Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिडे गुरुजींना झालंय काय ?

स
सोमनाथ खांदवे
Mon, 07/09/2018 - 15:19
🗣 118 प्रतिसाद
भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो . अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले . कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?

प्रतिक्रिया द्या
38689 वाचन

💬 प्रतिसाद (118)
म
माहितगार गुरुवार, 07/12/2018 - 11:18 नवीन
सकारात्मक नोंद घेतली. अनेक आभार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/12/2018 - 05:54 नवीन
एकदा भिड्यांनाच बोलवा ब्वॉ मिपावर. सन्माननीय सदस्यत्व देउन टाका
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/12/2018 - 06:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/12/2018 - 07:06 नवीन
मला हे नाही समजले भिडे गुरुजींनी सगळे आयुष्य ज्या राजा साठी घालवले त्या राजा बद्दलचेच असले घाणेरडे उदाहरण ( आणि शिवाजी महाराजां च्या वडिलांचेच का ? ) दासबोध नामक आय डी वाल्याने का दिले ? आश्चर्य नाही वाटले . दासबोध आय डी सारख्या लोकांना सवयच कोल्ह्या सारखं बकरी चे कातडे पांघरूण बसायचे आणि समाजाला काळिमा फासायचं . औरंगाबाद च्या छिदंम सारखी अचानक मळमळ बाहेर काढायची नंतर पुन्हा सोशल मीडियावर नावे बदलून समाजाच्या वर्चस्वासाठी हिरहिरीने वाद घालत बसायचे अशाने समाजाबद्दल वितुष्टता अजून वाढणारच आहे . आश्चर्य अजून एका गोष्टीचे वाटते की पिलीयन रायडर सोडून कोणीही दासबोध च्या या मुद्द्यावर प्रतिवाद केला नाही , दासबोध ची ती प्रतिक्रिया माझ्या सहित सर्वांच्या ' नजरेतून निसटली ' असेल असे आता आपण मानू या . दासबोध.कॊम's picture नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला 10 Jul 2018 - 1:16 pm | दासबोध.कॊम नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला आणि त्याचे लेखी पुरावे मागे ठेवले नाही तर त्याला मारण्यापूर्वी शेवटचे जे पत्र त्यांनी लिहिले होते ज्यात ते म्हणाले होते की मी तुम्हाला घाबरलो आहे आणि तुम्ही मला पितृतुल्य आहात त्यावरून तेवढेच पत्र उचलून लोकांनी इतिहास लिहिला असता की अफजल खानाला शिवाजी महाराज वडिलांप्रमाणे मानत होते. भिडे गुरुजी जर असे म्हणाले की मला एक जण म्हणाला आणि पुढे काही वाक्य बोलले तर ते गुरुजींचे वाक्य कसे काय ठरेल ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/12/2018 - 07:32 नवीन
दासबोध.कॉम यांच्या वरिल प्रतिसादात तुम्हाला मळमळ वगैरे कुठुन दिसली ? --- संपूर्ण भाषणातून एकादे वाक्य उचलून, त्यातून सध्याची प्रसारमाध्यमे अर्थाचा अनर्थ कशी करतात, ह्याचे फक्त उदाहरण त्यांनी दिले आहे असे मला तरी वाटते. शिवाय ज्या पत्राचा उल्लेख दासबोध.कॉम यांनी केला आहे ते अस्सल पत्र आजही उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
म
माहितगार गुरुवार, 07/12/2018 - 07:53 नवीन
....ते अस्सल पत्र आजही उपलब्ध आहे.
बहुतेक टाळण्याजोगे गैरसमज होताहेत पण मूळ साहित्याचे परिपूर्ण संदर्भ न देता लेखन गैरसमजांना वाढवणारे असते , आणि परिपूर्ण संदर्भ उपलब्ध करण्याबाबतीत सर्वच मराठी निष्काळजी का असतात ते उमजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/12/2018 - 08:55 नवीन
प्रसाद साहेब , यात तुम्हांला दासबोध. कॉम ची मळमळ दिसली नाही यात सर्व काही आले . हाच तो फरक !!!!!! व्यवस्थित वाचून सुद्धा हवे ' तेच ' पुढे घ्यायचे . ते पत्र आहे की नाही हा वादच नाहीये , दासबोध .कॉम ला उदाहरण देताना नेमकं शिवाजी राजे नीं लिहलेल्या त्याच पत्राचा आधार घ्यावासा का वाटला ? शिवाजी महाराजां बद्दल कोणीही काही वाक्य जोडून तोडून लिहावी ? आपण कुठे महाराज कुठे याच साधं भान नसावं ? म्हणून मी संयमाने मळमळ हा शब्द वापरला . बाकी काय बोलचाच भात आणि बोलचीच कढी !! . अशा ' विशिष्ट प्रतिक्रिया ' चीं जाणूनबुजून पाठराखण होत असेल तर हिंदू एकजुटी ची पोपटपंची सोशीलमीडिया वर सुद्धा चालणार नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ज
जेम्स वांड गुरुवार, 07/12/2018 - 09:10 नवीन
आसेतु हिमाचल हिंदू एक व्हावा म्हणायचं अन मग असले प्रकार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
आ
आनन्दा गुरुवार, 07/12/2018 - 14:17 नवीन
यात मळ्मळ काय अहे हे मलाही कळले नाही. यात त्रागा आहे, सिलेक्टिव्ह पत्रकारिता करणार्‍यांबद्दल.. आणि यात कुठेही शिवाजीराजांचा अपमान केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास व्हायचं कारण कळलं नाही. अवांतर - बेअरिंग सुटत चाललंय.., डु आयडी असेल तर उघडा पडेल हां !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/12/2018 - 15:42 नवीन
जाऊ द्या हो !!!! एका नंतर दुसरा मग तिसरा , पिचकारी मारून गेलेल्या दासबोध .कॉम साठी सगळे टप्प्या टप्प्या ने रिंगणात येत आहेत . बरोबर मुस्कटदाबी करतात हो !! चालू द्या असच , माझं च चुकलं मी मुखवट्या मागे वेगळे चेहरे असलेल्या लोकां मध्ये वावरत होतो . अवांतर : मी कायम एकच भूमिका ठेवली आणि मनाला पटेल तेच बोलतो , चुकलं तर कबूल करून पाऊल मागे घेतो . त्या मुळे डू आयडी उघडा पडणं हा प्रकार मला माहित नाही ( सं .मं विचारुन खात्री करा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 07/12/2018 - 20:19 नवीन
हा हा हा. तुम्हाला प्रतिसाद कळला नाहीये किंवा तुम्ही फारच संतप्त झालेले आहात. असो. सगळे शांत झले की पुन्हा एकदा विचार करा. मग अनेक निसटत्या बाजू समजतील.. किंवा कदाचित समजणार देखील नाहीत. कारण तुम्हाला कदाचित दुसरी बाजू माहीतच नसावी. असो. तक्रार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
ज
जेम्स वांड गुरुवार, 07/12/2018 - 08:53 नवीन
श्रीपाद छिंदम हा मनुष्य अहमदनगरचा होय औरंगाबादचा नाही. बाकी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/12/2018 - 09:34 नवीन
नाही तर काय !!कसली आली एकजूट ? विनाकारण पुराणातील वांगी बाहेर काढणाऱ्या ला पाठिंबा द्यायचा मग त्या साठी महापुरुषा चा अपमान झाला तरी चालेल . मी तर म्हणेन तोंडावर कंट्रोल नसलेल्या लोकांनी ' दासबोध .कॉम ' सारखा आयडी घेतल्या मूळे दासबोध ची सुद्धा प्रतिमा मालिन होत आहे . निसर्गात भरपूर गोष्टी आहेत घ्या ना त्यातले एखादे नाव किंवा ठेवा स्वतः चे ओरिजनल नाव .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
म
माहितगार गुरुवार, 07/12/2018 - 11:07 नवीन
त्यांच्या दुसर्‍या एका धाग्यावरच्या प्रतिसादानुसार त्यांचा दासबोध.कॉम शी काही संबंध नाही. आणि मी त्यांना दिशाभूल टाळण्यास हलकेच सुचवले होते. बाकी त्यांच्या लेखनाबद्दल त्यांनी स्वतः स्पष्टीकरण करणे अधिक उत्तम असावे. त्यांचा उद्देश्य अर्ध्या माहितीवर आधारीत चुकीचे अर्थ काढू नयेत असे सुचवण्याचा मर्यादीत असावा असे वाटले, पण भिडेंचे आंबांसंबधीत पूर्ण ओरीजीनल व्हिडीओ आणि त्यांनी उल्लेखिलेले पत्र आणि किंवा संदर्भ वाचनात आलेले नसल्याने ; तसेच त्या शिवाय त्यांयाशी इतरत्र व्यक्त केलेल्या मतांतरास त्यांची उत्तरेही आलेली नसताना, मत व्यक्त करण्याची घाई करणे श्रेयस्कर वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/12/2018 - 08:25 नवीन
भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन July 11, 2018 भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्या सर्वांना हे एक सडेतोड उदाहरण आहे ! भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन थायलंड येथे एका गुहेत अडकलेल्या बारा मुलांना व त्यांच्या फुटबॉल कोच यांना त्या दुर्गम गुहेतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असताना जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रेस्क्यु टिमला अडथळे येउ लागले. थायलंड सरकारने भारत सरकारकडे मदत मागितल्यानंतर किर्लोस्कर ब्रदर्सचे फ्लडपंप पाठविण्यास सांगितले. किर्लोस्कर ब्रदर्समध्ये अभियंते ( डिसाईन प्रमुख ) म्हणून कार्यरत असणारे प्रसाद कुलकर्णी यांच्यासोबत एक टिम थायलंड येथे पोहचली. तब्बल अडिच किलोमीटर गुहेतील पाणी उपसून खेळाडूंना बाहेर काढण्यात आले. सर्व स्तरातून भारताच्या या गौरवास्पद कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या रेस्क्यु टिम मध्ये अभियंता ( डिसाइन प्रमुख ) म्हणून जबाबदार व्यक्ती असणारे प्रसाद कुलकर्णी सर हे एक आहेत ! कोण आहेत हे प्रसाद कुलकर्णी ? हे मुळचे सांगलीच्या मिरज तालुक्यात राहणारे आणि आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचे निस्सीम धारकरी आहेत. पूर्वीपासून प्रसाद कुलकर्णी सर हे मिरजमध्ये भिडे गुरुजींनी देव देश धर्म शिवछत्रपती - संभाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे धारकरी म्हणून तिथे कार्यरत होते. भिडे गुरुजींनी दाखवलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर चालणारे असे शेकडों तरुण भविष्यात अनेक क्षेत्रात उज्ज्वल कार्य करत असताना आढळून येतात. भिडे गुरुजींनी जे हजारों तरुण उभे केलेले आहेत त्यांच्यापैकीच एक म्हणजे प्रसाद कुलकर्णी सर ! आता काही मुर्ख जातीयवादी लोक प्रसाद कुलकर्णी सरांचे आडनाव कुलकर्णी आहे आणि त्यांची जात काय म्हणूनही बोंबाबोंब करतील काही सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी जातीय चष्मा घालणाऱ्यांना केलेल्या कामगिरी पेक्षा जात कुठली हे जास्त महत्वाचे वाटते म्हणून या चांगल्या कार्याबद्दल एक चकार शब्दही काढणार नाहीत ! भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना हे एक सडेतोड उत्तर आहे ! (कायप्पावर मला आलेले ढकलपत्र)
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 07/13/2018 - 09:47 नवीन
' पाणी उपसून बाहेर काढल्या मूळे त्या मुलांचा जीव वाचला ' अस आंतरराष्ट्रीय मिडिया ने कौतुक केलेली फक्त एक लिंक द्या. नाही तस सगळ्या भारताला कौतुक आहे त्या किर्लोस्कर कं चे पण फक्त ' कुलकर्णी ' नाव घेऊन किर्लोस्कर च महत्व कमी होतंय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
म
महासंग्राम गुरुवार, 07/12/2018 - 08:28 नवीन
लै दिवसांनी पॉपकॉर्न वाला धागा आलाय, चिज कॅरॅमल चा मोठा टब घेऊन येतोय.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 07/12/2018 - 10:29 नवीन
भिडे गुरुजींना झालंय काय? काहीही नाही. ते तसेच आहेत आणि तसेच राहतील. झालंय फक्त एवढंच, की त्यांच्या सारखे विचार असणार्यांप्रति सहानुभूती असलेले सरकार सध्या आहे, त्यामुळे असे विचार समाजात मांडणे, त्यांना अनुयायी मिळणे वगैरे काहीसे वाढले आहे. ते तसेच राहतील म्हणण्याचे कारण म्हणजे इथे आलेल्या प्रतिक्रीया! उदाहरणार्थ गा पैना अजूनही मनुस्मृतीत आक्षेपार्ह काय आहे, असा प्रश्न पडला आहे. माहीतगार यांनी त्यांना मनुस्मृतीच्या धाग्यावर प्रश्न विचारला होता: तुंम्ही स्वत:ची समजूत कशी घालता म्हणून. भरपूर चर्चा झाली होती, पण पुन्हा तेच समर्थन! चालायचंच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/12/2018 - 18:49 नवीन
शब्दबम्बाळ,
आणि डोळ्यांनी नीट वाचता येत असेल तर मनुस्मृतीचा विषय दासबोध नि काढला आणि त्यांचं वाक्य कोट करून मी प्रतिसाद दिला हे आपल्याला दिसेल कदाचित...
मनुस्मृतीचा विषय काढला की तुम्हाला फक्त आक्षेपार्ह गोष्टीच दिसतात. जमल्यास स्वीकारार्ह गोष्टीही बघंत चला. संवाद वाढवण्यास फायदा होतो. उदा . : आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या आधारे घटनेत तरतुदी टाकल्या आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/12/2018 - 18:57 नवीन
आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या आधारे घटनेत तरतुदी टाकल्या आहेत. गा.पै, एक अतिषय नम्र विनंती. ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ? सदर दाव अन्यत्र काहीठिकाणी पाहिला अहे पण त्याला सबळ पुरावा कधीच दिसल नाहीये. पुराव्याशिवाय बोलायला लागलो तर रॅशनल हिंदुत्ववादी आणि स्वमतांध तथाकथित पुरोगामी लोकांत काय फरक राहील ? - आ.न. मा.ऑ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सोमनाथ खांदवे Fri, 07/13/2018 - 05:10 नवीन
छया !! छया !!! हवेत गोळीबाराला कोणी पुरावा देत का ? हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या मनुस्मृती प्रमाणे त्यात वर्णिलेल्या चार जाती आजच्या जीवनात कालबाह्य झालेल्या आहेत सगळे ब्राह्मण यज्ञ करून भिक्षुकी मागून जीवन जगतात का ? सगळे क्षत्रिय फक्त सैन्यात जातात का ? वैश्य मात्र त्यांना नेमून दिलेले च काम करत आहेत सगळे क्षुद्र वरील तिघांची सेवा करतात का ? मग कशाला भिडे गुरुजींनी आणि त्यांच्या समर्थकांनी मनुस्मृती ची भलामण करून गदारोळ उडवून दिला आहे ? आणि मनुस्मृती समर्थकांचे म्हणणे जर खर असेल तर शरिया , तीन तलाक , बुर्कां ह्ये विषय वादग्रस्त आणि कालबाह्य कसे होऊ शकतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/13/2018 - 05:56 नवीन
सोमनाथ , तुमचा प्रतिसाद निरुपयोगी आहे ! जर आनगापै " मनुस्मृतीचा आजच्या भारतीय घटनेला आधार आहे " हे पुराव्याने शाबित करत नसतील तर " मनुस्मृतीचा काडीमात्र आधार नाहीये संविधानाला" हे तुम्ही सिध्द करा ! नुसता शब्दच्छल करुन काय उपेग ? आम्हाला सुर्य उगवल्याशी मतलब आहे मग तो तुमच्या कोंबड्याच्या आरवण्याने उगवो कि गा.पैं. च्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
स
सोमनाथ खांदवे Fri, 07/13/2018 - 06:53 नवीन
अहो मार्कस , मला सुध्दा तेच म्हणायचे आहे !! फक्त गा पा पैलवान असल्या मुळे मी त्यांना डायरेक्ट विरोध न करता तुमच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली .काय राव !! मी आता गियर चेंज केला आहे , मुखवट्या मागचे चेहरे आताशी कुठे दिसायला लागले आहेत . आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती मधील तरतुदी वापरल्या असत्या तर त्यांनी मनुस्मृति जाळला असता का ? 3 % असलेल्या उच्चवर्णीयां मध्येच आंतरजातीय विवाहा चे प्रमाण का जास्त आहे ? आणि मग कुठे गेला तो वर्णसंकर चा नियम ? वृद्धाश्रमात उच्च वर्णीयांचेच म्हातारे आईवडील असण्याचे प्रमाण जास्त का आहे ? " माता पिता आचार्य यांचा अनादर करू नये " मग या वाक्याला अर्थ काय ? मनुस्मृती प्रमाणे उच्च लोकच वागत नसतील तर त्यांनी मनुस्मृती ची भलामण का करावी ? कोरगाव भीमा प्रकरण व्यवस्थित पणे का वाढत गेलं ? साम दाम दंड भेद वापरा आणि राज्य करा बस .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
महासंग्राम Mon, 07/16/2018 - 08:00 नवीन
3 % असलेल्या उच्चवर्णीयां मध्येच आंतरजातीय विवाहा चे प्रमाण का जास्त आहे ?
वृद्धाश्रमात उच्च वर्णीयांचेच म्हातारे आईवडील असण्याचे प्रमाण जास्त का आहे ? "
याला काही संदर्भ आहे का नसल्यास प्रतिसाद संपादित करावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/16/2018 - 12:27 नवीन
मिपावर च वाचलं होतं प्रतिसादा मध्ये , शोधतोय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ट
टवाळ कार्टा Wed, 07/25/2018 - 10:27 नवीन
व्वा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/12/2018 - 18:55 नवीन
स्वधर्म,
उदाहरणार्थ गा पैना अजूनही मनुस्मृतीत आक्षेपार्ह काय आहे, असा प्रश्न पडला आहे.
मनुस्मृतीचा अन्वयार्थ ( = इंटरप्रीटेशन ) वेगळ्या प्रकारे लावला पाहिजे. मी लावलेला जरासा वेगळा अर्थ इथे सापडेल : १. https://www.misalpav.com/comment/966587#comment-966587 २. मनुस्मृती आणि विवाह : https://www.misalpav.com/comment/966928#comment-966928 वरील दोन्ही प्रतिसाद परिपूर्ण नाहीत. पण मनुस्मृतीस वेगळ्या प्रकाशात पाहता येऊ शकतं, हा मुद्दा स्पष्ट व्हावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/13/2018 - 06:21 नवीन
गापै , 'मी मानत असलेल्या इश्वरांस्मोर सर्व मानव सारखे आहेत, म्हणून मी जन्माधारीत विषमता नाकारतो' खूपच क्मी शब्दांच वाक्य आहे, आपल्याच इश्वराचे मोठेपण मनाने स्विकारण्यासाठी काही सेकंद आणि कॉपी पेस्ट करण्यासाठी किबोर्ड वर चार पेक्षा अधिक टिचक्यपण माराव्या लागत नाहीत, तेव्हा ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
स्वधर्म Fri, 07/13/2018 - 10:39 नवीन
जो अर्थ सुस्पष्ट दिसतो, त्याचा मुद्दामहून ‘जरासा वेगळा’ अर्थ कशाला लावायचा? तो कसा पवित्र ग्रंथ आहे दाखवायला? तुंम्ही कसा अर्थ लावता याला बिल्कुल महत्व नसून बहुसंख्य लोक तो कसा लावतात, आपल्याच बांधवांप्रति अत्यंत हीन वर्तनाचे समर्थन करायला तो कसा वापरतात आणि त्यामुळे शतकानुशतके समाजाची कशी अपरिमित हानी होते, याला महत्व आहे. तुंम्ही ‘लावलेला’ उदात्त अर्थसुध्दा स्त्रियांप्रति किती विषमता निर्माण करणारा आहे, हे तुम्ही दिलेल्या लिंक्सवर जाउन स्वत: पहावे अशी समस्त मिपाकरांना विनंती. हे असे वेगळे अर्थ लावण्यापेक्षा सरळ माहितगार यांनी लिहीलेल्या 'मी मानत असलेल्या इश्वरांस्मोर सर्व मानव सारखे आहेत, म्हणून मी जन्माधारीत विषमता नाकारतो' या वाक्याला तुमची सहमती आहे का असहमती, ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/12/2018 - 19:35 नवीन
सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥ मनुस्मृती मध्ये किती व्यवस्थित सांगितले आहे शुद्र स्त्री बद्दल तरी पण त्याच्या अगदी उलट वर्णन ' माझा प्रवास ' या पुस्तकात झाशी या शहरातील नारायणशाश्री आणि 159 भटजी च्या कर्तृत्वा चे वर्णन केले गेले आहे http://aisiakshare.com/node/5250 असं समजूया तो भटजी आणि ते पुस्तक सगळे खोटं आहे . धागा मिपा पिनल कोड मध्ये बसेल का ? तरी पण स्वजबाबदारी वर उघडावा . त्या पुस्तकाची पी डी एफ सुद्धा आहे जमलं तर चितकवतो .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 07/13/2018 - 14:13 नवीन
मार्कस ऑरेलियस,
ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ?
माझ्याकडून चुकीचं विधान केलं गेलं. त्याबद्दल क्षमा असावी. घटनेतल्या तत्रुडी मनुस्मृतीवरनं घेतलेल्या नाहीत. मला हिंदू कोड बिल म्हणायचं होतं. आंबेडकरांना संस्कृत येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हिंदू कोड बिल समितीने अनेक शास्त्रीपंडितांकरवी मनुस्मृती व इतर ग्रंथ समजावून घेतले. त्याच दरम्यान (१९४९ च्या आसपास) घटना लिहिण्याचं कामही चालू होतं. घटनासमितीपुढे भाषण करतांना आंबेडकरांनी मनु व याज्ञवल्क्य या दोघांच्या स्मृती उच्च दर्जाच्या असल्याचं म्हंटलंय. यासंबंधी इथे एक उल्लेख आहे : http://antisambhajibriged1.blogspot.com/2012/12/blog-post_1142.html मूळ मुद्दा मनुस्मृतीच्या उपयोगहीनतेचा होता. विरोधक समजतात तितकी ती टाकाऊ नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/13/2018 - 14:52 नवीन
कायेन गापैजी, सध्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद आहेत, अबकड पर्सनल लॉ मध्ये काही बदल करण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी पवित्र ग्रंथा मधल्या काही चांगल्या तरतुदींचा प्रासंगिक आधार रविशंकर प्रसादांनी घेतला तर सबंध पवित्र ग्रंथास स्विकारलेच असा अर्थ होत नसावा. जसे गुलामगिरीचे समर्थन , स्त्री दास्य, जन्मधारीत विषमता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणे , अनिष्ठ रुढी कोणत्याही ग्रंथाचा आधार घेत असतील तर ते संबंधीत ग्रंथामधील अनिष्ठ भाग नाकारावाच लागतो. बाकीचा चंद्र बघा बाकिचा चंद्र बघा कितीही म्हणाले तरी चंद्रावरचा डाग लपत नसतो . डागाचे समर्थन करण्यासाठी चंद्राच्या बाकीचे सौंदर्य उपयोगी येईलच असे नसावे. जन्माधारीत विषमतेच्या डागाचे समर्थन करत नसल्याचे स्विकारावे आणि आपल्या मोठ्या मनाची पावती द्यावी असे सुचवावेसे वाटते , बाकी आपली मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 07/13/2018 - 22:30 नवीन
माहितगार, तुम्ही म्हणता की चंद्रावर डाग आहे. पण हिंदू समाजातल्या विषमतेला मनुस्मृतीस जबाबदार का धरण्यात आलंय? नक्की संबंध काय दोहोंत? हिंदू समाजात जी काही विषमता आलेली आहे ती परक्या राजवटींत. तिचं लोढणं मनुस्मृतीच्या गळ्यांत का म्हणून? आसामात अस्पृश्यता अगदी नाममात्र होती. तीसुद्धा इंग्रजी राजवटीत उत्पन्न झालेली होती. मग आसामी हिंदूंच्या समतेचं श्रेय मनुस्मृतीस मिळणार का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 07/14/2018 - 06:04 नवीन
तुमचे अंशतः बरोबरे गापै ! , बहुतेक सर्वच धर्मांचे परंपरावादी आपापल्या धर्मग्रंथात अनिष्ठ असे काही नाहीच / नव्हतेच हा मुद्दा मांडतात. व्यवस्थित सिद्ध करुन दिले तर या ग्रंथातील अयोग्य गोष्टीच्या समर्थनाचा परिणाम समाजावर झाला हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध करुन दाखवा म्हणतात, असे काही पुरावे देणे अशक्य नसले तरी प्रत्यक्ष पुराव्यांची संख्या कमी असल्याने संशयाचा फायदा इथे तिथे मिळत राहातो. (इथे इतर मिपासदस्य पुरेसे दाखले देतील त्यासाठी सहसा माझी जरुर भासू नये , भासल्यास कळवावे) अलिकडे दुसर्‍या धाग्यावर आपण पाकीस्तानी कॅनेडियन डॉक्टर अली रिझवी यांच्या पुस्तकावर चर्चा करत होतो. जे लोक कुराण आणि अतिरेकी वृत्तीचा संबंध नाकारतात किंवा इज्राएल आणि काश्मिर संघर्षावर टाकतात त्यांच्या साठी त्यांनी १८ व्या शतकातला एक आफ्रिकी देश कुराणच्या नावाने जहाजे लुटणार्‍यांना कशी सुरक्षा देत होता याचे वर्णन केले आहे. अमुक ग्रंथ अथवा चित्रपट बघणारे सर्वच लोक त्यातील चुकीच्या संदेशांचे पालन करतात असे नाही पण दिशा चुकलेले व्यक्ती आणि समुह ग्रंथ प्रामाण्याचे आधार घेऊन अनिष्ठ कृती करण्यास प्रवृत्त होत असतात हे वास्तव परंपरावादी आणि सापेक्ष झालेले तथाकथित पुरोगामी दोघेही नाकारत असतात. ग्रंथातील मग ते कोणतेही असोत अनिष्ठतेला अनिष्ठ म्हणणे आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारणे हेच आपल्यातील अनिष्ठतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन धुवून काढण्याचा एकमेव मार्ग असावा असे वाटते. मी वर म्हटल्या प्रमाणे बहुतांश हिंदू ग्रंथ प्रामाण्य आणि अनिष्ठता नाकरुन पुढे गेले आहेत. उरलेल्यांनी ग्रंथातील अनिष्ठ भाग मनमोकळे पणाने नाकारुन पुढे जाण्यार्‍यांची कास धरणे त्यांच्या स्वतःचे प्रेम असलेल्या हिंदू धर्माच्या खर्‍या उन्नती साठी अत्यंत गरजेचे असावे. मुख्य म्हणजे अन्यथा इतर स्पर्धक धर्मीयांच्या ग्रंथ प्रामाण्याला नाकारण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार रहात नाही. आणि हि मोठी विचीत्र स्थिती आहे. आधूनिक काळात 'मी चांगला होत नाही तू चांगला हो ' हे विधान फारकाळ विकले जाणार नाही, 'आम्ही चांगले झालोय आता चांगले होण्याची तुमची वेळ आहे' हे विधान व्यवस्थित परिणामकारक ठरते. मनुस्मृतीतल्या उणीवा आणि त्यांचे अनिष्ठ परिणामाचे दाखले पुन्हा पुन्हा देता येऊ शकतील ती मोठी गोष्ट नाही , मुख्य म्हणजे एकदा का ' ईश्वरासमोर सर्व समान आहेत आणि म्हणून जन्माधारीत विषमता, अनिष्ठता आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो ' हे स्विकारले जाणे ग्रंथाच्या योग्यायोग्यतेवरील चिकित्सेच्या आधी आणि टिकेपेक्षाही अधिक महत्वाचे आहे. एकदा ' ईश्वरासमोर सर्व समान आहेत आणि म्हणून जन्माधारीत विषमता, अनिष्ठता आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो , आणि निर्णय ग्रंथ प्रामाण्या एवजी विवेकाने करतो म्हटले तर ग्रंथांवर टिका करण्याचे प्रयोजन सर्वसामान्यासाठी कमी होऊन जात असावे. एकदा लांछनाचे समर्थन करत नाही म्हटले की उरलेल्या चंद्राचे गुणगाण करण्यास तुम्ही मोकळे आहात. हवे तर ज्ञानदेवांचे पसायदान आणि टागोरांचे व्हेअर द मांईड इज विदाऊट फिअर पुन्हा एकदा वाचून घ्यावे. जमल्यास बघावे मी काय म्हणतो ते लक्षात घ्यायचे का ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सोमनाथ खांदवे Sat, 07/14/2018 - 00:47 नवीन
मिपावरील तमाम कायदेपंडित पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज पडण्याची शक्यता आहे , खास करून दासबोध. कॉम. MT: ‘मुलगा’ शब्द भिडेंच्या अंगलट http://mtonline.in/76Q2Nb/dga via @mataonline: http://app.mtmobile.in
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 07/14/2018 - 05:16 नवीन
साबजी कायदा वाचलेला आहे, व्हिडीओ तेवढाच त्यांच्याच शेतातल्या आंब्या पुरता असेल तर ते बहुधा कायद्याच्या कचाट्यात अडकावेत. पण मिपासदस्य दासबोध.कॉम म्हणतात तसे , त्या सबंध असलेल्या व्हिडीओत त्यांनी दुसर्‍या कुणाच्या बद्दलचा उल्लेख रुपक म्हणून केला असेल कोर्टा समोर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत संभिंना त्यांची बाजू मांडता येऊ शकते, पण तो पर्यंत चौकश्या आणि कोर्ट केसेसचा त्रास होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
ग
गामा पैलवान Sat, 07/14/2018 - 15:26 नवीन
माहितगार, १.
दिशा चुकलेले व्यक्ती आणि समुह ग्रंथ प्रामाण्याचे आधार घेऊन अनिष्ठ कृती करण्यास प्रवृत्त होत असतात
कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणता येतं. मात्र मनुस्मृतीच्या आधारे अत्याचार केलेले आढळून येतात का? निदान एखादी नोंद तरी? मनुस्मृतीचे असे काही ठाम आणि ठोस अनुयायी कोणीतरी कधीतरी ऐकलेत का? नसल्यास मनुस्मृतीच्या नावे शिमगा कशासाठी? कम्युनिस्टांनी मार्क्सचं नाव घेऊन जगभरात अनन्वित अत्याचार केलेत. मग दास कॅपिटलला कोणी मयतीचं पुस्तक म्हणतो का? मग ती विषमतेची धोंड मनुच्या गळ्यांत कशासाठी? २.
मनुस्मृतीतल्या उणीवा आणि त्यांचे अनिष्ठ परिणामाचे दाखले पुन्हा पुन्हा देता येऊ शकतील ती मोठी गोष्ट नाही
एखादा ग्रंथ काही प्रमाणात कालबाह्य झाला असेल तर त्यातला कालबाह्य नसलेला भाग व कालोचित इतर विचार घेऊन नवीन कालसुसंगत ग्रंथ निर्माण करता येतो ना? मग जुन्या अर्धवट कालबाह्य ग्रंथाच्या नावे बोंबाबोंब करणं बरोबर नाही. संदर्भ म्हणून देखील मनुस्मृती नको? इतका विटाळ? ३.
मी वर म्हटल्या प्रमाणे बहुतांश हिंदू ग्रंथ प्रामाण्य आणि अनिष्ठता नाकरुन पुढे गेले आहेत.
माझ्या मते हिंदू लोकं धर्मग्रंथ फारशा कट्टरपणे पाळत नाहीत. बदलत्या काळातही उपासना, साधना, भक्ती, योग, इत्यादि मूळ अध्यात्मिक अंगे टिकवून धरल्याने हिंदू समाज पुढे गेला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 07/14/2018 - 17:32 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौथा कोनाडा Wed, 07/18/2018 - 14:16 नवीन
गापै, अतिशय निर्दोष प्रतिवाद ! तुम्हाला __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
वामन देशमुख Wed, 07/18/2018 - 18:10 नवीन
कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणता येतं.
नक्की का? कुराणात लिहिलंय म्हणून काफिरांना ठार मारणारे असे मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
ट्रेड मार्क Wed, 07/18/2018 - 18:40 नवीन
मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का? प्रतिवाद करण्याच्या नादात तुम्ही कशाचं समर्थन करताय? उद्या कोणीही म्हणू शकेल मी XXX पुस्तक मानतो आणि त्यात YYY व्यक्तींना मारा लिहिलंय म्हणून ते योग्य आहे? प्रत्येक जण स्वतःच्या मते नेहमीच बरोबर असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
व
वामन देशमुख Wed, 07/18/2018 - 19:17 नवीन
प्रतीवाद नाही आणि समर्थन तर मुळीच नाही. माझ्या माहीतीनुसार आणि समजुतीनुसार- १. भारतीय कायदा (किंवा घटना) मोमिनांना इस्लामचे पालन करण्यास परवानगी देते. २. इस्लामचा पाया कुराण आहे. मग, जर कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. हे खरे असेल तर अशा मोमीनांना दिशा चुकलेले कसं म्हणता येईल? ते तर कुराणानुसार आणि म्हणून subsequently घटनेनुसारही योग्य दिशेनेच जात असतील ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Sat, 07/14/2018 - 17:17 नवीन
मुळात अगदी वरिजनल संपूर्ण मनुस्मृती किती जणांनी वाचली आहे? त्यात नक्की काय काय लिहिले आहे याची खात्रीलायक माहिती किती लोकांकडे आहे? त्यापेक्षाही पुढे जाऊन गेल्या ५० वर्षात मनुस्मृती प्रमाण मानून समस्त भारतात किती गोष्टी केल्या गेल्या? मनुस्मृतीचे कट्टरपणे पालन करणारे किती समुदाय किंवा लोक भारतात आहेत? माझ्या मते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे हे पण एक कारस्थान शिजले आणि कोणाच्यातरी वाचनात कोणीतरी त्याच्या आकलनाप्रमाणे लिहिलेला मनुस्मृतीचा भाग आला असावा आणि मग त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्यात आला. मनुस्मृती किंवा त्याचे कुठलेच भाषांतर वगैरे मी तरी वाचलेलं नाहीये. पण काही शे/ हजार वर्षांपूर्वी, कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथावरून आत्ता का वाद होतात हेच मला समजत नाही. बरं हिंदूंमध्ये काही मनुस्मृती हा एकच ग्रंथ नाहीये. अगदी काही दशकांपूर्वी पर्यंत खूप शिकलेल्यांना वेदशास्त्रात पारंगत म्हणायचे, यात कुठेही कोणी मनुस्मृतीत पारंगत असल्याचे मी तरी ऐकले नाही. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती जी लोक पाळत होते, राजेशाही होती जी सगळ्यांना मान्य होती. उद्या कोणी शहाणा उठून पूर्वी हिंदुस्थानात राजेशाही होती हा किती मूर्खपणा होता आणि ते कसं अन्यायकारक होतं आणि त्यामुळे हिंदुस्थान हा जनतेसाठी चांगला नव्हता असं सांगू लागला तर ते मानाल का? काही राजे जनतेसाठी खूप चांगले होते तर काही वाईट होते, म्हणून संपूर्ण व्यवस्थाच पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट होऊ शकत नाही. राजा कसाही असो आणि त्याचा मुलगा कसाही असो, वारसाहक्काने त्या राजपुत्राकडेच राजगादी चालत यायची. राजाला पुत्र नसेल तर काहीतरी "सोय" करण्यात यायची पण प्रधानजींचा किंवा सेनापतीचा मुलगा, केवळ आधीचा राजा म्हातारा झाला म्हणून, राजा झाला अशी किती उदाहरणं आहेत? सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती त्यावर आता भांडण्यात काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 07/17/2018 - 08:01 नवीन
>> कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथावरून आत्ता का वाद होतात हेच मला समजत नाही.  >> सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती त्यावर आता भांडण्यात काय अर्थ आहे? ट्रेडमार्क साहेब, तुमचे वरील दोन्ही मुद्दे पटले… पण - कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?  - सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती हे सांगून वाद निर्माण करण्यात काय अर्थ आहे? … असं भिडे गुरूजींना विचारलं पाहिजे, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
प्रकाश घाटपांडे Wed, 07/18/2018 - 04:44 नवीन
मनुस्मृती कालबाह्य आहे हे भिडे गुरुजींना माहीत नाही काय? ते सोडा पुर्वीच कस चांगल होत आणि आता कसे वाईट चाललय असा वादही असतोच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ट
ट्रेड मार्क Wed, 07/18/2018 - 15:10 नवीन
कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय? त्या ग्रंथाला कोण गौरवत आहे? कोणी तरी उच्चवर्णीय, खास करून ब्राम्हण, मनुस्मृतीच्या आधारे वागत आहेत का? भिडे गुरुजींनी गौरव केला म्हणजे काय म्हणलं ते इथे वाचा. ते म्हणले 'मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही'. त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती किंवा आताच्या काळात मनुस्मृतीप्रमाणे वागावं असं काही म्हणले नाहीयेत. या उलट संभाजी ब्रिग्रेड आणि समविचारी मात्र अजून मनुस्मृती पकडून बसलेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे, ज्याला इंग्रजांनी प्रमाण मानून १७९४ साली हिंदू कायदा बनवायला वापर केला. ते कायदे सुद्धा आता काळाप्रमाणे बदलले आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था आत्ता अस्तित्वात आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
न
नगरीनिरंजन Sun, 07/22/2018 - 20:15 नवीन
मग आताची कालसुसंगत घटना असताना मनुस्मृतीचं नाव काढायची गरजच काय ते मला काही कळले नाही. आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना. अजूनही खालच्या जातीतल्या माणसाने लग्नात वरात काढली म्हणून खून होतात ह्या देशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Mon, 07/23/2018 - 17:54 नवीन
म्हणजे भिडेगुरुजींना भाषणस्वातंत्र्य नाही असंच ना? ब्रिगेडी लोक कित्येक वर्ष मनूच्या नावाने बोंबलत आहेत ते चालतं, हो ना? भिडे गुरुजींनी फक्त मनू आणि मनुस्मृतीबद्दलचं त्यांचं मत सांगितलं. त्याप्रमाणे वागा किंवा आत्ता आचरणात आणा वगैरे काही सांगितलं का? आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना. चातुर्वर्ण्य व्यवस्था नाहीचे. सध्या जातीआधारित व्यवस्था आहे. दोन्हींमधील फरक तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. तथाकथित उच्चवर्णीय सोडून बाकीच्यांना शिक्षणापासून ते सरकारी नोकरीपर्यंत सगळीकडे आरक्षण मिळतं. ऍट्रॉसिटी चे कलम लावून कोणाही तथाकथित उच्चवर्णीयाला विनाचौकशी तुरुंगात डांबता येतं. तुम्ही दिलेल्या वरात काढल्यामुळे हत्या होण्याच्या घटनांपेक्षा मी सांगितलेलया दोन मुद्द्यांवर आधारित कितीतरी जास्त घटना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
क
कपिलमुनी Tue, 07/17/2018 - 09:54 नवीन
इथे वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
प्रसाद_१९८२ Tue, 07/17/2018 - 10:01 नवीन
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. --- ‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला. --- https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा