अश्रू
पाणावलेल्या डोळ्यांमधुनी
काय निखळले अश्रू होऊनी
सुरुवात जाहली सांडायला
काय भावना होत्या त्या,
त्या, का नाही टिपल्या पापण्यांनी
रूळली अधरांवरती काही,
काही ओघळली गाली
काय मोल त्या आसवांना ,
ते तर फक्त खारट पाणी
असो विरह कि सुखाची मिठी
एकसारखे थेंब मग
ओळखावी कशी चव
वेगवेगळ्या भावनांची कोणी.....
- प्रणया
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रचेतस
Sun, 04/14/2019 - 03:08
नवीन
उत्तम
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 04/19/2019 - 13:25
नवीन
.
सुरेख !
आवडली कविता.
- Log in or register to post comments
प
प्रणया
Fri, 04/19/2019 - 14:58
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments