तडफदार मुख्यमंत्री श्री फडणवीस ह्यांची कामगिरी बुलेटिन -३
माननीय मुख्यमंत्र्यांनी भारताचे माजी प्रधानमंत्री श्री मनमोहन सिंग ह्याचा आदर्श घेऊन भारताच्या सर्व संपत्तीवर अल्पसंख्यांक लोकांचा प्रथम अधिकार आहे हा न्याय अतिशय वेगाने महाराष्ट्रात लागू करण्याचा ध्यास घेतला आहे. ह्यांत त्यांना वर्तमान प्रधान मंत्री श्री मोदी जी ह्याचा पूर्ण आशीर्वाद आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून मोदी ह्यांनी मनमोहन सिंग ह्याच्या सल्ल्याचे अनुकरण केले ह्यावरून मोदीजी किती मुसुद्दी नेते आहेत हे लक्षांत येते.
१. औरंगाबाद येथे फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी एक नवी अक्खी युनिव्हर्सिटी. सुप्रीम कोर्टाने अधोगामी भूमिका घेऊन मुस्लिम बांधवाना आरक्षण नाकारल्याने सरकारने फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी विद्यापीठ काढायचे ठरवले आहे. मोदी सरकारच्या स्कीम प्रमाणे इथे सुद्धा हिंदू मुलींना आरक्षण आहे कि नाही ठाऊक नाही पण असेल तर फडणवीस साहेबानी आपल्या मुलीला तिथे पाठवून पायंडा घालावा.
२. आधीच्या बुलेटिन प्रमाणे अल्पसंख्यांक मुलांना फी परत देणे, waqf बोर्डला काही शंभर कोटी इत्यादी स्कीम्स फडणवीस साहेबानी आधीपासून केल्या होत्या पण ह्या सुद्धा कमी पडत असतील तर सरकारी खजाना अल्पसंख्यांक लोकांसाठी ओपन आहे हे सांगण्यासाठी उलेमा - इ - जमात ह्यांना ऑफिस मध्ये बोलावून फडणवीस साहेबानी महाराष्ट्राचे सर्वांत पुरोगामी मुख्यमंत्री आपण आहोत हे सिद्ध केले.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना जी दूरदृष्टी नव्हती ती दृष्टी आमचे मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी दाखवली आहे. हल्लीच एका लहान मुलाने "लांगुनचालन" हे काय आहे असे विचारले तेंव्हा मी त्याला खालील चित्रे दाखवली.
पण जी गोष्ट मतपेटी डोळ्यासमोर ठेऊन होते तिथे राजकारण नाही असे म्हणणे भाबडेपणाचे वाटण्याचीही शक्यता असु शकते का ?मुळात राजकारणातूनच निवडून आलेल्या सरकारने(प्रतिनिधींनी) केवळ लोकांचे कल्याण विचारात घ्यावे. राजकारण करु नये. असे म्हणणेच अतिआदर्शवादी नाही का?