Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तमिळनाडूचा ईतिहास भाग-३

अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/01/2022 - 17:45
💬 5 प्रतिसाद
ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती. कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत. त्यांनी ही भाषा युरोपीय लोकांशी संवादासाठी शिकली किंवा त्यांना मिशनर्यांनी शिकवली. जेव्हा ब्रिटीश मद्रास वसवत होते तेव्हा त्यांना तिथे एक चर्च आढळलं. हे पाहून ते भांबावले. “ईथे हे चर्च कोणी बनवलं? आमच्या आधीही ईथे कुणी आलं होतं का?” “मी काही कोळ्यांना विचारले, काही मुसलमान याची देखभाल करायचे ते याला बोथूमा म्हणायचे” “पण हे तर चर्च आहे.” “ह्याची गोष्ट प्रभू येशूच्या काळाची आहे.” “म्हणजे?” “ईथे येशूच्या बारा प्रचारकांमधील एक संत थाॅमसची कबर आहे.” “काय फालतू बडबड लावलीय? ते भारतात केव्हा आले? बरं आले तर त्यांनी बनवलेले ख्रिस्ती कुठं आहेत?” “असं म्हणतात की त्यांना ईथल्या तमीळ हिंदूंनी मारून टाकले.” “ह्याचा काही पुरावा?” “काहीच पुरावा नाही. एक किस्सा तर मार्को पोलो ने लिहीलाय.” “तो पण सांगूनच टाक” “मार्को पोलो जेव्हा ईथे आले होते तेव्हा त्यांनी ह्या जागेला भेट दिली. त्यांनी एकलेली कथा लिहीलीय की संत थाॅमस ईथेच काही मोरपक्ष्यांसोबत बसले होते. तेव्हा एका शिकार करनार्या हिंदू जातीच्या शिकार्याचा बाण चुकून त्यांना लागला, ते ईथेच मेले.” “ठिकाय, त्यांनी हे चर्च पाहीलं होतं?” “नाही, त्यावेळी तर ही एक गढी होती, नंतर पोर्तूगिजांनी ह्याला किल्ला बनवले.” “संत थाॅमसचं जे काम अपुर्ण राहीलं ते काम आमचे मिशनरी पुर्ण करतील” “एकदा आपण ईथे स्थिरावलो तर ते कामही पुर्ण होईल.” एकोनीसाव्या शतकाच्या सुरूवातीला मद्रास प्रेसीडेंसीत एकूण ११८५ मिशनरी शाळांत जवळपास ३८००० विद्यार्थी शिकत होते. तेव्हा बंगाल आणी मुंबई प्रेसीडेंसीत मिशनर्यांच्या ४७२ शाळा नी १८००० विद्यार्थी होते. ह्या गणीताला काय अर्थ? ईंग्रजी शाळा सुरू झाल्या ही गोष्ट मद्रास साठी चांगली ठरली. ह्याचं तमीळनाडूच्या राजकिय भवितव्याशी काय घेणं देणं? १८५६ मध्ये एक ख्रिस्ती मिशनरी राॅबर्ट काल्डवेल ने एक जाड संशोधनात्मक पुस्तक लिहीले, त्याच्या पहिल्याच पानावर ऊल्लेख होता- “मनु ने सांगीतलंय - क्षत्रियांचे काही वंश ब्राम्हणांशी संपर्क तोडून आपला पवित्र धर्म विसरून “वृषाल(outcast)” बनलेत. - पौन्ड्रक, औद्र, यवन, कम्बोज, चीन, खासा….. आणी द्रविड!” ह्या आधी जर “द्रविड” शब्द कुणी वापरला जरी असेल तरी त्याचा नेमका अर्थ काय असावा? पण काल्डवेल द्वारा “नव- अविष्कृत” ह्या शब्दाने एका चिंगारीचे काम केले, ज्याने दक्षीण भारताला ऊत्तर भारताहून वेगळा “वंश” बनवलं. कायमचं! (क्रमशः) मूळ लेखक- प्रविण झा.

प्रतिक्रिया द्या
1986 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नि३सोलपुरकर Fri, 09/02/2022 - 06:23 नवीन
अ बा : मूळ लेखक- प्रविण झा की प्रकाश झा . भाग १ मध्ये मूळ लेखक- प्रकाश झा लिहले आहे आणी पुढील भागात मूळ लेखक- प्रविण झा .
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/02/2022 - 07:00 नवीन
तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.
सहमत. उत्तरभारतीय कुठेही गेले तरी दुसर्‍याची भाषा लवकर आत्मासात करत नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 09/02/2022 - 07:19 नवीन
एक किस्सा काही वर्षांपूर्वी वाचला होता. बनारस मध्ये राहणारा कन्नड ब्राह्मण ब्रिटिश सेवेत होता. साहजिक आहे अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता. एक दिवस आर्य द्रविड यावर वाद झाला. ब्रिटिश अधिकारी त्याला म्हणाला तू आर्य आहे कारण तुझा रंग स्वच्छ आहे. त्यावर त्या ब्राम्हणाने उत्तर दिले सर माझ्या कडे 25 पिढ्यांची वंशावळी आहे. फक्त गेल्या 10 पिढ्यांपासून आम्ही बनारस मध्ये आहोत. आर्य आणि द्रविड भेद तुम्ही केलेला आहे आम्ही नाही. त्याचे म्हणणे ब्रिटिश अधिकार्‍यालाही पटले.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/02/2022 - 07:58 नवीन
अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता हे म्हणजे अमेरिकेत गेलेले भारतीय अजून काही वर्षांनी ब्लोंड होणार तर..... पण आफ्रिकन गुलाम अजून कसे गोरे झाले नाहीत ..?? इथे १० पिढ्यात रंग बदलला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
च
चौथा कोनाडा Wed, 09/14/2022 - 14:00 नवीन
इंग्रज आधी दक्षिणेत पोहोचल्यामुळे दक्षिणी लोकांना हे पूर्ण पाने जाणवले असेल की आधुनिक असेल, पाश्चात्य ज्ञान हवे असेल तर इंग्रजी भाषा फायदेशीर असेल ... आणि याचमुळे भाषा लवकर आत्मसात केली असावी. एफ.. F.. रोचक लेखमाला वाचत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा