श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥
जागृती , जागेपणा म्हणजे काय ? झोप नसणे म्हणजेच जागेपणा . निद्रेचा अभाव हीच जागृती ! कित्त्ती सोप्पं आहे हे समजायला . तसेच अज्ञानाचा अभाव हेच ज्ञान ! Absence of delusions is the enlightenment. आता आपण आरशात पहातो तेव्हा आपल्याला आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते , मुख दिसत नसते , पण तरीही आपल्याला आपले मुख दिसल्याचा आनंद होत असतो. तसेच ज्ञानाने आपल्याला आपले स्वरुप कळते हे म्हणणे आहे. म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही. जसे आगीने ठरवले की चला हा कापुर जाळुन नष्ट करु अन तसे केले तर त्या सोबत आगही नष्ट होते तसेच ज्ञाने अज्ञानाचे खंडन करु गेल्यास अज्ञान नाश पावते पण त्या सोबत ज्ञानही नष्ट होते !
तैसे अज्ञान आटोनियां | ज्ञान येतें उवाया | ज्ञानाज्ञान गिळोनिया | ज्ञानचि होये ||
ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
माऊलींनी अनेक उत्तमोत्तम उपमा दिल्या आहेत अमृतानुभवात अन ज्ञानेश्वरीतही. त्यातली कदाचित ही माझी सर्वात आवडती उपमा आहे . कारण कोणत्या उपमेतुन कधी अन कोठे अर्थ क्लिक होईल ह्याचा काही नेम नाही.
ऑक्टॉबर/ नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा रविवार होता , कदाचित शनिवार असावा. घरात एकटेच बसुन कंटाळा आला होता, पिक्चर बघायची , नेटफ्लिक्स्वर बिंज वॉचिन्ग करायची, बियर प्यायची किंवा अगदी प्रौढ महानुभाव मनोरंजन क्लब मध्येही जायची इच्छा होत नव्हती. घरुन निघालो , पॉलास हूकला आलो, फलाफल अन पिटाब्रेड खात खात कोलगेट घड्याळाखाली येऊन बसलो. अगदी विंटर सुरु झाला नव्हता पण त्या मानाने बरीच थंडी असल्याने लोकांची वर्दळ अगदीच नगण्य होती.
शांत बसुन समोरची स्कायलाईन अन त्यमागुन होणारा चंद्रोदय पहाताना अचानक ही ओवी आठवली :
ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
चंद्र आपल्याला प्रतिपदेपासुन हळुहळु मोठ्ठा होताना दिसतो अन पौर्णिमेला तो पुर्ण होतो, अन मग तेथुन परत माघारी जात जात अमावस्येला शुन्य होतो . बट वेट, चंद्राच्या ह्या अमावस्येपासुन ते पौर्णिमेपर्यंतच्या १६ कला ह्या आपला भास आहेत . चंद्र त्याच्याजागी आहे तसाच पुर्ण आहे . आपल्या भासांमुळे त्याचे अस्तित्व कमी जास्त होत नाही ! च्रंद्र कायमच पुर्ण आहे , हीच ती सतरावी कला आहे जी की नेहमीच आहे, फक्त आपल्याला आपल्या भासांच्या पलीकडे जाऊन पहाता आलं पाहिजे बाकी मग - Its always there ! बिंगो !
आपल्याला आपल्या बुबुळांनी अख्खं जग दिसतं पण एका बुबुळाने दुसरे बुबुळ दिसत नाही मग ते नाहीच असे म्हणतो का आपण ?
जे तेज आहे , त्याला अंधार म्हणजे काय माहीतच नाहीय मग त्याला "तेज म्हणजे काय" हे तरी कसे माहीत असेल, सुर्यावर कधीही रात्र होत नाही मग जर सुर्याला रात्र म्हणजे काय हेच माहीत नसेल तर दिवस होणे म्हणजे काय हे माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही . जर नसणे म्हणजे काय हे माहीत नाही मग असणे म्हणजे काय हे तरी कसे कळणार ? शुन्यसिध्दांतवादी ( म्हणजे बहुतेक बौध्दमत) म्हणतात की "ह्याचाच अर्थ - सर्वथा काहीच नाही" पण हे म्हणणारा हे अनुभवणारा कोणीतरी निर्माण झालाच की ! त्यामुळे आत्मस्वरुप शुन्य आहे अर्थात नाहीच हे केवळ अलिप्तपणे पाहणार्यांना वाटु शकेल ,इरव्ही ह्या बोलण्यात काही तथ्य नाही.
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥
दिवा विझवुन टाकला अन त्याच क्षणी दिवा विझवणाराही विझला तर दिवा नाही हे कोणाला कळणार ?
झोप आली अन नेमका त्याच क्षणी प्राण गेला तर झोप चांगली लागली की वाईट लागली हे कोणाला कळणार ?
समजा तुमच्याकडे एक मातीचा माठ आहे असा तुम्हाला भास झाला , अन अचानक तो माठ फुटला असे तुम्हाला वाटले तर आता सांगा की माठ आहे की नाही ?
तसेच मुळात अज्ञान हाच भास आहे , पण समजा तो ज्ञानाने नष्ट झाला तर काय अन कोण उरणार ?
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ ।
जो ह्या अशा निरंजन अर्थात कशाकशाचाही स्पर्ष होत नाही अशा स्थितीत झोपला आहे तो इतरांना झोपला आहे तो इतरांना दिसायचा प्रश्न येत नाही कारण त्याला खुद्द स्वतःलाच स्वतःचे विस्मरण झालेले असते !
म्हणुन आत्मस्वरुप आहे आणि आत्मस्वरुप नाही हे दोन्ही बोल व्यर्थ आहेत ! अगदी जसे की पौर्णिमा आहे अन अमावस्या आहे हे बोलणे व्यर्थ आहे तसे कारण चन्द्र चंद्राच्या जागी, सतराव्या कलेत कायम आहेच की !!
झोप उडाली की आपल्याला जाणवते की आपण जागे झालेलो आहोत पण काहीवेळाने ही जाणीवही आपोआप नष्ट होते , तेव्हा निद्रेचे नसणे आणि जागृतीचे असणे ह्या दोन्हीही स्थिती नसतात ! बस्स आपण असतो !
जमीनीवर कुंभ ठेवला तर त्या जमीनीला सकुंभ म्हणता येईल अन तो कुंभ नेला तर जमीनीला निष्कुंभ म्हणता येईल ! पण सकुंभता काय आणि निष्कुंभता काय , हे दोन्हीही जमीनीचे गुण नाहीतच , हे केवळ आपले भास आहेत . कुंभ असला काय अन नसला काय जमीन आपल्याजागी नित्य चोखपणे आहेच की !
जसं आपल्या लक्षात आलं की अमावस्या असणे आणि पौर्णिमा असणे हे आपले भास आहेत , चंद्राचे अस्तित्व काय सदा परिपुर्णच आहे !
तसेच स्वरुपाबाबत अज्ञान असणे अन ज्ञानाने त्याचे खंडन केल्यावर ज्ञान असणे ह्या दोन्ही गफ्फा वायफळ आहेत , अज्ञान असणे , ज्ञान असणे हे दोन्हीही भाग स्वरुपाला स्पर्शच करत नाहीत ! ते बस्स आहे त्याच्या जागी काय सर्वदा सदोदित संचलेले !
आता ह्या पुढे काय बोलणार ?
अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥
साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥
तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
________________/\________________
संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) तुकाराम गाथा - https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm
___________________/\_____________________
(क्रमशः .... बहुतेक)
ऑक्टॉबर/ नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा रविवार होता , कदाचित शनिवार असावा. घरात एकटेच बसुन कंटाळा आला होता, पिक्चर बघायची , नेटफ्लिक्स्वर बिंज वॉचिन्ग करायची, बियर प्यायची किंवा अगदी प्रौढ महानुभाव मनोरंजन क्लब मध्येही जायची इच्छा होत नव्हती. घरुन निघालो , पॉलास हूकला आलो, फलाफल अन पिटाब्रेड खात खात कोलगेट घड्याळाखाली येऊन बसलो. अगदी विंटर सुरु झाला नव्हता पण त्या मानाने बरीच थंडी असल्याने लोकांची वर्दळ अगदीच नगण्य होती.
शांत बसुन समोरची स्कायलाईन अन त्यमागुन होणारा चंद्रोदय पहाताना अचानक ही ओवी आठवली :
ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
चंद्र आपल्याला प्रतिपदेपासुन हळुहळु मोठ्ठा होताना दिसतो अन पौर्णिमेला तो पुर्ण होतो, अन मग तेथुन परत माघारी जात जात अमावस्येला शुन्य होतो . बट वेट, चंद्राच्या ह्या अमावस्येपासुन ते पौर्णिमेपर्यंतच्या १६ कला ह्या आपला भास आहेत . चंद्र त्याच्याजागी आहे तसाच पुर्ण आहे . आपल्या भासांमुळे त्याचे अस्तित्व कमी जास्त होत नाही ! च्रंद्र कायमच पुर्ण आहे , हीच ती सतरावी कला आहे जी की नेहमीच आहे, फक्त आपल्याला आपल्या भासांच्या पलीकडे जाऊन पहाता आलं पाहिजे बाकी मग - Its always there ! बिंगो !
आपल्याला आपल्या बुबुळांनी अख्खं जग दिसतं पण एका बुबुळाने दुसरे बुबुळ दिसत नाही मग ते नाहीच असे म्हणतो का आपण ?
जे तेज आहे , त्याला अंधार म्हणजे काय माहीतच नाहीय मग त्याला "तेज म्हणजे काय" हे तरी कसे माहीत असेल, सुर्यावर कधीही रात्र होत नाही मग जर सुर्याला रात्र म्हणजे काय हेच माहीत नसेल तर दिवस होणे म्हणजे काय हे माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही . जर नसणे म्हणजे काय हे माहीत नाही मग असणे म्हणजे काय हे तरी कसे कळणार ? शुन्यसिध्दांतवादी ( म्हणजे बहुतेक बौध्दमत) म्हणतात की "ह्याचाच अर्थ - सर्वथा काहीच नाही" पण हे म्हणणारा हे अनुभवणारा कोणीतरी निर्माण झालाच की ! त्यामुळे आत्मस्वरुप शुन्य आहे अर्थात नाहीच हे केवळ अलिप्तपणे पाहणार्यांना वाटु शकेल ,इरव्ही ह्या बोलण्यात काही तथ्य नाही.
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥
दिवा विझवुन टाकला अन त्याच क्षणी दिवा विझवणाराही विझला तर दिवा नाही हे कोणाला कळणार ?
झोप आली अन नेमका त्याच क्षणी प्राण गेला तर झोप चांगली लागली की वाईट लागली हे कोणाला कळणार ?
समजा तुमच्याकडे एक मातीचा माठ आहे असा तुम्हाला भास झाला , अन अचानक तो माठ फुटला असे तुम्हाला वाटले तर आता सांगा की माठ आहे की नाही ?
तसेच मुळात अज्ञान हाच भास आहे , पण समजा तो ज्ञानाने नष्ट झाला तर काय अन कोण उरणार ?
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ ।
जो ह्या अशा निरंजन अर्थात कशाकशाचाही स्पर्ष होत नाही अशा स्थितीत झोपला आहे तो इतरांना झोपला आहे तो इतरांना दिसायचा प्रश्न येत नाही कारण त्याला खुद्द स्वतःलाच स्वतःचे विस्मरण झालेले असते !
म्हणुन आत्मस्वरुप आहे आणि आत्मस्वरुप नाही हे दोन्ही बोल व्यर्थ आहेत ! अगदी जसे की पौर्णिमा आहे अन अमावस्या आहे हे बोलणे व्यर्थ आहे तसे कारण चन्द्र चंद्राच्या जागी, सतराव्या कलेत कायम आहेच की !!
झोप उडाली की आपल्याला जाणवते की आपण जागे झालेलो आहोत पण काहीवेळाने ही जाणीवही आपोआप नष्ट होते , तेव्हा निद्रेचे नसणे आणि जागृतीचे असणे ह्या दोन्हीही स्थिती नसतात ! बस्स आपण असतो !
जमीनीवर कुंभ ठेवला तर त्या जमीनीला सकुंभ म्हणता येईल अन तो कुंभ नेला तर जमीनीला निष्कुंभ म्हणता येईल ! पण सकुंभता काय आणि निष्कुंभता काय , हे दोन्हीही जमीनीचे गुण नाहीतच , हे केवळ आपले भास आहेत . कुंभ असला काय अन नसला काय जमीन आपल्याजागी नित्य चोखपणे आहेच की !
जसं आपल्या लक्षात आलं की अमावस्या असणे आणि पौर्णिमा असणे हे आपले भास आहेत , चंद्राचे अस्तित्व काय सदा परिपुर्णच आहे !
तसेच स्वरुपाबाबत अज्ञान असणे अन ज्ञानाने त्याचे खंडन केल्यावर ज्ञान असणे ह्या दोन्ही गफ्फा वायफळ आहेत , अज्ञान असणे , ज्ञान असणे हे दोन्हीही भाग स्वरुपाला स्पर्शच करत नाहीत ! ते बस्स आहे त्याच्या जागी काय सर्वदा सदोदित संचलेले !
आता ह्या पुढे काय बोलणार ?
अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥
साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥
तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
________________/\________________
संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) तुकाराम गाथा - https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm
___________________/\_____________________
(क्रमशः .... बहुतेक)
म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही.बालकासम ही अवस्था ज्ञान,अज्ञान प्राप्त करण्यापलीकडे आहे.सतरावी कला म्हणजे आपण_/\_