महाराष्ट्रातील चालू घडामोडी १
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?
महाराष्ट्रात मानवी मुल्लेमग इतर ठिकाणी काय अमानवी "मुल्ले" असतात काय?! =)) =)) =))फार
करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे. अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का? एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल. सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या ऐवजी तानाजी म्हणाले महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?१ नंबरमुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत--- मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड. व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ? --८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.-- मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ? -- तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत....हे इतके सगळे आहे ! म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते. मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!