Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

स
सुबोध खरे
Sat, 05/23/2020 - 17:15
💬 142 प्रतिसाद
जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत? --श्री मंगेश पाडगावकर मागेच लिहिलं होतं-- एक दिवस दवाखाना बंद ठेवला परंतु रस्त्यावरचे स्वच्छता कर्मचारी साधे पोलीससुद्धा काम करत आहेत पाहून स्वतःची लाज वाटली म्हणून आम्ही (मी आणि बायको) दवाखाना चालू केला. एक दिवसा आड बातमी येते अमुक डॉक्टर तमुक डॉक्टर दिवंगत झाले. त्यातून बायका जास्त तणाव घेतात. त्यामुळे बायको एक दिवसाआड डिप्रेशन मध्ये जाते. तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत. मग आपली भीती दुसरीला सांगत राहतात आणि मग सर्वानाच फुकटचं टेन्शन येते. काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो. तिचा बराचसा सल्ला फोनवरच असतो. परंतु काही रुग्ण ताप खोकला असला तरीही तुम्हाला दाखवायचंय असा आग्रह धरतात. अगोदर ताप आला होता हे सांगत नाहीत. त्यामुळे आता ती सुद्धा लोकांवर विश्वास ठेवायला कचरू लागली आहे. बाकी दोन महिन्यात एकाही रुग्णाने टेलिफोनवर दिलेल्या सल्ल्याचे पैसे किती हे विचारले नाही.पैसे घ्यायचे नाही हे ठरवलेच होते परंतु निदान तेवढे सौजन्यही कुणी दाखवले नाही. माझ्या कडे येणारे रुग्ण सोनोग्राफी साठी येतात त्यामुळे सुदैवाने त्यांना कोव्हीड असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मला तेवढी भीती नाही. अर्थात वेळ सांगून येत नाही. कधीतरी आपल्याला सुद्धा हा रोग होणार आहे हे गृहीत धरूनच मी चाललो आहे. मला स्वतःची चिंता नाही पण वृद्ध आईवडिलांची (८४ आणि ७८) आहे. पण जे नशिबात असेल ते मी स्वीकारले आहे. एका मुतखडा असलेल्या रुग्णाने माझ्या सहायिकेला विचारले कि मला किती सवलत मिळेल? तिने त्याला विचारले कि दारूच्या दुकानाच्या रांगेत उभा होतास तिथे विचारलेस का किती "कन्सेशन" मिळेल ते. दर दोन दिवसांनी तुम्ही "असे केले नाही तर तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू" म्हणून सरकारची/ महापालिका आयुक्त यांची धमकी वृत्तपत्रात वाचायला मिळते आहे. ते पाहून काही वेळेस डोके फिरते. खरोखरच व्यवसाय बंद करून टाकावा कोणत्याही वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या क्लास मध्ये शिकवावे सहा आकडी पगार घ्यावा. पाट्या टाकून घरी यावे आणि थंड झोपावे सरकार आणि जनता झक मारली असे डोक्यात येते. ते माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. आणि क्लास मध्ये शिकवण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही. माझी पदवी आणि पदव्युत्तर पदवी हि प्रथितयश संस्थेची असल्याने त्याला शिक्षणाच्या बाजारात भरपूर किंमत आहे आणि क्लास मध्ये मी एक वर्षं शिकवलेले सुद्धा आहे तेंव्हा त्यात नवीन काहीही नाही. (तेच ते वर्षानुवर्षे शिकवायचे हे फार कंटाळवाणे आहे म्हणून मी पुढे ते सोडून दिले) अशीच मनस्थिती माझ्या पॆक्षा वरिष्ठ अशा अनेक डॉक्टरची आहे. आमच्या आयुष्याला पुरेल इतका पैसे कमावून ठेवला आहे. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे. तुमच्या सेवेची कुणालाही किंमत राहिलेली नाही हे गृहीत धरले तरीही असे धमकी देणे डोक्यात जाते. तरीही मी रोज दवाखान्यात जातो आहे. कारण साकी नाका, डोंबिवली पासून रुग्ण किती कष्ट घेऊन येतात. कुणी मुतखड्यामुळे तळमळत आहे. कुणा गरोदर स्त्रीला बाजारात मोटारीने ठोकले आहे आणि पायाचे हाड मोडले आहे. तिला स्वतःपेक्षा आपल्या बाळाची काळजी वाटते. कुणा स्त्रीला ११ वर्षांनी दिवस गेले आहेत पण रक्तस्त्राव होतो आहे. अशा स्त्रीला तिचे बाळ सुखरूप आहे हे दाखवताना / सांगताना तिच्या डोळ्यात जी कृतज्ञता असते त्याची किंमत पैशात होत नाही असे रुग्ण पाहून घरी बसायची मानसिक तयारी होत नाहीये. एक अजून गंमतशीर गोष्ट म्हणजे गेल्या दोन महिन्यात पोट बिघडलेले केवळ तीन रुग्ण आले होते. हॉटेले बंद असून लोक बाहेर न खाता घरीच खात असल्यामुळे हि एक सकारात्मक बाब दिसून आली. यातील दोन जणांनी दोन दिवसा पूर्वीचे चिकन आणि प्रॉन्स खाल्ले म्हणून पोट बिघडले आणि आज चि रुग्ण होती तिने SWIGGY वरून काही तरी मागवले म्हणून पोट बिघडले होते. आता लॉक डाउनचा दुसरा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या १० दिवसात ४ स्त्रिया नको असलेले गर्भारपण घेऊन आल्या होत्या. एकीला दोन मुलगे १४ आणि १० वर्षे दुसरीला एक मुलगा एक मुलगी ६ आणि ४ वर्षे. तिसरीच्या दोन्ही मुली १५ आणि १२ वर्षाच्या. आणि चौथीचा मुलगा १० महिन्यांचा आहे. या सर्व स्त्रिया अर्थात विवाहित आहेत आणि जवळपासच राहणाऱ्या आहेत. अशी स्थिती दिवाळीच्या आसपास असते. नवरात्राचा परिणाम महिन्यानंतर दिसू लागतो परंतु या बहुतेक लग्न न झालेल्या आणि कांदिवली चिंचपोकळी बांद्रा सारख्या ठिकाणाहून येतात.म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट दोन्ही परत भेटणारे नकोत. माझ्या एका नातेवाईकाच्या बायकोला आणि एका वर्गमत्रिणीच्या नवऱ्याला कोविड मुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते आणि त्यांना तेथे जाताही येत नव्हते. अशा लोकांना धीर देणे आवश्यक असते. त्यात माझा एक आठवडा गेला. सुरुवातीला मुलांनी थोडी कटकट केली कि बाबा तू घरी आल्यावर सारखा फोनवर असतोस. त्यांना समजावून सांगितले कि नातेवाईकांची मनस्थिती काय आहे. आणि अमुक माणूस एक दिवसात मृत्यू पावला सारख्या बातम्या वाचून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होते, अशा लोकांना धीर देणे त्यांच्या जखमेवर फुंकर घालणे हे पण आवश्यक आहे. अर्थात मुले समंजस आहेत. दोघे आता घरी बरे होऊन परत आले आहेत जाता जाता -- दारूची दुकाने उघडली त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट- पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एक किमी लांब रांग आणि तिला शिस्त लावण्यासाठी दुपारी १ वाजता उन्हात उभे असलेल्या पोलिसांची दया आल्यामुळे मी घरी जाऊन २ लिटर लिंबूसरबत तयार केले आणि मुलुंड पूर्वं येथे तीन ठिकाणी दारुच्या दुकानाच्या रांगा मध्ये उभे असणाऱ्या पोलिसांना देण्यासाठी गेलो. तिन्ही रांगांत स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने उभे होते. ( खरं तर अर्ध्या रांगा याच लोकांमुळे होत्या). पहिल्या रांगेत पोलिसाला सरबत देत असताना दोन गणवेशातील महापालिका कर्मचारी त्या पोलिसाला विनंती करत होते. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत मुलूंड स्मशानभूमीत काम करतो. पोलिसाने काय पाहिजे विचारले तर त्यांना रांगेत उभे न राहता थेट दारू विकत घ्यायची "मेहरबानी" हवी होती. दुसऱ्या रांगेत जुन्नर जवळच्या गावातील महिला पोलीस होती. तिच्याजवळ तिचा एक गाववाला ओळख काढून गप्पा मारू लागला आणि मग हळूच दारूसाठी विनंती करु लागला. तीन रांगातील पोलिसांना सरबत दिल्यावर मी पोलीस स्टेशन वर जेवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरबत देण्यास गेलो तेथे असलेले इन्स्पेक्टर साहेब सांगत होते. काय सांगणार डॉक्टर दोन दिवसापूर्वी स्थानिक आमदार सगळ्यांना फुकट रेशन वाटत होते (१० किलो गहू १० किलो तांदूळ ४ किलो डाळ आणि २ लिटर तेल असं काहीतरी मी एका रांगेच्या ठिकाणी बोर्डावर लिहिलेलं वाचलं होतं). त्या रांगेत असलेले निदान दहा तरी मजूर आज दारूच्या रांगेत उभे होते. पहिल्या मजुराला मी हाकलणार होतो कि दोन दिवसापूर्वी फुकट शिधा पाहिजे म्हणून रांगेत उभा होतास आणि आता दारू साठी. पण नंतर बाकी रांगेत असे भरपूर लोक दिसत होते. शेवटी मी सोडून दिले. काही वेळाने माझ्या समोर दोन माणसे इन्स्पेक्टर साहेबाना "गूळ" लावण्यासाठी लाळघोटे पणा करत होती. ते पाहून मला शिसारीच आली. अर्थात मी घरी केलेले लिंबू सरबत घेऊन गेलो होतो म्हणून त्यांनी ते घेतले पण एकंदर त्यांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड ड्रिंक चा पुरवठा करणारे माझ्या सारखे इतरही लोक होतेच. बाकी आमचे आयुष्य संथगतीने चालले आहे त्यात नवीन असे काहीही घडत नाही. धुणी भांडी स्वयंपाक झाडू पोछा हे घरचे सर्व मिळून करत आहोत. त्यामुळे एकावर भर येत नाही आणि त्यात रडारड करण्यासारखे काहीच नाही कारण सर्वच लोक तसे करत आहेत. मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे याची चिंता राजकारण्यांना( कोणत्याही पक्षाचे असोत), सरकारी लोकांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांना सुद्धा आहे. दुर्दैवाने त्यातील कोणालाच अशा प्रचंड प्रमाणावर असलेल्या जागतिक साथीचा अनुभव नाही. तरी आहे त्या शस्त्रानिशी ते लढत आहेत. निदान आपण त्यांच्या श्रमात हातभार लावू शकत नसलो तरी अनाठायी टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची तरी करत नाही एवढे ध्यानात घेता आले तरी खूप आहे असेच म्हणेन. माझी वृत्ती अशी आहे कि जे वाईट घडायचे आहे ते घडून गेले आहे. येणार काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे. त्यामुळे मला नैराश्य येत नाही.

प्रतिक्रिया द्या
62357 वाचन

💬 प्रतिसाद (142)
न
नावातकायआहे Sun, 05/24/2020 - 11:51 नवीन
एक आठवडा... फकत सप्लिमेंटरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
P
Prajakta२१ Sun, 05/24/2020 - 12:08 नवीन
मार्गदर्शनपर अनुभव धन्यवाद @navatkayahe काळजी घ्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ Sun, 05/24/2020 - 20:08 नवीन
काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो हे वाक्य खूप च खटकले. तुमच्या पुर्वी च्या लेखात बायकांवर असली टिप्पणी वाचल्याचे स्मरत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 05/24/2020 - 20:33 नवीन
तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले. त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत. मग आपली भीती दुसरीला सांगत राहतात आणि मग सर्वानाच फुकटचं टेन्शन येते. काही वेळेस मला तिचा राग येतो चिडचिडही होते. हे अगोदरचे वाक्य आपण वाचले का? डॉक्टर असल्यावर निदान वैद्यकीय विषयावर तरी वास्तववादी विचार करायला हवा अशी माझी अपेक्षा असणे चूक आहे का? स्त्री डॉक्टरनेही खंबीर न राहता भावनात्मक दृष्ट्या वैद्यकीय बाबींचा विचार करावा असेच आपले सर्वांचे मत असेल तर मी माझे हे विधान मागे घेतो आणि सर्वांची क्षमा मागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१
स
सुचिता१ Tue, 05/26/2020 - 11:18 नवीन
सामान्य स्त्रिया पण बर्याचदा खंबीर स्वभावाच्या असतात. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत स्वतः खंबीर राहून दुसऱ्याला धीर देणार्या बायका पण मी बघितल्या. तुमचे सरसकट "सगळ्या बायका " हे शब्द खटकले म्हणून कळवले. बाकी लेख उत्तम आहे. तुमचे निरीक्षण वाचायला आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 05/26/2020 - 15:31 नवीन
स्वतः खंबीर राहून दुसऱ्याला धीर देणार्या बायका अशा फार कमी असतात. विशेषतः स्वतःवर संकट आलं असताना. सुदैवाने आमची आई अशी आहे. स्वतःला कर्करोग झाला असताना सुद्धा ती शांत होती. टाटा आणि दुसऱ्या रुग्णालयात ४५ दिवस व्हेंटिलेटरवर काढून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मला कधी भय भीती चा लवलेश दिसला नाही. सर्वात पॉझिटिव्ह रुग्ण म्हंणून टाटाचे कर्मचारी तिच्याबद्दल मला अनेक वेळेस सांगत असत. पण अशा स्त्रिया फार कमी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१
म
मीअपर्णा Wed, 05/27/2020 - 01:19 नवीन
आजकालच्या स्त्रीया जास्त प्रमाणात खंबीर आहेत म्हणून जिथे तिथे पुरुष डॉमिनेट करत असतानाही खंबीर पणे काम करत राहतात. आपण स्वतः डॉ. आहात म्हणून या विधानावर चर्चा होत असावी. मी वरती देखील प्रतिक्रिया दिली आहेत त्यातले इतर मुद्दे तर तुम्ही वाचलेही नसावेत पण ते असो. विषय भरकटवायचा नाही तरीही हा एक व्हिडिओ पहा. मला वाटतं एकंदरित कोरोना या विषयावरदेखील राजकारण इ. चर्चा करणार्ञा जगातील सर्वच देशांतील लोकांनी हा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. आपला शत्रू कोरोना व्हायरस आहे आपल्यातील कुणी नाही. (हा पॅरा फक्त डॉ. साठी नाही. सर्वांनीच पाहावं, शिकावं, मोठ्या पदावर असणार्या व्यक्तींकडे हा मोठेपणा पोचावा.) मिशिगनची गव्हर्नर ग्रेचन व्हिटमर प्रेसिडंट ट्रम्पने तिला That Woman from Michigan म्हणून हिणवून झालं आहे. त्यावरचं तिचं संतुलित उत्तर पहा. मला वाटतं स्त्रीयांची ती युनिक ताकत तिच्याकडे आहे. आणि अशा स्त्रीया जास्त प्रमाणात आहेत. सो प्लीज अशी जनरलाइज्ड विधानं, बेजबाबदार पणे अशा साईट्स वर करताना इतरांचा विचार करा. https://www.youtube.com/watch?v=u9_-5j_pJn8 या विषयावर यापेक्शा जास्त ताकत नाही खर्च करायची गरज वाटत नाही. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उपेक्षित Fri, 05/29/2020 - 08:01 नवीन
आजकालच्या स्त्रीया जास्त प्रमाणात खंबीर आहेत म्हणून जिथे तिथे पुरुष डॉमिनेट करत असतानाही खंबीर पणे काम करत राहतात. >>>>>>>>>>>> अत्यंत एकांगी वाक्य आहे हे, कारण स्त्रिया सुद्धा जिथे तिथे पुरुषांना डॉमिनेट करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीअपर्णा
स
सुबोध खरे Sun, 05/24/2020 - 20:28 नवीन
लॉक डाऊन केला नसता तर आपल्याकडे काही अंदाजाप्रमाणे १५ एप्रिल पर्यंत रुग्ण संख्या ८ लाख पर्यंत गेली असती आणि त्यात ३ % मृत्यू दराने तोपर्यंत २४ हजार मृत्यू झाले असते. आणि हाच आकडा आता पर्यंत २० लाखा पर्यंत आणि मृत्यूचा आकडा ६०,००० पर्यंत गेला असता असे सरकारी आकडे दर्शवतात. त्याबद्दल शंका घेणारे लोकही आहेत. किंवा हे आकडे साफ चूक आहेत असे म्हणणारे लोकही आहेत. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मृत्यूचा आकडा १ लाख पर्यंतही गेला असता. सध्या व्हॉट्स ऍप विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रात, विषाणू शास्त्रात पीएच डी केलेल्या लोकांचे पेव फुटले आहे. त्यामुले सर्व तर्हेचे आकडे आपल्याला ऐकायला मिळतात. लॉक डाऊन हे आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल सरकारी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत आहे. त्यात कोणतीही शंका नाही. परंतु सुरुवातीला लॉक डाऊन केला नसता तर केवळ उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि चुकीच्या उपचारांमुळे मोठ्याप्रमाणावर मनुष्य हानी झाली असती याबद्दलहि सरकारी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत आहे उपचार -- सुरुवातीला कोव्हीड मुळे न्यूमोनिया होऊन रुग्ण दगावतात असा समज होता. त्यामुळे सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर लागेल असा अंदाज होता आणि आपल्याकडे एवढे व्हेन्टिलेटरही नव्हते किंवा ते वापरणारे तज्ञ डॉक्टर सुद्धा नव्हते. जसे संशोधन पुढे गेले तसे एक गोष्ट लक्षात आली कि रुग्ण न्यूमोनिया होऊन दगावत नाहीत तर फुफ्फुसात रक्ताच्या बारीक गुठळ्या झाल्यामुळे रक्ताभिसरण होत नाही त्यामुळे रुग्ण दगावतात. यामुळे आता रक्त पातळ करण्याची/ गुठळ्या विरघळवण्याची औषधे पहिल्या दिवसापासून दिली जात आहेत त्यामुळे एक तर बरेच रुग्ण मागच्या महिन्यापर्यंत दगावत असता त्यांना वाचवता येऊ लागले आहे आणि बहुसंख्य रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडत नाहीये आणि केवळ नाकाद्वारे ऑक्सिजन देऊन त्यांचे काम चालू शकत आहे. हे उपचार जास्त सोपे आणि एम बी बी एस डॉक्टर सुद्धा देऊ शकतात आणि ते छोट्या रुग्णालयात किंवा जास्त सुविधा नसलेल्या ठिकाणी देता येऊ शकतात. जो रुग्ण अशा लहान ठिकाणी अत्यवस्थ होईल त्यालाच मोठ्या रुग्णालयात व्हेंटिलेटरची गरज पडेल तसे हलवावे लागेल. यामुळे आपल्या उपचार प्रणाली वर अतिरिक्त ताण पडणार नाही. २) सध्या तरी कोव्हीड वर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना केवळ आधारभूत( सपोर्टिव्ह) होईल असेच उपचार दिले जात आहेत. यावर संशोधन अक्षरशः थक्क करेल अशा वेगाने होत आहे. सुदैवाने एखादा नक्की उपचार सापडला किंवा नजीकच्या काळात लस उपलब्ध झाली तर हे उद्यावर टाळलेले अनेक रुग्णांचे मरण कायमचे टाळता येईल अशी अशा करायला जागा आहे. ३) आपली अर्थ व्यवस्था किती काळ हे लॉकडाऊन सहन करू शकेल याचेही आडाखे अर्थ तज्ज्ञांनी बांधले आहेत. त्याप्रमाणे तेवढा काळ लॉक डाऊन केला तो हळूहळू शिथिलही केला जात आहे कारण गरिबीमुळे लोकांचे मृत्यू होऊ नयेत हि काळजीही सरकारला, घेणे आवश्यक आहे. सुदैवाने या यावर्षी आपले शेतीउत्पन्नाची स्थिती उत्तम आहे त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा नक्कीच होणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना कशी द्यायची याबद्दल अर्थतज्ज्ञ आपआपली मते मांडत आहेत. त्यात लोकांच्या खात्यात पैसे जमा करणे किंवा रेशन कार्ड नसतानाही रेशन देणे सारखेच तात्पुरते आणि उद्योगाला कर्ज देणे किंवा करमाफी सारखेच दीर्घ कालीन उपाय कसे करायचे हे निर्णय सरकार अर्थ तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करेलच. तज्ज्ञांचीहि टोकाची मते आहेत आणि काही लोकांची मते त्यांच्या राजकीय विचारसरणीनुसारच असतील. तो माझा विषय नाही. काही दुवे देत तेच ज्यांना इच्छा आहे त्यांनी वाचावेत. सरकार( भाजपचे केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे) साफ चूक आहे किंवा सरकार बरोबरच आहे असे आपले म्हणणे असू शकते ते आपल्या दृष्टीने बरोबर असेल. https://scroll.in/article/960789/in-charts-are-stringent-lockdown-measures-more-effective-in-curbing-covid-19-spread वरील सहा देशांचा लॉक डाउनचा अनुभव मुद्दाम वाचा https://www.livemint.com/news/india/nationwide-lockdown-will-no-longer-help-in-covid-19-fight-virologist-11590218271205.html इंग्लंड मध्ये हर्ड इम्युनिटी ( समूह प्रतिकारशक्ती) विकसित होऊ द्या म्हणू सुरुवातीला लॉक डाऊन केले गेले नाही त्यामुळे त्या देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागी आणि त्यांनी लॉक डाऊन केले हा अनुभव जगजाहीर असताना केवळ विरोधासाठी विरोध करणारे लोक दिसतात. श्री कुबेर यांनी लोकसत्तेत लेख लिहून भारताची स्वीडन शी तुलना केली आहे कि तिथे लॉक डाऊन केला नाही. अंध द्वेष आणि मीच शहाणा म्हटले कि असे होते. कारण स्वीडनची लोकसंख्या घनता एक चौ किमी ला ३५ आहे म्हणेज एक किमी X एक किमी क्षेत्रात फक्त ३५ माणसे राहतात. म्हणजे अक्ख्या शिवाजी पार्क मध्ये ३५ माणसे. भारताची लोकसंख्या घनता ६४०० आहे मुंबईची लोकसंख्या घनता ३२००० आहे तर धारावीची ३ लाख ५४ हजार आहे. म्हणजेच शिवाजी पार्क मध्ये साडे तीन लाख लोक राहायला आले तर त्याची काय अवस्था होईल? मग स्वीडन सारखे सोशल डिस्टंसिंग मुंबईत किंवा धारावीत शक्य आहे का? स्वीडनचे दर डोई उत्पन्न भारताच्या ६-७ पट आहे, आणि तेथील सामाजिक परिस्थिती अतिशय वेगळी आहे. तेथे बरेच लोक वृद्धाश्रमात मरतात आणि सरासरी माणसा च्या पार्थिवाला शवागारातून अंत्यसंस्कार मिळेपर्यंत एक महिना जातो. हे भारतीय मनस्थितीत शक्य आहे का? https://www.thejournal.ie/sweden-funerals-2792223-May2016/ तेथे अंत्य संस्कारासाठी सरासरी फक्त २४ माणसे येतात. आणि १० % लोकांच्या अंत्यसंस्काराला कोणीच येत नाही. https://www.usnews.com/news/best-countries/articles/2016-03-29/in-aging-sweden-dying-is-becoming-a-solitary-affair लोकांना लोकडाऊन न करता पहिल्या दिवसापासून फिरायला दिले असते तर मुंबईतच काही लाख रुग्ण मार्च महिन्याअखेरीस आले असते आणि त्यातून ४०-५० हजार रुग्ण दगावले असते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/24/2020 - 20:44 नवीन
ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ? > लॉक डाऊन केला नसता तर आपल्याकडे काही अंदाजाप्रमाणे १५ एप्रिल पर्यंत रुग्ण संख्या ८ लाख पर्यंत गेली असती या विधानाला काय अर्थ आहे ? १५ एप्रिलपर्यंत वाट बघायचा प्रश्नच नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Sun, 05/24/2020 - 20:49 नवीन
लोकांना लोकडाऊन न करता पहिल्या दिवसापासून फिरायला दिले असते तर मुंबईतच काही लाख रुग्ण मार्च महिन्याअखेरीस आले असते आणि त्यातून ४०-५० हजार रुग्ण दगावले असते. शेवटच्या विधानाला काय आधार आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ध
धनावडे Mon, 05/25/2020 - 05:24 नवीन
किती दिवसाची मुदत द्यायला हवी होती? सरकारच सोडून द्या तुमचे काय मत आहे ते सांगा. गणपतीला कोकणात किंवा घाटावर जायचं असेल तरी गाड्या मिळत नाहीत, इथे तर तुम्ही म्हणतंय तस थोड्या दिवसात अचानक काही कोटी लोकांना देशाच्या एका कोपऱ्यातून दुसरीकडे हलवायचे आहे, तुम्ही सांगा काय आणि कस करायला हवं होत? Full proof प्लॅन नसला तरी चालेल पण तुम्ही सारखा सारखा हा प्रश्न विचारताय म्हणजे काही तरी सुचवण्यासारखं असेलच तुमच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 05/25/2020 - 07:04 नवीन
आता किती लोकांना आणि किती अवधीत हलवले जाणार आहे? मुळात त्यांना का हलवले जात आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
स
संजय क्षीरसागर Mon, 05/25/2020 - 10:30 नवीन
करोनाचे साइड इफेक्टसवर मी खर्‍यांना नेमकं हेच विचारलं होतं की "आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ?" त्यावर त्यांनी मला उत्तर देण्याऐवजी "फ्लॅटनींग द कर्व, वैद्यकीय सुविधा आणि हर्ड इम्युनिटीचा अभ्यास करा" असा मोलाचा सल्ला दिला. मग पुन्हा तेच प्रश्न आणखी गंभीर होतात : १) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ? २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ? ३) लॉकडाऊन हा मोदींनी हर्ड इम्युनिटीच्या विरुद्ध घेतलेला निर्णय आहे, तस्मात त्याचा इथे काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
झ
झम्प्या दामले Sun, 05/24/2020 - 23:32 नवीन
सुरवातीला काही महाभागांनी भारतात कोरोना पसरणार नाही, पसरला तर तो हिमालयाच्या पायथ्याच्या राज्यांमध्ये पसरेल असे काहीच्याकही तारे तोडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकस२१२ Mon, 05/25/2020 - 01:26 नवीन
"...परंतु सुरुवातीला लॉक डाऊन केला नसता तर केवळ उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ".. अगदी बरोबर आणि हा विचार सर्व जगात थोड्या फार फरकाने तसाच केला गेला , फक्त भारतात्तीलच सरकार कसे चुकीचे हे जे विरोधकांचे उगाळणे चालू आहे ते असा जर "जागतिक आढावा" घेतला तर लक्षात येईल किती एकांगी आणि चुकीचा आहे आज अमेरिकेतील जी परिस्थिती आहे ती सर्व पाश्चिमात्य देशात नाही पण एक तर टोकाची भांडवलशी चे भूत आणि वयक्तिक मोकळेपणाचं टोकाची कल्पना त्यातून अर्थव्यसतेःला बोट लावणारे काही करणे म्हणजे अमेरिकेला कम्युनिस्ट बनवणे असले विचार या मुले १ लाख मेले ३० कोटी च्या लोकसंख्येत .. त्यामानाने भारत ठीक वाटतोय आणि भारतासारख्या देशात हे आटोक्यात आणणे कोणत्याही विचारसरणीचं सरकारला किती अवघड आहे याचा नुसता विचार कार्याला गेले तर ... अरे बापरे त्यामुळे भारतीय रहिवाश्यांनी सरसकट टीका कार्यानधी जर विचार करावं ... नंतर उहापोह करता येईल पण हि वेळ नव्हे राजकारण करण्याची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी_माणूस Mon, 05/25/2020 - 04:07 नवीन
काही वर्षा पुर्वी, एका मासिकात, एड्स वर एक लेख वाचला होता. त्या लेखात हा रोग भारतात पसरल्यावरचे एक चित्र रेखाट्ले होते. त्यात आपली लोकसंख्या , आरोग्य व्यवस्था लक्षात घेउन असे म्हटले होते की , हा आजार आपल्या देशात टीबी च्या स्वरूपात थैमान घालेल आणि प्रचंड जीवीतहानी होइल. लेख वाचल्यावर एक अस्वस्थतता आली होती. आज विचार करता मनात आले , ह्या रोगा वर अजुन ही औषध सापडले नसताना , खरेच तसे काही झाले आहे का ? वेगळी बाजु मांडणारा एक लेख https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-on-michael-levitt-abn-97-2167145/
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/25/2020 - 04:27 नवीन
वेगळं दृष्टिकोन गिरीश कुबेराचा ? हा हा ! हे म्हणजे सकाळ समूहातील श्रीराम पवार किंवा निखिल वागले हे निपक्षप्पाती पत्रकार आहेत असा दावा करण्यासारखे आहे! शेवटी ओढून ताणून कोविड च्या बंदोबस्तच्या प्रयत्नात सरकार चुकीचेच कसे हा एकच अजेंडा .. आणि असे प्रतिबंध चुकीचे असतील आज अनेक देशाचे अर्थ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासक महामूर्ख आहेत का? कि जे कुबेरणापेक्षा खूप मोठया जबाबदाऱ्या अंगावर घेतात असो माझ्या तरी देशात बंदी चा फायदा झाला असेच म्हणावे लागेल.. आत परतीचा प्रवास चालू झाला आहे बघू कसे काय होते ते इथंही टीका होईल नाही असे नाही.. चौकशी अयोग्य नेमले जातील .."अर्थव्यवस्थेचे पुढे काय" यावर दावे उजवे मतभेद तीव्रतेने पुढे येतील.. परंतु या काळात फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेणे हा एकमेव अजेंडा येथे ना विरोधकांनी ना सरकारने राबवला उलट हुजूर भांडवशाही सरकारला मजूर समाजवादी विचहरसरणीचे काही निर्णय घयावे लागले ...
  • Log in or register to post comments
स
सतीश विष्णू जाधव Mon, 05/25/2020 - 05:04 नवीन
या पुढे काही कालावधी साठी करोनासहच जगायचे आहे. म्हणूनच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे अतिशय आवश्यक आहे. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 05/25/2020 - 07:00 नवीन
एक डॉक्टर या दृष्टिकोनातून लिहिलेले (आणि एक नागरिक म्हणूनही लिहिलेले) लेखातले तुमचे अनुभव वाचताना छान वाटलं. लेख आवडला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 05/25/2020 - 10:27 नवीन
सकारात्मक लेख आवडला. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे. तुम्ही हे उद्वेगानेच लिहिले आहे असे वाटते. तुमचे सर्व लेख आणि प्रतिसाद वाचून सरकार कोणतेही आणि कसेही असले तरी तुम्ही तुमच्या कर्तव्याला आणि सामाजिक बांधीलकीला चुकणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे. तुमचे अनुभव लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 05/25/2020 - 12:06 नवीन
राजकीय पूर्वग्रहांवर आधारलेल्या व्यक्तिगत मतमतांतरांपेक्षा जागतीक आरोग्य संघटनेचा भारताच्या संदर्भातला अहवाल काय सांगतो आहे हे पाहणे महत्वाचे वाटल्याने जालावर शोध घेतला असता काल प्रकाशीत झालेल्या नवीनतम अहवालात ही माहिती मिळाली: Dr Harsh Vardhan, Minister of Health and Family Welfare, India, was elected the Chair of WHO Executive Board in the 73rd World Health Assembly. He will chair the 148th session of the Executive Board in Jan 2021, details here. The period of the lockdown gainfully utilized to ramp up health system capacity and infrastructure in the country, details here. • 3027 dedicated COVID Hospitals and COVID Health Centres along with 7013 COVID Care Centres identified • 2.81 lakh isolation beds, 31,250 ICU beds, and 1,09,888 oxygen supported beds identified in Dedicated COVID Hospitals and COVID Health Centres • 65.0 lakh PPE coveralls and 101.07 lakh N95 masks supplied to the States with 3 lakh PPE coveralls and 3 lakh N95 masks manufactured per day by domestic producers • WHO, India is supporting IMCR to conduct a community based serosurvey to estimate the prevalence of SARS-CoV-2 infection in Indian population Health Secretary held meeting to review measures for Covid-19 containment and management with 11 municipal areas that account for 70% of India's active case load, details here. (संदर्भः https://www.who.int/docs/default-source/wrindia/situation-report/india-situation-report-17.pdf?sfvrsn=6627059a_2)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/25/2020 - 15:17 नवीन
मुकवाचक साहेब कशाला झोपेचं सोंग घेतलेल्या माणसांना उठवायचे कष्ट घेताय? श्री मोदी कसे मूर्ख/ फकीर आणि बेजबाबदार आहेत आणि सरकारचे नाकर्तेपणा आणि अपयश हा एकमेव अजेंडा घेऊन आलेल्या लोकांना स्वतः काही समजूनच घ्यायचे नाहीये. तेंव्हा वितंडवाद घालण्यात काय हशील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
स
संजय क्षीरसागर Mon, 05/25/2020 - 16:42 नवीन
तुम्ही त्या क्षेत्रात कार्यरत आहात म्हणून सगळ्यांच्या मनात असलेले प्रश्नच विचारले आहेत. १) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ? २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ? ३) आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ? यात मोदी कुठे आले ? खालच्या प्रश्नाचं उत्तर जनता शोधेल किंवा परिस्थिती दाखवून देईल > ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Mon, 05/25/2020 - 18:21 नवीन
खालच्या प्रश्नाचं उत्तर जनता शोधेल किंवा परिस्थिती दाखवून देईल असे प्रश्न उठवणारे अनेक मातब्बर कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे २०१४ ते २०१९ कार्यरत झाले होते. असहिष्णुता, अवार्ड वापसी, हिंदूंचा बागुलबुवा असे अनेक स्टंट करूनही २०१९ ला जनतेने त्यांना जागा दाखवून दिली. जोपर्यंत मोदी यांना राहूल सारखा पर्याय दिला जात आहे, केजरीवालसारखे वाचाळवीर टीका करत आहेत आणि ऑनलाईन फोरमवर कोणतीही तमा न बाळगता दिसेल त्या मुद्द्यावर फक्त टीका करणारे तुमच्या सारखे आयडी आहेत तोपर्यंत जनतेच्या मनात मोदींच्या विरोधकांची प्रतिमा "फ्रॉड" अशीच राहणार. बाकी २०२४ ला मोदी स्वतः निवडणूक लढवतील याची शक्यता खूप कमी आहे आणि दुसर्‍या चेहर्‍यावर भाजपाला मते मिळाली नाहीत तर २०२४ला मोदी नसतानाही "मोदी लाट ओसरली" असे म्हणायला तुमच्यासारखे लोकं कमी करणार नाहीत याचीही खात्री आहे.. त्यामुळे सध्यातरी तुम्हाला शुभेच्छा देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
झ
झम्प्या दामले Mon, 05/25/2020 - 18:43 नवीन
जनतेच्या मनात मोदींच्या विरोधकांची प्रतिमा "फ्रॉड" अशीच राहणार. हे कोणी ठरवलं? अंतरजालावरचे चार दोन टाळकी ठरवणार का की फ्रॉड कोण आणि प्रामाणिक कोण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संजय क्षीरसागर Mon, 05/25/2020 - 18:48 नवीन
इथे काहीएक संबंध नाही. सध्या जनतेसाठी हे प्रश्न रिलेवंट आहेत : १) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ? २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ? ३) आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ? आणि > > ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ? याचे परिणाम जनता भोगते आहे. नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती, तुम्ही इथे कितीही जयघोष केलात तरी बदलणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
च
चौकस२१२ Tue, 05/26/2020 - 00:48 नवीन
१) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ? बाकी काही औषधे नसताना , आणि वैद्यकीय सेवा वरील ताण कमी व्हावा णहणून जगातील अनेक छोटे मोठे देश हाच लोकडवून काह उपाय योजित आहेत हे आपण संजुवूनच घेणार नाही का? आणि याचा फायदा झालं आहे , ऑस्ट्रेलिया आणि नू झीलंड , ऑस्ट्रेलियात तर एका क्रूझ शिप ( रुबी प्रिन्सेस ) वावर वेळेवर "लोकडोवन " केला नाही म्हणून साथ वाढली .. हा पुरावा आहे .. फक्त भारतीय सरकार कर्त्या चुकीचेच अशी कायमची धारणा केली असेल तर या उदाहरणांचा काही उपयोग नाही .. स्वीडन चा उदारमतवादी प्रयोग फसू लागलाय अशी दिसतंय https://theprint.in/world/why-swedens-low-scale-lockdown-strategy-is-beginning-to-backfire-now/408943/ २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ? कोविद संबंधात कि सगळ्या देशातील सगळे शेकडो वर्साचन्सह वैद्यकीय प्रश्न सोडवण्याच्या बद्दल? कोविद बद्दल: जर उद्या खूप रुग्ण झाले तर लागणारी तयारी पुरसेही झाली असेल . नसेल तर टीकेला जागा आहे पण सरसकट टीका कसली करताय? ३) आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ? हमी??? अहो अशा बाबतीत ब्रह्मदेवाचा बाप तरी अशी "हमी" देईल काय? प्रयत्न करणे , इतर देश काय करीत आहेत याचा अभ्यास आणि सुविधा तयार ठेवणे हेच सर्व सरकारे करीत आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Tue, 05/26/2020 - 16:13 नवीन
२) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ? The period of the lockdown gainfully utilized to ramp up health system capacity and infrastructure in the country, details here. • 3027 dedicated COVID Hospitals and COVID Health Centres along with 7013 COVID Care Centres identified • 2.81 lakh isolation beds, 31,250 ICU beds, and 1,09,888 oxygen supported beds identified in Dedicated COVID Hospitals and COVID Health Centres • 65.0 lakh PPE coveralls and 101.07 lakh N95 masks supplied to the States with 3 lakh PPE coveralls and 3 lakh N95 masks manufactured per day by domestic producers कुणी काहीही लिहिला तरी वाचायचंच नाही आणि आपलंच खरं हा हट्ट धरून बसलेल्या माणसाला कोणीही काहीही शिकवू शकत नाही. १) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ? Coronavirus Live Updates: India cases now double every 13 days, fatality rate among lowest in the world ़https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/coronavirus-live-updates-covid19-cases-in-india-may26/liveblog/75988337.cms ३) आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ? त्यात करोनाचे रुग्ण नक्कीच आहेत आणि त्यांच्याकडून कोरोना चे संक्रमण नक्कीच होणार आहे. परंतु जिल्हावार ते कुठे जात आहेत आणि त्यांच्या वर लक्ष( SURVEILLANCE) ठेवल्यामुळे त्यांना आजार झाला तर त्यांच्या यावर उपचार करता येतील अशी सरकारने तयारी केली आहे. शिवाय ते कोणाच्या संपर्कात तेथील त्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठीच आरोग्य सेतू ऍप्प तयार केला आहे. एका विशिष्ट कालावधी नंतर लॉक डाऊन काढायला लागणार आहे याची जगभरातील सर्व सरकाराना (भारत सरकार सुद्धा) कल्पना होतीच. आणि हा लॉक डाउन कसा काढायचा याचा संपूर्ण आराखडा सुद्धा तयार होता. जसजशी स्थिती बदलत गेली त्याप्रमाणे त्या आराखड्यात बदल केला गेला. आता सरकारची तयारी झाली आहे कि लॉक डाऊन काढला कि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याच बरोबर घरात बसून कंटाळलेल्या आणि त्यांच्या वर नजर ठेवताण थकलेल्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा आणि हाताला काम अंह आणि खिशात पैसे नाही अशा जनतेचीसुद्धा रुग्ण संख्या वाढणार आहे याची मानसिक तयारी झाली आहे. कारण अर्थव्यवस्था नको इतकी अपंग केली तर करोना ऐवजी गरिबीमुले जास्त माणसे दगावतील हेही अर्थतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ याना माहिती होते / आहे. त्या प्रमाणे सरकारची वाटचाल चालू आहे. योजना (PLAN) बिनचूक( FOOLPROOF) असेलच असे नाही आणि त्यात त्रुटी(ERROR) तर नक्कीच असतील पण कोणतीही योजनाशून्यतेपेक्षा ते १०० पटीने चांगले. बाकी सरकार वर टीका करणे आणि त्यात सुधारणा काय करायला हवी आहे हे सांगणे एकदम सोपे आहे. पण आपण जे सांगतो ते प्रत्यक्षात उतरवणे शक्य आहे का? असले तर सोपे आहे का? असा विचार न करता लॉक डाऊन लागू करण्यापूर्वी कोट्यवधि मजुरांना घरी जाण्यासाठी ३ दिवस द्यायला पाहिजे होते असे वक्तव्य करणे फार सोपे असते. तीन दिवसात फार तर ३० लाख मजुरांना पाठवता आले असते असे सप्रमाण दाखवले तरीही संक्षी आपले टुमणे अजूनही चौलचा ठेवतात याचे आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चौकस२१२ Tue, 05/26/2020 - 00:59 नवीन
सहमत १००% -जगातील सर्वात चुकलेले सरकार म्हणजे भारत सरकार ( कारण केवळ ते आपल्याला ना आवडणार्या पक्षाचे आहे ) - मेक इन इंडिया सारखया किंवा आत्मनिर्भर घोषणा म्हणजे सर्वात महामूर्ख कल्पना आहेत - लोकडवून उगाचच केला कारण आपल्यासमोर इंग्लडने आणि युनाइटेड स्टेट्स सारखी मस्त उद्धरणे आहेत , तिथे ३५००० आणि १ लाख केवळ हागवणी मुले मेले कोविद अस्तित्वातच नाही . - आम्ही खाटल्यावर बसूनच खाणार त्यामुळे सरकारने ने आम्हाला हि "हमी" दिलीच पाहिजे कि लोकडवून उठल्यावर रात्री १२ वाजून १ सेचकांदाने भारततिल सगळे रोग झटक्यात बरे होणार आहेत .. ३०३ शीट उगाच दिल्यात का? वैगरे वैग्रे वैगरे ...."लाला ल्यांड" मध्ये आम्ही राहणार आणि तुमि बी रहावा आणि नागरिक शास्त्राचे धडे घ्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 05/25/2020 - 12:21 नवीन
आपण भारतीय कशावरही खूष होतो. हे सगळे लॉक डाऊन नंतरचे कर्तृत्व आहे, लॉक डाऊन पूर्वी आरोग्य मंत्र्यांनी देशात कॉरोना थोपविण्यासाठी काय केले?
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 05/25/2020 - 12:32 नवीन
या अहवालातले काही मुद्दे: On 30 January 2020, a laboratory confirmed case of 2019-nCoV was reported in Kerala. The patient, a student returning from Wuhan, is currently in stable condition and cared for in hospital isolation. • The Prime Minister’s Office and the Ministry of Health, Family and Welfare (MoHFW) are closely monitoring 2019-nCoV situation and intensifying preparedness and response efforts. • Surveillance is being strengthened and enhanced at points of entry, in health facilities and in the community including contact tracing and follow up around the confirmed case. • Public health preparedness including surveillance, diagnostics, hospital preparedness, infection prevention and control, logistics and risk communication is being constantly reviewed by the national and state health authorities. The National Centre for Disease Control (NCDC) has activated Strategic Health Operations Centre (SHOC) room to provide command and control functions and a helpline (+91- 11-23978046) opened to answer public queries. • MoHFW and Ministry of Civil Aviation have initiated inflight announcements and entry screening for symptoms of fever and cough for travelers coming from China at 21 airports of India. Travel advisories Who is at risk for 2019-nCoV infection? • People who live in or have visited an area of China that has been affected by the currently outbreak. This area was initially Wuhan City, Hubei Province but has subsequently extended elsewhere in China. • People, including family members or health care workers, who are caring for a person infected with 2019-nCoV. • People who are in contact with an animal harboring 2019-nCoV. This animal, yet unidentified, is believed to be sold at the Huanan Seafood Wholesales Market in Wuhan. Investigation is still ongoing to identify this animal, the source of outbreak. INDIA SITUATION UPDATE What are coronaviruses and how they can cause diseases? • Coronaviruses cause disease in a wide variety of animal species. • SARS-CoV was transmitted from civet cats to humans in China in 2002 and MERS-CoV from dromedary camels to humans in Saudi Arabia in 2012. • Several known coronaviruses are circulating in animals that have not yet infected humans. • A spillover event is when a virus that is circulating in an animal species is found to have been transmitted to human(s). • Human to human transmission: Based on current available information, coronaviruses may be transmitted from person to person either through droplets or contact. have been issued and signages have been put in place. So far, a total of 234 flights and 43346 passengers have been screened. • MoHFW issued a travel advisory advising Indians to avoid non-essential travel to China (सविस्तर अहवाल येथे वाचता येईलः https://www.who.int/docs/default-source/wrindia/india-situation-report-1.pdf?sfvrsn=5ca2a672_0)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
स
सुबोध खरे Tue, 05/26/2020 - 04:47 नवीन
reality In the big picture, India has moved from 13 labs in the first week of February to 123 labs on March 24, the day Prime Minister Narendra Modi ordered a nationwide lockdown, to 609 labs https://www.hindustantimes.com/india-news/in-india-s-covid-19-testing-strategy-a-hard-push-from-pm-modi-and-a-dose-of-reality/story-OdltrmDPeTD4BRPUEM0qMP.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
म
मराठी_माणूस Mon, 05/25/2020 - 12:59 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/migrant-woes-greatest-manmade-tragedy-in-india-since-partition-ramchandra-guha-zws-70-2170107/
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 05/25/2020 - 17:17 नवीन
डॉ..खरे साहेबः- आज आमच्याकडे सर्व परिसरात सर्वांना घरी येवुन अर्सेनिक अल्ब या गोळ्या वाटल्या आहेत त्या घेतल्या तर चालतील काय?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 05/25/2020 - 18:56 नवीन
डॉक्टर साहेबांच्या सर्वच लेखांप्रमाणे माहितीपूर्ण उत्तम लेख. "........ सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो......" या वाक्यात "असे समजून" हे स्पष्टपणे लिहीलेले असूनही काही मिपाबायकांना हे वाक्य का खटकले हे कळले नाही, असो. (...सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मीही सोडून देतो...) उदाहरणार्थ "सगळे भाजीवाले असेच असतात असे समजून मी मुकाट्याने शंभर रुपये दिले" "सगळे टॅक्सीवाले असेच असतात असे समजून मी पायीच घरी परतलो" .... अशी वाक्ये पण आक्षेपार्ह समजायची का? @ प्रमोद देर्देकर साहेबः कोणत्याही होमियोपाथी औषधाचा काही साईड इफेक्ट होत नसतो, झाला तर फायदाच होतो, मनाला समाधान वाटते आणि उभारी येते, तेंव्हा 'अर्सेनिक अल्ब' या गोळ्या होमियोपाथीच्या असल्यास घेण्यास माझ्यामते काहीच हरकत नसावी. आम्हा उभयतांना पूर्वी अगदी असाध्य अश्या दुखण्यातून होमियोपाथीनेच वाचवलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सुबोध खरे Mon, 05/25/2020 - 19:56 नवीन
होमिओपॅथी बद्दल माझा काहीही अभ्यास नाही. यामुळे याबद्दल मी आपल्याला काहीही सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
श
शेखरमोघे Tue, 05/26/2020 - 05:31 नवीन
अरेरे, या कोरोनाला कसे कळत नाही की इतर देशात कसेही वागले तरी लोकशाही प्रमाण मानणार्‍या महान भारत देशात जरा लोकशाहीचा आदर ठेवत थोड्या तरी वेगळ्या पद्धतीने वागायला हवे. या कोरोनाच्या आडमुठेपणामुळे सरकारला लोकहिताकरता झटपट घ्याव्या लागलेल्या समयोचित निर्णयाला लोक "सर्जिकल स्ट्राईकसारखा कोणतीही पूर्वसूचना न देता" घेतलेला निर्णय म्हणू लागले आहेत. हेच जर कोरोना जरा शहाण्यासारखा वागण्यास तयार असता तर त्याला थोडातरी थाम्बण्याची व्यवस्थित आज्ञा देऊन त्यानन्तर लोकप्रतिनिधीन्शी चर्चा करून, सर्वाना पटणारा निर्णय घेऊन, वाटल्यास लोकमत अजमावण्यास लागणारा वेळ देऊन, जरूर पडल्यास "कोरोनाचा सामना कसा करावा" या विषयावरच मध्यावधी निवडणुका घेऊन, सगळ्याना एकत्र करून मगच कोरोनाला (जमल्यास पूर्णपणे अहिन्सक मार्गाने इ.इ.) सामोरे जाता आले असते. मग त्या काळात कोरोनामुळे कितीही बळी गेले असते तरी बेहत्तर पण हा निर्णय मग "सर्जिकल स्ट्राईकसारखा कोणतीही पूर्वसूचना न देता" घेतला गेला असे मुळीच वाटले नसते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/27/2020 - 01:31 नवीन
झकास प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे
म
मूकवाचक Wed, 05/27/2020 - 09:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
व
वीणा३ Tue, 05/26/2020 - 20:14 नवीन
उत्तम लेख. तुमचे प्रत्यक्ष कामातले अनुभव वाचायला आवडत. एकूण जे काय वाचत्ये ते बघून दिसतंय कि अजून (कमीत कमी) डिसेंबर पर्यंत तरी लस येणार नाही.  औषध यायला तर अजून जास्त वेळ.  त्यामुळे सगळ्याच जगापुढे २ वाईट पर्याय आहे.  १. संपूर्ण लॉकडाऊन करायचं - यात ज्यांचं हातावर पॉट आहे असे लोक खूप भरडले जातील. जिवंत राहतील पण अतिशय हाल होतील. पण जितके जास्त दिवस लॉकडाऊन मध्ये राहता येईल तेवढे  मेडिकल शास्त्राला आजारावर उपाय शोधायला, किमान आजाराची तीव्रता कमी करायला जास्त दिवस मिळतील. जस वरच्या प्रतिसादात डॉ खरे नि म्हटलं कि रक्तावरच्या गुठळ्यावरची औषध द्यायला सुरवात केल्यामुळे फायदा दिसलाय.  २. लॉकडाऊन काढायचा - यात ज्याच शरीर प्रतिकार करू शकेल तो जगेल नाही तो नाही.  जगातल्या कुठल्याही सरकार ने सध्या काहीही केलं तरी शिव्याच मिळणार आहेत. कधी कधी सगळ्याच राजकारण्यांची पण दया येते, काहीही केलं तरी कोणीतरी नावं ठेवणारा असतोच.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Wed, 05/27/2020 - 09:37 नवीन
डॉ साहेब , मस्त लेख आवडला खूप !!!
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 05/28/2020 - 06:55 नवीन
प्रत्यक्ष कामातले अनुभव असल्याने लेख चांगला वाटला. अजून लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/28/2020 - 07:13 नवीन
हा विषाणू पाणी दूषित करू शकतो का? समजा पाणी पुरवठा केंद्रातील एखादा कर्मचारी संसर्गित असेल (जलशुद्धीकरण झाल्यावर ) तर त्यामुळे पाणी दूषित होईल का? एकाच घरात एका बादलीत पाणी घेऊन सगळे आंघोळ करतात, त्यातून कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता असते का? हा विषाणू पाण्यात टिकून राहतो का?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/28/2020 - 08:04 नवीन
मलाही हाच प्रश्न पडला आहे. पाणी, माश्या, ओला कॅबमधे बसणे वगैरेतून संसर्गाची शक्यता आहे का ? काही दिवसानंतर मेट्रो, रिक्षा वगैरेतून जावे लागेल, तेंव्हा काय करावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सुबोध खरे गुरुवार, 05/28/2020 - 08:23 नवीन
हा विषाणू पाण्यात फारसा जगत नाही. त्यामुळे पाणयातर्फे याचे संक्रमण होते याला कोणताही आधार नाही. शिवाय जलशुद्धीकरणात वापरलेल्या क्लोरीन मुळे हा विषाणू निष्क्रिय होतो. यामुळे हा विषाणू पाणी दूषित करू शकतो का? नाही समजा पाणी पुरवठा केंद्रातील एखादा कर्मचारी संसर्गित असेल (जलशुद्धीकरण झाल्यावर ) तर त्यामुळे पाणी दूषित होईल का? नाही एकाच घरात एका बादलीत पाणी घेऊन सगळे आंघोळ करतात, त्यातून कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता असते का? नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/28/2020 - 09:11 नवीन
शंकानिरसन झाले. अजून काही शंकेचा किडा वळवळला की परत विचारेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 05/28/2020 - 08:16 नवीन
अद्ययावत माहिती नुसार सर्वात जास्त संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट थुंकी शिंक किंवा खोकल्यातून होते. एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर विषाणूचे संक्रमण कमी होते( शून्य असल्याचा अद्याप तरी पुरावा नाही) त्यामुळे जर आपण हात धूत राहिलात, तोंडावर मुखवटा घातलात, अनावश्यक गोष्टींना हात लावला नाही आणि चेहऱ्याला डोळ्यांना हात लावला नाही तर सार्वजनिक जागी मेट्रो रिक्षा इ मधून प्रवास केल्यावर आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे गुरुवार, 05/28/2020 - 12:06 नवीन
पाण्यातून संसर्ग होत नसेल तर फक्त पाण्याने हात धुतले तर हातावरील जंतू निष्क्रिय होतात का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/28/2020 - 17:37 नवीन
पाण्याने विषाणू धुतले जातात. कोरोना च्या विषाणूंच्या काटेरी मुकुटाचे काटे हे चरबीयुक्त पदार्थाचे असतात ते साबणाने किंवा सॅनिटायझरच्या अल्कोहोल मुळे विकृत (डीनेचर) होतात. मानवी पेशींना चिकटण्याची आणि त्यात प्रवेश मिळण्यासाठी हे काटे आवश्यक असतात. काट्यांच्या संरचनेत बदल झाल्यामुळे हा विषाणू आता मानवी पेशीत प्रवेश मिळवू शकत नाही. (वाकडी किंवा दाते तुट्लेली चावी कुलुपात शिरत नाही/कुलूप उघडत नाही तसे) साबण किंवा सॅनिटायझर नसेलच तर भरपूर पाण्याने हात चोळून धुवा म्हणजे विषाणू धुतले जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा