Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिव सेनेचे काय होणार ?

ह
हस्तर
गुरुवार, 10/31/2019 - 14:14
🗣 121 प्रतिसाद
ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय २०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

प्रतिक्रिया द्या
59197 वाचन

💬 प्रतिसाद (121)
ह
हस्तर गुरुवार, 11/07/2019 - 08:44 नवीन
आनि हा तह होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
क
कंजूस गुरुवार, 11/07/2019 - 09:24 नवीन
"द्याट ब्रेक्स अवर अलायन्स" एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी दिल्ली वाऱ्या!!! दिल्लीतले नेते नाहीत, गल्लीतलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
त
तर्री Tue, 11/05/2019 - 10:48 नवीन
म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत. काही अंशी सहमत आहे. जनता हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. भा ज प ला threshold मते आताच आहेत मतदार संघानुसार फक्त ३% ते ५% विरोधकांची मते फिरण्याची आवश्यकता आहे. तेवढी मिळाली कि भा ज प १५० पर्यंत पोहोचेल. तेवढी रसद राम मंदिर पुरवू शकेल. ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील. क्ष - भाग एवढाच कि कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि सेना ह्यांनी युती करून भा ज प विरुद्ध महा गठबंधन केले तर काय होईल हा आहे. ह्या मध्ये शिवसेना संपेल हे निश्चित आहे. त्यांची १६% मतांची जी वोट बॅंक आहे ती कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी मुळे उध्वस्त होईल. कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी ला अनुक्रमे बाळसे आणि नवसंजीवनी मिळेल हे माझे मत. तरीही भा ज प हा मोठा पक्ष राहील ( १०० +).
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 11/05/2019 - 11:11 नवीन
लोक शिवसेनेला जेवढे वैतागले आहेत तेवढे नाही पण आता सध्या भाजप ला पण वैतागले आहेत दररोज च्या रडगाण्याने राष्ट्रवादी खुद्द फायदा उठवेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
स
सुबोध खरे Tue, 11/05/2019 - 13:39 नवीन
राष्ट्रवादी आपल्या परंपरागत मतदार संघातच जागा जिंकले आहेत त्यामुळे फेर निवडणुकीत त्यांना फारसा फायदा होणार नाही. शिवसेनेने असंगाशी संग केल्यामुळे त्यांचे अनेक कुंपणावरील मतदार नाराज होऊन शिवसेने ऐवजी भाजपला मतदान करतील. या उलट युती केल्यामुळे भाजप मधील अनेक चांगल्या उमेदवारांना जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे नाराज असलेल्या अशा अनेक चांगल्या उमेदवारांना फेरनिवडणुकीत तिकीट मिळेल आणि नाराज शिवसेनेच्या मतदारांची मते मिळू शकतील. शिवाय जर भाजप ने आयात उमेदवारांच्या ऐवजी मूळ भाजपसंघाशी एकनिष्ठ उमेदवार निवडले तर कुंपणावर बसलेले भाजपचे मतदार आपल्याकडे वाळवून भाजप सव्वाशे ते एकशे चाळीस तरी जागा मिळवू शकेल. आणि शिवसेना ५० च्या आत येईल. या वेळेस काहीही न करता काँग्रेसला मिळालेला फायदा कमी होऊन त्यांच्याही जागा कमी होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ग
गणेशा Wed, 11/06/2019 - 05:25 नवीन
तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने विचार करून आहे . पहिली गोष्ट , पुन्हा निवडणूका लगेच होणार नाहीत . झाल्या तर सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी ला च होईल हे bjp आणि सेने ला पण माहित आहे . युती न करता लढल्यास शिवसेना आणि bjp यांची मते वेगवेगळी होतील . वंचित बहुजन आघाडी ला जेव्हडी मते विधानसभा क्षेत्रात मिळाली , तेव्हड्या पेक्षा कमी फरकाने हारलेले 23 जण काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आहेत , आणि 5 ठिकाणी v.b.a दुसऱ्या नंबर वर आहे , तुम्हाला असे वाटत नाही का , या 23 ठिकाणी राष्ट्रवादी पण काही उपाय करतील ? निदान 10 ठिकाणी तरी बदल होईल , आणि यात दौंड सहित काही जागा निवडून येतील ? बाकी राम मुद्दा , 370 राष्ट्रीय सुरक्षा हे सगळे ठीक आहे पण महाराष्ट्राचा विकास या मुद्द्यावर bjp kaa निवडणुकीत उतरली नाही , हे कळत नाही . 2014 च्या 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा , ला त्यांनीच 2019 ला उत्तर दिले असते तर आता वेगळे चित्र दिसले असते , आणि ह्याचा फटकाच त्यांना बसला आहे , हे आपण का मान्य करत नाही काय माहीत . असो.. बाकी राज्यपाल यांनी याआधीच निपक्ष पणे सर्वात मोठा पक्ष जो bjp आहे , त्यांना सरकार स्थापने साठी पाचारण करावयास हवे होते हे माझे मत . पण ते जर राम मंदिर निकालाची वाट पाहत असतील तर त्याचा निकाल काय लागणार हे त्यांना आधीच माहिती आहे हे सुद्धा पुढे येते आणि राज्यपाल पण त्यांचेच ऐकून वेळ काढू पणा करत आहेत हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही . ह्या अश्या वागण्यानेच bjp चा पण वैताग लोक करत असतील असे मला वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 11/06/2019 - 05:43 नवीन
फेर निवडणूक झाल्या तर भाजप ३७०, राम मंदिर यावरच प्रचार करेल असे आपल्याला वाटते का? ते इतके दुधखुळे असते तर देशात इतक्या ठिकाणी निवडून आलेच नसते. फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहे. बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असती. राम मंदिर निकालाचा महाराष्ट्रात सत्तेशी काहीही संबंध नाही. माझ्यासारखे असंख्य भाजपचे सहानुभूतीदार लोक आहेत ज्यांना राम मंदिराशी काहीही घेणे देणे नाही. केवळ मुस्लिम/ अल्पसंख्याक यांचे लांगुलचालन करूनच सत्ता मिळवता येते या सिद्धांताला छेद देणारे एक स्मारक यापलीकडे आम्ही त्याकडे पाहत नाही. किंवा भाजप हा शुद्ध आणि पवित्र पक्ष आहे असेही आम्ही मानत नाही.

केवळ घराणेशाही वर

चाललेला पक्ष नाही आणि अगदी तळागाळातील माणूसही तेथे उच्च स्थानी पोहोचू शकतो म्हणून भाजपला मत देणाया गटातील माझ्यासारखे लोक आहेत. शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही. कोळशाच्या व्यापारात हात काळे होणारच परंतु त्या पक्षातील लोकांच्या आपल्या निष्ठा आजमितीला तरी देशाबाहेर विकल्या गेलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Wed, 11/06/2019 - 06:51 नवीन
तुमच्या वयक्तिक मतांबद्दल आक्षेप नाहीच . पण भाजप ने 2019 च्या निवडणुकीत मात्र विकासा पेक्षा राष्ट्रीय मुद्दयांवर भर दिला आहे , हे त्यांच्या भाषणातुन स्पष्ट दिसत होते , मग हा दुधखुळे पणा होता की आम्हाला पर्याय नाहीच haa अति आत्मविश्वास होता ? बाकी कोणी कोणत्या पक्षाला का मतदान करतात हे मुद्दे आणि कारणे वेगवेगळे असतात .आणि सगळ्यांनाच त्यांचे मत योग्य वाटते . बाकी
फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहे
नाकर्ते पणा कशाचा ? जे सत्तेत आहे त्यांनी त्यांचा कर्ते पणा दाखवावा . ज्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता पण सोडून भाजपा मध्ये जातो . उभी छेद वगैरे म्हणून , किती तरी नेते राष्ट्रवादी मधून भाजप घेतो त्यांच्याकडून कर्तेपणा ची अपेक्षा का ?.. तर त्यांनी ठोस कामावर का निवडणुक लढवू नये ? विकास झाला , स्वछ नीती हे जे त्यांचे समर्थक बोलतात , तेच त्यांनी दाखवून द्यायचे होते , नक्कीच त्यांना 120-130 सीट तरी मिळाली असती . भाजपा च्या नाकर्तेपणा मुळे आता विरोधात मतदान झाले असे हि मग तुमच्या विधानावरून वाटते .
बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असती
मग काय केले पाहिजे राज्यपालांनी ? वेळ जाई पर्यंत आपल्याकडे कोणी येतोय का हि वाट पाहायची ? आणि नाहीच aale कोणी तर राष्ट्रपती राजवट लागू करायची ? त्यांनी त्यांचे काम करायचे ase माझे मत , मोठ्या पक्षाला बोलावले पॅबीजे होते , सरकार स्थापन करण्याचा पाहिला हक्क भाजपा चा आहे आता , शिवसेना , आणि राष्ट्रवादी he नंतरचे . Bjp चे काय म्हणणे आहे मग ? शिवसेनेने 2014 प्रमाणे लाचारीने आमच्याकडे यावे आणि आपण सरकार स्थापन करावे, असे ? उलट त्यांनी सरकार स्थापन करायला जावे , आणि नाही झाले तर शिवसेने मुळे नाही झाले ase म्हणून विरोधी पक्षात बसू असे म्हणून शिवसेने वर टीकेची झोड उठवून द्यावी .. आणि नंतरच्या निवडणुकीत शिवसेना विश्वास दर्शक नाही म्हणून शिवसेne ला मतदान करणाऱ्या काही लोकांची मते हि आपल्या पारड्यात झुकवावी . पण कसे आहे त्यांना हि सरकारच बनवायचे आहे , म्हणून हा घोळ चालू आहे , दिसताना शिवसेना दिसत असली तरी भाजपा सुद्धा ह्या सर्व खेळाला कारणीभूत आहेच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 11/06/2019 - 07:52 नवीन
सत्तेच्या खेळात कोणीही धुतल्या तांदुळाचा नाही. भाजपच्या जागा पूर्ण बहुमताला कमी आहेत. संजय राऊत यांनी ५ वर्षे बेताल वक्तव्ये करून भाजपच्या एका मोठ्या गटाला दुखावलेले आहे (आणि त्याना श्री उद्धव ठाकरे यांची फूस होती अशी त्यांची खात्री होती) या गटाला असे वाटते आहे कि शिवसेनेला अजिबात भीक घालू नये. याउलट काही लोक असे आहेत ज्यांना असे वाटते आहे कि शिवसेना हा मित्र पक्ष आहे त्यांना जिथे "तोंड मारायचे आहे ते मारून येउ द्या". मग शांतपणे बसून चर्चा करून सरकार स्थापन करता येईल. शिवसेनेस माहिती आहे कि आपल्याला शेवटी भाजप शिवाय पर्याय नाही परंतु भाजपच्या मागे फरफटत जायची त्यांची तयारी नाही. गेल्या पाच वर्षेत केलेली वक्तव्ये आता उलटल्यामुळे त्यांना भाजपशी सामंजस्याने वागणे कठीण होऊन बसले आहे. दोन्ही पक्षांचा असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार आहे. राज्यपालांच्या दृष्टीने शिवसेना भाजप यांची युती निवडणुकीपूर्वींची आहे. त्यामुळे त्यांनी येऊन राज्य स्थापनेचा दावा करावा हे घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे. त्यांनी असे काही केले नाही तर ८ नोव्हेंबर नंतर त्यांना भाजपला बोलावणे घटनेच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. तोवर ते थंड बसले आहेत अर्थात त्यांचा राष्ट्र्पतींशी संपर्क असेलच आणि राष्ट्रपती हे तर स्वतः सर्वोच्च न्यायालयात वकील होते.त्यामुळे घटनेप्रमाणे जे काही आवश्यक आहे तेवढे ते करणारच. या सर्व प्रकरणात शिवसेनेचा धीर सुटू लागेल असा श्री फडणवीसांचा होरा आहे म्हणून तेही गप्प आहेत. नाहीच सरकार स्थापन झाले आणि राष्ट्रपती राजवट लागली तर शिवसेनेवर खापर फोडून ६ महिन्यांनी फेर निवडणूक घेता येईल असा त्यांचा हिशेब आहे. बाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिवसेनेबरोबर फार काळ जाता येणार नाही हेही स्वच्छपणे माहिती आहे. त्यामुळे उगाच ६-८ महिने सरकार चालवून मग फडणवीसांना ते अर्पण करणे किंवा त्यानंतर फेरनिवडणूक घेऊन आपल्या जागा कमी करण्यात त्यांना रस नाही. सोनिया गांधी यांनी तर शिवसेनेबरोबर जाण्यास स्वच्छ नकार दिला आहे.(निधर्मी म्हटले कि शिवसेनेसारख्या हिंदुत्व वादी पक्षा बरोबर जाऊन आपले इतर राज्यात नुकसान करून घेण्याची त्यांची तयारी नाही) शिवाय त्यांचा श्री शरद पवार यांच्यावर बिलकुल विश्वास नाही. तसा तो उद्धव ठाकरे याना पण अजिबात नाही. २०१४ मध्ये श्री शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेस तोंडघशी पडले होते हे श्री उद्धव ठाकरे विसरणे कदापि शक्य नाही). श्री शरद पवार सोयीचे असले कि निधर्मी असतात आणि तरी शिवसेनेसारख्या पक्षाशी युती चालते किंवा भाजपाला पाठिंबाही देता येतो. त्यांच्याकडे कोणतीही ठोस विचारसरणी नाहीच. केवळ सोनिया गांधी याना पंतप्रधानपदास विरोध करण्यासाठी स्थापन झालेला हा पक्ष आता त्याचे मूळ कार्यकारणचे राहिलेले नाही. ती केवळ निवडून येऊ शकेल अशा उमेदवारांची स्वार्थासाठी बांधलेली मोट आहे. ते एकदा शिवसेनेला गूळ लावतात मग म्हणतात जनादेश भाजपलाच आहे आणि आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे. मग परत म्हणतात दुसरा पर्याय असेल तर आम्ही त्याचा विचार करू. श्री शरद पवारांना दिल्लीत जाऊन श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे कारणच काय आहे? सगळे सत्तेचा सारीपाट खेळत आहेत. दोन पावले पुढे, एक पाऊल तिरके आणि एक पाऊल मागे असे चालू आहे या सर्व लफड्यात हे गुऱ्हाळ चालवून शिवसेनेची (आणि भाजपची) जितकी नाचक्की करता येईल तितकी काँगेस राष्ट्रवादी करण्याच्या प्रयत्नात आहे. बाकी जनतेला कोण विचारतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
प्रसाद_१९८२ Wed, 11/06/2019 - 08:36 नवीन
प्रतिसाद आवडला. -- सध्याचा तमाशा करुन सेना, भाजपा बरोबर स्वत:चे नुकसान देखील करत आहे हे माझ्या सारख्या सर्वसामन्य माणसाला कळते, तर ते शिवसेनेच्या नेतृत्व व नेत्यांना का कळू नये ? हाच प्रश्न पडलाय ! --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गणेशा Wed, 11/06/2019 - 08:37 नवीन
तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे . राष्ट्रवादी हा निवडून येणाऱ्या नेत्यांची मोट आहे , हे मात्र या निवडणुकीने पुसले आहे असे मला वाटते .भल्या भल्या नेत्यांना पाडले आहे त्यांनी , त्यात शरद पवार यांच्या मुळे काँग्रेस ला पण फायदाच झाला आहे यावेळेस. शिवसेनेची नाचक्की काँग्रेस राष्ट्रवादी करत नाही असे हि मला वाटते . शिवसेना आणि भाजपा यांनी त्यांचे बघून घेतले तर बाकी कोणी मध्ये येणारच नाही . उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे दोन्ही main नेते दिल्लीत भेटतात , तसे शिवसेनेचे आणि भाजपा चे का भेटत नाही , युती मग पटत नव्हते तरी दोघांनी स्वार्था साठी केली होती का ? हा संदेश पण जनतेत जातो आहेच .. 2014 ला शिवसेना मागे आली नसती तर भाजपा राष्ट्रवादी च्या पाठींब्यावर सत्तेत येणार होतीच . त्यामुळे हे काँबिनेशन टिकले किती असते आणि आता कसे 6 महिनेच टिकेल वगैरे जर तर च्या गोष्टी आहेत . भाजपा आणि शिवसेने ने एकत्र चर्चा करून प्रश्न सोडवावा आणि सत्तेत यावे .ज्यांना एकत्र बसून चर्चा करता येत नाही त्यांनी युती , राष्ट्रवादी , काँग्रेस यावर बोलूच नये .. आणि राष्ट्रवादी ने विरोधी पक्षात बसावे ase माझे मत . आणि हेच होण्याची चिन्हे आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 11/06/2019 - 15:13 नवीन
२०१४ मध्ये सिंचन पासून अनेक घोटाळे नुकतेच उघडकीस आले होते त्यामुळे राष्ट्रवादीला फेर निवडणूक फारच महागात पडली असती याशिवाय भाजपच्या १२२ जागा होत्या. त्यामुळे अधिक २२ आमदार "मिळवणे" फारच सोपे होते. यामुळे अधिक गडबड न करता राष्र्टवादीने भाजपाला पाठिंबा देऊन प्रश्न निकालात काढला होता. मुळात शिवसेना (६३), काँग्रेस (४२) आणि राष्ट्रवादी (४१) या तिन्ही पक्षात त्यांच्या जागा सर्वात कमी होत्या. तेंव्हा या विळ्याभोपळ्याच्या मोटेत त्यांच्या हातात काहीच पडले नसते. तुमच्या घोटाळ्याबद्दल आम्ही आस्ते कदम जाऊ हे भाजप कडून वचन घेऊन राष्ट्रवादीने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला असेही ऐकिवात आले होते. ख खो दे जा आता परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या जागा ५४ या शिवसेनेच्या जागां(५६) पेक्षा २ नेच कमी आहेत. शिवाय जनता घोटाळ्यांबद्दल विसरली आहे. श्री शरद पवारांनी आपले मार्केटिंग फार उत्तम करून घेतले आहे. पावसात भिजणे इ इ. शिवाय भाजपने बरेच "गणंग आयात करून" आपली प्रतिमा मालिन केली आहे आणि आता त्यांच्या जागा १२२ वरून १०६ पर्यंत खाली आल्या आहेत. म्हणून राष्ट्रवादीने "विळ्याभोपळ्याचि मोट" बांधून आपली मान घोटाळ्यांच्या चौकशीतुन काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या साठी श्री शरद पवारांनी दिल्ली दौरा सुद्धा केला श्री संजय राऊत यांच्याशी बऱ्याच बैठकी खलबते केली. परंतु काँग्रेस श्रेष्ठी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास अजिबात तयार नाहीत आणि त्यांची सेक्युलर प्रतिमा शिवसेनेबरोबर मलिन होते आहे. त्यामुळे काँग्रेसकडून थंडा प्रतिसाद मिळाल्यावर आज श्री शरद पवारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आहे असे सांगून शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली. शिवसेना सुद्धा जागा ६३ च्या ५६ झाल्या असताना भाजप बरोबर ५०-५० ची मागणी करताना भाजपचा पराभव झाला असल्यासारखे वागत होते. आजही भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी तो एकच पक्ष १०० ओलांडून पुढे आहे हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. बाकी equal (समान) आणि equitable (प्रमाणात) या दोन शब्दात शिवसेना गल्लत करीत आहेत असा भाजप श्रेष्ठींचा पवित्रा आहे. भाजपने १५२ जागा लढवल्या आणि शिवसेनेने १२४ असे असताना भाजपने ५०-५० आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदास मान्यता दिली असेल हे मान्य करणे कठीणच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा गुरुवार, 11/07/2019 - 05:24 नवीन
तुम्ही लिहिता ते विश्लेषण म्हणून चांगले वाटले तरी ते तसेच असेल असेच काही वाटत नाही . उदा. 2014 ला आपल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला झाकण्यासाठी राष्ट्रवादी ने पाठींबा दिला , मला वाटते 122 पासून 145 गाठायला अवघड नव्हते , म्हणून bjp च्याच लोकांनी शिवसेने ला नाममात्र पदे देता यावीत म्हणून खेळलेली ती चाल होती. आणि पार्टी विथ डिफरन्स ह्या इमेज ला येथेच पहिला सुरुंग लावला गेला . गाडीभरून पुरावे असणारे हेच , पुढे राष्ट्रवादी च्या नेत्याना जेल मध्ये टाकण्याच्या भाषा करणारे , पुढे गप्प झाले , अगदी मोदींनी पवार यांना राजकीय गुरु म्हणणे आणि बारामती मध्ये भेट घेणे हे सुद्धा घडले . मग आधी तावा तावा ने बोलणे आणि नंतर गळा भेट घेणे हे उघड दिसत होते . नंतर या निवडणुकीत पवारांनी मार्केटिंग केले , पावसात भिजले ect. याबद्दल . राष्ट्रवादी आणि काँग्रेस नावाला पण न ठेवण्याचा चंग बांधलेली bjp .आणि स्वतःच्या अतिआत्मविश्वासात रमून , विकास सोडून भरकटलेल्या मुळे त्यांच्या विरोधात मते गेली , हे bjp आणि समर्थक कधी मान्य करणार ? पवार 2014 ला पण होते . त्यामुळे मार्केटिंग , वगैरे मला काही वाटत नाही . पवारांची तळागाळात पोहचण्याची क्षमता विरोधक हि मान्य करतील , त्यामुळे स्वछ प्रतिमा , पार्टी विथ डिफरन्स , acche din , विकास हे 2014 चे कुठलेच बिरुद भाजपा ला मिरवता आले नाही . तरी वंचित मुळे 10-20 सीट्स चा tari फायदा युती ला झाला हे ते पण नाकारणार नाही .. त्यामुळे 100 च्या वर जरी उमेदवार निवडून आले तरी bjp ला लोकांची पुर्ण सहानभूती अजूनही मिळवता आली नाही , आणि हे हेरूनच शिवसेने ने आग्रही भूमिका मांडली. शरद पवार यांना काँग्रेस चा प्रतिसाद मिळाला नाही .म्हणून ते विरोधात बसणार म्हणाले असे तुम्ही म्हणत आहात , निवडणूक निकाला पासून ते हेच म्हणत आले आहेत . Tv वरती तुम्ही पाहिले असेल , बाकी त्या मागचे काही तेच जाणो .. राहता राहिला काँग्रेस चा प्रश्न , मला वयक्तिक पहिल्या पासून वाटते ते सत्तेत पाठींबा देणार नाही , कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यांचेच प्राबल्य सत्तेत राहील , मग विरोधात बसने काय वाईट हे वाटणे चूक नाहीच , त्यामुळे bjp प्लस सेना सत्तेत येईल हेच माझे पहिल्या पासून म्हणणे आहे . शिवसेना 2014 चा आणि त्यानंतर च्या फेरफाटीचा बदला घेत आहे हे मात्र नक्की . बघू येणारा आठवडा सगळे उत्तरे घेऊन येईलच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय पाटिल गुरुवार, 11/07/2019 - 08:12 नवीन
भाजपच्या जागा कमी होण्याचे कारण युति हेच आहे. २०१४ प्रमाणे भाजपाने युती न करता निवडणूक लढवली असती तर जागा वाढल्या असत्या असे मला वाटते. बर्‍याच ठिकाणी भाजपाचा उमेदवार नाही म्हणून लोकांनी शिवसेनेला मते दिली आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
भ
भंकस बाबा Wed, 11/06/2019 - 14:29 नवीन
विश्लेषण उत्तम केले आहे. किंतु आता सगळ्यांनी घाटाचे पाणी पिले आहे. वंचित, ओवैसी, पवार आणि कोंग्रेस काही जागावर धोरणात्मक युति करू शकतात. असे झाले तर भाजपाला भारी पडेल. तेव्हा तेलही गेले तुपहि गेले व धुपाटने राहिले ऐसी अवस्था होईल. तरीही माझा आतला आवाज सांगतो की शिवसेना भाजपाबरोबर जाईल. आणि पदरात जास्त मंत्रीपदे पाडुन घेईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धर्मराजमुटके Wed, 11/06/2019 - 07:15 नवीन
बरोबर आहे. मी ह्याच वयोगटात आहे आणि राममंदिर होईपर्यंत तरी मला भाजपाला मतदान करावे लागेल (आणि युती असली तर नाईलाजाने युतीला). कारण दुसरा कोणताही पक्ष ह्या मुद्द्याच्या बाजूने लढू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
ग
गामा पैलवान Tue, 11/05/2019 - 14:04 नवीन
लोकहो, मोदी, शहा व फडणविसांच्या मनात नक्की काय आहे? तिकीट वाटप नेमकं कोणत्या आधारावर झालं? भाजपच्या घसरणीला तिथपासनं सुरुवात झालीये. एकीकडे बावनकुळेंसारखे कार्यप्रवीण निष्ठावान डावलायचे आणि दुसरीकडनं आयारामांना आयात करायचं. त्याच वेळेस शिवसेनेलाही शिरजोर होऊ द्यायचं नाही. त्याकरता तिकीट वाटपात जमेल तितकी संदिग्धता ठेवायची. म्हणून युती लांबली. याचा अर्थ काय लावायचा? मोदी शहांनी फडणविसांना खच्ची करायला मुद्दाम खेळी केली आहे का? की फडणवीसही या खेळात सामील आहेत? आज फडणवीस एकाकी पडलेले वाटतात का? बीबीसी मराठीवर हा लेख वाचला : https://www.bbc.com/marathi/india-50290626 संजय राऊत फाटक्या तोंडचे आहेत हे सगळ्यांना माहितीये. पण भाजपच्या चुकांची चर्चा होत नाही. ती व्हावी म्हणून हा संदेश. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 11/05/2019 - 15:05 नवीन
अहो मग शिल्लक कोण ? चिक्कीताई खडसे सगळ्यांचा गेम झालाय फडण २० गेले तर राहिले कोण ? विखे कि गडकरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
शुभांगी दिक्षीत Tue, 11/05/2019 - 14:43 नवीन
..
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 11/05/2019 - 18:05 नवीन
शिव्या सेना बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन विभाग झाले आहेत असे वाटते. एकाचे प्रमुख, मुखदुर्बळ उद्धव उपाख्य डॉ. जेकिल आणि दुसऱ्या शिव्या सेनाविभागाचे प्रमुख संजय उपाख्य मिस्टर हाईड .
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 11/05/2019 - 20:28 नवीन
good cop bad cop routine
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रविकिरण फडके Wed, 11/06/2019 - 17:25 नवीन
शिवसेनेत फूट पडून २०-२५ आमदार भाजपाच्या बाजूला येतील, हीही शक्यता आहेच की. फडणवीस शांत आहेत असे दिसते आहे पण ते काही शांत बसलेले नसणार.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर गुरुवार, 11/07/2019 - 13:38 नवीन
https://www.facebook.com/story.php?story_fbid=2496066447174916&id=100003147543274
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 11/07/2019 - 15:14 नवीन
किती तरी वर्ष महारष्ट्र नी एकपेक्षा अनेक पक्षांची सरकारे बघितली पण एवढं नालायक पण कधीच बघितला नाही. फक्त दुसरे च सत्र चालू आहे एकसंघ राजवटीचे . सेना आणि bjp ह्या राजकीय पक्षांचे. किती ही गैर जिम्मेदार वागणूक. ह्यांना राज्याच्या हिता पेक्षा स्वतःच्या इगो ची जास्त काळजी आहे. हिंदू वादी स्वतःला label चिकटवून घेतलं आहे आणि राज्यातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या हाताशी खेळायला ह्या दोन नालायक राजकीय पक्षांना काहीच वाटत नाही. Bjp सर्व दोष सेनेला देवू शकत नाही bjp सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. राष्ट्रपती राजवट लागू होवून नंतर निवडणूक झाली तर bjp आणि सेना ह्या दोन्ही पक्षांचे नामोनिशाण ह्या राज्य मधून मिट वले जाईल.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर गुरुवार, 11/07/2019 - 15:17 नवीन
५ वर्षा आधी तर आम्ही वडे दिले आम्ही चिकन सूप दिले से चालले होते
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 11/08/2019 - 07:36 नवीन
http://bollywoodscan.com/maharashtra-politics-current-situation.html
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 11/10/2019 - 16:44 नवीन
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा करण्यात आली आहे. आता शिवमहाआघाडी होणार काय ?
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 11/11/2019 - 02:22 नवीन
पवारांनी पाठिंब्या साठी खालील अटी घातल्या आहेत. १. हा पोरखेळ नाही.स्वतः मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागेल. उंटावरुन शेळ्या हाकता येणार नाहीत. २. तुमच्यावर दोन रिमोट कन्ट्रोल असतील. एक माझ्या कडे आणि दुसरा सोनियाकडे. ३. तुमच्या कुत्र्याचे मुस्काट दाबावे लागेल. ४. मागच्य वेळेस भाजपाच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना केंद्रातील तुमच्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगितले नव्हते. तसे आता चालणार नाही. आधी अरविंद सावंतांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चौकस२१२ Mon, 11/11/2019 - 03:35 नवीन
टीव्ही वरील सोपं ऑपेरा ची दुकान जी चालतात / कथा रखडत जातात त्या मागचे मुख्य कारण असते कि आधीच करार करताना/ किंवा कुटुंबामध्ये गोष्टी ठरवताना स्पष्टपणा नसणे .. गोष्टी संदिग्ध ठेव्याच्या ,, मग नंतर हे घोळ.. युती मध्ये कोणाचे किती आले तर सत्ता कशी वाटपायची यावर काही नक्की ठरले नवहते काय? कि दोन्ही पक्षांना हे आधीच ठरवणे सोयीचे नवहते जे काय असेल हा तमाशा व्हायला नको होता - शिवसेनेला आपण जिकली, कशी भाजपाची जिरवली असे आत्ता वाटत असले पण त्यांचा "चंद्रशेखर " होऊ शकतो आणि त्यांची सत्तेसाठी लाचारी उघडी पडू शकते हे कळत नाही का ? आधीच बाळासाहेबांनंतर मराठी माणसाच्या मनातून शिवसेना उतरली त्यात हे राडे - मग भाजपने करायला तरी काय पाहिजे होत? कधी नव्हे ते १००+ जागा मिळाल्या ते सुद्धा महाराष्ट्रात ते करताना शिवसेनेचे लोढणे होईल असे वाटले नसले दुर्दवी . आता निवडणूक झालाय तर सुक्या बरोबर ओलं जळत तशी परस्थिती भाजपची होणार - राष्ट्रवादी ला फायदाच बसून गम्मत बघा, अजूनही जनतेने त्यांना स्वीकरलेलं नाहीये पण या उन्मादात लोक ते विसरणार . - काँग्रेस काय चालू आहे .. दुकान एकूणच थंड आहे नाहीतरी
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 04:43 नवीन
जर सरकार स्थापन झाले नाही तर भाजपमधे मेगाभरती झालेल्यांचे काय होणार हा खरा प्रश्न बनेल
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 11/11/2019 - 05:52 नवीन
हो बरोबर भाजपला भोवलेली अजून एक चूक.. सातारकर भाजपात? लोक हसत राहिली ,,त्यांनी खरा तर "स्वयंभू" स्वतत्र राहाव कोणत्या पक्षात कसे काय जमणार ! वंशजांचं!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/11/2019 - 06:14 नवीन
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मर्सिडीझ साठी पठाणी व्याजावर कॉ+ रा कॉ महा आघाडी कडून कर्ज घेतले आहे. त्याचे पठाणी व्याज त्यांना दर महिन्याला हप्त्याहप्त्याने द्यावे लागणार आहे. त्याचे पहिले डाऊन पेमेंट अरविंद सावंत या अवजड उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याने भरावे लागले आहे. (महाआघाडीने मुळातच शिवसेनेस रालोआ( NDA) मधून बाहेर पडा असे निर्वाणीचे पत्र दिलेले आहे.) यानंतर आम्ही म्हणून तिथेच गाडी चालवायची, आम्हाला नको त्या रस्त्यावर ती न्यायची नाही, अशा अनेक अटी घालून ते शिवसेनेस जेरीस आणून शेवटी उद्धव ठाकरे यांचे एच डी कुमारस्वामी करणार यात शंका नाही. श्री मोदी आणि शहा हे बोलत नाहीत परंतु कधीही "गोष्टी विसरत नाहीत". तेंव्हा फेरनिवडणूक होतील तेंव्हा शिवसेनेस परत आपल्या बरोबर घेतील याची शक्यता फारच कमी आहे. त्यातून शिवसेनेने हिंदुत्ववादाची गाय सोडून निधर्मांधांची बकरी पिळायला घेतली आहे. तेंव्हा उद्या लग्नात आम्हाला गोमांसाचा नैवेद्य हवा म्हणून ते अडून बसले तर शिवसेनेची फार मोठी अडचण होणार आहे. आज केवळ भाजपला विरोध म्हणून काँग्रेसने त्यांना टेकू दिला तरी उद्या तो नक्कीच काढून घेणार आहेत कारण मतभेद "मूलभूत विचारात" आहेत. ( येथे कोण बरोबर कोण चूक असा मुद्दा नाही प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असेल). बाकी शरद पवार यांच्या इतका धूर्त आणि पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात नाही. सर्वात प्रथम ते शिवसेनेकडून किमान समान कार्यक्रम लिहून मागतील. त्यानंतर गृह ( आपले खटले प्रलंबित करण्यासाठी) किंवा महसूल( पैशावाचून सगळंच अडतं) सारखी महत्त्वाची खाती मागतील. मुळात जर राज्यपालांनी त्यांच्याकडे सरकारला साथ देणाऱ्या पक्षाच्या आमदारांची यादी लेखी स्वरूपात मागितली तर या कटकटी मर्सिडीझ मध्ये बसायच्या अगोदरच सुरु होतील. त्या तून काँग्रेसची( राष्ट्रवादीची संस्कृती वेगळी नाही) संस्कृती हि च "खा आणि खाऊ द्या" अशी असल्यामुळे काँग्रेसचे आमदार आपली अर्थपूर्ण कामे करण्यासाठी सेनेच्या मंत्रांकडे अशक्य मागण्या करतील आणि त्या पूर्ण करणे कठीण आणि न करणेहि कठीण. उदा. एखाद्या रस्त्याचे कंत्राट आपल्या माणसाला देण्याचे ठरवले असेल आणि एखादा आमदार ते कंत्राट माझ्या माणसालाच मिळायला हवे म्हणून अडून बसला तर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती होईल. आतापर्यंत अशी कामे झाली नाही तर भाजपच्या नावाने सामना मध्ये गरळ ओकून गप्प बसता येत होते. आता "सरकारही आपलेच आणि वृत्तपत्रही आपलेच." श्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवल्याने (आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद आणि ते सुद्धा पहिली अडीच वर्षेच मिळाले पाहिजे अशी मागणी) त्यासाठी द्यायला लागणारी किंमत त्यांना आयुष्यभर छळत राहील अशीच परिस्थिती आहे. मी बाळासाहेबांना वचन दिले आहे कि एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल हे वारंवार म्हणत होते. तो आत्ताच आणि आजच झाला पाहिजे का?मुळात आपले १२४ पैकी केवळ ५६ आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री आमचाच आणि तो आत्ताच असा हट्ट धरणे किती समंजसपणाचे आहे. आणि हि पहिलीच वेळ आहे का? पूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हता का? शिवसेना पाच वर्षातच संपणार होती का? आता महाआघाडी मुंबई महापालिकेत सुद्धा भाजपला सोडचिट्ठी द्या म्हणून हटून बसणार तिथे २२७ पैकी शिवसेनेच्या ८४ आणि भाजपच्या ८२ जागा आहेत. तेथे आता काँग्रेसच्या ३१ आणि राकॉच्या ९ नगरसेवकांच्या "आधारावर" शिवसेनेस काम करावे लागेल आणि हे लोक सुद्धा आता आपला वाटा ओरबाडून मागतीलच. उद्या एखाद्या विधेयकाला भाजप ने विरोध केला तर ते पास करण्यासाठी हे ४० नगरसेवक शिवसेनेस त्यांच्याच न्यायाप्रमाणे ५०-५० "द्या" म्हणून सांगतीलच. आणि हा खेळ जोवर शिवसेना सरकार चालवेल तोवर ते खेळणार कारण "आहेत त्या दिवसात मिळेल तितके पोट भरून घ्या" हीच मनोवृत्ती असणार आहे. एकंदर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशी स्थिती करून ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/11/2019 - 07:56 नवीन
एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल फक्त एक दिवस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकस२१२ Mon, 11/11/2019 - 11:41 नवीन
डॉक्टर तुमची हि प्रतिक्रया मुख माध्यमाकडे पण पाठवा समर्पक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Mon, 11/11/2019 - 13:35 नवीन
खरे डॉक्टर, तुमच्या या संदेशाशी सहमत आहे. शिवसेनेने काँग्रेस व/वा पवारांचा पाठींबा आजिबात घेऊ नये या मताचा मी आहे. त्यापेक्षा सेनेने कुणालाही बाहेरून पाठिंबा द्यावा आणि दोनेक वर्षांत पक्ष मजबूत करून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मात्र एक गोष्ट इथे प्रामुख्याने उठून दिसते, ती म्हणजे शिवसेना वगळता बाकी कोणीच मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट धारण करायला तयार नाही. त्यामुळे बाहेरून पाठिंबा द्यायचा तर तो कोणाला हा यक्षप्रश्न आहेच. म्हणून बहुधा शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत आक्रमक दिसते आहे. काहीही असलं तरी पुढील दोन वर्षं सेनेस पक्ष मजबूत करायला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गड्डा झब्बू Mon, 11/11/2019 - 06:17 नवीन
ABP माझा वरील हे विश्लेषण बरोबर वाटतंय. ...असा असेल भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/11/2019 - 06:17 नवीन
लहानपणी शाळेतल्या वर्गातल्या मुलास म्हटले की तुझी पेन्शल दे तर तो म्हणायचा त्याबदल्यात तुझे वासाचे खोडरबर दे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/11/2019 - 06:35 नवीन
बहुतेक बारामतीचे काका , कॉम्ग्रेस सोबत संसार थाटतील सेना त्याना बाहेरून पाठिंबा देईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/11/2019 - 07:06 नवीन
असे होणार नाही. बारामतीचे काका इतके दुधखुळे नाहीत. कारण चुकून माकून हे सरकार उभे राहिले तर पहिल्या काही दिवसातच कोसळेल उंट होऊन गाडी ओढण्यापेक्षा उंटाच्या गाडीत बसून उंट हाकणे जास्त सोयीचे, आरामाचे असते एवढा अनुभव तर राजकारणात त्यांना आहेच. मग (शिवसेनेस) त्यापेक्षा भाजपच्या सरकारात उपमुख्यमंत्रीपद (आणि इतर मंत्रीपदे) काय वाईट होते? "तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला" असे भांडण काय कामाचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गड्डा झब्बू Mon, 11/11/2019 - 07:07 नवीन
असे होण्याची शक्यता कमी आहे. मग ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदा साठी एवढी अडेलतट्टू भूमिका घेतली तिचे काय? चर्चेद्वारे महायुतीत १६ मंत्रिपदे अशीही मिळाली असती बाहेरून पाठींबा दिल्यावर तीपण मिळणार नाहीत. मंत्रिपद मिळवण्याची महत्वाकांक्षा असलेल्या व निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांत असंतोष पसरेल व फाटाफूट होण्याची शक्यताही वाढेल. एकवेळ भिन्न विचारसरणीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर कॉंग्रेसच्या पाठींब्यावर बेभरोशी-अल्पजीवी सरकार स्थापन करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतलेला शिवसेनेला परवडेल पण राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या संयुक्त सरकारला बाहेरून पाठींबा देणे त्यांना कदापि परवडणार नाही. मी मतदानाचा पहिल्यांदा अधिकार बजावल्या पासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर मतदार होतो. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची निवड बाळासाहेबांनी केली तेव्हापासून कट्टरपणा नाहीसा होऊन केवळ शिवसेनेचा सहानुभूतीदार मतदार राहिलो. पूर्वी संघटनेच्या जोरावर शाखा शाखांमधून चालणारी शिवसेना आता सामना मधून वाचाळवीर चालवत असलेले बघून तर आजपर्यंत सेनेशिवाय कुठल्याही पक्षाला मत न दिलेल्या माझ्यासारख्या कित्येक बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनात तिच्याविषयी घृणा उत्पन्न झाली नसेल तरच नवल. वानखेडे स्टेडीयमची खेळपट्टी उखडून झाल्यावर पुढे बरीच वर्षे काहीतरी उखडण्यासाठी हात शिवशिवत असलेल्या काही नतद्रष्टांनी आता संघटनेचा पायाच उखडून टाकला आहे. उद्धव ठाकरेंना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे एवढे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुबोध खरे Mon, 11/11/2019 - 07:37 नवीन
अहो असे वादग्रस्त विधान सार्वजनिक न्यासावर करायचे नसते. बाळासाहेबांची पुण्याई, आई भवानीचा आशीर्वाद, मराठी बाणा आणि स्वाभिमान कुठे गेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू
ग
गड्डा झब्बू Mon, 11/11/2019 - 08:52 नवीन
आमच्या नेते मंडळींनी बेताल विधाने करण्यास मागेपुढे पाहिले नाही मग आम्ही मतदारांनी आमच्या भावना व्यक्त करण्यात का मागे हटावे. >>>बाळासाहेबांची पुण्याई, आई भवानीचा आशीर्वाद, मराठी बाणा आणि स्वाभिमान कुठे गेला? >>> हे सर्व काही बाळासाहेबांबरोबरच पंचतत्वात विलीन झाले असे म्हणायची पाळी आणली आहे आमच्यावर त्यांच्या वारसदारांनी. कुठे आमचे नित्यस्मरणीय बाळासाहेब आणि कुठे हा नित्यतिरस्करणीय संजय राउत. यापुढे भाजप, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मिम, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी गेलाबाजार नोटा समोरचे बटण दाबीन पण शिवसेना आणि मनसेला कधीही मत देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/11/2019 - 08:50 नवीन
निवडणूकी नंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपा ने प्रचाराच्या वेळी अनेकदा जाहिर पणे सांगितले होते. अगदी मोदी आणि शहांनी सुध्दा जाहीर सभेत बोलताना फडणवीसच मुख्यमंत्री होतील असेच म्हणाले होते. "मी परत येईन" अशी भाजपाची जाहिरातही बर्‍याच वेळा पाहिली होती. ज्यावेळी त्यांच्या गळ्यात गळे घालून निवडणुक लढवली तेव्हाच का बरे अक्षेप घेतला नाही? मग जनतेची फसवणूक कोणी केली? सत्याची बाजू कोणाची आहे? भाजपाने ५०:५० चे आश्वासान दिले तरी केव्हा होते? २४ ऑक्टोबर च्या आधी की नंतर? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/11/2019 - 10:25 नवीन
वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले.. त्यातल्या बर्याचस्या रिप्लाय मध्ये , भाजपा बरोबर आणि शिवसेना, कॉन्ग्रेस , पवार सगळे चूकच हेच जाणवले.. असो. थोड्या वेगळ्या कोणातुन लिहितो. मुळात गेल्या ५ वर्षापुर्वी भाजपा आणि शिवसेनेची भांडणे चव्हाट्यावर आली होतीच. त्यात खुद्द सेनाप्रमुखांनी युतीत आम्ही २५ वर्षे सडलो असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मुळात युती करण्याअगोदर भाजपा आणि शिवसेना यांना हे मुद्दे आठवलेच पाहिजे होते.. मग चुक शिवसेनेची असली तर भाजपाची पण तितकीच होती. बहुमता मध्ये जर युती आली तर आपसात बोलुन थोडे नमते घेवुन थोडे अधिक-उने चे राजकारण त्यांना जमले पाहिजे होते. भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर निवडनुक लढवता आली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक कितीही ही भाजपाच्या बाजुने बोलत असले तरी विकासाच्या बाजुने काहीच जास्त बोलायला नसल्याने एकटे लढल्यास आपला पराभव होउ शकतो, असे भाजपा ला कदाचीत आधीच वाटले असेल असे मला वाटते. त्यामुळेच त्यांनी युती केली असेल. त्यामुळे युती न करता भाजपा १४५+ राहिली असती हे मला पटत नाही, उलट आता आलेले काही सीट्स जे ४-५ हजाराच्या आतिल फरकाने जे आलेत ते सुद्धा पडले असते. त्यामुळे पराभव होईल असे आधी वाटत असेल तर निदान सत्ता स्थापन होतच नसेल तर २.५ वर्षे मुख्यमंत्री पण इतर खाती आपल्या कडे ठेवुन त्यांनी जनतेचा आदर ठेवला असा संदेश द्यायला हवा होता. आणि जर बहुमतात येवुन सत्ता स्थापण करायचीच नसेल तर मग वेगळेच लढायचे होते ना ? म्हण्जे शिवसेना आपल्याला फरफटत पाठिंबा देइनच ही भावनाच कशाला ठेवली पाहिजे होती.. म्हणजे सोबत फक्त स्वताच्या पदाच्या लोभासाठीच असा ही संदेश समाजात जातोच. त्यामुळे शिवसे शिवसेने मात्र जी भुमिका शेवट पर्यंत घेतली, ती माझ्यासाठी आश्चर्यकारक होती, कारण माझय म्हणण्याने, भाजप + शिवसेना हेच सत्तेत बसतील असे वाटत होते. मुळात त्यांनी येव्हड्या टोकाची भुमिका घेण्यात कदाचीत २०१४ पासुनची त्यांची भाजपा बरोबर चाललेली फरफट असेल असे आता वाटत आहे. त्यामुळे हे कारण पुढे करुन आम्हाला तुम्हीच नको असेच ह्यांच्या मनात मागे असेल, मुख्यमंत्री पद हे कारण ही असु शकते.. आणि ही शक्यता नाकारता येत नाही.. शरद पवार हे तळागाळात पोहचलेले नेत्रुत्व आहे, त्यांचा उभा पक्ष फोडुन , त्यांचे राजकारण संपले अशी वल्गना भाजपा करत राहिली.. कोणी कितीही धुर्त, पाताळयंत्री म्हणाले तरी आज या देशात त्यांच्या इतका राजकारणी माणुस शोधुन सापडणार नाही... राष्ट्रावादी संपली, अतिआत्मविश्वास, अहम हे सारे त्यांनी एका वारामध्ये जमिन दोस्त केले.. आणि वयक्तीक पणे मला तरी ते योग्यच वाटते आहे. गोव्यात, मेहबुबा मुफ्ती बरोबर भाजपाने काय केले हे आपण पाहिलेच आहे, त्यामुळे ते तेंव्हा पाताळयंत्री, साम दाम दंड भेद वापरणारे वाटत होतेच,, त्यामुळॅ आपण काही केले तरी चालतय, मात्र इतर धुर्त . पाताळयंत्री हे बोलणे मला योग्य वाटत नाही. त्या पेक्शा , सगळे एकाच माळेचे मणी असे मला वाटते.. ( थोडेशे वयक्तीक : जरी यावेळेस मी राष्ट्रावादी ला वोट नाही करु शकलो, तरी मला नक्कीच शरद पवार यांचा एक राजकारणी म्हणुन आदर वाटतो, असेच माझे मत बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दल पण होतेच. हे तिनही माझे सर्वात आवडीचे नेते आहेत. आणि सद्य परिस्थीत अहंकाराला जमिनीवर आणण्यासाठी शरद पवारांची गरज होतीच) मुळात आपल्या मित्रपक्षांबरोबर व्यवस्थीत राहुन नंतर येणार्‍या काळात सत्ता स्थापुन पवारांना आणि कॉन्ग्रेस ला वर डोके न काढुन देण्याची ही संधी भाजपा आणि शिवसेने ने गमावली आहे. आणि त्यामुळे आपल्याला विकासा वर बोलता न येणे, राष्ट्रावादी ला नावे ठेवुन त्यांचेच नेते पळवणे , आणि आपण हात वर केला तरी निवडुन येइल अशी भावना ठेवणे यामुळे मतदारांनी ही वेळ भाजपा वर आणली आहे असे माझे स्पष्ट मत आहे, भले शिवसेना हे त्याचे कारण झाले असले तरी त्यांना पण ही परिस्थीती माहित आहे..
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 11/11/2019 - 13:35 नवीन
टक्केवारीच्या आधारावर बोलायचे झाले तर भाजपा व शिवसेना वेगवेगळी लढली असती तर त्या दोघांची मते वाढली असती व मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची मते कमी झाली असती अस दिसतंय. तसेच पुढच्या वेळेस भाजपा व शिवसेना वेगवेगळी लढली तर दोन्ही पक्षात बंडखोरी अजिबात होणार नाही. पाय खेचण्याचा प्रश्नच शिल्लक राहणार नाही. हे दोन्ही यावेळचे प्रश्न पुढच्या निवडणूकीत दोघांचेही सुटणार आहेत. :) मी मायबोलीवर पुण्याच्या स्थितीबद्दल बोलताना जे लिहिल आहे ते खाली डकवतोय. ते उदाहरण म्हणून पहायला हरकत नाही. असाच अभ्यास खरतर इतर ठिकाणांचा केला पाहिजे. पण अजून निवडणूक आयोगाने सांख्यकीय डाटा उपलब्ध केलेला नसल्याने महत्वाची बाब म्हणजे लढवलेल्या जागेनुसार मिळालेली मतांची टक्केवारी काढता येत नाही. उदा. २०१४ ला लढवलेल्या जागांनुसार भाजपाला 31.15% मते मिळाली होती तर सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता ती 27.8% होती. यावेळेस महाराष्ट्राचा विचार करता ती २५.७% आहे पण लढवलेल्या जागांनुसार अजून टक्केवारी कळलेली नाही. असो. ---------------------------------------------------- शिवसेनेची भरपूर मते (अंदाजे ८०% तरी) मनसे कडे वळली आहेत. २०१४ ला १००९४१ (५१.१५%) मते होती मेधाताईंना. ती थोडी १०५२४६ (५२.५%) वाढली आहेत यावेळेस. मात्र म॑नसेच्या शिंदेसाहेबांची मागील निवडणूकीतील २१३९२ वरून थेट ७९७५१ वर गेली आहेत. पुढच्या निवडणूकीत भाजप व शिवसेना वेगळे लढले की मनसे कडे गेलेली मते परत शिवसेनेकडे येतील. मग मनसे परत ७९७५१ वरून २१३९२ वर. त्याबरोबर पाटलांचा लीड परत मेधाताईं एवढा म्हणजे ६५००० होईल. २०१४ साली शिवसेनेला ३६२७९ मते होती. त्यातली फारच थोडी पाटलांकडे आली आहेत. त्यावेळेस इतर दोन भिडूंनी मिळवलेली मते खालीलप्रमाणे काँग्रेस ६७१३ राका २८१७९ ट्क्केवारीच्या आधारावर अभ्यास करताना सापडले आहे हे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकदिलाने निवडणूक लढवलीय. शिवसेना व भाजपाने एकमेकांचे प्रचंड पाय ओढले आहेत. भाजपाची मते काँगेस व राष्ट्रवादीला गेलेली दिसत नाहीयेत तर ती नोटा किंवा अपक्षांकडे जास्त गेली आहेत. या निवडणूकीत एकमेकांचे पाय ओढले तरी पुढच्या निवडणुकीत स्वतःच्या पायावर उभे राहूनच निवडणूक लढवायला लागणार आहे. एकंदरीत धमाल चाललीय. मस्त ध्रुवीकरण चाललंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
च
चौकस२१२ Mon, 11/11/2019 - 11:08 नवीन
- हातात आलेली संधी दोघांनी घालवली हे मान्य आणि परत त्यात तमाशा झाला - भाजपाला हि सेनेची गरज होती हा हि तर्क पटला परंतु शेवटी आकडे बघता सर्वांपेक्षा दुप्पट जागा जिंकलेल्या पक्षाने मुख्यमंत्री पद का घालवावे याचे उत्तर "भाजपणाने नमतं घयायला पाहिजे होत" असे जे म्हणतात त्यांनी दयावे ! हे म्हणजे मी २० रुपये घालतो तू ८० घाल पण घेतलेल्या लाडवातील ८० मी खाणार असले - ५ वर्षे नांदताना किती त्रास दिला.. तोड्याची होती ना युती - मला तरी शिवसेनेचा आततायी पणा वाटतोय आता उगाच मराठी शिवसेना / मोदी शाहह गुजराथी म्हणून भाजप गुजराथी असले विचित्र तर्क लढवणे हे शोभत का - राहता राहिला पवार साहेबानाचा बद्दल चा "आदर",, हं काय बोलायचं शिकलेले आणि मुरब्बी माणूस सुरवातीला जनतेला घेऊन चालणार नेता खूप आदर होता पण जातीचं राजकारण तसेच खुसपट काढत देशासाठी जेवहा ३७० किंवा पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या खंबीर भूमिकेला सुद्धा विरोध या गोष्टी पाहून आता तो आदर राहिला नाही . - घराणेशाही बद्दल ओंगळ पणा चालू आहे त्यात एकट्या पवारांना दोष देता येणार नाही .. थोडा फार कम्युनिष्टांच्यात ( शिल्लक असतील तर) आणि भाजपत ( मूळ) कमी एवढेच - भाजप वर जनता नाराज आहे हे खरे आणि त्यानं झटका दिला हे पण चांगले पण जनतेला ना राष्ट्रवादीला १००+ दिल्या ना काँग्रेस ला. हे कसे विसरयाचे ? - भाजपाची महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहून वाजपेयींचे १३ दिवसाचे सरकार आठवते !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/11/2019 - 13:13 नवीन
चौकस जी तुमचे मते कळाली आणि ती ही त्या त्या मुद्द्यांवर योग्य आहेतच. - शिवसेना जास्त चुकीची होती हे मान्य आहेच, पण फक्त सीट्स जास्त म्हणुन मुख्यमंत्री आमचाच पाहिजे नाहितर युती नकोच हे पण माझ्या मते चुकीचेच. १०० सिट्स असणे म्हणजे आम्हीच विजेते हे ही चुकच. मुळात विकासावर न बोलता, विकास न दाखवता १०० प्लस येवु शकतात हेच चुकीचे असे माझे वयक्तिक मत. उलट विकासावर लढले असते आणि मग १०० प्लस आणले असते तर लोकांच्या दृष्टीने तेच मुख्यमंत्री पदाला योग्य हे ते म्हणु शकले असते. पण हे १०० प्लस कसे आले, शिवसेने पेक्शा जवळ जवळा ३० जागा जास्त लढुन, इतर मित्र पक्षांना पण आपल्या चिन्हावर लढण्यास सांगुन. आणि राष्ट्रवादीतील आमदारांना फोडुन आपल्याकडे आणुन. बर हे नेते नुसते आले का ? तर त्यां बरोबर त्यांचे काही कार्यकरते, नगरसेवक असली लाईनच आत आली. मग १०० प्लस आणले हे जरी आकडे म्हणुन खरे असले तरी, नैतिकता, विकासावर निवडुन आणले, कोर भाजपाचे किती आणले आणि निवडुन येणार्या मुळीतुन किती आले हे ठोस ते तरी सांगु शकतील का हा प्रश्न आहेच. त्यामुळे मोठा पक्ष असला म्हणुन, तोच पुर्ण राज्यभर मान्यता पावलेला पक्ष असा अर्थ नाहीच होत. असो. हा वादादीत मतांचा मुद्दा असु शकतो यावर थांबतो. -- खिशात राजिनामे असुन युती तोडता आली नाही, कारण त्यांना माहीत होते १२२ पासुन बहुमत जास्त दूर नाही त्यामुळे रडतखडत जगा आणि योग्य वेळी डाव टाका, ते चुकीचेच असले तरी आता हेच राजकारण चालते , मग हे चुकीचे म्हणायचे असेल तर २०१४ ला पवारांचा घेतलेला पाठिंबा, गोव्याचे सरकार, काश्मिर चे मेहबुबा बरोबरचे सरकार ही कुठली नितिमत्ता ? त्यामुळे शिवसेना चुक समोर दिसत असली तरी त्याचे मुळे हे २०१४ पासुन होणार्‍या फरफटीत आहे असे मला वाटते.. -- गुजराथी, मराठी, हिंदु, मुसलमान असल्या गोष्टींचा विट आला आहे जनतेला, अहो विकासा वर बोला नाही तर घरी बसा, २०१४ ला कॉग्रेस - रा.कॉ. ला घरीच बसवले होते, उलट आता ३० % पण लोकल विकासावर भाजपा सामोरे आले असते तरी तेच जिंकले असते. -- पवार , ३७० ला राष्ट्रवादीने विरोध केला नाही, ना त्या विरोधात त्यांनी मतदान केले. (पाकिस्तान बद्दलचा मुद्दा मी कधी ऐकला नाही, मध्यतंरी शरद पवार काहीतरी त्यावरुन बोलत होते ते, पण मी ऐकले नाही). पवारांना विरोध करुन,स्वता मोदी ही २०१४ नंतर बारामतीला गळाभेट घेवुन गेलेच, त्याबरोबर भाजपा सरकारनेच त्यांना देशातील २ नंबरची पदवी दिली, आणि वसंत साखर कारखान्याजवळ मोदिंनी त्यांना राजकिय गुरु असे हि संबोधले, नव्हे त्यांचय करंगळीला धरुन राजकारण शिकले असे ही वाक्य जोडले. त्यामुळे पवार यांच्या बद्दल विरोधक पण सिस्थीत राहतात, तर मग त्यांच्याबद्दल एक राजकारणी म्हणुन ओढा वाढतोच. (वयक्तीक: मी बारामतीचा, माझ्या घरातील, माझ्या आजुबाजुला असणार्‍या त्या(९० च्या दशकात) तरुंणा ना दिलेला रोजगार, शेती बद्दल आणि त्या पुरक उद्योग धंद्याबद्दल शेतकर्‍यांना दिलेले ज्ञान आणि ते उद्योग, तेथील स्तिथी, ह्यामुळे पण कदाचीत त्यांच्याबद्दल मत असण्याचा भाग असेलच. तरीही असे समजु नये मी डोळे झाकुन मत देतो, अटलबिहारी वाजपेयी यांच्या साठी मी शरद पवार यांच्या विरोधात बारामती मतदार संघात मत दिलेले मला आजही आठवते. असो अटल बिहारी मोठे की शरद पवार यात मी पडणार नाही, दोन्हीही माझ्या साठी चांगलेच, आणि त्याच बरोबर मुंबईत राहिल्याने पाहिलेले बाळासाहेब ही आणि त्यांचे बोलणे मला आवडीचे) - घराणे शाही, कोण मोठे कोण छोटे असल्या पेक्षा आपण काय केले आणि काय करणार यावरच वोट दिले पाहिजे... बाकी काय .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/11/2019 - 13:17 नवीन
चुकुन , Vasantdada Sugar Institute च्या ऐवजी कारखाना असे लिहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
श
शाम भागवत Mon, 11/11/2019 - 13:54 नवीन
शरद पवार साहेब व मोदीजी हे दोघे सध्याच्या काळातले खरे मुरब्बी नेते आहेत. संघटन कला, प्रशासन कौशल्य, इव्हेंट मॅनेजमेंट, माणसांची पारख, स्मरणशक्ती व हजरजबाबीपणा वगैरे गुण दोघांचेही तोडीस तोड आहेत. परमेश्वराने त्या दोघांना राजकारण करण्यासाठी खूप गुणसंपत्ती बहाल केलेली आहे व त्या दोघांनी स्वबळावर त्यात वाढही केलेली आहे. फक्त त्या दोघांची राजकारण करण्याची पध्दत वेगवेगळी आहे. पवारसाहेब तात्कालीन फायद्याला महत्व जास्त देतात तर मोदीजी दिर्घकालीन फायद्यासाठी अल्पकालीन फायदा सोडायला तयार असतात असे मला वाटते. त्याचा परिणाम असा होतो की, पवारांचे बरेच सहकारी ५ वर्षात बदलेले दिसतात. तर तसे काही घडताना मोदींजींच्या बाबतीत दिसत नाही. थोडक्यात राजकारण करण्याच्या पध्दतीत दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
सुबोध खरे Mon, 11/11/2019 - 14:03 नवीन
पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे. पण हे १०० प्लस कसे आले, शिवसेने पेक्शा जवळ जवळा ३० जागा जास्त लढुन, पण ३०च जागा (१९%) जास्त लढून ४९ (८७%) जागा जास्त कशा आल्या हो? (१०५ वि ५६) हवेतून पडल्या का? आणि मतांची टक्केवारी भाजप २५.७५ % आणि शिवसेना १६.४१ % म्हणजे ५७ % मते जास्त मिळाली भाजपला. बाकी जाणत्या राजाने "पावसात भिजून एवढं दैदिप्यमान यश" प्राप्त केलं वगैरे वगैरे मीडियात आपला उदो उदो करून घेतला आहे. त्यांना जागा "५४ च" आहेत आणि मतांची टक्केवारी" १६. ७१ टक्के "आहे. आकडेवारी खोटं बोलत नाही. शब्द कसेही फिरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा