१. मिनी लॉकडाऊन : दिवस पहिला
काल उद्धव ठाकरेसाहेबांनी करोनाच्या केसेस चा वाढीव आकडा पहता कडक निर्बंध आणि वीकेंडला संपुर्ण लॉकडाऊन ची घोषणा केली . #मिनीलॉकडाऊन . आज संध्याकाळपासुन आठ वाजल्यापासुन त्याची अंमलबजावणी सुरु झाली , त्या अर्थाने आज लो़कडाऊनचा पहिला दिवस. मागच्या वर्षीच्या मिपावरील लॉकडाउन स्पेशल लेखमालिकेत लेख लिहिता न आल्याची खंत मनात होतीच , ती दुर करण्याची संधी सरकारने दिली ह्यबद्दल मी सरकारचा आभारी आहे ;)
________________________________________
खरंतर लिहिण्यासारखं खुप आहे पण सगळंच अघळपघळ ...
अगदी खरंच बोलायचं तर लॉकडाऊन आपल्याला काही झेपला नाही. आपली वृत्ती आधीही तशीच "विरक्त" अन बोली भाषेत बोलायचे तर आळशी होती, लॉकडाऊन मध्ये गेले ज्वळपास १ वर्ष हाच प्रश्न मनात घोळत राहिला , अजुनही घोळतोय , कि का आपण उगाच इतका उपद्व्याप करतोय ? काय गरज काय आहे इतकं सगळं करण्याची . सकाळी जेवल्यापासुन रात्री झोपेपर्यंत कोडींग चालु आहे का तर हजारो मैल दुरवर असलेलेल्या कोणत्या तरी बँकेचा नफा वाढावा म्हणुन . बरं कितिहि हुच्च काम केलं तरी आपल्याला काय मिळनार आहे तर केळंच . ती सुध्दा रुपायातील, डॉलर मधली नाहीच ! मुळातच येवढं सगळं करायची गरजच काय ? आणि करायचंच असेल तर स्वत:साठी का बरे करु नये इतके कष्ट ? प्रश्ण डोक्यात फिरत रहातात , उत्तर काही सापडत नाही. अगदीच खुपच निराश वाटतं , वाटतं की सगळं सोडुन द्यावं अन गडावर जाऊन रहावं समर्थांच्याजवळ , किंव्वा तेही नको अगदीच जंगलात जाऊन राहावं एकांतात. तेव्हा महाराजांनी व्यंकोजी राजेंना लिहिलेलं पत्र काढुन वाचतो , अन परत रुटिन चालु ठेवतो-
"रिकामे बैसुन लोकांहांती नाचीज खाववुन काल व्यर्थ न गमावणे. हे कार्य करावयाचे दिवस हायेती . वैराग्य तो उत्तरवयी कराल ते थोडे आज उद्योग करुन आम्हांसही तमासे दाखवणे "
ऑफिस होतं तेव्हा काहीनाकाही विरंगुळा होता मनाला , दोन मिटींग मध्ये ब्रेक असायचा, अगदी ओफिसला जाताना अन घरी येताना मनाचे गेयर शिफ्ट करता यायचे, आता अखंड काँप्युटर समोर असल्याने लॅपटॉप अन वाचन अन चिंतन सोडुन काहीच होत नाही. काही काही मित्र म्हणाले की "जरा अतिच होत नाहीये का ?" पण अभ्यास कधीच अति होत नसतो असं माझं ठाम मत आहे ! काय काय वाचलं नाही गेल्या वर्षात ! फायन्नास , पायथॉन, मशीन लर्निंग , आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , अॅल्गोरिदमिक ट्रेडिंग, माकियावेली चं प्रिन्स, फ्रेडरिक निचा चं बियाँड गूड अॅन्ड इव्हिल आणि दज स्पोक झरत्रुष्ट्रा वाचायला घेतलं पण हे जरा वाढीव काम आहे , ह्याला निवांत वेळ पाहिजे . बाकी अमृतानुभव सतत ऐकणे होतेच त्यातील दोन अध्याय तर पाठही झालेत ! अफलातुन पुस्तक आहे , त्यावर लिहायला घेतलं होतं , ४ - ५ लेख लिहिलेही , पण आता कशाचीच गरज वाटत नाही , कोणाला सांगुन कळणारं नाहीये , आणि कोणाला कळायची गरजही नाहीये , हेसगळं स्वांतःसुखाय आहे : "तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी|| "
___________________________________
बाकी ऑफिसात एक "महत्वाची गोष्ट " मात्र राहुन गेली.
"खरं सांगु का , तुला पाहुन मला माझ्या लहानपणीच्या क्रशची आठवण होते . "
"येस, आय नो दॅट ! तु मला आधीही सांगितलं आहेस, बट व्हॉट डु यु एक्झॅक्टली वॉन्ट टू से ? "
" आपण असं कधीतरी निवांत डिनर ला भेटुयात का ?"
" आर यु अस्किन्ग मी फॉर अ डेट ?"
" अ डेट ? , रोमॅन्टिक डेट ? नो...... आय मीन मे बी....... आयमीन काईंड ऑफ ..... आयमीन येस ....... ऑफकोर्स. लेट्स गो फॉर अ डेट !"
" (स्माईल) येस , वी विल गो फॉर अ डेट . आधी तु तुझी ट्रिप करुन ये , मलाही घरी जाऊन यायचं आहे , आल्यावर निवांत भेटु ;) "
त्यानंतर अस्मादिकांची बहुचर्चित बॅकपॅकिंग ट्रिप झाली, तीही घरी जाउन आली , अन त्यानंतर लॉकडाउनच लागला . त्यात भेटणे शक्यच नव्हतं . शेवटी शेवटी भेटता आलंही असतं पण घरी काय कारण सांगणार ? ती तरी काय कारण सांगणार ? भेटणार तरी कुठं ! भें*&* ह्या करोनाने सगळंच अवघड करुन टाकलं ...
हे प्रकरण म्हणजे मिपावर एखादी लेखमालिका वाचायला घ्यावी , त्यात अगदी मन गुंतावं अन लेखकाने क्रमशः लिहुन काहीच न सांगता कथा अर्धवट सोडावी असं काहीसं झाली =))))
हे असं पुर्णविराम, स्वल्पविराम , अल्पविराम असली काहीच विरामचिन्हे न देता अर्धवट सोडलेली वाक्य मला आवडत नाहीत त्या पेक्षा खाडाखोड आणि गिरगोटा झाला असता तरीदेखील परवडला असता.... पण हे असं .... अपुर्ण .... फार वाईट !
__________________________________________
गेला आठवडा लोंग वीकेन्ड केला , टोट्ल ९ दिवस मिळाले एकदम रिलॅक्स . त्यात एक गोष्ट मात्र अनुभवली : सुट्टीच्या पहिल्या दिवशी झटकन एकदम सगळी टेन्शन्स आणि ओफिसची कामे मनातुन जात नाहीत , हळु हळु विस्मरण होत जाते ! आणि शेवटी शेवटी तर आठवतही नाही कि काय काम चालु होते , कोणती स्प्रिन्ट चालु होती अन कोणत्या कोड मध्ये कोठे बग्स होते , संपुर्ण विस्मरण होते !
ही गोष्ट , हा अनुभव मला फार आशादायी वाटतो - आपण ह्या प्रापंचिक व्यापात अडकलो आहोत, कळत न कळत ह्यातील अनुभवांचे मनावर , विचारसरणीवर परिणाम होत आहेत , आयुष्यभराच्या सवयींचे गुलाम झालेल्या अनेक लोकांची उदाहरणे अगदी जवळुन पहायला मिळाली ( ही देखील लॉकडाऊनचीच कृपा ! ) , आपणही असेच आदत से मजबूर तर होणार नाही ना असा , काहीसा निराशाजनक, विचार मानात डोकावुन गेला होता मागच्या वर्षी. त्याचं उत्तर सापडलं -
नाही ! नक्कीच नाही !!
ज्या दिवशी आपण सुत्टी घेऊ , ह्यातु बाहेर पडु , तसे हळु हळु विस्मरण होत जाईल ह्या व्यापांचे ! आणि आपण निवांतपणे अमृतानुभव जगु शकु !
उठिला तरंगु बैसे । पुढें आनुही नुमसे ।
ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ ७-१८६ ॥
पाण्यावर उठलेला तरंग शांत झाला , त्याचा अंशही उरला नाही की पाणी कसे शांत होते तसे काहीसे ! म्हणजे पाणी आधीपासुनच पाणीच होतं , त्यावरील तरंगाचा केवळ आभास होता , आणि आता तर तोहि संपला !!
हे जे काही प्रापंचिक व्याप आहेत , कौटुंबिक जबाबदार्या आहेत , स्वतःच्यच महत्वाकांक्षेने पायात घायलेल्या आशा बेड्या आहेत , हे सगळं सगळं केवळ तरंग आहेत , एकदा "सुट्टी" मिळाली की हे सगळे तरंग आपोआप हळु हळु शांत होत जातील . नक्कीच !
_______________________
असंच सगळं अघळपघळ आहे . हे असंच रहाणार ! काय माहीत ऑफिस कधी सुरु होईल , तुर्तास तरी " वर्क फ्रॉम होम " आहे , आणि जोवर सर्वांना वॅक्सिन मिळत नाही तोवर ओफिस सुरु होणार नाही ह्याची खात्री आहे ! त्यामुळे हा लॉकडाऊन किमान सातार्यात रहायला मिळाणार हा आनंद आहे !
सर्व मिपाकरांना नवीन मिनी लॉकडाऊन च्या हार्दिक शुभेच्छा !
घरी रहा सुरक्षित रहा !
असे काही म्हणत नाहीत तोपर्यंत लॉकडाऊन झाल्यासारखे वाटत नाही.