भिडे गुरुजींना झालंय काय ?
भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो .
अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले .
कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?
आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या आधारे घटनेत तरतुदी टाकल्या आहेत.गा.पै, एक अतिषय नम्र विनंती. ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ? सदर दाव अन्यत्र काहीठिकाणी पाहिला अहे पण त्याला सबळ पुरावा कधीच दिसल नाहीये. पुराव्याशिवाय बोलायला लागलो तर रॅशनल हिंदुत्ववादी आणि स्वमतांध तथाकथित पुरोगामी लोकांत काय फरक राहील ? - आ.न. मा.ऑमोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?प्रतिवाद करण्याच्या नादात तुम्ही कशाचं समर्थन करताय? उद्या कोणीही म्हणू शकेल मी XXX पुस्तक मानतो आणि त्यात YYY व्यक्तींना मारा लिहिलंय म्हणून ते योग्य आहे? प्रत्येक जण स्वतःच्या मते नेहमीच बरोबर असतो.कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?त्या ग्रंथाला कोण गौरवत आहे? कोणी तरी उच्चवर्णीय, खास करून ब्राम्हण, मनुस्मृतीच्या आधारे वागत आहेत का? भिडे गुरुजींनी गौरव केला म्हणजे काय म्हणलं ते इथे वाचा. ते म्हणले 'मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही'. त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती किंवा आताच्या काळात मनुस्मृतीप्रमाणे वागावं असं काही म्हणले नाहीयेत. या उलट संभाजी ब्रिग्रेड आणि समविचारी मात्र अजून मनुस्मृती पकडून बसलेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे, ज्याला इंग्रजांनी प्रमाण मानून १७९४ साली हिंदू कायदा बनवायला वापर केला. ते कायदे सुद्धा आता काळाप्रमाणे बदलले आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था आत्ता अस्तित्वात आहे का?आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना.चातुर्वर्ण्य व्यवस्था नाहीचे. सध्या जातीआधारित व्यवस्था आहे. दोन्हींमधील फरक तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. तथाकथित उच्चवर्णीय सोडून बाकीच्यांना शिक्षणापासून ते सरकारी नोकरीपर्यंत सगळीकडे आरक्षण मिळतं. ऍट्रॉसिटी चे कलम लावून कोणाही तथाकथित उच्चवर्णीयाला विनाचौकशी तुरुंगात डांबता येतं. तुम्ही दिलेल्या वरात काढल्यामुळे हत्या होण्याच्या घटनांपेक्षा मी सांगितलेलया दोन मुद्द्यांवर आधारित कितीतरी जास्त घटना आहेत.‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.--- https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/