स्वातीताई..
एकदम सुटसुटीत आणि जुन्या काळची आठवण करून देणारी..
माझे आई-बाबा आणि भाऊ.. मी तिथे नसले तरी माझ्यासाठी म्हणून वस्तू घेऊन ठेवतात आणि फोनवर सांगतात की तुझ्यासाठी अमुक आणले आहे--तमुक आणले आहे. हे प्रेम गालावरून ओघळत कधी खाली ठिबकतं समजतही नाही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
फार सुंदर ! मनातली रांगोळी फारच छान उमटली आहे :)
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या हातचे छान पदार्थ (आम्हा) सर्वांना खायला मिळोत अश्या (आम्हा) सर्वांना शुभेच्छा :)!
--लिखाळ.
वा स्वाती ताई,
सुंदरच कविता..
प्रवासवर्णन, पाककृती नंतर आता कविता क्षेत्रही पादाक्रांत करायचं ठरवलेलं दिसतय :)
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
फराळाचे पदार्थ झाले का करुन ? म्हणजे आम्ही फ्राफूची तिकिटे काढतो. ;)
--शाल्मली.
किती छान लिहिले आहेस गं...
प्रत्येक ओळ, एक एक आठवण जागी करून देतेय. किल्ले, नव्या कपड्यांचा वास. माणूस हा एक आठवणींचं गाठोडं असतो, असं काही वाचलं की ते गाठोडं आपोआप उघडतं आणि त्यातून एक एक ऐवज बाहेर यायला लागतो.
आधी आठवण, मग त्यामुळे येणारा थोडा खिन्न पणा, पण नविन मिळालेले सुहृद आणि त्यांच्या बरोबर घालवतोय ते क्षण म्हणजे परत गाठोड्यात नविन भरच की... हे खिन्नपणा पासून नविन उत्साहापर्यंतचे आवर्तन तू खूपच छान मांडले आहेस.
आणि मनातली रांगोळी घरभर उमटते...
खरं आहे. मनात रांगोळी नसेल तर बाकी कशाला काही अर्थच नाही.
बिपिन कार्यकर्ते
मुक्तक आहे.परदेशी नसूनही ,घरी असूनही काळीज क्षणभर गलबललं.
फार वर्षांपूर्वी शैलेंन्द्रनी एक सुंदर कविता लिहीली होती ती ऐकली तेव्हाही असाच मूड बनला होता.
हुबेहुब दिवाळीची कविता नाहीये ही पण परदेशी असलेल्या आपल्या बहीणींच्या मनात काय कोलाहल होत असेल याची कल्पना आली.
दिपावलीच्या शुभेच्छा.
घरापासून दूर राहणे काही वेळा अपरिहार्य असते. एरवी रोजच्या रुटिनमध्ये सवय होते त्याची पण गणपती,दिवाळी सारख्या सणांना मात्र घराची आठवण आणि मग आठवणींच्या लडीच उलगडायला लागतात. माझ्यासारख्याच घरापासून दूर दिवाळी साजरी करणार्यांच्याही अशाच सिमिलर भावना आहेत हे वाचून बरं वाटलं.
सर्वांना मनापासून धन्यवाद.
अवांतर- आज आमच्याकडे आमचे जर्मन आजीआजोबा जेवायला येणार आहेत,:)
स्वाती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी