Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विलासराव अडचणीत

क
कवटी
Sun, 11/30/2008 - 12:50
🗣 24 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4672 वाचन

💬 प्रतिसाद (24)
अ
अनामिका Sun, 11/30/2008 - 13:00 नवीन
विलासरावांसारखा बधिर माणुस मी भारताच्याच काय जगाच्या राजकारणात मला कळायला लागल्यापासुन बघितलेला स्मरणात नाही. परिस्थितीच गांभिर्य लक्षात घ्यायच असत हेच या गुलछबूला माहित नसाव्,इतका संवेदनाशुन्य,तारतम्य नसलेला इसम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याची खरच लाज वाट्ते. गेंड्याच्या कातडिचे राजकारणी तयार करण्याची काँग्रेसची परंपरा विलासराव पुढे नेत आहेत. लोकांनी भर रस्त्यात जेथे जातिल तेथे यांची खेटराने पुजा बांधावी...... X( "अनामिका"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/30/2008 - 15:45 नवीन
गेंड्याची कातडी ही कोणत्याही एका किंवा समान विचारसरणीच्या पक्षाची मक्तेदारी नाही असं एक वैयक्तिक मत! (उगाच इतरांना जखमा होण्याचं नाटक करायला का भाग पाडताय?) बाकी देशमुख पिता-पुत्र आणि रामू यांचा निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/30/2008 - 13:15 नवीन
>>>लोकांनी भर रस्त्यात जेथे जातिल तेथे यांची खेटराने पुजा बांधावी...... = खेटरांचा अपमान केल्याबद्दल "अनामिका" ताईंचा जाहिर निषेध !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/30/2008 - 13:22 नवीन
पूजाच्या अपमानाला वगळल्याबद्दल राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा! "विनाशकाले विपरीतबुद्धी" असं यत्ता आठवीच्या संस्कृतच्या पुस्तकात लिहिलं होतं. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/30/2008 - 13:59 नवीन
>>पूजाच्या अपमानाला वगळल्याबद्दल राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा! == ह्या अपमानाला वगळण्यामागे पुजा नावाविषयी वैयक्तिक आकस असावा काय ? :? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सहज Sun, 11/30/2008 - 13:17 नवीन
खुर्ची जाईल हे कळाले असावे. निदान मुलाच्या सिनेमाचे व कदाचित विशेष सहाय्याचे काही टक्के कशाला सोडायचे. कमाई चालू राहीली पाहीजे हो कीनई? :-)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 11/30/2008 - 14:35 नवीन
बांडगुळांना कसली आलीये अडचण ? विलास आणि आबा हि बांडगुळं उलंट दुसर्याचीच अडचण करतील.
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sun, 11/30/2008 - 14:40 नवीन
"पप्पा, आज सुट्टी आहे... चला ना कुठेतरी..." इति (डोक्याने) 'रिते'श. "असं म्हणतोस का... ताज महाल पाहुयात का?" - विलासी तात "हो sssss! कित्ती मज्जा! ताज पाहू.. गेट वे ऑफ इंडिया पाहू. रामूकाकांना पण घेऊन जाऊ..." "चालेल हां बेटा... नंतर चौपाटीवर भेळही खाऊ"
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 11/30/2008 - 14:50 नवीन
हाकला. शिवराज पाटलाप्रमाणे या विलासरावालाही हाकला. ताबडतोब शरद पवारांना महाराष्ट्रात परत बोलवा. या प्रसंगी पवारांव्यतिरिक्त परिस्थितीचे गांभीर्य जाणून निर्णय घेणारा व प्रशासनावर नियंत्रण असणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्या विलासरावाला सांगा की रितेशचे पिक्चर बघण्यासाठी तरी माणसे जिवंत राहायला हवी आहेत.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 11/30/2008 - 15:51 नवीन
एकदम मान्य! जरी लोकशाहीत केवळ एकाच व्यक्तीवर (आणि कुठल्याही एकाच पक्षावर) सर्व अवलंबून राहण्याची वेळ यावी असे होणे चांगले नसले आणि तसे होऊ नये असे वाटले तरी, पवार आत्ता योग्य या विषयी दुमत नाही. पण मला तर पवारांना आत्ता गृहमंत्री (प्रधानमंत्री होणे शक्य नाही) झाले तर योग्य वाटते कारण सध्याचे हल्ले हे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टारझन Sun, 11/30/2008 - 16:18 नवीन
शिवराज पाटलाप्रमाणे या विलासरावालाही हाकला.
सहमत ... हे आज नाही तर उद्या होणारच आहे
ताबडतोब शरद पवारांना महाराष्ट्रात परत बोलवा. या प्रसंगी पवारांव्यतिरिक्त परिस्थितीचे गांभीर्य जाणून निर्णय घेणारा व प्रशासनावर नियंत्रण असणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही.
अरे काय रे कर्णा, महाराष्ट्राच्या मदतीसाठी पवारांना बोलवावं लागावं ? काय देव बिव आहेत का रे ते ? शरद पवार जेंव्हा मुख्यमंत्री होते, तेंव्हाच्या ,मुंबई बाँबस्फोटाच्या वेळी त्यांनाही घामच फुटलेला. क्रिकेट मधे रमलेला माणूस , काय गांभिर्य ओळखणार रे ? मला तरी कोणीच दिसत नाहीये. कदाचित ठाकरे आले तर ते काही तरी आडवा निर्णय घेतील,त्याने ही नुकसान होइल पण आता होतंय त्यापेक्षा ते बरं असं वाटेल . अँटीपवार - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 11/30/2008 - 17:26 नवीन
या प्रसंगी जनतेला धीर देणारा समंजस निर्णय हवा आहे. दुर्दैवाने पवार वगळता महाराष्ट्रात इतर नेता नाही याचा खेद वाटतो. ठाकरे आले तर त्यांच्याकडे सर्व प्रश्नांना वडापाव हे एकच उत्तर आहे. अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी शिववड्याचा वापर करा असेही ते सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे तर नकोच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ल
लवंगी Sun, 11/30/2008 - 15:22 नवीन
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.. जनतेने हाकलून लावायला पाहिजे .. र र पाटील म्हणे "मी का राजीनामा देऊ. मी योग्य कारवाई केली".. अरे जरातरी लाज बाळगाकी? जबाबदरीची लोकलाजेस्तव तरी जणिव ठेवा..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 20:10 नवीन
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.. हेच खरं..! सगळेच नालायक आहेत... गलिच्छ राजकारण करत बसणं आणि स्वत:ची तुंबडी भरणं एवढंच त्यांना जमतं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
स
सखाराम_गटणे™ Sun, 11/30/2008 - 15:36 नवीन
क्रुपया, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल लिहीताना योग्य शब्द वापरवेत. सदर बाबी कायद्याच्या कचाट्यात येउ शकतात. पदांचा उपमर्द करु नये.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 11/30/2008 - 16:02 नवीन
पदांवर मिरवणार्‍यानी आपापली जबाबदारी विसरल्यास त्याना जराही जाब विचारायला नको का? किती ते घाबरून जगायच! तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
त
तिमा Sun, 11/30/2008 - 15:53 नवीन
या रामूला याच्यावर फिल्लम् काढायची असंल म्हनून ग्येलं असेल तिकडे त्ये बेनं! प्रेताच्या टाळुवरचं लोनीच की!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 11/30/2008 - 16:01 नवीन
हा पदांचा उपमर्द मुळीच नाही.. पदांवर मिरवणार्‍यानी आपापली जबाबदारी विसरल्यास त्याना जराही जाब विचारायला नको का? किती ते घाबरून जगायच! तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व..
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 11/30/2008 - 16:12 नवीन
आजकाल कोणीही शिंकले तरीही मिडीया त्याची ब्रेकिंग न्युज बनवते. त्याधर्तीवर मुख्यमंत्र्यांनी तरी थोडेफार तारतम्य पाळायला हवे होते! असो, मुख्यमंत्र्यांनी (अन् गृहमंत्र्यांनी?) या हल्ल्याची नैतीक जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/30/2008 - 16:46 नवीन
हद्द झाली. अरे काही लोकोपयोगी कामं केली नाहीत (असं तरी कसं म्हणायचं, रामूला विध्वंस दाखवून आणलाय ते कामच आहे.) आता निदान पोराला बरोबर घेऊन जायचं हास्यास्पद काम तरी नको. राजीनामा द्यायलाच हवा (निदान मनाची तरी ). रेवती
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 11/30/2008 - 22:30 नवीन
विलास राव जाउ द्यात राखी सावंत ला मुख्य मंत्री बनवा
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Mon, 12/01/2008 - 05:46 नवीन
२ पाटिल गेले आता देशमुख कधी राजिनामा देतात ते बघु? पुंन्हा "अंतरात्मा की आवाज" हा तकिया कलाम ऐकावा लागेल आता. कानावर हात ठेवण्याची स्माईली नाही का मिपावर ? "अनामिका"
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Mon, 12/01/2008 - 07:54 नवीन
प्रसंगाचं गांभिर्य ओळ्खून नुसताच राजिनामा मागणं हे पुरेसं आहे का? राजीनामा मागून हे सगळं थांबेल असं वाटतं का? हे नाहीतर दुसरे कोणीतरी ह्या खुर्चीवर बसायला आसुसलेले आहेतचं. सडलेल्या राज्यव्यवस्थेला नेताबदल कितपत परवडू शकतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नविन आलेले पुन्हा निवडणुकिच्या बाजारात 'आम्ही हे केलं, आम्ही ते केलं' असं बोंबलायला तयार कारण निवडणुकांपर्यंत ह्याचा काहीतरी सुगावा लागणारच.(जो सगळ्यांना माहीत आहे. पण लोकांपुढे नव्याने तिच माहीती द्यायची). ह्यावर कायमचा उपाय एकच. सर्व नेत्यांना भर रस्त्यात उभं करुन फटके मारावेत. कामं करा नाहीतर मरायला तयार व्हा असं पाहीजे. सामान्य जनता अशी चिडून उठल्याशिवाय नेते हादरणार नाहीत. एकाला धडा शिकवला की बाकीचे सुतासारखे सरळ येतील आणि तिच खरी लोकशाही असेल.
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Mon, 12/01/2008 - 14:21 नवीन
या सर्व काथ्याकुटात कुठेहि मुळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न केलेला नाहि. केवळ कुणा मन्त्र्या सन्त्र्याने राजिनामा दिला म्हणजे राज्य सुरळित सुरु राहिल आणि हे दहशत वादि पुन्हा असे हल्ले करणार नाहित असे कुणि समजत असेल तर ती एक शोकान्तिका आहे. कुणिहि मन्त्रि असो तो सर्व प्रथम भारतिय आहे त्याच्या विषयी सन्मान पुर्वक भाषा वापरावि ही एक विनन्ती. आपण आपल्याच देशातिल व्यक्तिला लाखोलि वाहात असतान्ना आपले देश प्रेम सिद्ध होते, कारण ती व्यक्ति आपल्याच मतदानामुळे तिथपर्यन्त पोहोचलि आहे (मुळ चुक आपलिच..... काळ्जी आपणालाच नाहि). या सर्व परिस्थितित देशात राष्ट्रपती शासन लागु करुन देश लष्कराच्या स्वाधीन करावा आणी या सर्व उपद्व्यापान्चा बन्दोबस्त झाल्यावरच कोण ती लोक शाहि कि काय म्हणतात ती लागु करावि................. पाक अब नापाक हो चुका है | उसे अब भारत मे शामिल करना हि होगा |span> दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा