रॉकेट्री-नंबी इफेक्ट
आर.माधवन दिग्दर्शित,लिखित,निर्मित ‘रॉकेट्री’ सिनेमा पाहण्याचा अमाझोन योग प्राईममुळे मिळाला.
नंबी नारायण हे मूळ केरळातील इस्त्रोतील शास्त्रज्ञ होते. नंबीनी मदुराई येथे बी.टेक. मेकानिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले व १९६६ पासून ते थुंबा येथे इक्वेटोरीयलं रॉकेट लौन्चींग स्टेशनला रुजू झाले.विक्रम साराभाई यांना ते गुरु,फिलोसोफर सर्व मानत.१९६९ ला ते प्रिन्स्टन विद्यापीठात प्रोफेसर क्रोक्रो मार्गदर्शनाखाली प्रोपल्शनअभ्यास) आणि लिक्विड प्रोपल्शन यामध्ये ज्ञान मिळवून भारतात परतले.याचा दरम्यान त्यांना नासामध्ये काम करण्याची ऑफर त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.येथेच भारताचे नशीब फळाला आले.पुढे जाऊन नंबी यांनी फ्रांस मध्ये ५२ भारतीय अभियांत्याच्या चमूचे नेतृत्व करत एका करारा नुसार वायकिंग इन्जीन तंत्रज्ञान तेथे राहून आत्मसात केले.याचा फायदा म्हणजे विकास (१९८५ )या भारतीय बनावटीचे रॉकेट इंजिन तयार करण्यात झाला.अमेरिकाचा विरोध असूनही रशियाकडून विशेष इंजिन मिळवण्यातही त्यांनी दाखवलेले धाडसही अचंबित करते.
एवढे सुंदर घोडदौड सुरु असतांना दृष्ट लागते.नंबी यांना १९९४ हेरगीरीच्या खोट्या आरोपात अटक केली जाते. ५० दिवस जेलमध्ये,नंतर समाजात कुटुंबाची झालेली अवहेलना अशा अनेक गोष्टी समोर उभ्या ठाकतात.परंतु नंबी यांचा न्यायाचा संघर्ष सुरूच राहतो.सुप्रीम कोर्ट लवकरच त्यांना निर्दोष म्हणून घोषित करतात.केरळ सरकारही १.३ कोटी रुपये मानहानी मोबदला म्हणुन देऊ करतात.
एका निर्दोष देशभक्ताला देखील केवळ काही भ्रष्ट लोकांमुळे इतक्या अग्निदिव्यातून जावे लागले.या महान शास्त्रज्ञाची ओळखही आपल्याला इतके दिवस नसावी याचे आश्चर्य वाटले.२०१९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते.सिनेमात कलाम,नील आर्मस्ट्रॉंग ,युरी गागारीन,विक्रम साराभाई यांची छोटी पात्रे पाहून लहानपणापासून ओळखीचे नाव पाहून मज्जा वाटते.
सॉलिड,लिक्विड,क्रायगेनिक इंजिन रॉकेटयाविषयी माहिती या निमित्ताने मिळाली,ठेओडे अजून वाचन झाले.
सिनेमात एकही गाण नाही.तरीही सिनेमा वेगवान घडणाऱ्या घडामोडींमुळे खिळवून ठेवतो.आर .माधवन याने या सिनेमासाठी केलेली मेहनत प्रकर्षाने दिसते.
शेवटच्या दृश्यानुसार “सारा देश या महान देशप्रेमीची मनापासून माफी मागतो”
-भक्ती
💬 प्रतिसाद
(52)
B
Bhakti
Fri, 08/12/2022 - 14:51
नवीन
सर्वांना धन्यवाद!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 08/17/2022 - 07:01
नवीन
मतदान करताना जात पात सोडून देशाच्या सुरक्षेला सर्वात जास्त महत्व दिले पाहिजे. अन्यथा देशद्रोही मौज करतील आणि देशाचे तीन तेरा होतील. 2014 मध्ये सत्ता बदलली नसती तर बहुधा इथे लिखाण करणे ही अशक्य झाले असते. पीएमओ मध्ये एनएसएच्या निजी स्टाफ मध्ये कार्य केले आहेत त्यामुळे अधिक लिहू शकत नाही
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2