कारण हे निमित्तमात्र
मग पुढे असं होतं की ..
अोळखीचा समोरचा आज अनोळखी वाटतो
हाच का तो हा प्रश्न मनास पडतो
शोध नव्याच्या नव्यानी चालू होतो
डोके टेकवायला 'ताजा' खांदा शोधतो
नवा खांदाही शेवटी जुना होतो
अपेक्षांच्या अोझ्याला जरासा बळी पडतो
सोबतीच्या लक्षावधी क्षणांना क्षणात विसरतो
एखादा फुटकळ क्षण बाहेर डोकावतो
अव्याहत भूक हा तर इथला जिवनमंत्र
नाती संपावयास कारण हे निमित्तमात्र..
💬 प्रतिसाद
(2)
प
प्राची अश्विनी
Sun, 03/31/2019 - 03:40
नवीन
ही सुद्धा आवडली.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/01/2019 - 13:04
नवीन
हा दृष्टीकोन देखिल आवडला.
प्रत्येक खांद्याला कधिना कधी त्याच्यावर पडणारा भार असह:य होतोच.
ती वेळ येण्या आधी आपण दुर झालो तर गोडवा टिकून रहातो.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments