छान वर्णन.
बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.
प्रतिक्रिया
छान वर्णन.
नवीन डब्यांमध्ये
जांबरुख व टाटाला थांबा आहे?
घाटात खंडाळा आणि नागनाथ शिवाय