गायी दूध देत नाहीत
गायी दूध देत नाहीत
एक शेतकरी लहान असताना त्याच्या मुलाला सांगायचा: - जेव्हा तू वयाच्या 12 व्या वर्षी पोचशील तेंव्हा मी तुला आयुष्याचे रहस्य सांगेन.
एके दिवशी जेव्हा सर्वात मोठा मुलगा 12 वर्षांचा झाला, त्याने चिंताग्रस्तपणे आपल्या वडिलांना विचारले की जीवनाचे तुम्ही रहस्य सांगणार होतात ते काय आहे.
वडील म्हणाले गाय दूध देत नाही.
"तुम्ही हे काय बोलताय?" मुलाला अविश्वासाने विचारले.
“बाळा, गाय दूध देत नाही, आपल्याला ते (दूध) काढावे लागते.
आपल्याला पहाटे 4 वाजता उठणे आवश्यक आहे, शेणाने भरलेल्या गोठ्या मधून चालणे आवश्यक आहे, गायीचे पाय, शेपटी बांधावी लागते, स्टूलवर बसावे लागते, बादली ठेवून दूध काढावे लागते.
तेच आयुष्याचे रहस्य आहे, गाय दूध देत नाही तुम्हाला ते काढावे लागते.
असेच बाजाराचे आहे.
आपल्याला समभाग कोणते चांगले आहेत याचा अभ्यास करावा लागतो
अचूक वेळेवर ते विकत घ्यावे लागतात
आणि
अचूक वेळेवर विकावे लागतात.
यापैकी हा शेवटचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे आणि तोच दुर्दैवाने कोणताही पंडित हे तुम्हाला कधीही शिकवत नाही.
यामुळे काय होते.
जसे एखादे फळ तुम्ही काढता तेंव्हा ते एकतर कच्चे निघते किंवा अतिपक्व झालेले असते.
तद्वत एखादा समभाग तुम्ही घेता आणि तो चढला म्हणून खुशीने तुम्ही विकून टाकता आणि तो पुढे जाऊन मल्टी बॅगर होतो आणि तुमच्या दसपटीने नफा ( दुसऱ्याला) देतो.
याउलट तुम्ही एखादा समभाग अजून चढेल म्हणून ठेवता आणि तो पडत जातो आणि सतत सर्किट लागत राहते आणि तुम्ही विकेपर्यंत त्यांची किंमत तुमच्या खरेदी किमतीच्या अंशमात्र होते.
अशी स्थिती आपल्यासारख्या १०० % नाही तरी ९९ % सामान्य निवेशकांची कधीतरी किंवा बर्याच वेळेस होते.
उरलेले १ % ज्यांचे समभाग कधीच पडत नाहीत आणि त्यांना कायम नफाच मिळत जातो आणि कोट्याधीश होतात असे विद्वान हे अपवादात्मकच आहेत त्यांच्या बद्दल मी बोलत नाहीये.
मी यातून अनेक वेळेस गेलो आहे. उदा. मी टायटन या कंपनीचे समभाग २६० -२८० ला घेतले आणि ते वाढत वाढत जाऊ लागले. तेंव्हा ५०० आणि ६०० च्या मध्ये विकून टाकले. कारण सोने एवढे चढेल असे मला वाटलेच नाही आणि हे समभाग चढतच गेले आणि १५०० च्या वर गेले.
याच्या उलट पिपावाव शिपयार्ड नावाचे समभाग मी ५०- ५५ रुपयाला घेतलेले होते ते ९० -१०० च्या पुढे गेले म्हणून मी अजून थांबू या असा विचार करून थांबलो. हि कंपनी श्री अनिल अंबानी यांनी विकत घेतली आणि मी विकायचा विचार करेपर्यंत त्याला लोअर सर्किट लागले आणि ती किंमत एक आकड्यात येऊन थांबली. आता ते समभाग विकून काय मिळणार अशा विचाराने मी ठेवलेले आहेत.
तेंव्हा समभाग विकत घ्या आणि विसरून जा असे सांगणारे पंडित सुद्धा आपल्याला गाळात घालतात. १९८४ साली सेन्सेक्स १०० होता आणि आता जातो ५० हजार झाला आहे हे सांगणारे महापंडित एक विसरतात कि त्या वेळेस सेन्सेक्स मध्ये असलेलय ३० शेअर्स पैकी आता फक्त काही शेअर्स सेन्सेक्स मध्ये आहेत. आणि तेंव्हा तुम्ही ते समभाग घेऊन विसरून गेलात तर तुमचे पैसे बुडाले असते.
मी स्वतः जेवढे समभाग लोकांच्या टिप्स वर विकत घेतले आहेत किंवा विकले आहेत त्यात ९० % पेक्षा जास्त वेळेस नुकसानच झाले आहे. आणि हि माणसे मला बुडवण्यासाठी असे करत होती असे मुळीच नाही तर काही माझे चांगले मित्र आहेत किंवा नातेवाईक सुद्धा. एवढंच झालं कि त्यांचा स्वतःचा अंदाज सुद्धा चुकला.
उदा टाटा एलेक्सी हा समभाग मी २०० रुपयाला विकत घेतला होता तो चांगला २३०० पर्यंत गेला तेंव्हा माझ्या एका नातेवाईकाने जे स्वतः एका MNC मध्ये आय टी चे हेड आहेत त्यांनी या कंपनीचे व्यवस्थापन "भिकार" आहे असे सांगितले आणि त्यामुळे मी तो समभाग २३०० च्या आसपास विकून मोकळा झालो. यानंतर त्या कंपनीने एकास एक बोनस दिला आणि आता त्याचा समभाग २७०० च्या आसपास आहे. म्हणजे माझ्या साठी ५४०० पर्यंत गेला असता. हा मागच्या मार्च मध्ये मला घ्यायचा होता जेंव्हा तो ५००-५५० च्या आसपास होता पण इतर अनेक ब्लु चिप शेअर्स घातल्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते.
या अनुभवानंतर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मी स्वतः विकत घेतलेले बरेचसे समभाग चांगले होते आणि टिप्स वर घेतलेले बहुतेक सगळे समभाग भिकार निघाले. तेंव्हा आता "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे"
माझ्या एका मित्राने मला आमची जमीन विकताना एक साधी गोष्ट सांगितली.
म्हणजेच
हा शब्द ठळक का केला आहे हे आणि यातच
चा अर्थ काय आहे हे सोप्या मराठीत समजावून घ्या मग बोलू