एक व्यक्ति एक मत सर्व समस्यांचे मूळ?
नमस्कार,
मी ब्लॅक मिरर चा ३ रा सिझन बघत असताना हा विचार पुन्हा पुन्हा सतावत होता.
सोशल क्रेडिट प्रणाली चा कायदा ( २/३ बहुमत असले एखाद्या केंद्रीय सरकारला तरच शक्य होईल) भारता सारख्या सदैव विकसनशील देशाला होईल का?
ह्या व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचे सामाजिक योगदान किंवा शैक्षणिक पात्रता किंवा इतर काही बाबी बघूनच त्याला मतदानासाठी क्रेडिट देता येईल.
ज्याने जाती-पती वर धर्मावर आधारित आणि पैसे देऊन खरेदी करता येणारे मतदान बऱ्याच प्रमाणात कमी होईल, आणि झुंडशाहीला पण आळा बसेल.
उदा..
१. फातिमा (किंवा भंवरीदेवी) फक्त मॅटर्निटी होमी च्या ट्रिप्स आणि मतदान ह्या दोनच दिवशी घराबाहेर पडते...तिचे क्रेडिट ०.५.
तिने मतदान केले तर तिच्या उमेदवाराला फक्त ०.५ मताचा फायदा होईल.
२. डॉक्टर अमर्त्य सेन हे जागतिक पातळीचे आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रद्न्य आहेत, तेव्हा त्यांचे क्रेडिट ५.
३. मी एक साधा बीई एमी करून ९ ते ५ पाट्या टाकून नित्य नेमाने टॅक्स भरणारा कॉर्पोरेट कर्मचारी, माझे क्रेडिट १.५
४. हाफ मर्डर साठी आत जाऊन आलेल्या कोणा माळवदकर / आंदेकर चे आयुष्यभर साठी क्रेडिट ०
ह्या साठी एक सर्वसमावेशक नियमावली तयार करून आधार कार्डला जोडता येईल.
आणि मतदाराला आपले क्रेडिट सुधारावयाचा बरेच उपाय पण असतील. (अधिक शिक्षण घेणे, कर भरणे, खेळात, संगीतात, संशोधनात काही तरी करून दाखवणे)
What are the positives or negatives of this social credit system
(I am asking this very honestly and seriously, I am not an elitist or an anarchist in any shape or form.
Also, do excuse me for linguistic and grammatical errors.).
धन्यवाद,
- कुळकायद्यांत जमिनी जाणे,
- स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांनी पण काही अल्पसंख्य वर्गाना सरकारी जॉब मिळण्याची शक्यता नसणे,
- इतिहास बदलण्याचे प्रकार,
- पुतळे उखडून फेकणे,
- संशोधन केंद्रे नष्ट करणे...
हे सगळे माझ्या मते एलिमिनेशन चे प्रकार आहेत. आणि ते सर्रास चालू आहेत "लोकांचे लोकांनी लोकांसाठी" चालविलेल्या राज्यात... आणि हे ज्यांनी केले ते दुसऱ्या मोठ्या वर्गाच्या मतांसाठी गळ टाकून बसलेले असतात किंवा त्या दुसऱ्या वर्गाची झुंडशाही असते. तुम्हाला पदवीधरशाही, विद्वानशाही, साक्षरशाही नको, पण झुंडशाही चालतेय का?