Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं

प
प्रमोद देर्देकर
Wed, 08/05/2020 - 06:03
💬 136 प्रतिसाद
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर. जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं. सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे. पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत. मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं. या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्‍या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक. मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक. मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्‍या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो. मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात. आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे. जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती. हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती. !जय श्री राम!

प्रतिक्रिया द्या
43705 वाचन

💬 प्रतिसाद (136)
G
Gk Wed, 08/05/2020 - 20:48 नवीन
व्हॅटसप वर नवा राम मंदिर ईमोजी आला आहे व्हॅटसप इमोजी वर वर जिथे गाडी चा लोगो आहे त्या गटात आहे दर्शन घ्यावे Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 08/05/2020 - 22:24 नवीन
मोदी है तो मुमकीन है. -गा.पै.
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 04:05 नवीन
रामाचे वारस आले नव्हते का ? भारतातील श्रीमंत 10 स्त्रियांत आहे म्हणे ती कुणीतरी राणी. 15 ऑगस्ट 47 ला चांगले महाल , सोने नाणे , शेतजमीन , प्लॉट , हे सगळे खजिने राज वारसांना मिळाले आणि सामान्य लोकांना इतिहासाची प्रॉपर्टी मिळाली खंड ( पुस्तकांचे) खिंड खिंडार पडलेले बुरुज खंदक खंडहर खिद्रापूर वगैरे देऊळ खांब मोडके , लेण्यांमधले खापराचे तुकडे म्युझीयममध्ये
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 06:00 नवीन
भारतातील श्रीमंत 10 स्त्रियांत आहे म्हणे ती कुणीतरी राणी. चंपाबाई याला काही पुरावा वगैरे?
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 06:14 नवीन
https://trendcelebsnow.com/diya-kumari-net-worth/ दिया कुमारी याशिवाय अजून काही राज घराणी आहेत शिवाय , नंतर अयोध्येची फाळणी होऊन 5 तुकडे झाले , त्यातून नाग , निषाद वगैरे अजून वंश उत्पन्न झाले. नळराजा , नहूश , शुद्धोधन , गौतम बुद्ध हे सगळे रघुवंशीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 07:10 नवीन
यात श्री रामाचें वारस आहेत असं कुठे म्हटलंय? राज घराणी तर लैच हैत. त्यांचं काय करताय?
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 07:42 नवीन
https://youtu.be/rh5SgXh-mLQ रामाचे वंशज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 08:22 नवीन
त्यांनी दावाच केला आहे ना? त्यात काय मोठंसं? काही लोक आपण शिवाजी महाराजांचे पाईक असून शिवाजी महाराजांचे "जाणता राजा" हे बिरुद मिरवतात. काही मांजरं अंतर्गोल आरशात पाहून मिशा फेंदारून वाघ असल्याचा दावा करतातच ना मग तुम्ही करा कि दावा कि मी औरंजेबाचा वंशज आहे. हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
ब
बाप्पू गुरुवार, 08/06/2020 - 07:51 नवीन
gk आणि mrcoolguynice तुमची जळजळ होतेय हे स्पष्ट दिसतेय म्हणून तुम्ही तर्कहीन आणि वयक्तिक प्रतिसादांचा रतीब घालताय इथे. हजारो मंदिरे पाडून तिथे मुद्दामहून मस्जिदी उभी करायची, इतर धर्मियांचे खचीकरण आणि अपमान करून स्वतः ला श्रेष्ठ समजणाऱ्या संस्कृती चे पाईक तुम्ही.. तुमच्याकडून तर्कशुद्ध प्रतिसादाची अपेक्षा फोल आहे. असो. मोदी स्वतः कुठेही येऊन फक्त मी आणि माझ्या मुळेच राममंदिर झाले असे म्हणाले नाहीयेत. त्यामागे लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारीं वाजपेयी आणि असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे मोदींनी कालच्या भाषणात मान्यच केलेय. आणि ते जगजाहीर आहे. सध्या मोदी पंतप्रधान आहेत त्यामुळे ते समारंभास उपस्थित राहिले पण म्हणून ते पूर्ण श्रेय घेतायेत... किंवा त्यांच्या हातात हे फळ आयते पडले वगैरे वगैरे असे बिनबुडाचा आरोप तुम्ही त्यांच्यावर इंडिरेक्टली करता आहात. यातून तुमचा फक्त मोदीद्वेष आणि दिसून येतो असे श्रेय घेण्याचे काम ( करून दाखवले वगैरे ) चिवसेनेत चालते, तिथे त्यासाठी खास माणसे ठेवली जातात आणि वर्तमानपत्र सुद्धा चालवले जाते. पण आता एका सो कॉल्ड धरनिरपेक्ष पक्ष्याच्या आधारामुळे आणि काकांच्या धाकामुळे आपला उत्साह त्यांना दाबून ठेवण्याखेरीज पर्याय नाहीये.
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 08:31 नवीन
आयते फळ मिळाले , हे मी बोललो नाही मी अभिनंदन बोललो आहे , नवीन व्हॅटप वर चित्र आहे , ते दिले आणि हा आता ऐतिहासिक खजिना व रामाच्या वंशाच्यावर प्रतिसाद लिहिला आहे बाकी मोदी आयते वगैरे मी लिहिलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 08:59 नवीन
आयते मिळाले वगैरे मोदीच राहुल गांधीबद्दल बोलतात, पण तसे काही नसते , काही ना काही प्रत्येकाला आधीपासून मिळालेले असतेच , मोदींचे वडील पंतप्रधान नव्हते , पण म्हणून काही मोदींनी सुरुवात आदिमानवाच्या गुहेतून लाकूड घासून नव्हती केली. मागचे घ्यावे , पुढंचयानाही द्यावे , अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे , त्यामुळे कुणाला काही मिळत असेल तर आम्ही पोट दुखावून घेत नाही, राफेल आल्यावरही पूर्वीच्या 3000 शस्त्रात 5 नवीन आले , असाच आनंद आम्ही मानतो. मनुष्याला संचित , क्रियमाण व प्रारब्ध अशी 3 फळे भोगावी लागतात, कुणी काही आयते वगैरे म्हणत असेल तर ते प्रारब्धाचे फळ असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
स
सुबोध खरे Sat, 08/08/2020 - 07:41 नवीन
काँग्रेसी संस्कृती संस्कृतचा द्वेष करणारे आपली

संस्कृती

आहे म्हणून बोलतात याचा अर्थच असा आहे कि तुम्ही किती वल्गना केल्या तरी संस्कृत/ संस्कृती तुमच्या आत्म्यातून जात नाही. जसे भारताच्या आत्म्यातून "राम" जाणारच नाही. मग बाकी शब्द छल कितीही करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
स
सुबोध खरे Sat, 08/08/2020 - 07:44 नवीन
मागचे घ्यावे , पुढंचयानाही द्यावे , अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे अशी नाही तर मागच्यानी खावे आणि पुढंचयानी ही खावे , एकमेका लांच देऊ अवघे होऊ श्रीमंत अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
महासंग्राम Mon, 08/10/2020 - 06:15 नवीन
नरसिंह रावाचं पार्थिव दिल्लीत जाळू न देणारी हि काँग्रेसची संस्कृती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
च
चौकस२१२ गुरुवार, 08/06/2020 - 10:53 नवीन
वयक्तिक प्रतिसादांचा रतीब घालताय इथे अगदी बरोबर खास करून स्वतःला "कुल" म्हणवणारी घाणेरड्या मनोवृत्तीचे दर्शन, घडवणारी व्यक्ती... मग सतत कमोड काय , अर्धनग्न काय आणि "फ... अप" काय मुद्दा नसला कि हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 10:11 नवीन
शिवसेना आम्हीच पाडली असेच सांगताहेत ना ? मग बिघडले कुठे ? अडवाणींनी कोर्टात तो मी नव्हेच असे सांगितले म्हणे
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 08/06/2020 - 10:28 नवीन
शिवसेना आम्हीच पाडली असेच सांगताहेत ना ?........... नाही. शिवसैनिकांनी पाडली असेल तर अभिमान आहे असे शिवसेना सांगत होती. अत्ता शिवसेना काहीच सांगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
G
Gk गुरुवार, 08/06/2020 - 10:32 नवीन
असू दे अडवाणी तर तो मी नव्हेच असेच म्हणणार , शेंगदाणे मोदी शहाने नेले, फोलपटे कुठे उचलत बसणार ? म्हणून मी शेंगदाणे खाल्ले नाहीत , ते बिचारे असेच बोलणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
स
सुबोध खरे Fri, 08/07/2020 - 06:32 नवीन
मोगा खान जहाँ राम का जन्म हुआ था मंदिर वही बनायेंगे असे सोमनाथ ते काशी आणि अयोध्या म्हणत कोण रथ चालवत होते? बाकी जळजळ होते आहे तर अडवाणी मुरली मनोहर जोशी याना बोलावले नाही म्हणून मनाचे समाधान करून घ्यायचे असेल तर घ्या पण मंदिर वही बन रहा है हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारावीच लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
स
सुबोध खरे Fri, 08/07/2020 - 06:35 नवीन
जखमेवर मीठ चोळणे कशाला म्हणता येईल? कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत अजून किती अच्छे दिन हवे आहेत? असदुद्दीन ओवैसी ने रामरक्षा म्हणायला हवे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
G
Gk Fri, 08/07/2020 - 16:45 नवीन
तुम्हाला ह्यातले काय काय येते ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 06:30 नवीन
राम रक्षा येते कि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
G
Gk Fri, 08/07/2020 - 16:44 नवीन
बाबरी मशीद पाडल्यानंतर बिजेपी नेते सुंदर सिंग भंडारी यांच्या तोंडचं वाक्य - "बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली". त्यावेळेला किती शिवसैनिक घुमटावर चढले, कितींनी हातोडा मारला याचा पुरावा शोध्णं कठिण आहे. पण तुम्हि तुमच्याच नेत्यांचं भाष्य मान्य कराल कि नाहि? अडवाणींनी सुद्धा त्यावेळेला हात वर केले. म्हणजे जेंव्हा गरज असते, हिंदु खतरेमे असतो तेंव्हा तुम्हि दारं खिडक्या लावुन घरी बसणार. थोडक्यात तुमचा "तो मी नव्हेच" मधला लखोबा लोखंडे होणार. आणि सगळं आलबेल झाल्यावर, ऐटित क्रेडिट घ्यायला सगळ्यात पुढे. काय, बरोबर ना...
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 08/07/2020 - 17:44 नवीन
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामे लिहिले होते.. आणि अफजलखानाला देखील आपण घाबरलोय असे सांगितले होते. पण दोन्ही वेळेला नंतर काय झाले हा इतिहास आहे.... तसेच बाबरी मशिदी च्या बाबतीत कित्येक नेत्यांनी जे घडले कदाचित उघडपणे मान्य केलेही नसेल पण ते महत्वाचे नसून आज काय झाले ते इतिहासाच्या पानात नक्की च लिहिले जाईल. स्थळ वेळ काळ परिस्थिती पाहून राजकारण करावे लागते मोगा भाऊ.. बाकी तुमच्यात आणि तुमच्या आका (पप्पू, खुजलीवाल, ओवेसी वगैरे) यांच्यात खरं बोलायची एवढीच खुमखुमी असेल तर मुगलांनी आणि इतर इस्लामी आक्रमकानीं हजारो मंदिरे आणि प्रार्थना स्थळे ( त्यात अयोध्या पण आले ) पाडून जबरदस्ती मशिदी उभ्या केल्यात हे उघडपणे बोलून दाखवा.. ! मग पुढे बोलू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
क
कोहंसोहं१० Fri, 08/07/2020 - 18:40 नवीन
मंदिराच्या बाबतीत हिंदूंनी जास्तच सहिष्णुता दाखवली म्हणायला पाहिजे. राम कृष्ण हे सर्व इथले पूजनीय आहेत आणि त्यांचे मंदिर जन्मभूमीवर बनणार नाही तर काय पाकिस्तानात आणि अरबस्तानात बनणार? तरीही हिंदूंनी सहिष्णुतेच्या मार्गाने अगदी न्यायालयीन लढाई ३० वर्षे लढवून आणि अनेक विघ्ने पार पाडून मंदिर बनवायला घेतले आहे. जगातल्या इतर कोणत्याही धर्माच्या लोकांनी इतका संयमितपणा दाखवला असता हि शक्यता खूपच कमी आहे. एक साधा प्रश्न - जर मोहम्मद पैगंबरांच्या जन्मभूमीवरील प्रार्थनास्थळ दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आक्रमणात पाडले असते तर सद्यपरिस्थितीत तेथील मुस्लिम लोकांनी त्यांचे प्रार्थस्थळ उभे करायला न्यायालयीन मार्ग अवलंबून धीराने आणि नेटाने ३० वर्षे लढाई लढली असती का? ५०० वर्षापूर्वीचे चर्च म्युझियम एका झटक्यात मशिदीत रूपांतरित करण्याच्या आणि इतर घडणाऱ्या जसे की इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करणे, खोदकामात इतर धर्माच्या निगडित काही गोष्टी सापडल्या जसे की मूर्ती तर त्या नष्ट करणे असे प्रकार पाहता वरील शक्यता ना च्या आसपास आहे. रिझवान अहमद यांनी काही मुद्दे खरेच खूप छान मांडले आहेत या विडिओ मध्ये. अश्या विचारांची समाजाला जास्त आवश्यकता आहे. https://www.youtube.com/watch?v=gyryX0Owq9U
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 08/08/2020 - 04:12 नवीन
+१ आनि बाप्पू न पन +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
G
Gk Fri, 08/07/2020 - 19:16 नवीन
https://youtu.be/zxySITIhz40 अयोध्या करती है आव्हान गीत रवींद्र जैन ..... अयोध्या करती है आव्हान, ठाट से कर मंदिर निर्माण, शीला की जगह लगा दे प्राण, बिठा दे वहां राम भगवान । सजग हो रघुवर की संतान, ठाट से कर मंदिर निर्माण । हिन्दू है तो हिन्दुओ की आन मत जाने दे, राम लला पे कोई आंच मत आने दे, कायर विरोधियो को शोर मचाने दे, जय श्री राम, कायर विरोधियो को शोर मचाने दे, लक्ष्य पे रख तू ध्यान । अयोध्या करती है आव्हान, ठाट से कर मंदिर निर्माण ॥ मंदिर बनाने का पुराना अनुंबध है, सब तेरे साथ पूरा पूरा प्रबंध है, कार सेवको के बलिदान की सौगंध है, जय श्री राम, कार सेवको के बलिदान की सौगंध है, बढ़ चल वीर जवान । अयोध्या करती हैं आव्हान, ठाट से कर मंदिर निर्माण ॥ इत शिवसेना उत बजरंग दल है, दुर्गावाहिनी में शक्ति प्रबल है, प्रण विश्वहिंदू परिषद का अटल है, जय श्री राम, प्रण विश्वहिंदू परिषद का अटल है, जो हिमगिरि की चट्टान । अयोध्या करती है आव्हान ठाट से कर मंदिर निर्माण । जिस दिन राम का भवन बन जाएगा, उस दिन भारत में राम राज आएगा, राम भक्तो का ह्रदय मुस्काएगा, जय श्री राम, राम भक्तो का ह्रदय मुस्काएगा, खिलते कमल समान । अयोध्या करती है आव्हान ठाट से कर मंदिर निर्माण । सजग हो रघुवर की संतान ठाट से कर मंदिर निर्माण । ॥ जय श्री राम ॥
  • Log in or register to post comments
G
Gk Fri, 08/07/2020 - 19:17 नवीन
रवींद्र जैन आंधळे होते तरी त्यांना शिवसेना दिसली. महाराष्ट्राची सत्ता गेल्यापासून भाजप्याना डोळे असूनही शिवसेना दिसायची बंद झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
ब
बाप्पू Sat, 08/08/2020 - 07:49 नवीन
G. K उर्फ मोगा भाऊ.. बाकी सगळं ठीक आहे.. पण तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवता आहात हे वाचून डोळे पाणावले.. अच्छे दिन ते हेच का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
G
Gk Sat, 08/08/2020 - 19:13 नवीन
भाजपावालेही मागची 35 वर्षे बाळासाहेबांच्या नावे साक्षात करवा चौथ करत होते म्हणे आणि 35 वर्षांनी भाजपा रिया चक्रवर्ती झाली पण सेना म्हणजे सुxxxx नव्हे , 1 दिली हाकलून आणि 2 आणले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 06:29 नवीन
मोगा खान शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवत आहेत अजून किती अच्छे दिन हवे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
स
सुबोध खरे Sat, 08/08/2020 - 07:57 नवीन
कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत मोगा खान शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवत आहेत अजून किती अच्छे दिन हवे आहेत? असदुद्दीन ओवैसी ने रामरक्षा म्हणायला हवे आहे का?
  • Log in or register to post comments
म
माझा_डूआइडी Sun, 08/09/2020 - 11:56 नवीन
कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत
त्यात चुक का आहे? राजकार्नात सगळं चालू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 06:28 नवीन
चूक कोण म्हणतंय? पण ज्यांनी राम हा काल्पनिक आहे असे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रात म्हटलंय. त्यांनीच त्याचे स्तोत्र म्हणावे यापेक्षा नैतिक पराभव कोणता असावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझा_डूआइडी
ड
डँबिस००७ Sat, 08/08/2020 - 13:01 नवीन
मोगा खान, अब बस भी करो, सिर्फ बर्नॉल लगाओ, जलेपे बस वोही काम आता है !!
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/10/2020 - 11:27 नवीन
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा