द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
भारतीय नीति विश्लेषक संजय बारू याचं एक संस्मरण आहे. ते २००४ ते २००८ या काळात तत्कालीन पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांचे प्रसार माध्यमाचे सल्लागार आणि सहाय्यक होते.
पेंगुइन इंडिया द्वारा प्रकाशित 'एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'या पुस्तकात त्यांच्यावर आरोप केला होता कि तत्कालीन काबीनेट च काय तर PMO प्रधान मंत्री कार्यालय सुद्धा मनमोहन सिंगांच्या अधिकारात किंवा नियंत्रणात नव्हते. त्यांच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे जास्त अधिकार होते. आणि मनमोहनसिंग तिचे सहाय्यक होते. सत्तेची दोन केंद्रे असू शकत नाहीत , त्यामुळे लोकांमध्ये भ्रम तयार होतो. आणि हि गोष्ट श्री बारू यांनी मन्मोहानांच्या लक्षात आणून दिली होती.
द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हे पुस्तकं प्रसारित व्हायच्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य करून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले होते.
पुस्तकातील आरोपा अनुसार पंतप्रधान मुद्दाम त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते हे खरे आहे. हे 2 जी, सीडब्ल्यूजी आणि कोलगेटमुळे झाले का? निवडणुकांनुसार, भाजपने असेही वचन दिले की "आम्ही या देशात परस्पर पंतप्रधान देऊ इच्छित नाही."
द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर , या पुस्तकाचे श्री हंसल मेहता द्वारा बॉलिवूड च्या सिनेमात रुपांतर केले गेले आहे. या मध्ये श्री अनुपम खेर हे प्रमुख भूमिकेत ,पूर्व प्रधान मंत्री मनमोहनसिंग यांची भूमिका साकारणार आहेत. येत्या काही दिवसात हा सिनेमा प्रदर्शित होत असून याचा सर्वस्वी परिणाम खूप रोचक असणार आहे.
२०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ते आजतागायत, बारू यांच्या पुस्तकात खोटेपणा आहे असा गंभीर दावा, आरोप, कोर्ट खटला, इत्यादी कृती काँग्रेससकट कोणाहीकडून केली गेलेली नाही.हे ठळक शब्दांत लिहिलेले असतानाही... आता, बारूंवर खटला चालविण्याची हिंमत न केलेल्या काँग्रेसच्या अनेक खंद्या जाणकार संविधान व कायदा तज्ज्ञांपेक्षा, तुम्ही जास्त हुश्शार आहात, असा तुमचा दावा असल्यास, आम्ही हसण्यापेक्षा जास्त काय करू शकतो? =)) नेहमीच्या सवयीप्रमाणे संबंध नसलेल्या इतिहास-भविष्यकाळात भरकटत गेला आहात यावरूनच, "शस्त्रे टाकून चुकीच्या वाटेने पळून गेला आहात", हे सिद्ध झाले आहे... मिपाकर सुजाण आहेत, ते सगळे समजतात. स्वतःची अजून किती नाचक्की करून घेणार आहात ???!!! =)) =)) =)) अवांतर : विचार फारच अवास्तव भरकटत जाणे, प्रकृतीला ठीक नसते असे म्हणतात. ;) :)लिहिणार्याचे विचार आहेत , सत्य असेलच वगैरे नाही , असे कोपर्यात कुठेतरी छापले असेलच ना ?
मोगा खान हे तुमच्या प्रतिसादातपण कोपऱ्यात लिहीत चला कारण तसेही सत्य आणि तुमच्या प्रतिसादांचा फारसा संबंध नसतोच. केवळ काड्या टाकणे सोडले तर.चित्रपटात मनमोहनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोनिया-राहूलवर गोळी मारायचाही प्रयत्न आहे असे वाचले आहे.अग्गो माई, तसे असले तरच ते सत्याच्या जास्त जवळ असेल नाही का? मनमोहन यांना पुढे करून सोनिया-राहूल देशावर गोळ्या चालवत... आपले ते... देशाचे सरकार चालवत होते, हे तुझ्यासारख्या मुरलेल्या राजकारण्याला सांगायचे म्हणजे कृष्णाला अर्जुनाने गीता सांगितल्यासारखे होईल, नाही का?! =)) =)) =))