सौरव नावाचे वादळ...
💬 प्रतिसाद
(7)
घ
घाटावरचे भट
Sat, 11/15/2008 - 17:15
नवीन
सौरव गांगुली हा क्रिकेट मधील एक अत्यंत महान खेळाडू आणि कर्णधार आहे याबद्दल वादच नाही. त्याची निवृत्ती निश्चितच भारतीय क्रिकेटमधे एक पोकळी निर्माण करेल, जी भरायला थोडा अवधी जावा लागेल. पण सौरवची निवृत्ती चटका लावून जाणारी वगैरे आहे असं मला मुळीच वाटत नाही. किंबहुना, अत्यंत योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असं त्याचं वर्णन केल्यास ते जास्त सयुक्तिक ठरेल. आपण काहीही म्हटलं तरी एकूणच बीसीसीआयला तो नकोसा झाला होता. दालमियांची राजवट संपल्यावर त्यांची आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांची पाळंमुळं खणून काढण्याच्या बीसीसीआयच्या धोरणाचा तो बळी ठरला (शिवाय त्याने तेव्हा माज केला ही गोष्टही नाकारता येत नाही). गांगुली बाजूला पडत जाण्याचं अजून एक कारण म्हणजे नवीन चांगल्या खेळाडूंचं संघात आगमन. आपण आता पाहतोच आहे की हे 'फॅब फोर' संघात नसतानाही आपला संघ एकदिवसीय सामने जिंकतो आहे. या सगळ्या घटकांचा विचार करता गांगुलीने केवळ संघात राहाण्यासाठी सीलेक्टर्सची हांजी हांजी करणं हे त्याच्या आक्रमक स्वभावाला आणि प्रतिमेला विसंगत ठरलं असतं (निदान मला तरी ते बघायला आवडलं नसतं). 'मला संघात निवड होण्यासाठी सीलेक्टर्सच्या मर्जीवर अवलंबून राहाण्याची इच्छा नाही' हे त्याचं वक्तव्य या बाबतीत बरंच काही सांगून जातं. आणि तो निवृत्त झाला म्हणून झालेल्या दु:खाबद्दल म्हणायचं झालं तर त्याला काही इलाज नाही. माझ्या आधीची पिढी सुनील गावसकर निवृत्त झाला म्हणून हळहळली, मी सचिन/सौरव/कुंबळे निवृत्त होताना हळहळणार आणि पुढच्या मॅचच्या वेळी उत्साहाने धोनी/युवराजची फलंदाजी पाहायला टीव्हीसमोर बसणार.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 11/15/2008 - 17:36
नवीन
बा देवा ... काय बोललास काय .. अगदी मनातलं .. गांगुलीने असं हांजी हांजी केलं असतं तर आपला हिरो राहिलाच नसता रे तो .. तो *डवा 'किरण मोर्या"' .... **घाला स्वत:च्या कारकिर्दीत काय दिवे लावलेले कोणास ठाउक .. साला क्लियर होती रे सौरव ला संघाबाहेर ठेवण्यात "किरण मोरे" ह्याचे वैयक्तिक वाद कारणीभूत आहे.
अप्पन भी येईच कहता है ...
कट्टर सौरववादी)
टौरव टांगूली
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Sat, 11/15/2008 - 17:15
नवीन
दोपप्रकाटाआ.
- Log in or register to post comments
अ
अमितकुमार
Sat, 11/15/2008 - 20:15
नवीन
"गांगूलीची अजून ऐक ओळख.... जलद गति गोलंदाजाना घाबरणारा, त्याच्या सोमोर डोळे मिचक्वत खेळणारा, कधि हि चेंडू लेगला पूल न करू शकणारा, bouncer ball खेळताना नेहमी ज्याचि फाटायचि, ....मैदानावर थोडेसे लागल्यावर नाटके करणारा... खेळ्ण्यापेषा मैदाना बाहेर राजकारण करण्यात धन्यता माणनारा.... आपल्या काहि बावळ्ट बंगालि समर्थकाच्या जोरवर कायम बातम्यामध्ये राहणारा..... सचिनचे त्रिशतक न होवू देणारा ( द्रविडच्या खांद्यावर बंदूक ठेवून )........
अश्या माणसाला.... "दादा", "टायगर" म्हणनने हास्यास्पद आहे......विकिराव थोडे जास्तच कौतूक झाले, एवढि लायकि नाहि त्याचि.......
त्याला खेळ्तांना बघतांना कंटाळा तर यायचाच पण त्याच्या जाहिराति तर त्याहून टूक्कार....
सचिनभक्त्....अमितकुमार....
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Sat, 11/15/2008 - 21:34
नवीन
ज्याप्रमाणे 'गांगुली जलदगती गोलंदाजांना घाबरतो आणि त्याला बाउंसर खेळता येत नाही' असं तुम्ही म्हणता तसंच 'सचिनला आजकाल इनस्विंगर खेळता येत नाही' असं म्हणणारे महाभागही माझ्या माहितीत आहेत. जर गांगुली इतका वाईट खेळाडू असता तर कसोटी सामन्यांत ७०००+ आणि एकदिवसीय सामन्यांत ११०००+ धावा करूच शकला नसता. आता गांगुली निवृत्त झालाय. जेव्हा एखाद्या फलंदाजाच्या संपूर्ण कारकिर्दीचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्या फलंदाजाचं यशापयश केवळ त्याने केलेल्या धावांवर ठरत असतं. एका मर्यादेपलिकडे त्या खेळाडूच्या भात्यात कोणते फटके आहेत याला काहीही अर्थ नसतो. अर्थात गांगुलीने नंतर जे राजकारण केलं त्याचं मी समर्थन मुळीच करू इच्छित नाही (पण असं राजकारण कपिल देवने सुनील गावसकरच्या विरोधात केलं असही म्हणतात. ती कदाचित भारतीय क्रिकेटची देदिप्यमान परंपरा असावी). माझा मुद्दा एवढाच आहे की केवळ लेग साईडला फटके न मारल्याने/ राजकारण केल्याने खेळाडू म्हणून गांगुलीचं श्रेष्ठत्व कुठेही कमी होत नाही. भविष्यात जेव्हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासाबद्दल लोक बोलतील, तेव्हा तुम्हाला ते पटो अथवा न पटो, सचिन बरोबर गांगुलीचंही मोठा खेळाडू म्हणून नाव घेतलं जाणारच. 'तुम्ही ऑफ साईडला सगळेच्या सगळे ९ क्षेत्ररक्षक लावा. गांगुली तरीही तुम्हाला ऑफ साईडला चौकार वसूल करुन दाखवील' हे स्टीव्ह वॉचं वाक्य किंवा 'ऑन दी ऑफ साईड, फर्स्ट देअर इज गॉड अँड देन देअर इज दादा' हे राहुल द्रविडचं वाक्य काही वेगळं सांगत नाही. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे डोक्यावरचे काळ्याचे पांढरे केलेल्या या धुरंधरांपेक्षा आपल्याला या खेळाची समज जास्त आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर बोलणंच खुंटलं.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 11/15/2008 - 21:52
नवीन
अरे कशाला परिश्रम घेतलेस एवढं टाइप करायचे , मी ही उत्तर देउ शकत होतो की , बाकी तुझं खालचं एकच वाक्य पुरं होतं रे..
आपल्या इथं कोणी काय राजकारण केलं काय केलं हे कोणालाही अगदी तळापर्यंत माहित असावं म्हणूनच कुमारजींनी तो मुद्दा काढला, आणि जर माहित नसेल तर एक बडबड म्हणून सोडून द्यावं . गांगूली कोणत्या दर्जाचा आहे हे आपल्या सारख्या क्षुद्रांनी वर्णन काय करावं ? किंवा कोण्या एकाच्या ४ टिकांनी त्याचं श्रेष्ठत्व का कमी व्हावं ? इग्नोर कर ना बे भटा , असाइमेंट देउ का तुला एखादी अजुन ?
- Log in or register to post comments
अ
अमितकुमार
Sun, 11/16/2008 - 10:28
नवीन
वरिल लेख हा अतिशोय्क्ती वाटतो म्हणून प्रतिकिया दिलि......
- Log in or register to post comments