Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१

क
कलंत्री
Sat, 11/29/2008 - 16:14
🗣 56 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15383 वाचन

💬 प्रतिसाद (56)
आ
आजानुकर्ण Sat, 11/29/2008 - 16:20 नवीन
लेख फार विस्कळित आहे. मला अजिबात समजला नाही. स्पष्ट बोलल्याबद्दल माफ करा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 11/29/2008 - 16:34 नवीन
गांधीवादाने अतिरेक्यांचा खातमा करता येईल का? -१
=)) =)) =)) =)) =)) लेख वाचला नाही, पण कलंत्री साहेबांचं एवढा चांगला विनोद केल्याबद्दल हाबिणंदण ... इथे गांधीवाद कराल तर अरिरेक्यांऐवजी माझ्यासारखा कोणी नथू गोडसे त्याला गोळ्या घातल्याशिवाय रहाणार नाही. जे निष्पाप जिवांची हत्या करतात त्यांना गांधीवाद *ट समजेल ? नॉटीगीरी: बाकी आपल्याबरोबर गांधीवाद होतोय हे कळून अतिरेकी हसून हसून नक्कीच मरतील आणि त्यांचा बिना लष्कर, गोळ्या आणि कोणतेही एफर्ट्स न घेता खात्मा होईल. -(सावरकर वादी) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 11/29/2008 - 18:18 नवीन
टारूशेठशी सहमत. कलंत्री साहेबानी मनापासून लिहीलेले असल्याने त्याला अगदी मी विनोद नाही म्हणणार म्हणून टारूला +१ नाही. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 11/29/2008 - 18:57 नवीन
पेशवे साहेब , कलंत्री साहेब , वरील विनोद कोणालाही वैयक्तिक टार्गेट करून केलेला नाही, त्यामुळे वाईट वाटून घेउ नये. पण गांधीवाद आणि आतंकवाद याचा संबंध जोडणे हे हस्यास्पद वाटले म्हणून विचारावर आणि परिस्थितीवर एक गंभीर विनोद केला आहे. आमचा इतिहास कच्चा असला तरी आम्ही इतिहासात नापास मात्र झालो नव्हतो. गांधीच्या सत्याग्रहांमुळे आणि असहकारामुळे इंग्रज भारत सोडून गेले नाहीत. उलट गांधीवादामुळे आपलं स्वातंत्र्य लांबलं. दुसर्‍या महायुद्धा नंतर सर्व राजवट करणार्‍या देशांना आपल्या वसाहती मुक्त करणे भाग होते. इंग्रजांना सोडून जाणे जिवावर आलेलं, म्हणून त्यांनी जाता जाता देशाची फाळणी केली, आणि आपल्या प्रिय परमपुज्य शांतीवादी गांधीबाबांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि वर कितीतरी कोटी रुपये (जे अर्थात त्यांच्या मालकीचे नव्हते) पाकिस्तान राष्ट्र उभारणीसाठी दिले. पाकिस्तान ने तोच पैसा भारतावर आक्रमण करण्यासाठी वापरलेला. क्राँग्रेसच छगन सरकार हे गांधी-नेहरूंचच पिल्लू. त्यांच्या नितीने चालाल तर तुम्हाला तुमच्या सैन्याला व्हिआरएस द्यावा लागेलच. वरिल माहिती काहीशी चुकीची असू शकते पण त्यात सत्यता आहे हे आपणास माहीत असेलच. गोडसे भाउंनी त्यांचं काम करायला ४०-५० वर्ष उशिर केला. असो वरिल गोष्टींमुळे मला कलंत्री साहेबांचा मुद्दा हस्यास्पद वाटला. अर्थात माझा कोणावर रोष नाही. संपादकांना काही अक्षेपार्ह वाटल्यास त्यांची आगाउ माफी मागतो आणि प्रतिसाद उडवावा वाटल्यास माझी ना नाही. - टारू गोडसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/29/2008 - 16:22 नवीन
कलंत्री साहेब, मी या मुद्यावर बोलण्यापूर्वी तुमच्या पुढच्या भागाची वाट बघेन. मला तुम्हाला कश्या प्रकारचा गांधीवाद अभिप्रेत आहे ते बघायचे आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 11/29/2008 - 17:58 नवीन
समोरच्याला संधी देणे म्हणजे गांधीवाद. एक उदाहरण म्हणून सांगावेसे वाटते. शिवाजी महाराज शिस्तप्रिय, कठोर शासक म्हणून सगळेच समजतात. त्यांच्या आयुष्यात त्यांचे आणि त्यांच्या सेनापतीचे पाहिजे तसे जमले नाही. उदा. नेताजी ( बडतर्फ), प्रतापराव ( खफामर्जी) आणि अजून एक ( नाव आणि कृती विसरलो.), त्याच शिवाजीने मात्र आपल्या पुत्रासाठी ( मोगलाला जाऊन मिळालेले असतानाही), त्यांना मोगलाच्या तावडीतुन आणले आणि त्यांना समर्थाच्या सहवासात ठेवले. त्यांना संधी दिली आणि इतिहास म्हणतो की धर्मासाठी बलिदान करावे तर संभाजीसारखे. जर शिवाजीमहाराजानी शिस्त आणि शिक्षाकेली असतीतर? आता शिवाजीचा हा गांधीवाद नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/29/2008 - 18:39 नवीन
साहेब, माफ करा, २-३ वाक्यात खूप मोठा आवाका मांडता येणार नाही म्हणून असेल, पण खूप उथळ वाटले. तरी पण मी तुमच्या दुसर्‍या लेखाची वाट बघेन. त्या लेखात तुम्ही नक्की काय आणि कसे करू इच्छिता ते पूर्ण पणे मांडाल अशी आशा करतो. तरच काही बोलता येईल. समोरच्याला संधी देणे म्हणजे गांधीवाद. मी तेच करतोय. :) अवांतरः वर उथळ शब्द वापरल्याबद्दल गैरसमज नसावा. दुसरा यथार्थ शब्द लक्षात नाही आला पटकन. धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
श
शक्तिमान Sat, 11/29/2008 - 18:45 नवीन
आपण इतिहासामध्ये गफलत करत आहात.
शिवाजी महाराज शिस्तप्रिय, कठोर शासक म्हणून सगळेच समजतात. त्यांच्या आयुष्यात त्यांचे आणि त्यांच्या सेनापतीचे पाहिजे तसे जमले नाही. उदा. नेताजी ( बडतर्फ), प्रतापराव ( खफामर्जी) आणि अजून एक ( नाव आणि कृती विसरलो.)
हे आपले व्यक्तिगत मत चुकीचे आहे. जर सेनापतींचे आणि राजांचे पटत नसते तर एवढ्या मोठ्या परकीय सत्तेशी लढताच आले नसते आणि स्वराज्याची उत्कृष्ट व्यवस्था राखताच आली नसती. आणि ज्याच्याशी पटत नाही अशा माणसाला कोण कशाला सेनापती म्हणून नेमेल? नेताजी पालकरांना नंतर खुद्द शिवाजीराजांनी हिंदुधर्मात आणि हिंदवी स्वराज्याच्या कामी समाविष्ट करुन घेतले होते. बहलोलखानाला ठार न करता एकदा प्रतापरावांनी त्याला सोडून दिल्यामुळे राजांचा त्यांच्यावर रोष होता. यात प्रतापराव आणि राजे यांच्या पटण्या-न-पटण्याचा काय संबंध?
त्याच शिवाजीने मात्र आपल्या पुत्रासाठी ( मोगलाला जाऊन मिळालेले असतानाही), त्यांना मोगलाच्या तावडीतुन आणले आणि त्यांना समर्थाच्या सहवासात ठेवले. त्यांना संधी दिली आणि इतिहास म्हणतो की धर्मासाठी बलिदान करावे तर संभाजीसारखे. जर शिवाजीमहाराजानी शिस्त आणि शिक्षाकेली असतीतर?
संभाजीराजे मोगलांना का जाऊन मिळाले याची पार्श्वभूमी वेगळी आहे. आणि ते हिंदवी स्वराज्याविरूद्ध लढण्यासाठी तिकडे गेले नव्हते. शिवाय शिवाजीराजे स्वतः संभाजीराजांना आणायला गेले नव्हते - संभाजीराजांना आपली चूक समजून आल्यावर ते स्वतः परत आले होते. राजांनी नेताजी आणि संभाजीराजे या दोघांनाही समानच न्याय लावला होता. शिवाय या वरील उदाहरणांचा गांधीवादाशी काय संबंध आहे ते स्पष्ट होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कलंत्री Sun, 11/30/2008 - 05:25 नवीन
शिवाजी महाराजांशी सध्याच्या मूळ धाग्याचा संबंध नाही म्हणून मी प्रतिवाद देत नाही. आपण एकदा पुन्हा शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे असे सूचवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
इ
इनोबा म्हणे Sat, 11/29/2008 - 19:18 नवीन
आता शिवाजीचा हा गांधीवाद नाही काय? नाही, हवं तर त्याला शिवाजीवाद म्हणा. आणि हो, संभाजी महाराजांना संधी दिली गेली कारण शिवाजी महाराजांना आपल्या पुत्रावर विश्वास होता, आणि तो विश्वास संभाजी महाराजांनी सार्थ ठरवला. हीच संधी महाराजांनी अफजल्याला दिली असती तर कदाचित इतिहास बदलला असता. पृथ्वीराज चौहानने महंमद घौरीला दिलेल्या संधीने काय झाले हे माहित आहे ना? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
ऋ
ऋषिकेश Sat, 11/29/2008 - 19:28 नवीन
आता शिवाजीचा हा गांधीवाद नाही काय?
बापरे! हे बात कुछ हजम नहि हुई :) -(हाजमोलाच्या शोधात गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
स
सर्वसाक्षी Sun, 11/30/2008 - 05:53 नवीन
<समोरच्याला संधी देणे म्हणजे गांधीवाद. एक उदाहरण म्हणून सांगावेसे वाटते. शिवाजी महाराज शिस्तप्रिय, कठोर शासक म्हणून सगळेच समजतात. त्यांच्या आयुष्यात त्यांचे आणि त्यांच्या सेनापतीचे पाहिजे तसे जमले नाही. उदा. नेताजी ( बडतर्फ), प्रतापराव ( खफामर्जी) आणि अजून एक ( नाव आणि कृती विसरलो.)> समयास का पावला नाहीस? - आपला सेनापती आपल्या हुकुमानुसार वागत नसेल तर राजाला तो व्यक्ति म्हणुन प्रिय असला तरी त्यावर कारवाई करावीच लागते. नपेक्षा सैन्याची शेंदाड - बेशिस्त फौज झाली असती. द्वारकानाथजी, याच नेताजीचा जेव्हा महंमद कुलिखान झाला व जेव्हा पुढे त्याने आपल्या चुकीच्या परिमार्जनार्थ पुन्हा हिंदु होण्याचा व हिंदवी स्वराज्यात येण्याचा मानस व्यक्त केला तेव्हा याच राजांनी त्याचे स्वागत केले व त्याला आपल्यात सामावले. एखादा दाखला देताना पूर्ण हकिकत सांगावी, सोयिस्कर असे अर्धसत्य सांगु नये. सला काय निमित्त्ये केला? - सरसेनापती प्रतापराव गुजराने जिंकलेला बहलोल आपल्या अखत्यारीत दयेपोटी सोडुन दिला. आता तुमच्याच गांधीवादी भाषेत त्याला संधी दिली. त्याने काय केले? पुन्हा स्वराज्यावर उलटला! निवडुंगाच्या फडाला प्रेमाने कुरवाळले तरी तो तुमचा हात ररक्तबंबाळ करणारच. आता प्रतापरावावरील कारवाई विषयी - शत्रूशी तह करणे हा राजाचा अधिकार असतो, सेनापतीचा नव्हे. १९७१ विसरलात काय? कै. फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी 'तीन दिवसात कराची साफ करतो' अशी तयारी व तेख अंगी असतानादेखील पंतप्रधानांच्या आदेशादाखल कूच रोखली. जर सेनापती शत्रूला दया दाखवायचा निर्णय स्वतः घेऊ लागले तर लगोलग शिपाई देखील असे निर्णय घेऊ लागतील व सैन्याचा बोजवारा उडेल. द्वारक्कानाथजी पुन्हा तेच सांगतो. एखादा दाखला देताना पूर्ण हकिकत सांगावी, सोयिस्कर असे अर्धसत्य सांगु नये. राज्याभिषेक प्रसंगी राजांनी याच बहाद्दर सेनापतीची आठवण सिंहासनस्थ होण्याआढी आवर्जुन काढली होती व ते नसल्याचा शोकही केला होता. शिवाय प्रतापरावांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या पराक्रमाची नुसती तारिफ करुन ते थांबले नव्हते तर त्यांनी त्याच्या घराण्याशी सोयरिकही केली होती. राजाला प्रसंगी कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात. दोन्ही सेनापतींविषयी इतिहास हेच सांगतो. असे असताना 'राजांचे सेनापतिंशी जमले नाही' हे विधान अत्यंत खोडसाळ वाटते - जणु राजाची चमचे गीरी नकेल्यानेच राजे नाराज झाले होते असे भासविणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कलंत्री Sun, 11/30/2008 - 14:51 नवीन
सर्वसाक्षी महाराज, आपण मी जे काही लिहिले होते ते अर्धसत्य या सदारात टाकले. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीचा अन्वनार्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जाऊ शकतो. संदर्भ बदलतात त्याप्रमाणे खुलासे, स्पष्टीकरणही बदलले जाते. मला माझे मत प्रतिपादन करण्याचा आधिकार दिला पाहिजे. आपण ज्येष्ट आहात आणि शब्दाच्या योग्य वापराबद्दल जागृत रहाल अशी अपेक्षा आहे. ( खोडसाळ या शब्दाला आक्षेप आहे.) बाकी आपला प्रतिसादात अनेक दुबळ्या जागा आहेत आणि त्याचा समाचार घेणे शक्य असले तरी मूळ लेख सद्यस्थितीत अतिशय महत्त्वाचा असल्यामूळे आपणच आपला प्रतिसाद वाचावा आणि त्या जागा एका इतिहासकार म्हणून वाचाव्यात ही विनंती. सस्नेह, द्वारकानाथ कलंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 11/30/2008 - 18:29 नवीन
दुबळ्या जागा आवश्य दाखवुन द्या. मी आभारी राहीन <मला माझे मत प्रतिपादन करण्याचा आधिकार दिला पाहिजे. > अर्थातच! आपण आपल्याला जे वाटेल ते अवश्य लिहा, पण ते सर्वांना स्विकारार्ह असेल व आपलेच ते सत्य असेल असा अट्टाहास ठेवु नका. सत्याचा स्विकार करायची तयारी ठेवा. आता आपण आपले मत हे केवळ 'आपले मत' मत म्हणुन देत असाल व त्यामुळे शिवरायांचा अवमान होत असेल तर त्याला खोडसाळ्च म्हटले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
भ
भडकमकर मास्तर Sun, 11/30/2008 - 11:06 नवीन
मी पण हेच म्हणतो... पुढच्या भागाची वाट बघेन ...मात्र असले ब्रेनवॉश्ड आतिरेकी गांधीवादाला ऐकतील हे शक्य नाही... तालिबानसारख्या राजवटीपुढे गांधीवाद अजिबात अयशस्वी झाला असता असे माझे मत आहे.... पण कलंत्री यांची काही विधाने विचार करायला लावणारी आहेत... (वेळीच भान आले नसते तर आपणही कदाचित याच हिंसेच्या मार्गाला लागलो असतो वगैरे..)हे वाचून विचारमग्न झालो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सागर Sat, 11/29/2008 - 16:33 नवीन
कलंत्रीभाऊ, विचार छान आहेत. चर्चेस अतिशय योग्य, मांडणी अजून सुटसुटीत हवी हे मात्र खरे. माझे थोडेसे विचारः परत एका अहिंसावादाच्या पोकळ श्रद्धेला खतपाणी घालण्याएवढी आजची पिढी एवढी मूर्ख नक्कीच नाहिये , मुंबई च्या अतिरेक्यांवर विजय कोणी मिळवला? संसदेवरचा हल्ला कोणी परतवून लावला? कारगीलच्या वेळी काय झाले? एकदा अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळायला वेळ लागला. तेव्हा सगळे भारतीय अशिक्षित होते, मर्यादीत जीवनसरणी होती. आज सर्वसामान्यांच्या बुद्धीचा आवाका जागतिक झेप घेऊ शकतो. पण परत एकदा गांधीबाबांच्या शिकवणीचा पाठपुरावा? त्यापेक्षा शूराचे मरण मी जवळ करेन. (देशभक्त) सागर
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 11/29/2008 - 18:17 नवीन
लढा अहिंसाचा असो अथवा हिंसेचा. त्यात तयारी आणि शौर्य एकाच दर्जाचे लागते. पकिस्तानातील अतिरेक्यांच्या संदर्भात आपण गांधीवादाचा पुरस्कार भितीपोटी करत नाही. शेवटी तळहातावर शिर ठेऊनच लढा लढावा लागतो. त्याचप्रमाणे अतिरेकी आणि हिंसा याचा बिमोड शांतता आणि सद्भावनेनेच करावा लागेल असे माझे भाकित आहे.माझ्या माहितीप्रमाणे तो भाग अजूनही आपल्यात यायचाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
स
सर्वसाक्षी Sat, 11/29/2008 - 16:35 नवीन
<यात मला थोडाफार आशेचा किरण दोन गोष्टीमध्ये दिसतो.एकतर आपल्या देशात ब्रिटिशाविरुद्ध यशस्वी ठरलेला गांधीवाद (त्याचबरोबर जगाला शांततामय लढ्याला प्रेरणा देणारा) आणि अतिरेकी असली तरी ती माणसेच असावी. काल्पनिक भीतीच्या अथवा आदर्शाच्या पोटी त्यांना दिशाभूल करत असावेत असे मला वाटते> ब्रिटिशांविरुद्ध गांधीवाद यशस्वी ठरला म्हणजे नक्की कसा? त्या लढ्याचे साध्य काय? मुळात गांधीवाद म्हणजे काय? जगाला सोडा, शांततामय लढा तर आपल्यालाही पटला नाही. काश्मिर, गोवा, हैद्राबाद, पाकिस्तान, चीन....... सर्वत्र शस्त्रच कामी आले, अर्जविनंत्या वा प्रार्थना नाही. द्वारकानाथजी, एका हातात पुंगी आणि दुसर्‍या हातात दुधाची वाटी घेउन श्रीकृष्णाच्या यमुनाकाठी बसण्याने जर कालियाचे हृदयपरिवर्तन झाले असते तर त्याला काही हिंसेची हौस नव्हती. रावणाने सीतेचे हरण केले नसते व आपला दुराचार सोडला असता तर रामाला लंकेत जाऊन हिंसा करायचे कारण नव्हते अफझलखान जर सदिच्छाभेटीवर आला असता तर शिवरायांनी नक्कीच त्याचा कोथळा काढला नसता. असो.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 11/29/2008 - 18:08 नवीन
भेकडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा कौतुकास्पद असते. आपल्याचा दाखल्याप्रमाणे, रामाने रावणाला सिता परत करण्याची संधी दिली होती, अंगद शिष्टाई प्रसिद्धच आहे. रावणाने जर सिता परत केली असती तर रावणही मारला गेला नसता.त्याच प्रमाणे अफजल खान जर कपट न करता तर तोही परत जीवंत नक्कीच गेला असता. शिवाजीने सुद्धा विनाकारण हिंसा केली नाही. सुरतच्या लूटीत खानाच्या वकिलाने त्यांच्यावर हल्ला केला असता मराठ्यांनी सर्वच मुस्लिमसैनिक कापायला सुरवात केली होती. त्याला प्रतिबंध शिवाजीनेच केला होता. काश्मिरचा भाग गांधीच्याच जींवत असताना मिळवळा गेला होता. हैद्राबाद, गोवा किंवा इतरत्रही अगोदर सत्याग्रह, चर्चा केली होती. विचारपरिवर्तन हा गांधीवादी विचारसरणीचा गाभा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 11/30/2008 - 18:25 नवीन
<काश्मिरचा भाग गांधीच्याच जींवत असताना मिळवळा गेला होता. हैद्राबाद, गोवा किंवा इतरत्रही अगोदर सत्याग्रह, चर्चा केली होती.> हे सांगितलेत तर पुढचे ही कबुल करा की या सर्व प्रकरणात चर्चा, सत्याग्रह याचा उपयोग झाला नाही. झाला असता व हृदयपरिवर्तन होऊन शत्रू निघुन गेले असते तर भारत हा काही उगाच शस्त्रबळाचा वापर करणारा युद्धखोर नाही. सर्वत्र केवळ सशस्त्र लढा व वीरांचे बलिदान यामुळेच यश आले. काश्मिरात सत्याग्रह झाल्याचे ऐकिवात नाही. सरदार पटेलांचा तडफदार व त्वरित निर्णय आणि आपल्या सेनेची कुर्बानी यामुळेच काश्मिर वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
म
मृदुला Sat, 11/29/2008 - 17:10 नवीन
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 11/29/2008 - 17:24 नवीन
अजून पुढील भाग येऊ द्यात.. या भागावर काहिच प्रतिक्रिया नाहि -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 11/29/2008 - 17:51 नवीन
या लेखाद्वारे अतिरेकी कसे घडतात या प्रक्रियेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझ्या खर्‍या अनुभवाप्रमाणे, १००० वर्षातील हिंदू-मुस्लिमाचा संघर्ष आणि त्याचा दोन्ही बाजूने हवा तसा लावलेला अन्वनार्थ, फक्त स्त्रीयांच्यावर बलात्कार, विटंबनेचे किस्से ऐकवित जाणे, भारत फक्त आपलाच(म्हणजे हिंदुंचाच) आहे असा प्रचार करणे, कुराणातील हवे तसे दाखले देणे असा गोबेल्सप्रमाणे मनावर बिंबवत गेले तर हिंदुही अतिरेकी बनु शकतात/ बनतात. आता येथे पाकिस्तान / मदरश्यात हिंदु म्हणजे काफर, मुर्तीपुजक, त्यांना मारले तर जन्नत, भारतातील मुस्लिमावर अत्याचार होतात ( कपोलकल्पित कहाण्या), मुस्लिमांनी भारतावर ७००/८०० वर्ष राज्य केले आता हिंदु कसे राज्यकर्ते झाले असा भडिमार केला तर त्यांचे रक्त खवळणार नाही तर काय? परंतु या प्रक्रियेला गतीमान करणार्‍यांच्याच वर्तनात विसंगती दिसत जाते, प्रत्यक्ष जीवनात जगतांना खरे जिवन पुस्तकाच्या पलिकडे वेगळेच असते, हिंदु-मुस्लिमात शौर्य, भिती, प्रेम, लालसा सारखीच असते, शेवटी आपण सर्व एकाच मातीतुन बनलेलो आहे असे समजते तेंव्हा सर्व वृथा अभिमान गळुन पडतो. फक्त या प्रक्रियेत सर्व पायर्‍यांवरुन जाण्याची संधी कोणाला मिळते आणि कोणी मध्येच गोळीला बळी पडतो इतकाच काय तो फरक. लेखनात काहीसा विस्कळीतपणा असलाच तरी पुढच्या लेखात तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 11/29/2008 - 21:37 नवीन
गांधीवादाने अतिरेक्यांचा खातमा करता येईल का? उत्तर नाही असे आहे. बाकी अतिरेक नक्की कशाला म्हणत आहात? कारण ह्या लेखात अतिरेकी कारवाया, त्या ज्यातून निर्माण झाल्या आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न त्यावर गांधीवाद कसा योग्य याचा उहापोह दिसण्यापेक्षा भाजपावरच लेख दिसला.. म्हणून शिर्षक एकतर, "गांधीवादाने भाजपाचा खातमा करता येईल का?" असे तरी हवे अथवा, "गांधीवादाच्या अतिरेकाने भाजपाचा खातमा करता येईल का?" असे असल्यास उत्तम. आणि हो, आधीपण म्हणल्याप्रमाणे, गांधीवादाची भाषा करणार्‍याच्या लेखनात "खातमा' वगैरे शब्द योग्य वाटत नाहीत. गांधी तसे शब्द वापरत नसत. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 11/29/2008 - 22:24 नवीन
१. गांधींना आणि त्यावेळी देशाला शत्रू कोण याची पूर्ण कल्पना होती. सद्य परिस्थितीत आपल्याला ती नाही. आजही दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत, देशी आहेत का परदेशी आहेत यावर आपण आश्चर्य व्यक्त करत आहोत. अदृश्य शत्रूला (च्यामारी या त्रू ला काय धाड भरली आहे?) सत्याग्रहाने तोंड कसे द्यावे ते कळत नाही. २. गांधींना ब्रिटिशांना भारताकडून काय अपेक्षित आहे ते नेमके माहित होते. त्यामुळे त्याला विरोध करणे त्यांना आणि इतरांना शक्य झाले. ३. गांधी स्वतः ब्रिटनमध्ये शिकलेले, ब्रिटिश विचारसरणीशी ओळख असणारे होते. साऊथ आफ्रिकेत तळागाळात काम केल्यानंतर त्यांनी भारतात येऊन काम सुरू केले तेव्हा ते भारताला समाजसेवक, सत्याग्रही म्हणून ठाऊक होते. त्या ताकदीचा कोणताही नेता जो लोकांना बांधून ठेवू शकेल असा, मला भारतात दिसत नाही. ४. ब्रिटिश अधिकारी हे राणीचे नोकर होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा जाब त्यांना द्यावा लागत होता (त्यात खरे किती आणि नाटक किती वगैरे भाग वेगळा पण ब्रिटिश म्हणजे दहशतवादी अतिरेकी निश्चित नाहीत) त्यामुळे सरसकट सर्वच जनरल डायर ;) नव्हते. अशी अनेक कारणे असावीत ज्यामुळे ब्रिटिश आणि दहशतवादी यांत साम्य नाही आणि जर दोन शत्रूत साम्य नाही तर त्यांच्या विरुद्ध एकच एक धोरणही योग्य नसावे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/30/2008 - 05:35 नवीन
+१ याकारणांव्यतिरिक्त, मुद्दा#१ ला पुरवणी : ब्रिटीश हे आजच्या अतिरेक्यांसारखे भ्याड व भेकड नव्हते .. ते आपले खूलेआम शत्रु होते.. इथे अतिरेकी समोरच येत नाहित तेव्हा विचारपरिवर्तन करणार कोणाचे? -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
क
कलंत्री Sun, 11/30/2008 - 05:45 नवीन
अतिरेक्याची समस्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कोणत्याही मार्गाने का होइना समाधान तर शोधावे लागेलच ना? आपण गोंधळुन जाल तर आम्ही कोणाकडे पहायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ए
एकलव्य Sun, 11/30/2008 - 05:28 नवीन
बिन लादेनच्या ९/११ ला विवेकानंदांचे ९/११ (http://hinduism.about.com/library/weekly/extra/bl-sv1.htm) हेच उत्तर आहे. पण हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही. - एकलव्य
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 11/30/2008 - 05:39 नवीन
अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे. वेळेच्या आणि माझ्या अंगभूत लेखनकौशल्याच्या मर्यादेमूळे योग्य ते उत्तर देता येत नाही. माझा प्रत्येक वाचकाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण विश्वास आहे. तरीही त्यांनीही गांधीवादावरील पुस्तके ( वाचलेली नसल्यास) वाचावी ही शिफारस करावीशी वाटते. या पुस्तकात सत्याचे प्रयोग, मेरे सपनोंका भारत, हो,रामनावाने रोग बरे होऊ शकतात, अनासक्त योग इत्यादींचा समावेश होऊ शकेल. त्याचबरोबर विनोबाजींची आणि प्यारेलाल यांचीही पुस्तके वाचावीत. गांधींचे विपुल लेखन आजही उपलब्ध आहे. त्याचबरोबर गांधीवरील इतरही लोकांनी दोन्ही बाजूनी लिहिलेले आहे. जि़ज्ञासूनी त्याचाही लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. आज नकळतच अतिरेकी कारवायामूळे आपल्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अतिरेक या समस्येवर आपण एक तज्ज्ञ व्हावेत आणि आपली विचारसरणी, तर्कमिमांसा, माहिती बिनतोड असावी अशीच माझीही अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/30/2008 - 05:41 नवीन
ज्या गोष्टीमुळे समस्या सुरु झाली तिचाच आधार घेवुन समस्या सोडवायची. उत्तम. शुभेच्छा !! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 11/30/2008 - 06:03 नवीन
गांधीवादाने दहशतवादावर उत्तर जरूर मिळेल. घरोघरी रघुपती राघव राजाराम म्हणा आणि मारणार्‍यांसाठी आणि मरणार्‍यांसाठी प्रार्थना करा. चरख्यावर भरभर सूत कातून स्वतःचे पंचे स्वतःच तयार करा. ते सीमेवर आणि समुद्रकिनारी वाळत घाला. पंच्यांची अभेद्य तटबंदी मोडून अतिरेकी भारतात घुसूच कसे शकतील?सामाजिक ऐक्यासाठी वाटेल तितकी उपोषणे करा. पण उपोषणे सोडताना मोसंबीचा रस पिऊ नका तर दहशतवाद्यांनी मारलेल्या निरपराध लोकांचे रक्त प्या! तुमची हजारो उपोषणे सुटू शकतील इतके रक्त अतिरेक्यांनी एकट्या मुंबईतच सांडले आहे. पदयात्रा करत भरभर गांधींचे अपत्य पाकिस्तानपर्यंत चालत जा आणि सत्य आणि अहिंसेचा संदेश द्या. शत्रूला प्रेमाने जिंका. आपण शरीर नसून आत्मा आहोत ही भगवद्गीतेची शिकवण आपल्या मनात खोल रुजली पाहिजे. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ' तेव्हा दहशतवादी आपल्या शरीराला मारू शकतील, आत्म्याला नाही हे विसरू नका. हे सर्व केलेत तर दहशतवाद कसा चुटकीसारखा मिटतो तेच बघा. (गांधींचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 11/30/2008 - 07:53 नवीन
क्लिंटन साहेब, असे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाते म्हणजे अतीच झाले. गांधींचे नाव घेत अनेक लोक हुतात्मे होऊ शकतात हे ऐकले होते पण कोणाच्या नावाने शरीरात आग होते असे प्रथमच ऐकत आहे. कृपया योग्य तो उपचार करुन घ्या. कोणत्याही गोष्टीकडे शांतपणे बघता आले पाहिजे. उद्या तुम्हाला जर या देशाचे प्रंतप्रधान केले तर तुम्ही काय काय कराल अशा भुमिकेतुन विचार करा. जबाबदारीच्या भावनेतून मनाला शांती मिळते. जमल्यास पंचके मुहसे परमेश्वर ही प्रेमचंदाची कथा नक्की वाचा. कलंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 09:02 नवीन
कलंत्री साहेब, गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन वगैरे सद्य परिस्थितीत जरा कैच्या कै वाटून एखाद्याची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते तेव्हा योग्य उपचार वगैरे जरासे अप्रस्तूत वाटले. प्रत्येकाला मताचे स्वातंत्र्य आहे तेव्हा एखाद्याला तसे वाटणे काही गैर नसावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
अ
अनामिका Sun, 11/30/2008 - 11:48 नवीन
लेखक सोडुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांशी सहमत (गांधींचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा /जाणारी) L) (मी पण) ~X( "अनामिका"
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/30/2008 - 15:57 नवीन
लो एक और आ गया !! मी पण - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
आ
आपलाच गम्पु Sun, 11/30/2008 - 21:27 नवीन
आम्हि पन हेच बोलु रहिलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/30/2008 - 11:55 नवीन
ताणतणावातुन थोडी मुक्ति देउन मनमुराद हसवल्याबद्दल लेखकाचे आभार !! ह्या विनोदि लेखाच्या दुसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. तो भाग प्रथम भागापेक्षा जास्ती विनोदि असेल हि अपेक्षा ! आतुरलेला चतुर |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 12:11 नवीन
ताणतणावातुन थोडी मुक्ति देउन मनमुराद हसवल्याबद्दल लेखकाचे आभार !! ह्या विनोदि लेखाच्या दुसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. तो भाग प्रथम भागापेक्षा जास्ती विनोदि असेल हि अपेक्षा ! आतुरलेला चतुर =)) परिकथेतील राजकुमारा, कलंत्री सरांच्या छड्या खाणार तुम्ही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
क
कलंत्री Sun, 11/30/2008 - 14:55 नवीन
प्राध्यापक सर, अहो, गांधीवादात छ्ड्या मारायच्या नसतात तर स्वत खायच्या असतात. फार तर एखादे उपोषण करायला हवे....हलके घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Sun, 11/30/2008 - 15:00 नवीन
गांधीवादात छ्ड्या मारायच्या नसतात तर स्वत खायच्या असतात. म्हणजे उध्या अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या तर आम्ही अभिमानाने खायच्या काय ? मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/30/2008 - 15:14 नवीन
>>>फार तर एखादे उपोषण करायला हवे.... == का ? त्यामुळे काय होईल ? आमच्या विचारात फरक पडेल असे आपणास वाटत असल्यास वेळिच सावध व्हा !! हा उपाय आमच्या मातोश्रींनी अनेकदा वापरुन बघितला आमच्या लहानपणी पण उपयोग शुन्य !! "का वाळलीस ग बाई येव्हडी ?" ह्या सहानभुती पेक्षा जास्त काहि मिळाले नाही तिला ;) आपलाच टुण्णा हजारबाराशे |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
त
तिमा Sun, 11/30/2008 - 12:26 नवीन
आपल्या काश्मीरवरचा तसेच देशावरचा हक्क सोडून द्या. त्यांच्यातलेच एक व्हा. मग बघा, लगेच सर्व अतिरेकी कारवाया थांबतील. प्रतिसाद संपादित केला आहे. -चित्रा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/30/2008 - 13:02 नवीन
नक्की कोणत्या डोकेदुखीबद्दल बोलत आहात आपण अनामिकाताई? यावेळी आलेले सगळे दहशतवादी भारताबाहेरचे होते. अवांतरः भावनेच्या भरात विचारशत्रू बनून भडकावू विधाने करण्यापासून प्रत्येकाने स्वतःला रोखावे अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 13:07 नवीन
पण त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कुठे झाला ? जिथे शिक्षण घेतले तीच त्यांची जन्म आणि कर्मभूमी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चित्रा Sun, 11/30/2008 - 16:42 नवीन
काही प्रतिक्रिया संपादित केल्या आहेत, एक प्रतिक्रिया ही वरील प्रतिक्रियेतील जो भाग वगळला त्याच्याशीच केवळ संबंधित असल्याने अप्रकाशित केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अनामिका Sun, 11/30/2008 - 19:39 नवीन
चित्राताई ! मीच ते लिखाण उडवणार होते पण संपादन करणे शक्य झाले नाही. तश्या प्रकारच्या भाषेचा उपयोग केल्या बद्दल मी तुम्हा समस्त मिपा करांची क्षमा मागते. या पुढे अशी चुक होणार नाही याची खात्री बाळगा "अनामिका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/01/2008 - 05:17 नवीन
तश्या प्रकारच्या भाषेचा उपयोग केल्या बद्दल मी तुम्हा समस्त मिपा करांची क्षमा मागते. वयक्तिक म्हणाल तर आपल्या प्रतिसादातील बरीच वाक्य पुरुषमंडळी सर्रास बोलतांना वापरतात. मात्र एका स्त्रीला ( म्हणजे आपण स्त्री आहात असे ग्रहीत धरलेले आहे.) असे लिहितांना जरा आश्चर्यच वाटले तरी ती भावना योग्यच होती, या बाबतीत वयक्तीक माझ्या मनात तरी कोणती शंकाच नाही. पण आपल्याबरोबर मीही स्ट्रीक संपादकांचा आदर करतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
अ
अनामिका Sun, 11/30/2008 - 13:22 नवीन
एक वाक्य काढून टाकीत आहे. कृपया काही विषय हे सध्याच्या काळात भावना भडकावणारे आणि मिपाच्या दॄष्टीने दूरगामी परिणाम करणारे असू शकतात, त्यामुळे शब्दरचना जपून करावी ही विनंती. - चित्रा यावेळी आलेले सगळे दहशतवादी भारताबाहेरचे होते तिच तर खरी शोकांतिका आहे...........ते भारताबाहेरचे असले तरी त्यांचे लागेबांधे इथे कुणाशी तरी असणारच. "अनामिका"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/30/2008 - 13:28 नवीन
पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती की सरसकट अपमानास्पद (?) विधाने करु नयेत, भले ती स्त्रियांच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याबाबत असोत वा राजकारण्यांच्या चारित्र्याबद्दल वा इतर काही .... ! ९३च्या दंगलींच्या खटल्यात अनेक बहुसंख्यांपैकी(!) लोकांनाही शिक्षा झाल्या आहेत, त्यांना कुठे हाकलणार होतो (होतात) आपण? (बिहारी मित्र उज्ज्वल, पटकथाकार सलीम खान, क्रिकेटपटू इरफान पठाण, माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ अब्दुल कलाम, वर्गमित्र इमरान खान पठाण आणि सर्वसामान्य मुसलमानांबद्दल काहीही आकस नसलेली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
व
वेताळ Sun, 11/30/2008 - 13:22 नवीन
त्यानी अहिंसेचा मार्ग आयुष्यभर पाळला व वापरला. त्यात त्याना यश आले. परंतु तो मार्ग सुसंस्कृत समाजात वापरण्या योग्य आहे. तो जर रानटी लोकांसमोर वापरला तर ते आपले मटण सुप बनवुन खातील.तेच आज दिसत आहे. लेखकाने समजुन घेणे गरजेचे आहे की अहिंसा हे तत्व गांधीजी फक्त स्वातंत्र्य मिळवण्याकरिता वापरणार होते. देशाच्या रक्षणाकरिता सैन्य बाळगावे लागणार व त्याचा वापर करावा लागणार हे त्याना माहित होते.अंतर्गत सुरक्षा करताना बळाचा वापर करावा लागणार हे त्यानी १९४७ मध्ये कलकत्ता येथे दंगलीनिमित्त झालेल्या त्याच्या उपोषनावेळी सांगितले होते. मी गांधीजीचा कट्टर विरोधक आहे. पण त्याच्यावर जाहिर टिका करण्याइतपत मोठा नक्कीच नाही.फक्त त्याची तत्वे समजावुन घ्या. त्याचा विपर्यास अर्थ काढु नका. वेताळ
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा