विचीत्र प्राणी
💬 प्रतिसाद
(65)
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/03/2008 - 12:41
नवीन
मास्तर मला पण भूमिती आवडते लहानपणापासून. सगळ्या सिध्दता अगदी अचूक यायच्या मला.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Mon, 11/03/2008 - 12:43
नवीन
(खुद के साथ बातां : पायथागोरसचे काटकोन त्रीकोणाचे प्रमेय सांग बरे रंगा!! :W :? )
चतुरंग
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 11/03/2008 - 13:35
नवीन
चतुरंगजी हे साधे प्रमेय आजकाल विसरले जाते आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/03/2008 - 12:01
नवीन
तो ठाकुर धूवत कसा असेल.......... हात ओ ;)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 11/03/2008 - 12:11
नवीन
ठ्यां..................................
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Mon, 11/03/2008 - 12:13
नवीन
वाचली नसेल तर वाचा आणि त्यातून विवाहेच्छुकांना काही मार्गदर्शन मिळणार असेल तर आनंदच आहे.
माझ्या लग्नाची चित्तरकथा!भाग १ते ५
- Log in or register to post comments
स
संताजी धनाजी
Mon, 11/03/2008 - 13:00
नवीन
फारच सुंदर :)
एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 11/03/2008 - 13:32
नवीन
देवा तुमची चित्तरकथा वाचली. भावली. मार्गदर्शन नाही ते हायवे दर्शन आहे. गऱजूनी परत परत नीट वाचावे असे.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 11/03/2008 - 14:02
नवीन
उशिरा वाचला. विचित्र प्राणी हे नाव वाचुन नवीन प्राण्याबद्दल माहिती असावी म्हणुन वाचायचा टाळला. वाचल्या नंतर कळाले हे आपल्याच बद्दल लिहीले आहे.
सर्व गोष्टी समान आहेत आपल्याबाबत....माझा हात मात्र मोडला नाही अजुन.लग्न जुळवताना खुप अडचणी येतात,काही वेळा दोन्ही बाजुला अपमानास्पद प्रसंग ही येतात.पण ही पध्दत मला मान्य आहे.कारण प्रेम करतेवेळी किंवा प्रेमात पडण्यासाठी समोरची व्यक्ती आपल्याला आवडावी लागते. त्यावेळी त्या व्यक्तीच्या दोषाकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते. तेच दोष पुढे पुढे वाढत जातात.
लग्न ठरवण्याच्या पध्दतीत देखिल खुप दोष आहेत परंतु मुलगी किंवा मुलगा बघताना आपण सामाजिक दर्जा,आर्थिक कुवत,दोन्ही बाजुच्या आवडीनिवडी ह्या बाबींची माहिती घेतल्यानंतरच बघण्याचा कार्यक्रम घेतो.बघण्याच्या कार्यक्रमातही दोष समजत नाहीत पण त्या बरोबर एकमेकांचे गुण ही समजत नाहीत. लग्नानंतर दोष व गुण एकदमच कळत जातात त्यामुळे तडजोड ही होत जाते. संसार टिकतो.परंतु प्रेमविवाहात दोष लग्नानंतर कळु लागतात व ते वाढतच जातात्.त्यामुळे तडजोड करायची ती किती हा प्रश्न उभा राहतो.
किती लोकांना स्वतःचीच संपूर्ण ओळख असते की आपल्या स्वतःच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपलं आपल्याला समजावं?
अदितीशी सहमत आहे.पण एक असेही वाटते की माणसाचे जसजसे वय बदलत जाते तशी त्याची विचारसरणीही बदलत जाते.त्यामुळे आपला जोडीदार काहीदिवसात, काहीवर्षात आपल्याला ओळखता येइल का नाही हे सांगता येत नाही.कारण प्रत्येक वेळी त्यांचे वेगवेगळे गुणदोष समोर येत असतात.
बाकी एक उत्तम विषय इथे सुरु केल्या बद्दल विचित्र प्राण्याला धन्यवाद.
वेताळ
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 11/03/2008 - 14:09
नवीन
आम्हाला बी हेच वाटते.
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/03/2008 - 14:13
नवीन
पण एक असेही वाटते की माणसाचे जसजसे वय बदलत जाते तशी त्याची विचारसरणीही बदलत जाते.त्यामुळे आपला जोडीदार काहीदिवसात, काहीवर्षात आपल्याला ओळखता येइल का नाही हे सांगता येत नाही.कारण प्रत्येक वेळी त्यांचे वेगवेगळे गुणदोष समोर येत असतात.
अर्थात! माणूस वयाप्रमाणे बदलला नाही तर, "किती गं मोठी झालीस तू!" हे वाक्य मला माहितही नसणारी माझी कोणीतरी आत्या मला कसं ऐकवणार? ;-)
पण पुन्हा तेच, एकमेकांना त्या-त्या वयात त्या-त्या काळाप्रमाणे समजून नाही घेतलं तर मग कसलं आलंय सहजीवन? (नाही, मी ७५ वर्षांची नाही, २७ वर्षांची आहे आणि मला सहजीवनाचा एक वर्षाचाही अनुभव नाही आहे.)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 11/03/2008 - 14:16
नवीन
डोके शाबुत असले तर काही महिने सुद्धा मार्गदर्शक बनतात. जे तुझ्याक्डे आहे.
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
Mon, 11/03/2008 - 14:26
नवीन
लगीन म्हंजी तिन पानी चा जूगार
त्यान गनीत, ज्यामेट्री, ईतीहास, भूगोल कायव वर्क व्हत नाय
जसे पत्ते येतील आनी जेवडे पैशे जवल आसतीन तेवड्यातच खेलाच
पत्ते चांगले नसतील त पैशे आसून ऊपेग नाय
पैशे नसतील त पत्ते भारी आसून उपेग नाय
दोन्हींचा बॅलन्स म्हंजे जींकायची खात्री नाय त हार नक्की
पत्ते कवा ओपन कराचे , कवा पॅक कराचा, कवा बंद मदी सूसाट खेलाचा ह्ये कल्ला क डाव तूमचाच
***खारपाडा क्रीप्टीक
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 11/03/2008 - 15:08
नवीन
खारपाडा क्रिप्टिक+१
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Mon, 11/03/2008 - 17:54
नवीन
लेख आणि चर्चा छान आहे.
लग्नापूर्वी दोघांनी दोन्-तीन वेळा एकमेकांशी बोलावे. आवडिनिवडी, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्याची स्वप्ने, आकांक्षा याबद्दल खुल्या मनाने बोलावे आणि समोरचा आपल्याला कसा प्रतिसाद देतो हे सुद्धा पहावे.
लग्न लागले आहे त्यामुळे आहे तो जोडिदार स्विकारायचा आणि संसाराचा गाडा ओढायचा ! असा स्वभाव आता अनेक मुला-मुलींचा नसतो. त्यामुळे एक्-दोन वेळा बोलून वरवरचा अंदाज घेणे चांगलेच असते असे मला वाटते.
तसेच परदेशात जाऊन राहणे-न राहणे-परत येणे-न येणे, देश-संस्कृती याबद्दलची मते यालासुद्धा अनेक जण प्राधान्य देतात हे मी बघितले आहे. त्या बाबतीतली मते सुद्धा पटायला लागतात.
आणि जे होणार आहे ते होतेच, कुणीच कुणाला नीट ओळखु शकत नाही वगैरे मते ठिकच आहेत. पण आपल्या कडून आपण अनुरुपता पहावी आणि जास्तीत जास्त अनुरुप व्यक्तीला होकार द्यावा. हल्ली मुले आणि मुली या बाबतीत बरेच सजग होत आहेत हे पाहिले आहे.
--लिखाळ.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2