय उपयोग?” निराश होत माकडाने विचारले.
“मग तत्वज्ञान ?”
“ते काय असते?”
“त्यात तुला कन्फुशियस, ताओ, बुद्ध अशा थोर तत्वज्ञानी लोकांची शिकवण शिकायला मिळेल. वैद्यकीय शास्त्र, प्राचीन पवित्र ग्रंथ यांचा अभ्यास, प्रार्थना, असे अनेक विषय शिकायला मिळतील”
“पण मी अमर होईन का ?”
“तुला जर अमरच व्हायचे असेल तर मला वाटते, तत्वज्ञान तुझ्या उपयोगाचे नाही. तत्वज्ञान शिकून अमरत्व प्राप्त करणे म्हणजे महालाच्या भिंतींना खांबांचा आधार देण्यासारखे आहे..”
“हे महान मुनी, मी एक अतिसामान्य असा माकड आहे मला पामराला तुमची ही अध्यात्मिक भाषा कळत नाही. भिंतींना खांब लावणे म्हणजे काय ? मला जरा समजावून सांगता का ?”
“जेव्हा माणसे महाल बांधतात तेव्हा ते भिंतींना आधार म्हणून खांब बांधतात. पण जेव्हा त्या महालाचा काळ भरतो तेव्हा छप्पर कोसळते आणि खांब कुजतात.”
“यात मला अमर होण्यासाठी काही सापडेल असे वाटत नाही. हे शास्त्र मी नाही शिकणार.”
“तुला सर्वात अवघड असे मौनव्रतशास्त्र शिकायचे आहे का?”
“आता त्यात काय काय असते ?”
“कमी अन्नावर जगण्याची कला, ध्यानधारणा, कर्म आणि वाणी यांवर ताबा, जागेपणी आणि निद्रीस्त अवस्थेत योग, हे सगळे तुला या शास्त्रात शिकायला मिळेल”
“पण मी अमर होईन ना याने ?”
“ हे शास्त्र शिकून अमर होणे म्हणजे भट्टीतील ओल्या माती सारखे आहे”
“महाराज तुमची स्मरणशक्क्ती स्वल्प दिसते. मी तुम्हाला मगाशीच सांगितले की मला तुमची ही अवघड भाषा कळत नाही. हे शिकून मी चिरंजीव होईन का? कच्च्या मातीचा इथे काय संबंध ?”
“विटा जरी भट्टीमधे तयार होऊन पडल्या असतील तरी त्या भाजल्या नसतील तर काय उपयोग ? एखादा दिवस जर पाऊस आला तर शेवटी त्याचा चिखलच होणार.”
“याच्यात मला काही भविष्य आहे असे वाटत नाही. मी काही मौनव्रतशास्त्रासाठी तुम्हाला त्रास देणार नाही”
“मग तू असे कर, तू व्यायामशास्त्र शीक”
“आता हे आणखी काय ?” माकडाने शांतपणे विचारले.
“यात शक्तीची पूजा असते. यात तू विविध प्रकारचे व्यायाम आणि युध्दशास्त्र शिकशील. धनूष्य बाण चालवणे, पुण्य जमवणे आणि पापाचा त्याग करणे, श्वास रोखणे, जादूने स्फोट करणे, मोठमोठाल्या शिळा वितळवणे, अशा अनेक गोष्टी.”
“मग मी अमर होणार ना?” माकडाने शांतपणे विचारले.
“हे शिकून अमर होणे म्हणजे पाण्यातून चंद्र काढण्यासारखेे झाले.”
“परत तेच ! आता ही पाण्यातल्या चंद्राची काय भानगड आहे ?”
“पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. ते तुम्ही पकडायला गेलात की कळते की तो एक भ्रम आहे.”
“यातसुध्दा मला काही रस वाटेल असे मला वाटत नाही.”
हे ऐकल्यावर मुनींनी येणारे शब्द घशातच गिळले.
“अरेच्या !” असे ओरडून मुनीवर त्यांचे आसन सोडून खाली उतरले. माकडाची गचांडी पकडून ते ओरडले “ अरे निर्लज्ज माणसा तू हे ही शिकणार नाहीस आणि ते ही शिकणार नाहीस. तुला पाहिजे तरी काय ?” असे म्हणून त्यांनी त्या माकडाच्या डोळ्यावर तीन टपला मारल्या. हात मागे बांधून मग त्यांनी दोन येरझारा घातल्या, सर्वांना प्रवचन संपले असे खुणेनेच सांगून ते आतल्या खोलीत निघून गेले. आत गेल्यावर त्या खोलीचे दार लावायला ते विसरले नाहीत. ते गेल्यावर सर्व शिष्यगणांनी मोर्चा त्या माकडाकडे वळवला.
“अरे नीच माकडा, ही काय वागायची रीत झाली ? महाराज तुला शिकवायला तयार झालेत, त्यांचे ऐकायचे सोडून तू त्यांच्याशीच वाद घालतोस ? एवढे अपमानीत झाल्यावर ते केव्हा परत येणार कोण जाणे ! माकडाला घेरुन चिडून सर्वजण त्याला शिव्याद्या देऊ लागले. प्रकरण पार हातघाईवर आले. पण माकडाच्या चेहर्यावर जरासुध्दा खेद नव्हता. त्याने शांतपणे त्यांना तोंड देत एक स्मितहास्य केले. त्यामागचे खरे गुपीत हे होते की त्याला खुणांची गुप्त भाषा येत होती. त्याने या सगळ्यांचा बरोबर अर्थ काढला. त्याला मुनींनी तीन टपला मारल्या त्याचा अर्थ तिसर्या प्रहराकडे लक्ष ठेव. त्यांनी मागे हात बांधले याचा अर्थ होता त्यावेळी ते सर्वात आतल्या खोलीत असतील आणि त्यांनी दरवाजा आतून लावून घेतला त्याचा अर्थ होता मागच्या दरवाजाने येऊन भेट.
उरलेला दिवस मग वानराने त्याच्या मित्रांबरोबर उंडारण्यात घालवला पण मनात मात्र रात्र केव्हा होते याची तो आतूरतेने वाट बघत होता. दुसर्या प्रहराच्या शेवटी, वानर नेहमीप्रमाणे इतरांबरोबर झोपायला गेला. अंथरुणावर तो झोपेचे सोंग घेऊन पडून राहीला. त्याचा श्वास झोपलेल्या इतरांसारखा मंद चालत होता. डोंगरांमधे आपल्यासारखी घडयाळे नसतात आणि वेळेची दवंडीही नसते. त्याने मग श्वास मोजायला सुरवात केली. मध्यरात्रीच्या आसपास तो हळूच उठला, त्याने बाहेर बघितले
चंद्र सूर्याच्या तेजाने तळपत होता
नक्षत्रांवरची धूळ अस्पष्ट झाली,
दूरवर झांडांमधे पक्षी निद्रीत होते,
पाणी शांतपणे तालात वाहत होते.
काजव्यांच्या प्रकाशात क्षितिजावर
बगळ्यांची माळ चमकत होती
तिसरा प्रहरच हा, मोक्षमार्ग विचारायचा !
त्याने पटकन कपडे चढवले. पुढचा दरवाजा हळूच उघडला आणि चोरपावलाने बाहेर पडून तो वळसा घालून मागच्या दरवाजापाशी आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तो अर्धवट उघडाच ठेवलेला होता. माकड मनात म्हणाला “मुनींनी मला खरंच दिक्षा द्यायची ठरवलेली दिसते आहे. म्हणूनच त्यांनी हा दरवाजा किलकिला करुन ठेवलेला दिसतोय”. पायाचा आवाज न करता तो सरळ त्यांच्या बिछान्यापाशी पोहोचला. मुनीवर्य भिंतीकडे तोंड करुन अंगाची मुटकुळी करुन झोपले होते. त्यांना उठवायचे वानराला काही धाडस झाले नाही. त्याने तिथेच त्यांच्या पायाशी बसकण मारली. असाच बराच वेळ गेला. त्यांना जाग आली आणि त्यांनी आपले पाय सरळ केले आणि शरीर ताणले. हे करताना ते स्वत:शीच बोलत होते -
“कठीण आहे मार्ग मोक्षप्राप्तीचा
हे रहस्य थोडयांसाठीच आहे.
पोराटोरांचा तो खेळ नाही.
नालायकांना हे शिकवणे म्हणजे
स्वत:चाच घसा सुकवणे !”
हे ऐकताच माकड जमिनीवर डोके टेकवून म्हणाले “ स्वामी तुमचा हा शिष्य तुमच्यापुढे गुडघे टेकून केव्हाचा उभा आहे.”
जेव्हा मुनींच्या कानावर हा सन् वुकाद्यंगचा परिचित आवाज पडला तेव्हा ते दचकून ऊठले, त्यांनी कसेबसे अंगाभोवती कपडे गुंडाळले आणि पायाची घडी घालत ते किंचाळले “ अरे क्षुद्र मर्कटा ! तू इथे काय करतो आहेस ? तुझी झोपायची जागा तर पुढे आहे ना ?”
“स्वामी, काल सर्वांसमोर तुम्हीच मला सांगितले ना ,की तिसर्या प्रहरी मागच्या दरवाजाने येऊन मला भेट म्हणजे मी तुला चिरंजीव होण्याचे रहस्य सांगतो ! म्हणून तर मी हे इथे असे यायचे धाडस केले.”
त्या मुनीवर्यांना हे ऐकून अतिशय आनंद झाला. या माकडात खरोखरंच दैवी अंश आहे बरं का ! तेे मनाशी म्हणाले. “नाहीतर त्याला मी केलेल्या खुणांचा अर्थ कसा समजला असता ?”
“स्वामी आता आपण इथे दोघेच आहोत. कुणालाही आपण काय बोलतोय ते कळणार नाही.
माझ्यावर , हे स्वामी, दया करा आणि मला चिरंजीव होण्याचा मार्ग दाखवा” माकड कळवळून म्हणाले......
पुस्तक वरवर साधेसुधे वाटते पण त्यात फार अर्थ भरला आहे..... उदा. माकड म्हणजे आपले मन असे रुपक आहे....
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 03/13/2018 - 08:26
नवीन
मस्तं कथाय, जयंतराव! दिल लागा मोक्षपे तो इंद्रपद क्या चीज है!!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 03/13/2018 - 11:49
नवीन
आणि हे मन जेव्हा शरण जाते तेव्हा बनते हनुमान.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 03/13/2018 - 12:23
नवीन
क्या बात है !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 03/13/2018 - 12:25
नवीन
पुस्तक कुठे मिळेल ?
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Tue, 03/13/2018 - 13:01
नवीन
मी २० प्रती तयार केल्या होत्या. त्यातील १/२ शिल्लक असतील. तुम्हाला पाहिजे असेल तर एक परतबोलीवर देऊ शकेन कारण माझ्याकडे आता तेवढ्याच प्रती असतील...
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Sun, 03/18/2018 - 03:05
नवीन
मला फक्त डाॅ.दिलीप बिरुटेंचे मत पटतय,
"जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही. ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते."
बाकी blah blah शुद्ध भंकस आहे.
आदरामुळे लोक बोलत नाहीत,पण एका गोष्टीतल्याप्रमाणे "राजा नागडा आहे हे सत्य लहान मूल सांगते"
इतर लोक काय तलम वस्त्र आहे अशी खोटी तारीफ करतात.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2