"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी
माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले. रमामाधव यांच्यातील काही हलके फुलके नर्मविनोदी प्रणय प्रसंग त्याकाळातील माझ्या वयाला मोहवणारे वाटले आणि अखेरची ताटातुट गळ्यात आवंढा आणणारी होती. काकापुतण्यातील ताणतणावाचे प्रसंग बरी अद्दल मोडली अशा पुटपुटीत बदलुन हाणला मस्त अशा मांडीवर थाप मारत दाद देण्यापर्यंत प्रसंगी जात असे. हे सर्व दहावी पर्यंत येईपर्यंत तीन चार वेळेस नक्की झालं असेल. अर्थात त्याकाळात अशीच दाद वीरधवल, कालिकामुर्ती इत्यादी कादंबरींना सुद्धा दिली जात असे. खरी गोष्ट ही होती की माझ्या मनात इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्या विवेकाचा अभाव होता.
आजही मी जेव्हा अशा विवेकाबद्दल बोलतो तेव्हा तसा विवेक माझ्या ठायी आहे असा माझा अजिबात दावा नाही. परंतु असा विवेक असावा अशा पद्धतीचे भान मला आज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामताबद्दल विरोध असु शकतो परंतु असा विरोध नोंदवण्याआधी माझे मत समजुन घेतले जावे अशी माझी माफक अपेक्षा आहे. इतिहासकालिन कादंबरी आणि काल्पनिक कादंबरी यामधे प्रमुख भेद हा असतो की दोन्ही मधील व्यक्तिरेखा पुर्णपणे भिन्न असतात. इतिहासकालीन कादंबरीमधील व्यक्ती प्रत्यक्षात जीवन जगलेल्या असतात. त्यांच्या संबंधी, त्यांच्या गुणावगुणांविषयीचे उल्लेख कुठे न कुठेतरी नोंदले गेलेले असतात. अशा व्यक्तिंचे चित्रण करतांना त्यांच्या या उल्लेखांना बाजुला सारता येणे अवघड असते. काल्पनिक व्यक्तिरेखा आपण हव्या तशा गुणांची बनवु शकतो. प्रसंगी त्यांच्यातील मनुष्याला बाजुला सारत सुपरहिरो बनवु शकतो. मात्र ऐतिहासिक कादंबरीमधे हे घडणे अवघड असते. पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात. भारतासारख्या इतिहासाबद्दल अक्षम्य बेपर्वाई असलेल्या पण इतिहासाबद्दल अत्यंत उर्मट अहंभाव असलेल्या देशामधे ऐतिहासिक कादंबरीच्या नावाखाली वाटेल ते दडपणे गेल्या काही वर्षांमधे सुरु झाले आणि तशा कथानकांमधुन पुढे आलेला इतिहास हाच खरा इतिहास आहे अशी भ्रामक समजुत विशेषत: महाराष्ट्रात पसरली. अशा कथानकांमधले अग्रेसर नाव स्वामी कादंबरी आहे. आज मला स्वामी कादंबरी अजिबात आवडत नाही. मी आजही तिचे वाचन करेन परंतु काही वर्षांपुर्वी ज्या भावुकतेने मला ती कादंबरी आवडली होती तशी आज आवडत नाही.
स्वामी कादंबरी ज्या काळात आली त्या काळात साहित्य हे ब्राह्मणांचे ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले अशा एका परिघात अडकलेले होते. नाही म्हणायला इतर लेखक होते, परंतु त्यांचा आवाका मर्यादीत होता आणि त्यांची मजल पुणे वा दादर मधुन शाबासकी मिळावी इतकाच होता. त्यापलिकडे वाचकवर्गच नव्हता आणि प्रकाशन व्यवसाय मक्तेदारी असल्याने वेगळे काही लिहिलेले छापले जाण्याचा संभव नव्हता. अहो रुपम अहो ध्वनी करुन पाठखाजवणी करुन पैसे कमवणे आणि जमल्यास नाव कमवणे हे उद्देश असल्यावर जशी साहित्यनिर्मिती होईल ती तशी त्या काळात झाली. बहुधा हे पुरातन काळापासुन आहे. मुद्दा हा आहे की अशा काळात एखादी कादंबरी जी ब्राह्मणांची अहंता जोपासेल, त्यांच्या गतकालीन वैभवाची (!) जाण करुन देईल, त्यांच्या अक्षम्य चुकांवर पांघरुण घालेल नव्हे त्यांचा उल्लेख सुद्धा टाळेल, देव देश आणि धर्माच्या पेल्यातील अमृत प्यायला देऊन निवांत झोप आणेल, वर्तमानातील समस्यांना क्षणभर अंधारकोठडीत टाकून कर्तृत्वाचे धगधगते पलिते ह्या हातातुन त्या हातात झेलत भुतकाळातील तथाकथित संग्राम सावल्यांच्या खेळाच्या रुपात मांडून जागरणाने डोळे विस्फारत अभिमानाने डोलवायला लावेल अशा कथानकाची गरजच त्या काळात निर्माण झालेली होती. ती गरज स्वामीने पूर्ण केली.
४८ च्या गांधीहत्येनंतर ब्राह्मणांचे सामाजिक आयूष्य संपले. राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले. ५२ चा कुळकायदा ब्राह्मणांचे आर्थिक आयुष्य संपवणारा ठरला. अशा प्रकारे २० ते ५२ अशा सुमारे ३०-३५ वर्षांच्या आत गेली दोन ते तीन हजार वर्षे भारतात आणि महाराष्ट्रात समाजाच्या जडणघडणीवर ब्राह्मणांचा पगडा होता तो संपून गेला. तसा तो सातव्या आठव्या शतकात मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासुन संपू लागलाच होता. आणि सुरु झाला होता एक काळा कालखंड ज्यामधे अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल ते करण्याचे उरफाटे धंदे. इस १००० च्या पुर्वीचा ब्राह्मण आणि इस १००० नंतरचा ब्राह्मण यामधे प्रचंड फरक आहे. अगदी जसा वैदिक कालखंडातील सर्वशक्तीमान, दयाळु राजा इंद्र आणि पुराणकथांमधुन समोर आलेला लंपट, लबाड इंद्र यांच्या सारखा. याचा अर्थ इस १००० नंतरचे सगळेच ब्राह्मण वाईट असा अर्थ नाही. समाजातील इतरही घटक साथीला असतांना जे घडू शकते तेच ह्या कालखंडात झाले. समाजातील योग्य घटकांनी अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले की समाजाचे पतन निश्चित होत असते. ब्राह्मणांचे तेच झाले. वैयक्तिक लाभ अन हिशेब यांच्या नादात पेशवाई पतन पावली. नव्या साम्राज्यात कारकुनीशिवाय काही करता आले नाही. थोडेफार बरे निपजले ते फासावर गेले किंवा समाजाकडून धिक्कारले गेले. टिळकांच्या अस्ताबरोबर ब्राह्मणांची राजकीय घुसमट झाली. ६० च्या दशकात ब्राह्मण समाज म्हणून संपलेला होता.
अशा वेळेस स्वामी कादंबरी समोर आली. ब्राह्मणांची थोडीफार जमीन उरली होती तिचे वाटणीवरुन कज्जे चालु होते. नोकरी करुन आपण बरे आपली बायको बरी अशी विचारसरणी दृढ होत होती. एकत्र कुटुंब भांडणात तुटत होते किंवा सकाळ संध्याकाळ भांडे आदळत दात ओठ आवळत होते. तिन्ही लोकी भ्रष्ट पण आम्हीच श्रेष्ट असा फुकाचा अहंभाव वाढत होता. हा आपला तो त्यांचा असे वर्गीकरण मनात सुरु झाले होते. गाव सोडून शहरात आल्यामुळे गावची बलुतेदारी आणि जातीव्यवस्था सुटली होती. पण त्यामुळे इतर जातीच्या लोकांशी मिसळून वागण्याची गरज संपली होती. सोसायटीत आजुबाजुला ब्राह्मणच असावे असा आग्रह आणि कटाक्ष पाळला जात होता. त्यामुळे गावाकडुन शहरात विशिष्ट उपनगरातच घर घेतले जात होते. या सर्व घडामोडीत आपण ब्राह्मण असून धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार पैसे गाठीला नाहीत ह्याचा विचार न करता जुनी कर्मकांडे मात्र अगदी व्यवस्थित पुन्हा सुरु केली होती. प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता. मानपान देणे घेणे यातच पुरुषार्थ शोधत होता. अशा ब्राह्मण मनाला स्वामी कादंबरीची भुरळ पडली.
काका पुतण्याच्या भांडणात, माधवरावाच्या देवभक्तीत, लांबुन लांबुन केल्या जाणार्या प्रेमकुजनात, संतापुन चाबकाचे फटके देऊन शासन करणार्या माधवरावात, हताश गोपिकाबाईत, राघोबादादात, नानात प्रत्येकात ब्राह्मण समाज स्वत:ला शोधत होता. स्वत:ला रमवत होता. गतकाळाच्या स्मृतीमधे आजचा वर्तमान विसरत होता. ब्राह्मणसमाजाने स्वामीला डोक्यावर घेतले. त्या कादंबरीत खरे किती खोटे किती हा संशोधनाचा विषय आहे. कादंबरी आवडलेल्यांना त्याची फिकीर नाही. हीच गोष्ट संपूर्ण पेशवाई बद्दल आहे. हीच गोष्ट इतिहासातील कुठल्याही कालखंडाबद्दल आहे. इतिहास कसाही असो कादंबरी आम्हाला हवी तशीच हवी ही वाचकांची मागणी आहे. ही मागणी स्वामी पूर्ण करते. ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्याचदा आढळले आहे. त्याचमुळे नंतर इतर समाजातील लोकांना सुद्धा स्वामी कादंबरी आवडु लागली. कारण समस्या सर्वच समाजात असतात. आणि वर्तमान विसरुन भुतकाळात रमायला अनेकांना आवडते.
स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही. पटावी असा माझा आग्रह नाही. माझ्या कारण मीमांसेमधे काही चुका असण्याची शक्यता मी नाकारत नाही. कालानुरुप माझी मते बदलत असतात त्यात मला कमीपणा वाटत नाही. स्वामी मला का आवडत नाही याची कारणे तुम्ही शांतपणे वाचलीत याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि हे आभार नोंदवणे मला माझे कर्तव्य वाटते.
💬 प्रतिसाद
(70)
स
सुरिया
Wed, 08/23/2023 - 13:20
नवीन
ठरविक एक विचार सोडुन सगळे कसे टूलकिट असते हो तुमच्या मते. जिंदगी एक टूलकीट केलीय नुसती.
आणि कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये. राष्ट्रासाठी केले तर ते हिंदू राष्ट्रासाठी केलेय म्हणायचे. घरवापसी धर्मासाठी केली म्हणायची. ही घरवापसी राष्ट्रासाठी केले म्हणले की पापड मोडतो लगेच. धर्मासाठीच करायचे म्हणले तर कितीतरी सैनिक मुस्लीम असुन राजांच्या पदरी होते. अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते. पण बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर दोन नावे सोडता केलीय का कुठली घरवापसी? उलट राजांनी प्रत्येक धर्माचा आदरच केलेला दिसतो. हे खरे राष्ट्रकारण. आणि धर्मकारण म्हणले तर अगदी पार पेशवाईपर्यंत खुद्द राऊपुत्राला मनात असताना घरवापसी करता आली नाही तेंव्हा धर्माचे राज्य हा विषयच सोडा.
काय मान्य करायचे आणि काय टूलकीट ठरवायचे ते तुमचे तुम्ही बघा.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/23/2023 - 16:44
नवीन
कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये.?
सतत महाराजांचा आणि धर्मरक्षणाचा ( हिंदू ) काही हे संबंध नाही हे दाखवणे
अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते.
पण असा कुठंही दावा केलेला नाहीये,,, उलट माझे विधान वाचा "टोकाच्या हिंद्त्ववाद्यांनी महाराजांचे हिंदू धर्म रक्षणाचे काम हे हिंदुत्व वैगरे म्हणून उगाच उर बडवू नये आणि इतरांनी उगाचच त्यांचा धर्म रक्षणाशी संबंध नव्हतं असा अप्रचार करू नये ते म्हणले आहे मी ..
महाराजांचा हेतू तसा नसावा,, रयतेचा आणि स्वतःचा जो मूळ धर्म आहे त्यावर जो अन्याय चौ होता आणि परवलंबित्व आलाय ते झुगारून द्यायचे हे " स्वराज्य "ध्येय मग असे असताना त्यांनी जे केलं ते हिंदू धर्म टिकवनयसाठी केला असे म्हणले तर का जळफळाट होतो?
तान्हाजी या हिंदी चित्रपटत एक प्रसंग दाखयलाय .. तान्हाजी जेवहा गावकऱ्यांना शिवबा ला साथ द्या असे सांगायला जातो तेव्हा कशाला अंहित्य शिवबा ला साथ देऊ असे विचारल्यावर तो म्हणतो कि हे जे तुतुमचे हे जर सण वार आहेत / प्रथा आहेत त्या टिकण्यासाठी ( नक्की सवांद आठवत नाही पण मतितार्थ हा कि जे आहे ते टिकवण्यासाठी )
येवध सरळ असताना मुददमून शिवाजी महाराजांनच्या या कृतीचा वापर स्वताच्या भंजाळलेलय सर्वधर्मसमभावाशी जोडायच हे जे सत्र ते एका ठराविक साच्यातून आलेलं दिसत ते पाहून ... म्हणून टूल किट म्हणले ...
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/23/2023 - 01:03
नवीन
हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे.
अगदी योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत तुम्ही डॉ.
मी (माझ्या देशात) डाव्यान्न मत देणारा असून सुद्धा तुमच्याशी १००% सहमत
पण काय आहे एक तर तुम्ही "खरे" त्यातून तुम्ही महाराजांना हिंदूतलं ह चिकटवला म्हणजे नक्कीच संघी हालफ चड्डी वैगरे त्यामुळे तुमच्या या विचारणकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाईल ... ( ते मुद्दे किती हा तर्काला धरून असले तरी )
आणि गंमत बघा हा आज एक "खरे " मानतो कोणाला तर "भोसलेंना" जर "अजेंडा" जातीचा असता तर सतत पेशवाई चा उदो उदो केला असता "एखाद्या खरे" ने
असो ...
दुरदैवाने यात "न जाणारी जात" आणावी लागली त्यामुळे कदाचित हा प्रतिसाद उडवलं हि जाईल
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Tue, 08/22/2023 - 16:49
नवीन
फक्त एका वयात स्वामी आवडली पुढच्या वाढलेल्या वयात आवडली नाही. हे सर्वां बरोबरच होते. पण लेखकाने पेशवाई, ब्राह्मण, हिंदवी स्वराज्य आणी इतर वादग्रस्त मुद्दे घेऊन बराच धुराळा ऊडवून घेतला.
इथून पुढे आपला पास.
जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते
डाव्या उजव्या राजकीय ऐजंडा असू शकेल पण मिपाकर कशाला चालवतात. स्वामी होणे फार कठीण कमीत कमी विचाराने भिकारी तरी बनू नये.
चौकस भौ याच्या म्हणण्याशी सहमत.
ते आपले कर्म करून गेले
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/23/2023 - 01:31
नवीन
स्वामी होणे फार कठीण कमीत कमी विचाराने भिकारी तरी बनू नये.
शॉलिड
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/22/2023 - 19:02
नवीन
स्वामी, श्रीमान योगी ह्या रणजित देसाईंच्या कादंबऱ्या अगदी रटाळ वाटल्या. किंबहुना देसाईंनी बरेचदा कादंबरी लिहिताना स्वैर स्वातंत्र्य घेतलेले जाणवते. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वगळता (कर्णाचे उदात्तीकरण सोडून द्या) युगंधर, छावा या अतिलालित्यपूर्ण वर्णनामुळे अतिरटाळ झालेल्या कादंबऱ्या आहेत. त्यामुळे शक्यतो उत्तम चरित्र संदर्भ पुस्तके वाचावीत अशा मताचा मी आहे.
पेशव्यांच्या बाबतीत श्रीराम साठे यांचे 'पेशवे' आणि प्रमोद ओकांचे 'पेशवे घराण्याचा इतिहास' ही दोन उत्तम संदर्भ पुस्तके आहेत.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/23/2023 - 01:17
नवीन
आपला हा लेख परत वाचला
.. मूळ स्वामी कादंबरी तील त्रुटी किंवा त्यातील ओढून आणलेले अलंकारिक पणा वैगरे हा हेतू होता असे वाटले सुरवातीला आणि त्यादृष्टीने तसे विश्लेषण अधिक असते तर बरे झाले असते उलट त्याचे रूपांतर "एका जातीवर आग पाखड करणे हा दिसला .. मिपावर हे चालते?
हे म्हणजे मध्यन्तरी एक सिने दिग्दरक्षकाने " मराठी चित्रपट एकाच जातीचे लोक का घेतात " असे विधान केलं होते तसेच आहे
असो यावर सचिन पाटील ने छान वक्तवय केलं आहे
पहा https://www.youtube.com/watch?v=uVuMsV4MfYI
https://www.youtube.com/watch?v=zbV0LfIPDQk
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Wed, 08/23/2023 - 04:17
नवीन
या आय डी ची कुंडली व प्रगल्भ विचार सरणी बघता कोणीतरी पुनर्जन्म घेऊन आलेला दिसतोय.
वय दोन महीने तीन दिवसात ऐव्हढे ज्ञान,अद्भुत बाळक दिसतोय.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/23/2023 - 06:23
नवीन
कर्नल साहेब आपण नक्की कोणाबद्द्दल बोलत आहात ? म्या तो गुन्हेगार नाही ?
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Wed, 08/23/2023 - 07:22
नवीन
........
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Wed, 08/23/2023 - 06:22
नवीन
सर्व वाचक प्रतिसादकांचे पुनश्च अभिनंदन आणि आभार !
काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा. गंमतीशीर आहे एकंदरीत त्यामुळे मजा वाटते.
आता मते मांडली की धुरळा उडणारच, मतमतांतरामुळेच भारतातील लोकशाही जिवंत आहे आणि ती अशीच रहावी.
माणसाने व्यक्त होणे सोडू नये. भांडण मताशी असावे माणसाशी नको अशी भुमिका सर्वांची असली तर आनंद अधिक असतो.
आपणा सर्वांना आरोग्यपुर्ण दिर्घायुष्य लाभावे ही मनोकामना.
ही चर्चा आपण इथे थांबवु, परत केव्हातरी असेच व्यक्त होऊ !
धन्यवाद.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/23/2023 - 06:29
नवीन
असेच व्यक्त होऊ ! डाव्यांना मी उजवा वाटतो ...
अहिरावण
डावे वा उजवे प्रश्न नाही .. काय आणि कसे मांडले आहे ... त्यामागे काही "अजेंडा" आहे का हे महत्वाचे
तुमची दोन वाक्येच काय ते सांगून जातात "सावरकर बुळबुळीत विचारसरणीचे" आणि " छत्रपतींचं सैन्यात मुस्लिम नवहते का !
अजेंड्याच्या भरभक्कम भावना पोचल्या
विषयांप्रमाणे दावे उजवे असते ... उदा पाश्चिमात्य लोकशाहीत बहुतेकदा डाव्यानां मत देणार असलो तरी काही बाबतीत उजवा आहे
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Wed, 08/23/2023 - 11:14
नवीन
शोध पत्रकारीता अशी असते हे माहित नव्हते. तुमच्या भावना पोचल्या.
तुमच्याबद्दल नितांत आदर आहेच आणि तो अजुन वाढवाल याची खात्री आहे.
शुभेच्छा !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/23/2023 - 15:35
नवीन
काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा.
मी पोलिसांना हात भट्टी वाला वाटतो
आणि
हात भट्टी वालयाला मी पोलीस वाटतो.
माझा चेहराच असा आहे
-- श्री राम नगरकर
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 08/23/2023 - 23:41
नवीन
स्वामी वाचल्याचा काय परिणाम झाला होता हे आठवत नाहि. नसेलच झाला बहुतेक :)
पण कादंबरीच्या प्रस्तावनेत एका इंग्रज अधिकार्याचं टिपण दिल्याचं आठवतय... माधवराव पेशव्याच्या अकाली निधनामुळे पेशवाईचं आणि पर्यायाने मराठेशाहीचं प्रचंड नुकसान झालं असं काहिसं मत दिलं होतं साहेबाने. माधवराव काहि एक कर्तुत्ववान होता, व तदनुषंगाने देसाईंनी त्याला कादंबरीचा हिरो बनवलं असल्यास, आणि ललित साहित्य कलाकृती निर्माण केली असल्यास काहि गैर नाहि.
बाकि मला स्वामी काहि विशेष आवडल्याचं आठवत नाहि. श्रीमान योगी मात्र आवडली होती.
सावंतांचं मृत्युंजय थोडं रटाळ वाटलं होतं. युगांधर आणि छावा तर अजीबात आवडलं नव्हतं.
राहिला मुद्दा ब्राह्मणांच्या मानसीकतेचा. ओसाड गावची पाटिलकी करण्याचं नशीबात आलं तर आणखी काय होणार. ज्या ब्राह्मणेतरांच्या हातुन सत्ता, संपत्ती वगैरे मटेरीयल गोष्टी निघुन गेल्या तरिही स्वभावतला पीळ गेला नाहि, त्यांची मानसीकता समजणं सोपं आहे. पण विद्वत्ता, धर्मदर्शन वगैरे अमूर्त बाबतीत हा पीळ किती खरा किती खोटा हे कळणं कठीण असतं.. स्वतःचं स्वतःला देखील. अनेकांची यात खुप ओढाताण झाली. जे सावरले त्यातल्या बर्याच जणांनी या ब्राह्मण्याला कायमचा रामराम ठोकला. काहिंनी त्यातल्या उदात्ततेवर आलेली काजळी साफ करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. उर्वरीत भट आपापला गोंधळ आपापल्या परिने निस्तरण्याचा प्रयत्न करत असतात. मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच. त्यामुळे सरमिसळी मानसीकतेचा एक वेगळाच ब्रह्मवृंद आकाराला येतोय असं दिसतं.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 08/24/2023 - 01:13
नवीन
मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच.
हेच किती एकांगी आहे आणि हास्यस्पद आहे , महाराष्ट्रात तर असा कांगावा केला जातो कि बघ ते ३.५% कसे सगळे बळकावून बसले आहेत? हायला मग उरलेलले ९६.५% अशी गुलामगिरी काय सहन करतात असे काबुल केल्यासारखेच आहे !
कदाचित नाट्य कला क्षेत्र सोडलं आणि काही थोडे खाजगी वयसाय आणि लष्करच्या भाकऱ्या असे सामाजिक उद्योग या ठिकाणी काय ते ब्राह्मणांचे थोडे फार प्रभुत्व शिल्लक असेल ( एखांदा गडकरी किंवा फडणवीस म्हणजे काही अख्या ब्राह्मणांनी गिळंकृत केलाय असे होत नाही- संघ ब्राह्मणाचा म्हणणारे हे विसरतात कि ना मोदी ना योगी ना शहा ब्राह्माण ,, )
आणि flogging horse mhnun मारायला सोपे
पानिपतात लाखो मराठे ( जात आणि समाज दोन्ही ) गेले पण त्यात भोसले राजे का नव्हेत पुढे हा प्रश्न विचारला तर? 2 पेव्श्वे मेले / शिन्दे मेले पन भोस्ले जख्मि झले असे कहि ऐक्लेले नाहि?
या राजकीय आगलावू पनामुळेच जे काही उरले सुरले ब्राह्माण भारतात आहेत ते कारण नसताना कडवे बनत चालले आहेत... लै झाले,,, लै ऐकून घेतले " गेले बा......" म्हणतात
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
गुरुवार, 08/24/2023 - 23:50
नवीन
लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत. आता त्यात भर म्हणून शिवाजी महाराज, सावरकर ह्यांच्या विचारसरणीवर धुराळा उडवत आहे. स्वतःचे विचार मांडणे ह्यात गैर काहीच नाही तरी देखील इतिहासाला सोडून वाटेल ती विधाने करणे अत्यंत गैर आहे.
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Fri, 08/25/2023 - 03:59
नवीन
आपल्या आकलन क्षमतेचे मला नेहमी कौतुक वाटत आले आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 08/25/2023 - 02:02
नवीन
लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत
नक्किच
मिपाचं संपादकांना राजकीय घडामोडी वरील चर्चा थांबव्यावयश्या वाटल्या पण अश्या जातीवाद वाढवणाऱ्या लेख लिहिलेले चालतो !
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Fri, 08/25/2023 - 03:59
नवीन
आपली शोध पत्रकारीता वंदनीय आहे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2