मुलाचा हट्टीपणा
माझा मुलगा वय ११ वर्षे 6th Standard. शाळेत जायला रोज त्रास देतो, बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. आम्ही विचारून झालं, त्याच्या शाळेच्या Principal Madem नी व क्लास टीचर नी पण विचारल कोणालाही काहीच सांगत नाही.
आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. परीक्षेत मार्क कमीच आहेत. आठवी पर्यंत पास होत जाईल, पण पुढे त्याचे नुकसान होईल.
आता त्याला कोणती treatment द्यावी ते समजत नाही.
- पी हळद आणि हो गोरी असे मानसोपंचाराच्या बाबतीत अजिबात होत नाही.
- आपल्या केसमधे समुपदेशन न्हवे औषधाची गरज आहे(Go to psychiatrist not psychologist) असे सकृत दर्शनी ठामपणे वाटते
- हे उपचार नेमके निदान व पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरवायला किमान 5 महिने तरी घेतात तो पर्यंत साधारण मोठ्या शहरात पर सेशन/विसीट ₹५०० असा सरासरी तपासणी खर्च असतो
- औषध खर्च वेगळा परंतु तो महिन्याला ₹500 एव्हडाही होत नाही अर्थात औषधे आणि त्यांचे अर्थकारण हा विषयच गहन असल्यानं याबाबत डॉक्टरच काय ते योग्य बोलतील
- वरील मुद्दे लक्षात घेता सहज समजेल कि हे उपचार खर्चिक नसले तरी प्रचंड पेशन्स चे काम आहे, आणि बहुतेक पेशन्ट इथेच हार मानून उपचार मधेच सोडून देऊन अजून निराश होतात तसे होता कामा नये
- कोणत्याही शारीरिक आजारपणात पेशण्ट कधी एकदा हा त्रास थांबतोय दूर होतोय याचीच आतुरतेने वाट बघत असतो प्रयत्न करत असतो परंतु मनाच्या आजारपणात बरेचदा नेमके याच्या उलट असते, पेशन्ट डिनायल मोड मधे असतो ज्यामध्ये आपण वर्तनाने आजारी आहोत चुकत आहोत हेच त्याला मान्य होत नसते परिणामी आपल्यात काही बदल अपेक्षित आहेत हेच अमान्य असल्याने शारीरिक रोगाप्रमाणे मानसोपचारहि आपल्याला आवश्यक आहेत हेच गांभीर्याने घेतले जात नाहीत मान्य केले जात नाही मग रोगमुक्ती तर दूरच पण ब्लेम गेम मात्र नक्कीच सुरु होतो आणि आपणहि तो सध्या करत आहात
- परंतु असे करू नये, आपल्या कृती हया आपल्या इच्छा नियंत्रित करत नसून आपल्या इच्छा या शरीरातील (मेंदूतील) कार्यप्रणालीशी बांधील व अंकित असून त्यानुसार आपली कृती होते हे वास्तव चटकन मान्य करणे उमजून घेणे हा यावरील रामबाण
- आणि आपले वर्तन हे फक्त आपले ज्ञान, अनुभव व संस्काराचा भाग नसून मेंदूच्या संपूर्ण अंकित असलेल्या गुंतागुंतीच्या कार्यप्रणालीचा परिपाक आहे जो औषधांनी नियंत्रित होणे हे एक साधे सोपे व तर्कशुद्ध वास्तव आहे जे आपल्याच अहंकारात झाकोळले जाते व फार मोठ्या नुकसानास कारणीभूत ठरते
बाकी जर कोणी नाहीच मिळाले तर मला व्यनि करा असे नमूद करून जाहिरात टाळतो. मी या विषयातील तज्ञ अजिबात नाही.