पुस्तक परिचय - काबुलीवाल्याची बंगाली बायको
आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.
मुळच्या कोलकाताच्या, नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या सुश्मिता, १९८८ मध्ये जानबाज खान या अफगाणी व्यावसायिकाशी लग्न करतात आणि सासरच्या मंडळींना भेटायला मोठ्या उत्सुकतेने अफगाणिस्तानात जाऊन पोहचतात. तिथे गेल्यावर आपली झालेली फसवणूक त्यांच्या लक्षात येते. महिना - दोन महिने अफगाणिस्तानमध्ये राहून भारतात परत येण्याच्या उद्देशाने गेलेल्या सुश्मिता तिथे तब्बल आठ वर्षे अडकून पडतात. या आठ वर्षात त्यांना अफगाणिस्तानात आलेले अनुभव, सासरच्या मंडळींचे तऱ्हेवाईक वागणे (हा खूपच सौम्य शब्द वापरत आहे मी) धर्मांध आणि संस्कृतीहीन तालिबान्यांचे फतवे, त्या फतव्यांचा सुश्मितांनी कडाडून केलेला विरोध, त्यांच्या नवऱ्याचे एकटेच परत भारतात पळून येणे आणि अशा या सगळ्या कठीण परिस्थितमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल आठ वर्षे सुश्मिता कशा राहिल्या असतील याची आपल्यासारख्यांनी कल्पना करणेपण कठीण.
या आठ वर्षाच्या काळात पराकोटीचा शारीरिक, मानसिक छळ सोसूनही सुश्मितांचा हिंदू धर्माविषयीचा अभिमान आणि भारतात परत येण्याची इच्छा वाढतच जाते. भारतात पळून येण्याचा फसलेला पहिला प्रयत्न गाठीशी बांधून आणि रानटी तालिबान्यांशी निकराचा लढा देऊन भारतात via पाकिस्तान पळून येण्याच्या या प्रवासात पाकिस्तानी लोकांनी त्यांना केलेल्या मदतीचे अनुभव केवळ थक्क करणारे आणि त्याच वेळी भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अडवणुकीचे अनुभव अतिशय चीड आणणारे आहेत. या सगळ्या संघर्षात त्यांना भेटलेली काही चांगली माणसं, अफगाणिस्तानातील सर्वसामान्य माणसाचे जीवन, तिथल्या extreme weather conditions आणि त्याला अनुसरून केली जाणारी शेती, त्यांच्याप्रमाणेच अफगाणी माणसाशी लग्न करून अफगाणिस्तानमध्ये गेलेल्या आणि तिथेच अडकून पडलेल्या अनेक भारतीय मुली, तिथल्या कामचलाऊ (प्रत्यक्षात अगदीच बिनकामाच्या) आरोग्यसेवा, त्यांनी तिथे सुरु केलेला छोटासा दवाखाना अशा सगळ्या अनुभवांची मांडणी केलेली आहे. ज्या लव्ह जिहादची आपल्याला आज जाणीव होते आहे, तो प्रकार असा ऐंशीच्या दशकात किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून सुरु असल्याचे पाहून प्रचंड संताप होतो.
असामान्य धैर्याने आल्या प्रसंगाला तोंड देऊन मायभूमीमध्ये परत येण्याचा हा थरारक प्रवास अक्षरशः नि:शब्द करून सोडतो.
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात.
--
सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे.स्वानूभावावरून सांगतो. मी १३ साली फेसबूक चॅटींग करायचो बर्याच मूलींशी, एक पनवेल ची मूलगी तर घरदार सोडून पळून यायला तयार होती. त्यासाठी खुप मागेही लागली होती, मी त्या मूलीला कधी पाहीलं/भेटलोही नव्हतो तरी. मूली प्रेमात एकदा फसल्या की काहीही करायला तयार असतात, प्रेमवीरांना जग कायम लक्षात ठेवतं, अमरप्रेमकथा वगैरे हे टीवी सिरीयल्स नी प्रत्येक सिनेमात दाखवलेलं असतंचं, आपणही तसंच काहीतरी करावं ही भावना भयानक ऊचंबळून आलेली असते, त्यात मग जाती पाती ची भिंत असेल तर ती तोडायला त्या ऊत्स्फूर्त असतात, मग पुढे धर्म नी देश वगैरे आले तर त्या प्रेम स्ट्रगल ला आणखी धुमारे फूटतात. तो अनूभव घ्यायची तर त्यांची भयानक ईच्छा होते. प्रत्येक लवस्टोरीला व्हिलन असावा लागतो, मग ह्या मुली आई, बाप, भाऊ ह्यांनाच व्हिलन बनवतात. काही दिवसानी मग हे स्ट्रगल वगैरे ओसरलं, नी समाज, आई,वडील,भाऊ ह्यांनी वार्यावर सोडलं की खाडकन डोळे ऊघडतात. काही परत येऊन स्थिरावतात, काहींचे परतीचे दोर कापले जातात, काहीना काहीच न सुचल्याने परत सासरी जाऊन बसतात.तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेलाआधी कुणीही कट्टर वगैरे असल्याचं दाखवत नाहीत, बर्याच फसवणूकात तर मूलांनी हिंदू नाव धारण केलेलं असतं, बाकी कितीही सुशिक्षीत असो अनेक मुलींना आपल्या राज्यातील जिल्हे नीट माहीत नसतात तर अफगाणीस्तान वगैरे माहीत असण्याची शक्यता शून्य. बी. ई मेकॅनीकल झालेल्या मूलींचं आरटीओ प्री परिक्षेसाठीचं मेरीट शंभर पैकी फक्त १ मार्काला लागलं होतं. सरकारी नियमाप्रमाणे ० चं मेरीट लावता येत नाही नाहीतर सरकारने ते लावलं असतं, ईतकं पक्कं जीके असतं मूलींचं. पुण्यातच कितीतरी मूलींना जळगाव दक्षीणेला की बेळगाव ऊत्तरेला विचारलं तर सांगता येत नाही हे मी स्वत: पाहीलंय. वास्तवीक जगाचं भान ह्या बाबतीत मूली फार म्हणजे फारच कमजोर असतात. ह्यावर एक लेख पाडू म्हणतो…..मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Parampara