शोध आणि धागेदोरे: Research and References
💬 प्रतिसाद
(4)
च
चौथा कोनाडा
Mon, 04/05/2021 - 14:05
नवीन
अतिशय रोचक सुरुवात.
लेखन नेहमी प्रमाणेच सरस, ओघवते, उत्सुकता जागवणारे !
हार्दिक शुभेच्छा !
- Log in or register to post comments
म
मनो
Mon, 04/05/2021 - 21:33
नवीन
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले.
खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत.
"""
'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं
"""
दुसरे उदाहरण -
"""
फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे!
"""
इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो.
अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते.
असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.
- Log in or register to post comments
ल
लेखनवाला
Tue, 04/06/2021 - 09:26
नवीन
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय.
आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल.
"तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.
- Log in or register to post comments
म
मनो
Wed, 04/07/2021 - 00:31
नवीन
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.
- Log in or register to post comments