कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.
काही लोकांनी कागदी गणेशमुर्ती तयार करून इकोफ्रेंडली गणेशोत्सव अश्या हाळ्या द्यायला सुरुवात केली. (एका पंथाने त्यांच्या अनुयायांकडून नामजपाच्या वह्या भरून घ्यायला सुरुवात केली आणि हाताने नामजप लिहिलेल्या वह्या परत जमा करून घेऊन त्याच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवून " हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव" असे सांगत अनुयायांना विकायला सुरुवात केली असे ऐकण्यात आले) या वर्षी पुण्याच्या हॅण्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने व्यापारी तत्वावर आशय मूर्ती विक्रीसाठी बाजारात आणलेल्या आहेत. कागदी गणेशमुर्ती वजनाने हलक्या असल्यामुळे ९ इंचापेक्षा उंच मुर्ती घरगुती सजावटीत वापरता येतात त्यामुळे अश्या मुर्तीना ग्राहकांकडून पसंती मिळेल. कदाचित पुढे अशाच गणेशमुर्तीचा ट्रेण्ड येईल.
कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा ९० % + माती १०% पासून बनवलेल्या) च्या विसर्जनासाठी "मुर्ती मोठ्या पात्रात पाणी घेऊन विसर्जित करा १०-१२ तासानंतर पात्रातील राहिलेला कागदी लगदा वाळवून जवळच्या रद्दी वाल्याला द्या जेणे करून पाणीप्रदूषण टाळलं जाईल"अश्या विल्हेवाटीच्या सूचना आहेत. यामुळे असं कुणी करत असेल असं वाटत नाही.
कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा-९० % + माती - १०% पासून बनवलेल्या) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातकच आहेत. कागदी मुर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर वर मिथेन नावाचा विषारी वायू तयार होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. यामुळे कागदी मुर्ती पर्यावरणस्नेही नाहीत असे काही लोकांचे म्हणणे आहे. एकूण घनकचऱ्यापैकी २६% कचरा हा कागदी असतो आणि हा जमिनीत जिरवल्यास विषारी रंग, शाई आणि काही प्लास्टिक घटक जमिनीत मुरतात ज्यामुळे प्रदूषण होते. कागद रिसायकलिंग मुळे या प्रदूषणाचे प्रमाण कमी होते पण ते फारच थोड्या प्रमाणात. कागद रिसायकलिंग जास्त ऊर्जा खाऊन इतर प्रकारचे प्रदुषण करतेच.
दिवसेंदिवस कागदाचा वाढता वापर पर्यावरणाच्या मुळाशी उठत आहे (एकूण कागद उत्पादनासाठी लागणारा ९३% लगदा वृक्षांपासून तयार केला जातो. एका ए४ मापाचा कागद तयार करण्यासाठी सुमारे १० लिटर पाणी लागते) कागद-रिसायकलिंगसाठी प्लास्टिक रिसायकलिंगपेक्षा जास्त ऊर्जा लागत असल्याने तो प्लास्टिकपेक्षा कमी पर्यावरणस्नेही आहे.
आम्ही इतकी वर्षे उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करत होतो. आणि उत्सव संपल्यावर मूर्ती मनपा तलावात विसर्जन करत होतो. मनपा कर्मचारी/ सेवक नंतर त्या विसर्जित मुर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायचे (म्हणजे नक्की काय करायचे माहीत नाही) आता गेल्या वर्षीपासून शाडूची मुर्ती स्थापित करतो आणि विसर्जनानंतर कुंडीत माती टाकतो.
मित्रांनो आपण कुठल्या प्रकारच्या गणेशमुर्तीची स्थापना करता ? कागदी मुर्ती मुळे प्रदुषण वाढते की कमी होते असे आपल्याला वाटते ? कागदी मुर्ती स्थापित करता का ? असाल तर त्या मूर्तीचे विसर्जन कसे करता ?
दिवसेंदिवस कागदाचा वाढता वापर पर्यावरणाच्या मुळाशी उठत आहे (एकूण कागद उत्पादनासाठी लागणारा ९३% लगदा वृक्षांपासून तयार केला जातो. एका ए४ मापाचा कागद तयार करण्यासाठी सुमारे १० लिटर पाणी लागते) कागद-रिसायकलिंगसाठी प्लास्टिक रिसायकलिंगपेक्षा जास्त ऊर्जा लागत असल्याने तो प्लास्टिकपेक्षा कमी पर्यावरणस्नेही आहे.
आम्ही इतकी वर्षे उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करत होतो. आणि उत्सव संपल्यावर मूर्ती मनपा तलावात विसर्जन करत होतो. मनपा कर्मचारी/ सेवक नंतर त्या विसर्जित मुर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायचे (म्हणजे नक्की काय करायचे माहीत नाही) आता गेल्या वर्षीपासून शाडूची मुर्ती स्थापित करतो आणि विसर्जनानंतर कुंडीत माती टाकतो.
मित्रांनो आपण कुठल्या प्रकारच्या गणेशमुर्तीची स्थापना करता ? कागदी मुर्ती मुळे प्रदुषण वाढते की कमी होते असे आपल्याला वाटते ? कागदी मुर्ती स्थापित करता का ? असाल तर त्या मूर्तीचे विसर्जन कसे करता ?
😂
जर मातीच्या मुर्ती इतक्या सुंदर बनत असतील तर पी.ओ.पी किंवा कागदाच्या लगद्या पासुन बनवलेल्या मुर्त्या घ्यायची गरजच काय?