पुरोगामी लक्षणं...
जर कोणी -
काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाबद्दल न बोलता एनआरसीमुळे रोहिंग्यांवर कसा अन्याय होतो आहे हे सांगत असेल...
काश्मीर मध्ये दगडफेकीत आणि फुटीरतावाद्यांच्या कारवायांना बळी [पडणाऱ्या सैनिकांपेक्षा मेजर गोगोईने एका दगडफेक करणाऱ्याला जीपला बांधले त्याबद्दल वाईट वाटत असेल तर...
कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा यांना काही वर्षे उगाच तुरुंगात काढावी लागली याबद्दल अवाक्षरही न काढता वरावर राव, सुधा भारद्वाज ई. ना नक्षलींना पाठिंबा दिल्याबद्दल कोर्टाने हाऊस अरेस्ट सांगितली म्हणून वाईट वाटत असेल...
दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या पोलीस, कमांडोज आणि सामान्य नागरिकांपेक्षा अफझल गुरु आणि कसाब यांना फाशी दिली गेली म्हणून वाईट वाटत असेल तर...
कोर्टाने कन्हैया कुमार, उमर खालिद वगैरेंना देशद्रोहाच्या आरोपातून मुक्त केल्यावर कोर्ट चांगलं काम करतंय असं वाटत असेल पण एका दशकाच्या सुनावणीनंतर मोदींना २००२ च्या दंगलीसाठी क्लीन चीट दिल्यावर कोर्ट चुकीचं वाटत असेल तर...
अखलाख आणि जुनैदच्या मृत्यूबद्दल वाईट वाटत असेल आणि कुठे चाललाय भारत माझा असं वाटत असेल पण प्रशांत पुजारी, प. बंगाल आणि केरळमध्ये होणाऱ्या हिंदू लोकांच्या हत्या याबद्दल बोलावेसे वाटत नसेल तर...
फक्त असिफावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाईट वाटत असेल पण मंदसौर मधील ८ वर्षांच्याच मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल माहीतही नसेल किंवा माहित असेल तरी असिफबद्दलच बोलावंसं वाटत असेल...
तर त्या व्यक्तीला पुरोगामी लक्षणांची बाधा झाली आहे असे म्हणता येईल...
आणि जर कोणाला वरील मुद्द्यांपैकी काही वाटत असेल तर तपासून घ्यावे...
नसेल तर अजून तुम्हाला कुठली पुरोगामी लक्षणं माहित आहेत ते प्रतिसादांमध्ये लिहावे...
त्याची जागा अस्मितांचे स्फुल्लिंग चेतवून भरून काढातर हे सगळं न बघता कुठल्या तरी निवडक मारहाणीच्या घटना फक्त बघून अस्मिता आणि कसली स्फुल्लिंग वगैरे बघणे हे पण एक लक्षण म्हणावे काय?शेवटी हे स्फुल्लिंग म्हणजे अस्तनीतले निखारेच होतेदेशातील फक्त निवडक वाईट घटनाच बघणाऱ्या आणि दाखवणाऱ्या तसेच फक्त त्यावरच विश्वास ठेवणाऱ्यांना अस्तनीतले सापच म्हणावे लागेल.असेच धर्माभिमानाचे पलिते पेटते ठेवाधर्माभिमान असला तर काय वाईट आहे हे मात्र मला समजले नाही. मी हिंदू असल्याचा मला अभिमान का असू नये याचं एक तरी कारण मला सांगाल का?