Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक मराठा लाख मराठा

ख — खिलजि, Wed, 07/25/2018 - 15:41
" एक मराठा लाख मराठा " पूर्वी गुंजला होता नाद गिनीज बुकात नाव नोंदवुनी मराठ्यांनी घेतली होती दाद नव्हता कुणाचा अंकुश तेथे नव्हते कुणीही नेते गल्लोगल्ली येऊनि मिसळले लाख लाख मराठे काकासाहेब गेले बुडुनी (?) झाला मोठा आघात बंद पुकारला खरा तरीही पण चढला हिंसेचा माज मी हि मराठा तरी भेदत आलो चक्रव्हुय ते सारे शांततेतच खरा जोर असे नको हिंसेचे वारे मराठा असूनही आज मला वाटत आहे लाज पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा नको आरक्षणाचा साज सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
68647 वाचन

💬 प्रतिसाद (139)
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/25/2018 - 17:28 नवीन
ही कविता तुमी लिव्हली ?? खर न्हाय वाटत , लैच बेस काम क्येलय बघा !!!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 12:01 नवीन
बस्स काय खांदवे भाऊ , मी स्वतःच लिवतो आणि सोडून देतो आंजावर . या मराठा आंदोलनाबद्दल आणि त्यानुषंगाने पुकारलेल्या बंद बद्दल माझं जे काही मत आहे ते मी या कवितेत मांडले आहे . आतापर्यंत ५८ मोर्चे निघाले तेव्हा साधा कागदही रस्त्यावर पडू दिला नाही मराठ्यांनी , सर्व काही शांततेत पार पडलं . साऱ्या जगात कौतुक झालं . पण आता हे असं कसं काय घडलं कि कुणी मुद्दाम घडवून आणलं याची खोलवर चौकशी व्हावी असं वाटत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/25/2018 - 17:52 नवीन
नको आरक्षणाचा साज ठार निषेध !! मराठा समजाच्या भावना दुखाऊ नका . आरक्षण ही केवळ मागणी नाही , गरज आहे गरज ! आणि कोंबडं झाकुन ठेवलं म्हणुन सुर्योदय होण्याचं टळत नाही ! कोणी किती ही विरोध करा , मराठा आरक्षण होणारच आणि नुसते होणारच नाही तर अन्य अरक्षणांप्रमाणे यावश्चंद्रदिवाकरौ रहाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 12:01 नवीन
मित्रा , मला तुझ्या भावना समाजतायत पण काल जे घडलं ते योग्य नव्हतं आणि त्याचे समर्थन मी कधीच करणार नाही . अर्थात ते घडलं कि कुणी मुद्दाम घडवून आणलं , नाव खराब करायला ते बघायला हवं . हे राजकारण , आपल्याला आजून काय काय दिवस दाखवणार आहे ते तो वरचाच जाणे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 12:46 नवीन
??? खवचट प्रतिसाद आहे तो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 13:36 नवीन
कुठला प्रतिसाद आपल्याला खवचट वाटला ते कळले नाही मला , अँमी ताई .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 14:01 नवीन
नको आरक्षणाचा साज 25 Jul 2018 - 9:22 pm | मार्कस ऑरेलियस ∆ हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/26/2018 - 17:30 नवीन
हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला आहे.
>>>> तुम्हाला असं का वाटलं ? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या नाहीतर चुकीचे आरोप केल्य्याबद्दल माफी मागा ! मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची पहिल्या पासुन ठाम भुमिका आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 07/27/2018 - 00:28 नवीन
मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची पहिल्या पासुन ठाम भुमिका आहे ! -> तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/27/2018 - 03:54 नवीन
तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का? >>>> सांगतो पण त्या आधी तुम्हाला माझा इतका स्पष्ट लिहिलेला प्रतिसाद खवचट का वाटाला ते सांगु शकाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 07/27/2018 - 04:19 नवीन
कारण मराठा आरक्षणाला इतकं स्पष्ट/ठाम + प्रामाणिक समर्थन मिपावर + मराठा नसलेल्याकडून पाहिल्याच आठवत नाहीय.... चुभूद्याघ्या. तो प्रतिसाद खवचट नसेल तर माफ करा माझ्या आकलनात चूक झाली _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/27/2018 - 23:17 नवीन
तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?
मराठा समाजतील सर्वच जण पुढारलेले आहेत हा बर्‍याच लोकांचा गैरसमज आहे. काही शहरातील किंव्वा श्रीमंत गावातील जमीनदार मराठा वर्ग पुढारलेला आहे बाकी बहुतांश मराठा समाज हा मागासलेलाच आहे. त्यांना ही समान संधी मिळालेल्या नाहीत . अगदी SC ST इतका सामाजिक मागसले पणा नसल तरीही किमान OBC इतका मागासले पणा नक्कीच आहे . आता काही स्वतःच्या पहाण्यात आलेली उदाहरणे सांगतो, मी सातार्‍यात राहिलो आहे , आणि पहिल्यापासुन स्पष्ट बोलण्याची सवय असल्याने कट्टर सनातनी असुनही माझे सर्वच्या सर्व जातीतले मित्र होते. मझ्य कॉलेजात मी चौथा रॅन्कर होतो आणि माझ्या पेक्षा वर ३ मुली होत्या ज्या मराठा समजतील होत्या. केवळ इंजिनियरिंग / मेडिकल ची फी भरता येणे शक्य नाही म्हणुन बी.एस.स्सी ला अ‍ॅडमिशन घ्यावे लागले होते त्यांना . त्या तिघिंपैकी कोणाच्याच घरची आर्थिक स्थिती बक्कळ नव्हती . सर्वच्या सर्व दुरवर असलेल्या खेड्यातुन प्रवास करुन कॉलेजला येत. केवळ वडीलोपार्जित थोडीफार शेती आहे म्हणुन ह्यांना सामाजिक दृष्ट्या प्रगत म्हणात येईल का ? जी अवस्था ओ.बी.सी समाजाची होती तीच मराठा समाजाची होती. एक मराठा समाजतील मित्र तर दररोज ठोसेघर वरुन सातार्‍यात कॉलेजला येत होता सायकल वरुन ! येताना समजु शकतो पण जाताना ?? आय. कान्ट इव्हन इमॅजिन ! शहरात रहाण्या इतकी आर्थिक सुब्बत्ताच नव्हती ! काय करणार ! आता ह्या लोकांना सामाजिक दृष्ट्या समान संधी मिळाल्या असे कसे म्हणता येईल ? हे सामाजिक दृष्ट्या पुढारर्लेले आहेत असे कसे म्हणता येईल ? आणि ही परिस्थीती सातार्‍यासारख्या बर्‍यापैकी मोठ्ठ्या शहरातील आहे , अन्य छोट्या खेड्यापाड्यात काय अवस्था असेल ? आर्थिक मागासलेपण हे सामाजिक मागासलेपणाचे एक लक्षण आहेच आहे ! अर्थात तरीही आरक्षण हे जाती आधारितच असले पाहिजेल . नाकरल्या गेलेल्या संधी हाच आरक्षणाचा बेसिस असला पाहिजे. मराठा समाजातील थोडाफार एलिट वर्ग वगळता बहुतांश मराठा समाजाला ह्या व्याखेनुसार आरक्षण मिळायला हवे असे माझे प्रांजळ मत आहे ! (हा तर्क ब्राह्मणा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला लागु पडत नाही , ब्राह्मणांमधील गरीबी ही कर्तृत्व शुन्यतेमुळे आलेली आहे संधीच्या अभावाने नाही , हे मला माझ्या एका मराठा समाजातील ज्येष्ठ हितचिंतकाने समजाऊन सांगितले होते आणि हे मला अगदी १००% पटते ! ब्राह्मण समाजाला कायमच शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत्या, अगदी वार लाऊन जेवायला घालणारीही अनेक ब्राह्मण कुटुंबे होती. मला स्वताला किमान १०-१२ ब्राह्मण संस्थांनी , ५-६ ब्राह्मण लोकांनी वैयक्तीकली , आणि अन्य समजातील किमान २०-३० व्यक्तींनी शिक्षणात मदत केलेली आहे , ब्राह्मणांना शिक्षणाची , सामाजिक अन आर्थिक प्रगतीच्या संधींची दारे कायमच ओपन होती, आता आमचे पुर्वज केशवाय नमः नारायणाय नमः मध्ये अलप्संतुष्ट होते खुष होते त्याचा दोष अन्य समाजाला कसा देणार ? ब्राह्मणांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागणे मला तरी पटत नाही. कोणी गरीब ब्राह्मण पहाण्यात आला तर मी त्याला वैयक्तिक माझ्या खिशातुन आर्थिक मदत करेन, पण सरकारने त्याला आरक्षण द्यावे ही मागणी अनाकलनीय आहे किमान मला तरी! ) अवांतर : बाकी ह्या आरक्षण शब्दाला काहीतरी विचित्र अर्थ प्राप्त झाल आहे , अमेरिकेत वाप्रतात तो शब्द किती तरी भारी आहे - अ‍ॅफरमेटीव्ह अ‍ॅक्शन !! आरक्षण हा जन्मसिध्द अधिकार नाही की कुबड्या नाहीत की कोणी तरी सर्कार ने केलेला उपकार नाही , ते केवळ एक अ‍ॅफरमेटीव्ह अ‍ॅक्शन आहे समाजामध्ये समानता येण्यासाठी केलेली ! अवांतर २ : बाकी मराठा समाजातील मान्यवर मात्र आरक्षण मागताना सेल्फ गोल करुन बसलेत . परवाच्या त्यांच्या पत्रकात म्हणाले की - मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख कर्ता आणि वडिलधारा समाज आहे तुम्ही जर स्वतःहुनच म्हणत असल की तुम्ही कर्ते वडीलधारे आहात तर मग सामाजिक मागासले पण हा मुद्दाच खोडुन काढला जातो ना ? मग आरक्षण कोणत्या मुद्द्यावर देणार ? एकीकडे मागास म्हणुन आरक्षण मागणे आणि एकीकडे वडीलधारे (पक्षी क्षत्रिय वगैरे) म्हणुन मिरवणे हे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन आहे ! तुम्हाला एकदा एक काय ते ठरावावे लागेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Sat, 07/28/2018 - 00:11 नवीन
उत्तरासाठी आभार _/\_ अवांतर १ आणि २ बद्दल सहमती आहे. बाकी भागाबद्दल विचार करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुबोध खरे Sat, 07/28/2018 - 16:03 नवीन
@मार्कस ऑरेलियस POPULIST प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
शिवाय Wed, 07/25/2018 - 20:08 नवीन
मला वाटतं की आपण काय करतोय याची कल्पना नाही आपल्याला. मराठा असाल आणी असे लिहित असाल तर पुढे जाऊन काय होईल याची कल्पना नाही. पुलेशू
  • Log in or register to post comments
श
शिवाय Wed, 07/25/2018 - 20:09 नवीन
मला वाटतं की आपण काय करतोय याची कल्पना नाही आपल्याला. मराठा असाल आणी असे लिहित असाल तर पुढे जाऊन काय होईल याची कल्पना नाही. पुलेशू
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 12:04 नवीन
मित्रा , हा सिद्धेश्वर विलास पाटणकर उर्फ खिलजी , शंभर नंबरी ( ९६ कुलीन ) मराठा आहे रे .. माझे गोत्र भारद्वाज. पूर्वीचे आडनाव साळुंखे , " पाटण " चे वतन महाराजांकडून मिळाले म्हणून कालानुपरत्वे पाटणकर झालो . आजही आम्हाला आमच्या गावाकडे अदबीने " सरकार " असे म्हंटले जाते . माझी बायको हि तर फलटणचे जमीनदार " स्व श्री श्री लालासाहेब राजेनिंबाळकर " यांची नातं . ती देखील राजघराण्यातली . अजून इतर काही माहिती हवी असल्यास व्यनि करेन. अजून के मित्रा , मी परिणामांना कधीच घाबरलो नाही आणि पुढे घाबरणारही नाही . माझी काळजी तू करू नकोस , माझे दोन हात , दोन तलवारींप्रमाणे आहेत आणि गरज पडेल तेव्हा मी माझे कर्तृत्व सिद्ध करत आलोय तेसुद्धा समोर कितीही फौजफाटा असला तरीही. असं समाज कि हा एक मराठा , लाख मराठ्याप्रमाणे आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवाय
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/26/2018 - 20:06 नवीन
एक नं ललकारी दिलीस खिलजी भाऊ !!! निर्मळ मनाची माणस शब्दांचा खेळ , मग त्यातुन जातीपाती च राजकारण , मग एका विशिष्ट उच्च भृ भू भू समाजाचा कंपू बनवून बाकीच्या नां झोडून काढणे असले प्रकार करत नाही . खिलजी भाऊ नीं ' जय शिवाजी !! जय भवानी ' घोषणा दिल्याच्या आवेशात म्यांनातून तलवार बाहेर काढली पण समोर कोणी थांबलेच नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Fri, 07/27/2018 - 10:12 नवीन
खांदवे साहेब टंकताना चुकलात वाटत " जय भवानी , जय शिवाजी " असं पाहिजे व्हतं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
स
स्वधर्म Fri, 07/27/2018 - 09:01 नवीन
तुमची भूमिका सुसंगत अाहे. बरोबर चूक सोडून देऊ. तुंम्हाला घराण्याचा, जातीचा अाभिमान अाहे व अारक्षणाचा ‘साज’ नको अाहे. पण अांदोलनकर्त्यांना काय हवे अाहे? त्यांना हे सर्व हवे अाहे अाणि शिवाय जातीमुळे कोणतीही संधी, प्रतिष्ठा, शिक्षण नाकारले गेले नसूनही, अारक्षणही पाहिजे. त्यांची भूमिका सुसंगत दिसत नाही. जातीमुळे अारक्षण मिळालेली माणसं अशी जात जाहीरपणे ‘मिरवू’ शकत नाहीत, कारण त्यांना हिणवले जाण्याची, पात्रता असूनही कमी लेखले जाण्याची सामाजिक भिती असते. ‘ग्रेट मराठा’ लिहीलेल्या मोडक्या रिक्षा, भज्याच्या गाड्या अनेक दिसतात. अार्थिक गरीबी असली, तरी जातीचा अभिमान जात नाही. अशांनी जातीच्या अाधारावर अारक्षण मागणे खरोखर विसंगत वाटते. तुमच्या भूमिकेशी सहमत अाहे, फक्त ती अांदोलनकर्त्या मराठा बांधवांना पटवून कोण देणार हाच प्रश्न अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 04:02 नवीन
तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच पण नको आरक्षणाचा साज -> याच्याशी असहमत आहे. आरक्षणाची मागणी का होते आहे याचा विचार करायला हवा सगळ्यांनीच. कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हेच एक उत्तर नसलं तरी प्रश्न आहेत हे नक्की. === मला थोडा वेगळाच प्रश्न पडला आहे: जर मराठा मतपेढी ३२-३५% असेल तर हा फारच मोठा आकडा आहे. २०१९ मधे तो कसा वागेल यावर बरेच अवलंबून राहील. यांना सध्याचे भाजप, फडणवीस, मोदी नकोच आहेत पण परत काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाण्याचीदेखील इच्छा नाही कारण तिकडे आधीच भ्रमनिरास झालेला आहे. दुसरी एक रोचक बाब म्हणजे इतके मराठा मोर्चे होऊनही, शेतकऱ्यांचे खरच काही प्रोब्लेम आहेत हे मान्य असूनही सध्याचे विचारवन्त आणि सत्ताधारी दोघेही यांना दादागिरी करणारे म्हणूनच बघतायत. हा गावाशी नाळ तुटलेल्या शहरी/पुस्तकी विचारवन्तांचा steriotypeला बळी पडलेला limited दृष्टिकोन आहे कि खरंच मराठ्याचा behavioural प्रॉब्लेम आहे ते कळत नाही. खरंच मराठ्याचा behavioural प्रॉब्लेम असेल हे मान्य करणे अवघड जाते कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येला एकाच साच्यात बसवणे अशक्य/अयोग्य आहे
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 04:26 नवीन
त्यामुळे आता मला स्व/कम्पू घोषित विचारवंत, डावे वगैरेंबद्दलच शंका वाटू लागली आहे. नक्की काय हवं आहे यांना? २०१९ निवडणूकसाठी यांचा काही प्लॅन आहे का? एका मोठ्या मतपेढीला एकत्र आणावं अस यांना वाटत नाही का? शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सोडवायचे नाहीतच का कोणाला? कि ते शेतकरी म्हणून समोर येण्याऐवजी मराठा म्हणून समोर येतायत हाच प्रॉब्लेम आहे? आर्थिक मागासनाच आरक्षण द्यावे या फसव्या युक्तिवादाला बळी पडत चाललेल्या मराठ्यांचे नीट प्रबोधन करावे असे वाटत नाही का कोनाला? ते भिडे वगैरेंच्या नादी लागून भीमा कोरेगावला दगडफेक करणाऱ्यांबद्दल काही बोलायलालाच नको. एका मोठ्या लोकसंख्येला प्रखर हिंदुत्ववाद पासून दूर नेण्याची संधी वाया घालवली जात आहे असे वाटते.... असो. आपल्या हातात काहीच नाही त्यामुळे जे जे होईल ते ते पहावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 10:56 नवीन
न्यायसंस्था वेळ घालवत असेल तर राज्यघटनेतील संबंधीत तरतुदी बदलाव्यात. शेवटी जनतेचे राज्य म्हणजे लोकशाही. राज्यघटना जनतेस हवी तशी ठेवावी हे सर्वात उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 11:10 नवीन
....तरी प्रश्न आहेत हे नक्की.
सर्व आयोगांचे ज्यात मागासवर्गीय आयोग तसेच महाराष्ट्र लोक्सेवा आयोग इत्यादींचे सर्व कामकाज आणि न्यायालयीन कामाचे लाईव्ह प्रसारण करावे. शिवाय महाराष्ट्र लोक्सेवा आयोगाचे संचालक मंडळावर ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्या जाती जाहीर करुन मराठा समाजास समान संधी का मिळू शकली नाही याची सार्वजनिक चौकशीचे लाईव्ह टेलीकास्टींग करुन मिडीया ट्रायल करावे म्हणजे तरी जनतेला प्रश्न नीट समजतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 12:51 नवीन
आरक्षणाचा जांगडगुत्ता रमेश जाधव राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावर व्यक्त केलेल्या मतावरून सध्या गदारोळ माजला आहे. "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही जातीचा असो, त्याला आरक्षण मिळाले पाहिजे,`` असे पवार म्हणाले. आपल्या देशात आरक्षण हे आर्थिक निकषावर नव्हे तर सामाजिक आधारावर दिले जाते. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल, पण घटनेच्या मूळ ढांच्याला हात लावता येत नाही, मग हा पेच सोडविण्याचा अन्य मार्ग कुठला असा उपप्रश्न त्यावर राज ठाकरेंनी विचारायला पाहिजे होता. तसे घडले नाही. त्यामुळे पवारांच्या अर्धवट विधानावरूनच सगळीकडे चर्चेचे फड रंगले आहेत. मुळात मराठा, जाट, पाटीदार यासारख्या शेतकरी जाती आरक्षण का मागत आहेत, याच्या खोलात गेले पाहिजे. आरक्षणाची ही मागणी म्हणजे रोगाचे लक्षण आहे, मूळ आजार शेतीची दुरवस्था हाच आहे. त्यातून निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तो ताप हे दुसऱ्या एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण असू शकतो. अशा वेळी मूळ दुखण्यावर इलाज करण्याऐवजी तापावरची औषधं घेऊन उपयोग नसतो. अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शेती हा आतबट्ट्याचा आणि दिवाळखोरीचा धंदा झाला आहे. त्यामुळे शेतीतून बाहेर पडून नवीन संधी शोधण्याशिवाय गत्यंतर नाही. सरकारी नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललीय. दर्जाहीन शिक्षण इतर क्षेत्रातल्या संधी हस्तगत करण्यासाठी कुचकामी ठरतेय. शेतीतून बाहेर पडू पाहणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेऊ शकेल, इतकी औद्योगिक व सेवा क्षेत्राची वाढ झालेली नाहीयै. अर्थव्यवस्थेची वाट लागलीय. जे सध्या नोकरीवर आहेत, त्यांच्या नोकऱ्या चालल्यात. उच्च शिक्षित बेकारांच्या फौजा तयार होतायत. अशी कोंडी झालेल्या तरूणांना `मागास जातींना आरक्षण मिळत असल्यामुळे आपल्या संधी हिरावल्या जातायत` ही मांडणी दिशाभूल करणारी असली तरी पटणे साहिजक आहे. कारण ते ज्या अवस्थेमधून जात आहेत, त्यातून `आपण या व्यवस्थेचे बळी आहोत,` ही भावना मूळ धरणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आरक्षणाचे गाजर हा मोबिलायजेशनचा मुख्य मुद्दा बनतो. समजा वादासाठी असं गृहित धरू की दलित, आदिवासी व्यतिरिक्त इतर जातींसाठी आर्थिक निकषावर आरक्षण लागू झालं तरी त्यातून त्या समाजातील अशा किती मोठ्या घटकाला लाभ होणार आहे? हे आरक्षण प्रामुख्याने सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षणसंस्थांतील प्रवेशासाठी लागू असेल. खासगी क्षेत्रात तर आरक्षण नाही. आज सरकारी नोकऱ्यांची उपलब्धताच तोकडी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या तीन वर्षांत ६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल दीड लाखाच्या घरात आहे. सरकारी शिक्षणसंस्थांतील जागाही मोजक्याच आहेत. ही अशी सगळी परिस्थिती असूनही आरक्षण हाच एकमेव उपाय असल्याची हाकाटी पिटणे कितपत योग्य ठरते? आरक्षण हे सामाजिक न्यायाचे तत्त्व अंमलात आणण्यासाठी आहे, तो काही गरीबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही, याचा विसर पडल्याने हा पेच निर्माण झाला आहे. तसेच आरक्षण ही कुबडी आहे, सक्षम झाल्यानंतर ती कुबडी फेकून दिली पाहिजे; ना की त्या कुबडीची व्याप्ती वाढवून आणखी समाजगटांना त्यात सामावून घेण्याचा आटापिटा केला पाहिजे, याकडे आपण जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहोत. आदिवासी, दलितेतर जातींतल्या आर्थिकदृष्ट्या गरीब तरूणांची कोंडी, त्यांचा उद्रेक, त्यांचा संताप जेन्युईन नाही का? तर शंभर टक्के आहे. पण आरक्षण हा त्यावरचा उपाय असल्याची मांडणी करणे ही आत्मवंचना आहे. या तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या आकांक्षांना न्याय देण्यासाठी इतर सिस्टिम्स, व्यवस्था, मार्ग उभे करण्यात आलेले अपयश हे या आत्मवंचनेला कारणीभूत आहे. त्यामुळे या वर्गासाठी एक नवीन कार्यक्रम आखणे हीच आपली पुढची दिशा असली पाहिजे. शरद पवारांनी मराठा आरक्षणाला पूर्वी स्पष्ट शब्दांत विरोध केलेला होता. परंतु नंतरच्या टप्प्यात हा मुद्दा राजकीय बनून इतक्या टोकाला गेला की त्यांना राजकीय अपरिहार्यतेपोटी का होईना आपल्या भूमिकेला मुरड घालावी लागली. आज ते अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर जातींसाठी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण असलं पाहिजे, अशी भूमिका मांडत असतील तर त्याला `दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचा प्रयत्न` म्हणून उडवून लावणे योग्य ठरणार नाही. आरक्षण हा उपाय खचितच नाही, पण या आर्थिकदृष्ट्या मागास तरूणांचा कन्सर्न अॅड्रेस केलाच पाहिजे, हाच पवारांच्या भूमिकेचा आशय आहे. एक प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय इतःपर राजकीय अजेंड्यावर राहणार नाही, हेच त्यांनी सूचित केलं आहे. सत्तर हजार लोकांना रोजगार देणारा हणमंत गायकवाड (बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख) हाच तुमचा आयकॉन असला पाहिजे असे या मुलाखतीत सांगून ते जो मेसेज देत आहेत, त्याला काही महत्त्व आहे की नाही ? जनाधार (मास बेस) असलेल्या नेत्याला एकदम टोकाची भूमिका घेता येत नाही, त्याला हळूहळू समाजमनाला आकार द्यावा लागतो. त्या नेत्याच्या भूमिकेतील विसंगतींवर बोट ठेवलेच पाहिजे पण त्याची दिशा योग्य आहे की नाही यावरूनही त्याचे मूल्यमापन करायला हवे. शरद पवार किंवा भालचंद्र नेमाडे जी विधाने करत असतात ती शब्दशः घेऊन उपयोग नसतो; त्यातला `बिटविन दि लाईन्स` अन्वयार्थ लक्षात घेतला नाही तर फसगत होण्याचीच शक्यता जास्त. खरं तर पवारांच्या भूमिकेवर अधिक व्यापक परिप्रेक्ष्यात आणि अधिक खोल पाण्यात उतरून टीका केली पाहिजे, प्रतिवाद आणि विरोध केला पाहिजे. ही प्रगल्भता आज दिसत नाही. काठावर बसून पाण्यात खडे फेकण्यापलिकडे आपली काही भूमिका व जबाबदारी आहे, याची जाणीव नसलेले पत्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते आणि कथित (स्वयंघोषित) विचारवंत यांचा सुकाळ झाला की पवारांसारख्या व्यक्तींचं ना खरंखुरं मूल्यमापन होतं, ना त्यांच्या चुकीच्या गोष्टींना ठाम विरोध होतो. आरक्षण ही समान संधींचा अवकाश उपलब्ध करून देणारी कुबडी आहे, हत्यार नव्हे याचा विसर पडलेला आपला समाज आहे. अमेरिकेत जशी `अफर्मेटिव्ह अॅक्शन` झाली, तशी स्थिती आपल्या समाजात आहे का? गोऱ्यांनी वर्चस्ववादी भूमिका घेऊन आपल्याला संधी नाकारल्यामुळे आपण मागे पडलो; आता त्या संधी हस्तगत करून त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्याहून अधिक चांगला परफॉर्मन्स आपण देऊ ही तिथली विजिगिषू वृत्ती आपल्या समाजात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींकडे दिसते का? त्याच्या वरताण म्हणजे `त्यांना आरक्षण मिळतंय तर आम्हालाही द्या` ही याचकाची वृत्तीच अधिक आक्रमक होऊन आपल्याकडे इतर जाती मांडत आहेत. ज्ञानाची आस आणि संपत्तीनिर्मितीचा ध्यास याला कवडीचंही महत्त्व नसलेल्या समाजाचं हेच भाग्यध्येय असणार. आजच्या पर्यावरणात अशी आस आणि ध्यास असलेला समाज (सोसायटी) निर्माण करणं हा आज एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा अजेन्डा असणं शक्य आहे का, याचं आपणही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हे आपलं `कलेक्टिव्ह फेल्युअर` आहे. उद्या समजा ऑक्सफर्ड किंवा हार्वर्ड विद्यापीठाचा कुलगुरू आपण शक्य ते सगळे प्रयत्न करून भारतात आणला आणि त्याच्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सोपवली तर काय होईल? एक तर तो इथल्या कुलगुरूंसारखाच होऊन जाईल किंवा कंटाळून निघून जाईल. कारण इन्स्टिट्युशन्स उभारण्याचं महत्त्व आपण विसरून गेलो आहोत. नेहरूंच्या काळात ज्या इन्स्टिट्युशन्स उभ्या राहिल्या (त्यासाठी अनेकांनी गाडून घेऊन काम केलं) त्या पलीकडे आपण फार काही मजल मारलीय असं दिसत नाही. आधुनिकता या मुल्याचा स्वीकार करताना आपली जी गोची झालीय किंवा जो पेच आपण ओढवून घेतला आहे, त्यावरून आपली एकंदर धारणा आणि जडणघडण कशी आकारला आली यावर प्रकाश पडतो. त्यातून सध्याच्या या कोंडीचं गणित काही प्रमाणात सुटतं. ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक सुनिल तांबे यांना इथे उध्दृत करणं मला आवश्यक वाटतं. तांबे लिहितात- ``आधुनिकता म्हणजे प्रगतीविषयीची नवी कल्पना स्वीकारणे, त्या कल्पनेवर आधारित नवा जीवनमार्ग स्वीकारणे, आपल्या समाजापुढील प्रश्नांचे यथार्थ स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करणे, त्या प्रश्नाच्या सोडवणुकीची जबाबदारी स्वीकारणे आणि त्यासाठी सतत कृतिशील राहणे. स्वातंत्र्य, व्यक्तिमूल्य, इहवाद (सेक्युलॅरिझम), समता ही आधुनिक मूल्यं मानली जातात. ह्या मुल्यांची पायाभरणी युरोपातील पुनरूज्जीवन आणि प्रबोधन या सांस्कृतिक आंदोलनांमध्ये झाली. या सांस्कृतिक आंदोलनांनी औद्योगिक क्रांतीला जन्म दिला. निसर्ग आणि मानवी समाजाचे नियम जाणून घेणं, त्या नियमांचं सखोल ज्ञान मिळवणं आणि त्या ज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञान व समाजाची रचना करणं याला प्रबोधनाची विचारसरणी म्हणतात. युरोप आणि अमेरिका खंडांतील राष्ट्रांनी वा समाजांनी आधुनिक मूल्यांना अनुरूप अशी नवी समाज-संस्कृती घडवली. युरोपियन देशांचा वसाहतवाद, साम्राज्यवाद यांच्यामार्फत आधुनिकतेचा परिचय जगातील अन्य समाज संस्कृतींना झाला. तंत्रज्ञानामार्फत ही आधुनिकता जगभर पसरली. मात्र आधुनिक मूल्यं जगभर रूजलेली नाहीत. ऐहिक निष्ठा आणि आधुनिकता प्रामाणिकपणे कशा स्वीकारायच्या हा प्रश्न बहुसंख्य बिगर युरोपियन राष्ट्रांपुढे आहे. आपल्या भौतिक प्रगतीसाठी एक समर्थ हत्यार म्हणजे आधुनिकता अशी धारणा बहुसंख्य भारतीयांची आहे. अमेरिका असो की युरोप, आधुनिकता हा जनआंदोलनाचा अजेंडा होता. त्यातून तिथे क्रांती झाली. राजाचे अधिकार मर्यादीत झाले वा केवळ देखाव्यापुरते उरले वा राजाला सुळावर चढवण्यात आलं. भारतात आधुनिकता हा सरकारचा कार्यक्रम होता आणि तो तसाच असायला हवा अशी बहुतेक पुरोगाम्यांची धारणा आहे. राखीव जागा असणार, असायला हव्यात याबद्दल एकमत असायला हवं. मात्र लाभधारकांच्या निश्चितीबाबत वेगळी व्यवस्था वा मेथॉडॉलॉजी शोधायला हवी. अशी मेथॉडॉलॉजी की जी विविध घटकांना न्याय देईल.`` शेती किंवा पशुपालन या क्षेत्रांत शेकडो वर्षांपासून काम करत असलेल्या अनेक जाती आपल्याकडे आहेत. या जातींकडे विशिष्ट, दुर्मिळ कौशल्यसंपदा (स्किलसेट) आहे. या संपदेचा उपयोग करून त्यांच्या विकासासाठी नवीन प्रारूप आकाराला यावं, अशा प्रकारची रचना आपण का उभी करू शकत नाही? त्यांच्या उत्थानासाठीही सरकारी नोकरीतील आरक्षण या `सब घोडे बारा टक्के` छापाच्या कार्यक्रमाखेरीज अन्य कार्यक्रम का असू शकत नाही? या जातींकडे असलेल्या गुणसंपदेचा सरकारी नोकरीत काय परिपोष होणार आहे? सजल कुलकर्णी हे तरूण संशोधक स्थानिक पशुप्रजाती व लोकसमुहांचे अभ्यासक आहेत. आपल्याकडील दुधाळ गायी-म्हशींच्या स्थानिक जाती हुडकणे आणि त्यांचे पालन करणाऱ्या समुहांचे ज्ञान विकसित करणे, त्यांच्या दुधाला आणि मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ विकसित करणे हा मार्ग चोखाळला पाहिजे, अशी मांडणी ते सातत्याने करत आहेत. धनगरांनी त्यांच्या पशुपालनाच्या ज्ञानाचा, कौशल्यांचा विकास करायला हवा; त्यातून त्यांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सुटायला हवेत; त्यासाठी त्यांना योग्य संधी आणि एनॅबलिंग वातावरण तयार करण्याची जबाबदारी सरकारची आहे अशा पध्दतीने आपल्याकडे विचार होत नाही, असे ते म्हणतात. अशा दृष्टिकोनाऐवजी धनगरांना सरकारी नोकरीत आरक्षण, राखीव जागा देणे हाच त्यांच्या प्रगतीचा एकमेव मार्ग असल्याचा निष्कर्ष आपण काढून ठेवलेला आहे. ज्ञानाची आणि लक्ष्मीची उपेक्षा करण्यात आपण मास्टरी मिळवली आहे. मग हा आरक्षणाचा जांगडगुत्ता सुटणार कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 13:33 नवीन
अ‍ॅमी ताई आपण स्वतःच्या मताच्या विरोधातला लेख का कॉपी पेस्ट केला आहे ? 'वैचारीक गोंधळ' आहे की 'वैचारीक कोलांटउडी; की विरुद्ध बाजूचे मत की अजून काही वेगळे कारण आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 14:00 नवीन
प्रश्न काय आहेत आणि त्यावर दीर्घकालीन उत्तर काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 18:44 नवीन
...प्रश्न काय आहेत आणि त्यावर दीर्घकालीन उत्तर काय आहे......
या गोष्टी विवेकाशी संबंधीत असतात -त्यावर चर्चा करु नये असे नाही; पण जिथे विवेकापेक्षा भावनिक परसेप्शन, मतपेटीचे आणि उत्पातमुल्य अधिक असणार आहे. जिथ पर्यंत न्यायालय स्विकारते तिथपर्यंत आरक्षण द्यायचे हे नक्की आहे आणि न्यायालय नाही म्हणाले तर उत्पात आणि हिंसा आणि झूंडशाही किंवा निवडणूकातील मतपेटीचा प्रभाव म्हणून राज्यघटना बदलण्या शिवाय संसद सदस्यांना पर्याय असणार नाही हि ज्या राजकारणाची दिशा स्पष्ट आहे तिथे खरे प्रश्न आणि नेमक्या विश्लेषणाची बूज शिल्लक रहाण्याची शक्यता कितपत आहे ? एखाद खिलजी कविता लिहील दोनचार त्यांचे समर्थन करतील दोघे चौघे विश्लेषण करतील पण जे व्हायचे नक्की आहे ते होऊन रहाणार हे माहित असताना, त्याची चिंता का पडलेली आहे . हि चर्चा चालू असताना सरकारी नौकर्‍यांची संख्या तर मर्यादीत आहे. आरक्षण उपलब्ध असूनही सरकारी नौकरीत नंबर न लागणारे ओबीसी काय करतात ह्याची चर्चा झाली तर हे आरक्षण पदरात पडूनही सरकारी नौकरीचा लाभ न होणार्‍या बहुसंख्य मराठा समाजा समोरच्या खर्‍या आव्हानांची चर्चा कदाचित होऊ शकावी . पण अशा चर्चांची क्षमता महाराष्ट्रीयात असती तर चळवळींच्या दिशा बर्‍याच वेगळ्या राहील्या असत्या असे वाटून जाते. अशी वाक्ये भविष्यातील इतिहास संशोधंकांना रेकॉर्डवर असे वाक्य दिसले होते हो या पलिकडे याची वास्तव किंमत काही नसावी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 12:45 नवीन
अँमी ताई, मला आपला प्रबोधनाचा मुद्दा पटला. खरंच समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे . आपल्या संपूर्ण देशाला एक ठेवण्यासाठी , देश सध्या तरी दूर ठेवूया , राज्याला एक ठेवण्यासाठी , चांगले लोकनेते प्रत्येक पक्षात असणे गरजेचे आहे . इथे त्यातच आपण चुकत आहोत . सध्या निवडणूक पक्षाच्या नावाखाली लढवली जाते आणि उभे राहतात वरिष्ठांच्या मार्जीतलेच . ते काय प्रबोधन करणार . मी तर म्हणतो , निवडणुकीला उभे राहण्यासाठीच काहीतरी कायदा असावा . पात्रतेचा निकष असावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 07/27/2018 - 01:12 नवीन
पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण- प्रा.हरी नरके या देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी जी विषयपत्रिका ठरवतात, ती सामान्य माणसांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. कितीही वेळा ते पराभूत झाले तरी चिवटपणाने लढत राहतात. थोडीशी फट दिसली की लगेच आपला अजेंडा [मुद्दा] पुढे सरकवतात. आता पुन्हा आले दिल्लीकरांच्या मना आणि सुत्रांच्या नावे एक पिल्लू सोडण्यात आले. लगेच पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण माध्यमांनी सुरू केले. आधी त्याबाबतची वस्तुस्थिती तरी समजावून घेऊया. 1. आधुनिक चाणक्य पं.प्र. नरसिंहराव यांच्या सरकारने मंडल आयोगाविरूद्ध पेटविण्यात आलेला दंगा आटोक्यात आणण्यासाठी एक खेळी केली. 25 सप्टेंबर 1991 रोजी त्यांनी आर्थिक निकषांवर 10% आरक्षण घोषित केले. सवर्ण समाजातील सर्व गरिबांना ते मिळणार होते. मात्र 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते. [इंद्र साहनी वि. भारत सरकार, म्हणजेच मंडल आयोगाची केस.] 2. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे केस लॉ असतो. तो रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीच करावी लागते. आता तो पर्याय सुचवला जातो आहे. मात्र अशी घटना दुरुस्ती केली तर ती ही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे. [ पाहा- प्रा. अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12] न्या.सावंत म्हणतात, "विद्यमान आरक्षण हे जात, जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची आहे म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे. व्यक्ती म्हणून दिलेला नाही. त्या गटाची सदस्य म्हणून दिलेला आहे. आर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही." 3. राज्यघटनेत आरक्षणाला जात, जमात, वर्ग हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली] आपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागास वर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे. ओबीसीमध्ये एखादी जात समाविष्ट करायची असेल तर त्याची 23 गुणांची एक सुची असते. त्यातले 12 गुण सामाजिक मागसलेपणाला, 8 गुण शैक्षणिक मागासलेपणाला व 3 गुण आर्थिक मागासपणाला दिलेले असतात. यात 23 पैकी किमान 12 गुण मिळाले तरच ती जात ओबीसीत समाविष्ट केली जाते. आर्थिक निकष का नको? 4. आरक्षणामुळे शिक्षण व नोकरी मिळते त्यामुळे जरी आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मात्र सध्या सर्वत्र आरक्षण म्हणजे गरिबी निर्मुलन असे समीकरण बनवण्यात आलेले आहे. देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी यांचा कल आर्थिक निकष लावून आरक्षण द्यावे याकडे झुकलेला आहे. 5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38, 39, 41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा. देशातील सर्व गरीबांसाठी भरीव आणि कार्यक्षम कृतीकार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे याबद्दल दुमत नाही. 6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना शिक्षण, प्रगती, उन्नती यांची संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर अनेक वेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरलेले आहे. 7. आपल्या समाजव्यवस्थेत जातनिहाय व्यवसाय ठरवून दिलेले होते. ही व्यवस्था किमान 2800 वर्षे या देशात होती. व्यवसाय हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे स्त्रिया, दलित, आदिवासी, ओबीसीच करतात. याउलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले, बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार. 8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल. 9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन, हवा, पाणी, उर्जा, संपत्ती यांची ] मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का? मालकीचे वाटप बदलले का? आजही देशातले 99%+ विवाह जातीतल्या जातीत होतात. लग्नं जातीत, संघटना जातीच्या, धर्मशाळा, कितीतरी बॅंका आणि आणखी काय जातीचे पण आरक्षण मात्र आर्थिक निकषांवर हवे हा दुटप्पीपणा नाही? आजही सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती, राजसत्ता दुसर्या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [ शेयरमार्केट, कारखाने, व्यापार ] तिसर्या वर्णांच्या हाती आहे. याला कोणाचाच आक्षेप नाही. हे मनूने दिलेले आरक्षणच आहे. ते आजही चालते. धर्माधिकारी नेमताना त्यांची गुणवता तपासणारी विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेला सर्व हिंदूंना स्त्री-पुरूषांना बसू द्या अशी मागणी बाबासाहेबांनी 100 वर्षांपुर्वी केली होती. ती आजही मान्य झालेली नाही. ती नियुक्ती जातीवर का? 10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का? 11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय. 12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे. 13. ज्या देशात फक्त 10% पैसेवाले आयकर भरतात व 90 टक्के पैसेवाले तो चोरतात त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही भ्रामक गोष्ट आहे. 14. राजकीय आरक्षण, [ निवडणुकीतले आरक्षण ] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय? 15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील [ग्राम पंचायत, पंचायत समिती, जि.प. न.प. मनपा ]यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर तत्व लावलेले नाही हे किती लोकांना माहित आहे? 16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ती जात ओबीसी ठरल्यावर त्यातल्या खर्या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे. हा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढा एकच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. खुसपट काढण्यासाठी, बुद्धीभेद करण्यासाठी इतर मुद्दे पुढे करू नयेत. ज्यांना याबाबतचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आजवरचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया ती आधी करून घ्यावी. शाळकरी, पोरकट, बालीश आणि दांभिक मुद्दे उपस्थित करून टाईमपास करू नये. उगीच खिजवू नये. असल्या कॉंमेंट्स उडवल्या जातील. - प्रा.हरी नरके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 07/27/2018 - 12:46 नवीन
आरक्षणाची मागणी का होते आहे याचा विचार करायला हवा सगळ्यांनीच. कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हेच एक उत्तर नसलं तरी प्रश्न आहेत हे नक्की. -> https://www.maayboli.com/node/66915?page=2#new इथला 'डब्बा बाटली' या आयडीचा प्रतिसाद वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Mon, 07/30/2018 - 02:00 नवीन
कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हेच एक उत्तर नसलं तरी प्रश्न आहेत हे नक्की. -> डॉ.बाबासाहेब : शेतकर्यांचे सच्चे मित्र शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता. 1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन अशी शेतं एकत्र करून शेतकर्याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला. 2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे. 3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल. 4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत. 5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात. 6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी. असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते. त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्यांचे मोर्चे काढले. त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले. आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो. डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता. -- प्रा. हरी नरके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
माहितगार Mon, 07/30/2018 - 08:37 नवीन
...त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
हम्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
N
nanaba गुरुवार, 07/26/2018 - 08:47 नवीन
फक्त मरा ठा म्हणून जातीनिहाय मागणी का असा वी? ती ही शतकानु शतके सत्ताधारी असलेल्या जाती ने ही माग णी करावी का? मुळात आपल्यात ताकद असताना, आपल्याला बुद्धी मिळालेली असताना, शेतज मिनी सारखा आधार असताना कुणीच आरक्षण वापरु नये असे प्रामाणिक पणे वाटते. त्याच वेळी जे ख रेच वंचित आहेत त्यांना ते मिळावेच. पण आपल्याला फक्त राडे करण्यात आणि सोपे र स्ते निवडण्यात रस आहे असे वाटते अनेकदा. बायदवे, भिड्यान्च्या ज्या भाषणाने कोरेगाव पेटले असे म्हणता - त्या भाषणाचा रेफरन्स द्याल का? मला फारच उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
N
nanaba गुरुवार, 07/26/2018 - 08:52 नवीन
कुणालाही आरक्षण मिळाले किंवा नाही मिळाले तरी मला पर्सनली काहीच फरक पडणार नाहिये. प ण आश्चर्य मात्र खूप वा टते(च)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 07/26/2018 - 09:07 नवीन
>> आर्थिक मागासनाच आरक्षण द्यावे या फसव्या युक्तिवादाला बळी पडत चाललेल्या मराठ्यांचे नीट प्रबोधन करावे असे वाटत नाही का कोनाला? घटनेनुसार अारक्षण हे केवळ सामाजिक मागासलेपणाच्या निकषांवरच दिले जाऊ शकते, तो गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. म्हणून तो युक्तीवाद फसवा अाहे का? का दुसरे काही कारण अाहे ज्यामुळे याला अापण फसवा युक्तीवाद म्हणत अाहात? प्रबोधनाचे म्हणत असाल, तर असे प्रबोधन कुणीही त्यांचे करायला जाणे अवघड दिसते. ती त्या नेत्याची राजकीय अात्महत्याच ठरण्याची शक्यता अाहे. मराठ्यांना इतर सर्व मागास समाजटांगप्रमाणे संधी नाकारण्यात अालेली नव्हती, असे कोणी सांगू जाणे, अाणि ते ऐकणे, या परिस्थितीत खरेच अवघड दिसते.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 07/26/2018 - 09:08 नवीन
वरील प्रतिसाद अॅमी यांना होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 09:32 नवीन
मराठा उद्रेकाला जबाबदार कोण? सदर - सडेतोड निखिल वागळे http://www.aksharnama.com/client/article_detail/2323
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 11:00 नवीन
...जातीतोडोची लढाई आपण गमावलेलीच आहे,...निखील वागळे
* हि लढाई गमावणारे आपण म्हणजे नेमके कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 12:44 नवीन
आपण म्हणजे सगळेच आले त्यात. सगळ्या जातीचे. "खरंतर मी जन्माने क्ष पण जातपात मानत नाही" असे सांगणारेदेखील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/26/2018 - 09:55 नवीन
आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण : मा. विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 10:40 नवीन
रोचक पण त्या व्यासपिठावरचे आज तिघे हयात नाहीत आणि चौथे मनोहर जोशींना आजच्या राजकारणात स्थान नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ए
एमी गुरुवार, 07/26/2018 - 12:42 नवीन
देशमुखांनी काय तोडगा सुचवला होता हे कोणीतरी थोडक्यात लिहू शकेल का? काही कारणास्तव मी व्हिडिओ बघू शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 15:28 नवीन
अँमी ताई , स्व श्री विलासराव देशमुखांनी आपल्या भाषणात खालील मुद्दा अधोरेखित केलेला आहे . " जर आरक्षणावरून उद्भवणारा संघर्ष टाळायचा असेल तर जातीनिहाय आरक्षण ना देता , आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे . असे जर झाले तर पुढे भविष्यात कुणालाही जात पडताळणी करायची गरजच भासणार नाही आणि त्या अनुषंगाने जातीयवादी संघर्ष पण उफाळून येणार नाही . " सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Fri, 07/27/2018 - 00:22 नवीन
अच्छा. धन्यवाद. 'केवळ' आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास माझा विरोधच असेल. जातीवर आधारित आरक्षण देऊन मग त्यात क्रिमी लेयर वगळणे किंवा त्यात आर्थिक मागास अशी सबकॅटेगरी करणे याला समर्थन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि गुरुवार, 07/26/2018 - 12:08 नवीन
आताच आलेल्या ताज्या बातमीनुसार कोपरखैराणेत ( नवी मुंबई ), जिथे मी सध्या काम करतोय तेथे लष्कराला पाचारण केले आहे . सध्या तणावपूर्ण शांतता आहे तिथे . कालचा बंद असताना तिथे पूर्व वैमनस्यातून एका नगरसेवकाचे घर फोडले , त्याच्या मालमत्तेची वाट लावली . निमित्त ठरला मराठ्यांचा बंद . हे असे व्हायला नको असे मनापासून वाटते . आता बघू पुढे काय होते ते ..
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 07/26/2018 - 14:08 नवीन
https://www.thehindubusinessline.com/blink/talk/who-is-the-grand-maratha/article9912185.ece
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/26/2018 - 16:57 नवीन
अतिशय रोचक माहिती आहे या धाग्यात. मराठी अनुवाद करुन समजाऊन घ्यायला लागेल. कुणी इंग्रजी जाणकार मराठीत अनुवाद/गोषवारा देईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ब
बार्नी गुरुवार, 07/26/2018 - 16:03 नवीन
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे काय , ह्यासंबंधीचा रोचक धागा "The three groups demanding OBC status and, in turn, access to reservations (quotas), are already closer to the upper castes than to the more disadvantaged groups in their respective states. Their anxieties seem to be based more on perception than on empirical evidence. An overwhelming amount of evidence suggests that these communities are not the most marginalised in their respective states; additionally, these jatis have consolidated their advantage over the marginalised groups and have narrowed gaps with the dominant groups in their respective states between 2004–05 and 2011–12. " Jats, Marathas, and Patels Want Quotas, But Do They Need Them?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/26/2018 - 16:49 नवीन
खिलजि, मराठ्यांनी आरक्षणाच्या सापळ्यात अडकू नये हे माझं स्पष्ट मत आहे. साधा प्रश्न आहे, शिवाजीमहाराज कोणत्या आरक्षणामुळे जागी सर्वत्र तळपले? एक सोडून दोनदा तत्कालीन जगातली सर्वात मोठी युद्धं (१७६१ चं पानिपत व १८५७ चं स्वातंत्र्ययुद्ध) मराठ्यांनी कसल्या आरक्षणाच्या जोरावर लढली? उगीच काहीतरी फालतू बकवास चाललाय. एकंदरीत माझ्या मते चालू आंदोलनाचं फडणवीस हेच एकमेव लक्ष्य आहेत. मराठा आरक्षण हे केवळ निमित्त आहे. खरं अघोषित आरक्षण मुख्यमंत्रीपद हे आहे. राज्यातल्या मराठा प्रस्थापितांना एक ब्राह्मण मुख्यमंत्री फक्त कामाच्या जोरावर जनतेत लोकप्रिय होतोय हे पाहवंत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद हा जातीसिध्द अधिकार (= बापाची पेंड) वाटतो. हे खरं दुखणं आहे. त्यामुळे अपक्ष आमदार रवी राणा यांची भूमिका मला पटली. ते म्हणतात की आरक्षण देण्यास फडणवीस समर्थ आहेत. कोणी त्यांना बदललं तर सरकारचा पाठींबा काढून घेणार. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा