सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !
सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !
साहित्याचा वारसा लाभलेला एक संवेदनशील चित्रकार !
तुम्ही म्हणाल मी ही काय लिहिलंय ! त्याचं असं झाल, कालच्या रविवारी म्हंजे म्हणजे १३ जूनला संध्याकाळी फेसबुक नोटेशन वाजल. संध्याकाळी ५ वाजता चित्रकार अन्वर हुसेन लाईव्ह येणार होते ! कलापुष्प या संस्थे तर्फे बाळा साहेब पाटील आणि राजेंद्र महाजन हे अन्वर हुसेन यांची मुलाखत घेणार होते ! अन्वर हुसेन यांच्या कलाकारीचा चाहता म्हणून मला हा सुखद धक्का होता ! चार एक वर्षांपूर्वी मासिकात त्यांचं रेखाटन पाहिलं होतं, तेव्हा ते बेहद्द आवडलं होतं ! हळूहळू त्यांची स्केचेस पेंटिंग्ज हे सुद्धा सोशल मीडियातून पाहण्यात येऊ लागलं ! मग तर पक्का फॅन झालो मी त्यांचा ! दोन एक वर्षांपूर्वी अचानक त्यांचं पेंटिंग प्रात्यक्षिक पाहण्याचा सुंदर योग आला होता ! त्यांच्या कुंचल्यातून उतरणारे पोर्ट्रेट पाहून रोमांचित झालो होतो. त्यांच्याशी दोन-चार शब्द बोलून कृतकृत्य झाल्या सारखे वाटलं होतं. त्या आख्या दिवसाचा सुंदर अनुभव मी सुहास एकबोटे यांच्याकडील एक कल्लाड दिवस (http://misalpav.com/node/44353) या मिपा धाग्यात केला होता !
आणि आज परत मुलाखतीचा योग. उत्सुकतेने लॅपटॉपपुढे बसलो !
छोटे छोटे प्रश्न सुरु झाले आणि शांत, मितभाषी असलेल्या या चित्रकाराची खुलून बातचीत करणं सुरु झालं ! कारण मुलाखत घेणारे त्याला कॉलेजपासूनच बघत आलेले. त्याच्यातला "चाकोरीची वाट" सोडून आपली स्वतःचा मार्ग तयार करताना, उमलताना, फुलताना त्याला पाहिले होते !
तासादिड तासाची मुलाखत म्हणता म्हणता चक्क अडीच तासांपर्यंत रंगली ! चित्रकार, चाहते यांची लक्षणीय उपस्थिती होती. लाईक्स आणि कमेंट्सनी सत्र बहरत चालले होते ! कमेंट्स पैकी दोन आणि उरलेल्या कमेंट्स खाली दिल्या आहेत, त्यावरून कल्पना येईल !
अन्वरच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रांचे विषय आणि रंग लेपन हा आत्मा आहे
सोप्या साध्या विषयातून गूढ आणि गहनता चित्रातून जाणवते
सामान्य विषयांना असामान्य करण्याची क्षमता असलेला चित्रकार
साहित्यात दबदबा निर्माण केला आहे यांच्या "मुखपृष्ठांनी"
चित्रकार अबोल पण कलाकृती मात्र सबोल, सखोल....
दृष्यापलीकडचे खूप काही सांगणारी उत्कट चित्रे
त्यांची चित्र बघितल्यानंतर फक्त पाहणं न होता, चित्रात गुतंण होतं सर.....
आपल्या आकलनाच्या पलीकडील विश्वात सरांची चित्र घेऊन जाता -
सामान्य लोकांच्या मुक्या संवेदना चित्राच्या मुक्या माध्यमातून मांडणे ही कुशलताच.
खुप सुंदर ! संवेदना, साहस, सहजता, स्वतंत्र विचार, सहज शैली, रेषा-रंग यांबद्द्ल निश्चितता, खोल निरीक्षणशक्ती. या सर्वांचे सहृदय मिश्रण अन्वर यांच्या चित्रांमध्ये हळुवारपणे (शांत लयीत) प्रतिबिंबित होत आहे.
त्यांची काही पेंटीग्ज :
शाळेत असताना चित्रकला विशेष का आवडत नव्हती ? दहावीला चांगले मार्क पडून सुद्धा सांगलीच्या कलाविश्व या कला महाविद्यालयात प्रवेश घेणं कसं झालं ? कलाविश्व् मध्ये पुस्तकं आणि साहित्य यांचा कसा काय संबंध आला ? त्या सुमारास आजूबाजूचे वातावरण, भवताल कडे कसे आकर्षित झालात ? चित्रात चाफ्याचे झाड बऱ्याच वेळा का असते ? त्यावेळी कोणकोणत्या चित्रकाराचा प्रभाव पडला ? जीडी आर्ट नंतर चाकोरीबद्ध पेंटिंग कडे का वळलो नाही ? विविध पारितोषिके मिळून सुद्धा मुंबई-पुण्यात न जाताच गावाकडेच राहणार हे कसं ठरवलं ? सहसा कष्टकरी, सामान्य माणसांचं पेंटिंग का करावंसं वाटलं ? प्रचलित सुंदर वाटणारी लॅण्डस्केप्स, पोर्ट्रेट्स का करावीशी वाटली नाहीत ? नॉस्टल्जिया'' अलमिराज': कपाटे, 'मेमरीज', 'व्हिस्परिंग सायलेन्स' 'मुंबई डायरी' 'रोड स्टोरीज' अश्या विविध चित्र मालिका का कराव्या वाटल्या? काय पार्श्वभूमी होती? विविध पेंटिंग्जच्या मागच्या भूमिका, पुस्तकांची मुखपृष्ठ करण्याकडे कसे वळलात ? कविता संग्रहांचींची मुखपृष्ठ करताना स्वातंत्र्य, समाधान कसे लाभते ?
अश्या सर्व प्रश्नांमागची पार्श्वभूमी, भूमिका तपशिलात उघडून दाखवली !
अतिशय सुंदर अशी ही मुलाखत खलील लिंकवर आपणास पाहता येईल !
साहित्याचा वारसा लाभलेला एक संवेदनशील चित्रकार !
तुम्ही म्हणाल मी ही काय लिहिलंय ! त्याचं असं झाल, कालच्या रविवारी म्हंजे म्हणजे १३ जूनला संध्याकाळी फेसबुक नोटेशन वाजल. संध्याकाळी ५ वाजता चित्रकार अन्वर हुसेन लाईव्ह येणार होते ! कलापुष्प या संस्थे तर्फे बाळा साहेब पाटील आणि राजेंद्र महाजन हे अन्वर हुसेन यांची मुलाखत घेणार होते ! अन्वर हुसेन यांच्या कलाकारीचा चाहता म्हणून मला हा सुखद धक्का होता ! चार एक वर्षांपूर्वी मासिकात त्यांचं रेखाटन पाहिलं होतं, तेव्हा ते बेहद्द आवडलं होतं ! हळूहळू त्यांची स्केचेस पेंटिंग्ज हे सुद्धा सोशल मीडियातून पाहण्यात येऊ लागलं ! मग तर पक्का फॅन झालो मी त्यांचा ! दोन एक वर्षांपूर्वी अचानक त्यांचं पेंटिंग प्रात्यक्षिक पाहण्याचा सुंदर योग आला होता ! त्यांच्या कुंचल्यातून उतरणारे पोर्ट्रेट पाहून रोमांचित झालो होतो. त्यांच्याशी दोन-चार शब्द बोलून कृतकृत्य झाल्या सारखे वाटलं होतं. त्या आख्या दिवसाचा सुंदर अनुभव मी सुहास एकबोटे यांच्याकडील एक कल्लाड दिवस (http://misalpav.com/node/44353) या मिपा धाग्यात केला होता !
आणि आज परत मुलाखतीचा योग. उत्सुकतेने लॅपटॉपपुढे बसलो !
त्यांची काही पेंटीग्ज :
शाळेत असताना चित्रकला विशेष का आवडत नव्हती ? दहावीला चांगले मार्क पडून सुद्धा सांगलीच्या कलाविश्व या कला महाविद्यालयात प्रवेश घेणं कसं झालं ? कलाविश्व् मध्ये पुस्तकं आणि साहित्य यांचा कसा काय संबंध आला ? त्या सुमारास आजूबाजूचे वातावरण, भवताल कडे कसे आकर्षित झालात ? चित्रात चाफ्याचे झाड बऱ्याच वेळा का असते ? त्यावेळी कोणकोणत्या चित्रकाराचा प्रभाव पडला ? जीडी आर्ट नंतर चाकोरीबद्ध पेंटिंग कडे का वळलो नाही ? विविध पारितोषिके मिळून सुद्धा मुंबई-पुण्यात न जाताच गावाकडेच राहणार हे कसं ठरवलं ? सहसा कष्टकरी, सामान्य माणसांचं पेंटिंग का करावंसं वाटलं ? प्रचलित सुंदर वाटणारी लॅण्डस्केप्स, पोर्ट्रेट्स का करावीशी वाटली नाहीत ? नॉस्टल्जिया'' अलमिराज': कपाटे, 'मेमरीज', 'व्हिस्परिंग सायलेन्स' 'मुंबई डायरी' 'रोड स्टोरीज' अश्या विविध चित्र मालिका का कराव्या वाटल्या? काय पार्श्वभूमी होती? विविध पेंटिंग्जच्या मागच्या भूमिका, पुस्तकांची मुखपृष्ठ करण्याकडे कसे वळलात ? कविता संग्रहांचींची मुखपृष्ठ करताना स्वातंत्र्य, समाधान कसे लाभते ?
अश्या सर्व प्रश्नांमागची पार्श्वभूमी, भूमिका तपशिलात उघडून दाखवली !
अतिशय सुंदर अशी ही मुलाखत खलील लिंकवर आपणास पाहता येईल !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami