शेतकरी आत्महत्या - एक उपाय
नुकतेच हे चित्र फेसबुकवर माझ्या कालरेषेवर पहायला मिळाले आणि मनात एक विचार आला.
शेतकरी आत्महत्त्यासाठी कायम सरकारने उपाय योजावेत यासाठी सरकारवर दबाव आणला जातो. सरकारला या दबावाला झुकावे पण लागते. पण कुणाच्या हे लक्षात कसे येत नाही की देवस्थानांकडे सडत असलेली संपत्ती काही प्रमाणात जरी बाहेर पडली तरी शेतकरी आत्महत्त्यांचा प्रश्न बर्याच प्रमाणात सोडवता येईल.
चित्रपट अभिनेते जसे शेतकर्यासाठी पुढे आलेले दिसतात तसे या देवस्थानांनी पुढाकार घेतलेला दिसत नाही. सर्वात करूण विनोद असा की सचिन तेंडूलकरच्या भारतरत्नसाठी सरकारवर दबाव टाकायला जनता एकत्र येते. पण देवस्थाने आणि धार्मिक संस्थाना त्यांचे खजिने खुले करायला लावण्यासाठी भारतीय पुढे येत नाहीत.
yet the latter hogs the headlines.
https://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/farmer-agitations-reflect-clout-more-than-distress/ हे स्वामिनाथन अय्यर काही भाजप संघीय वगैरे नाहीत तर काँग्रेसी आहेत वर नास्तिक आहेत आणि आपल्या लाडक्या मोदीद्वेष्ट्या मणिशंकर अय्यर यांचे सख्खे भाऊच आहेत. म्हणजे "तसा" पूर्वग्रह ठेवायचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल वस्तुस्थिती लिहिली तर असंवेदनशील शहरी मनोवृत्तीचे इ इ लेबले लगेच लावली जातात. आणि आपण देवस्थानांचा पैसा विकासाच्या ऐवजी शेतीचे कर्ज माफ करायला निघालो आहोत. म्हणजे पहा आपण सर्व लोककिती सहज
पत्रकारांच्या अजेंड्याला"बळी"
पडतो आहोत.