Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी अमेरिकन्स ..

म
महेंद्र
Wed, 02/18/2009 - 14:50
🗣 127 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32664 वाचन

💬 प्रतिसाद (127)
स
सुचेल तसं गुरुवार, 02/19/2009 - 02:36 नवीन
महेंद्र साहेब, आपल्या लेखावरुन असं वाटतं की, आपलं एखाद्या परदेशस्थ भारतीयाशी भांडणं असावं. त्यावरुन तुम्ही सरसकट सगळ्यांना एकाच तराजूत तोलण्याची चूक करत आहात. तुम्ही ज्या नेत्याबद्दल (लालूंबद्दलच ना?) त्यांना "हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात" असं विधान केलं आहे, त्या नेत्याला आपण आदर्श मानायचं का? तुम्हाला जर लालू ग्रेट वाटत असतील तर त्यांनी बिहारची जी वाट लावली आहे त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला उत्सुक आहे. मिपावर बरेच परदेशस्थ भारतीय आहेत, पण आजपर्यंत मी कुणालाही भारतात राहणार्‍यांना ज्ञान शिकवताना पाहिले नाही. आधीच जातीची/धर्माची कुंपणं आहेत. त्यात अजून तुम्ही परदेशस्थ्/भारतात राहणारे असा भेद करु नका ही नम्र विनंती. तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो, मग माझं म्हणून काय असतं? -श्याम मनोहर
  • Log in or register to post comments
स
साजिरा गुरुवार, 02/19/2009 - 07:21 नवीन
माझी मागे एकदा मायबोलीवर लिहिलेली "चिऊच्या घराची गोष्ट" वरती आली आहे. ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल फारेंडाचे आभार मानतो. अशा वेळी लिंक दिली जावी अशी अपेक्षा असते. जेणे करून मुळ लेखकाला त्याचे क्रेडिट मिळावे. पण तरी हरकत नाही. माझ्या वरील कवितेला जे प्रतिसाद आले होते त्यातच कुणीतरी तेव्हा मला 'आमच्या मित्रांना मेल करू का?' असे विचारले होते; व मी त्याला 'नक्कीच करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कविता पोचावी असे मला वाटते' असे उत्तर दिले होते. मेल मधून फिरत फिरत ही कविता इथे आली असेल, तर तो उद्देश साध्य झाला असे म्हणावे!! असो. वरती कवितेवर प्रतिक्रिया दिलेल्यांचे आभार. बाकी तुमची चर्चा चालू द्या.
  • Log in or register to post comments
न
नाटक्या गुरुवार, 02/19/2009 - 08:07 नवीन
ही कविता मला ढकलपत्रातून मिळाली. त्यावर कोणाची, कुठून, कशी हे काही लिहीलेले नव्हते आणि मलाही ठावूक नव्हते. तसेच जेव्हा ती कविता ईथे टाकली तेव्हा त्याचा बद्द्ल मी क्रेडिट माझ्या कडे घेतले नाही (कविता टाकतानाच याचा उल्लेख केला आहे. वर असेही संपादक मंडळाला लिहिले आहे कि जर जरूर वाटली तर काढून टाकावी). जर माहीत असते तर १००% सांगतो की त्या बरोबर तुमचे नाव आणि लिंक दिली असती. तरी देखील एक सुंदर कविता लिहिल्या बद्दल आणि त्या मार्गाने आमच्या भावनांना शब्दरूप दिल्याबद्दल धन्यवाद... - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साजिरा
क
कवटी गुरुवार, 02/19/2009 - 10:18 नवीन
आ रे फक्त अमेरिकाच का? तिकडे आफ्रिका ,वेस्ट इंडीज मधे पण झाडा रे २-४ दुगाण्या... आपला टार्‍यापण येयिल आखाड्यात.... कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 02/19/2009 - 10:31 नवीन
>>आ रे फक्त अमेरिकाच का? तिकडे आफ्रिका ,वेस्ट इंडीज मधे पण झाडा रे २-४ दुगाण्या... नाही हो. तिथे अमेरिकेच्या तुलनेत कायमस्वरुपी रहाणारे खूप कमी आहेत. आणि अमेरिकन डॉलर ला भाव आहे ना. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/19/2009 - 10:39 नवीन
'इथे वाचा' वर मला तरी स्वाती दांडेकर ह्यांचे विचार (ज्यावरून एवढा गदारोळ माजला आहे) वाचायला मिळाले नाहीत. श्री. महेंद्र ह्यांनी 'स्वाती दांडेकर' ह्यांच्या विचारांचा 'सकाळ' ह्या वर्तमानपत्राचा दुवा द्यायला हवा होता, असे वाटाते. असो. मी अमेरिकेत नाही पण भारताबाहेर २५ वर्षे राहिलो आहे. अजूनही त्या देशाशी संबंध राखून आहे. ह्या वास्तव्यात मला तरी भारताला शिव्या घालणारा कोणी महाराष्ट्रीयन (की महाराष्ट्रिय?) भेटला नाही. सर्वांना भारताबद्दल प्रेमच दिसून आले. भारतातील गैरप्रकारांवर बोट ठेवणे म्हणजे काहितरी मोठ्ठे पाप करणे असा विचार कोणाच्याही मनात येत नाही. भारतात बुद्धीवंतांची कमी नाही. पण भ्रष्टाचार, राजकारण्यांची समाजकारणातील उदासिनता, समाजातील वाढती ऐहिकता, पारंपारिक जिवनमुल्यांचा र्‍हास, नविन पिढीची ऐतिहासिक वारशाबद्दलची अनास्था आदी अनेक मुद्दे भारत भेटीत प्रकर्षाने जाणवतात त्यावर 'तिथे' मराठी माणसांमध्ये स्वाभाविक पणे चर्चा होते. नुसती चर्चा होते का? तर नाही पुढील पिढीला संस्कारक्षम बनविण्यचा प्रयत्नही होतो. पण त्यावरही,' 'मुंजी लावल्या, शुभंकरोती शिकविले' म्हणजे आपण खूप काही संस्कार केले, असे एन्. आर्. आय्. ना वाटते', असे हिणकस शेरे, स्वदेशी आणि स्वबांधवांकडून कानावर येतात. असो. त्यांचे विचार त्यांच्या जवळ असे म्हणून सोडून द्यायचे. भारताबद्दल प्रेम वाटते तर परदेशात का राहता? परत येऊन भारताची सेवा करा, त्याला प्रगतीपथावर न्या. असा पोकळ आरडाओरडा करण्यापेक्षा आपण इथे आहोत तर प्रथम आपण स्वतःला सुधारू, मग आपल्या गल्ली-मोहल्ल्याला सुधारू, पुढे आपल्या शहरला सुधारू म्हणजे देश आपोआप सुधारुन आज ना उद्या प्रगती पथावर नेता येईलच. १०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? स्वाती दांडेकराचे विचार माझ्या वाचण्यात आले नाहीत त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण त्या काहितरी 'गैर' बोलल्या आहेत असे एकूण श्री. महेंद्र ह्यांच्या लिखाणावरून वाटते. ठीक आहे ते त्यांचे विचार आहेत असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करून आपण आपले लक्ष भारताच्या सद्य परिस्थितीवर केंद्रित करावे. वरील सर्व सल्ला/उपदेश मी खडकावर उभा राहून पाण्यात बुडणार्‍याला पोहण्याचे धडे देत नसून मी स्वतः ह्या व्यवस्थेत गटांगळ्या खात पोहण्याचा प्रयत्न करतो आहे. दर महिना काही हजार परकिय चलन भारताला मिळवून देतो आहे. भारतातल्या १५ जणांना परदेशात पोटापाण्याला लावले आहे, भारतात सर्व टॅक्स भरून व्यवसाय उभारतो आहे. भारतात ३० जणांना पोटापाण्याला लावले आहे. पुण्यासारख्या शहरात सुशिक्षित (?) म्हणवणारे वय वर्षे १५ ते ७५ पर्यंत सर्व, स्त्री काय किंवा पुरुष काय, जेंव्हा बेशिस्तपणे वागून रहदारीचे नियम तोडतात तेंव्हा त्यांचा रोष पत्करून मी त्यांना समजविण्याचे, लोकशिक्षणाचे कार्य तिथल्या तिथे रस्त्यातच करीत असतो. भारताची पुढची पिढी महत्त्वाची. माझ्या स्वतःच्या मुलाला तो परदेशात असल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे बद्दल वारंवार मार्गदर्शन केले आहे. आज तागायत विविध स्तरावर त्याला 'घडविण्याचा' प्रयत्न करतो आहे. तसेच गल्लीबोळात क्लासेसच्या बाहेत रस्त्यावर आपापल्या दुचाक्या उभ्या करून गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही 'रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वागू नका' अशी हात जोडून विनंती करीत असतो. रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍यांनाही समजावत असतो. असो. शासनाचीही काही जबाबदारी असते. आपल्याकडे सार्वजनिक मुतार्‍या अगदी नगण्य असतात. असतात त्याही 'वापरण्यापलिकडच्या' अवस्थेला पोहोचल्या असतात. स्त्रियांसाठी तर अशी सार्वजनिक सोयच नसते. समानतेचा ढिंढोरा पिटण्याच्या आजच्या काळात ही असमानता का? त्या मुळे कोणी पुरूष मंडळी रस्त्याच्या कडेला उभी असतील तर ते गैर आहे हे जाणूनही तिकडे दुर्लक्ष करावे लागते. मी स्वतः, बँका, मॉल, उपहारगृहे अशा आस्थापनांमधील स्वच्छतागृहांचा वापर निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी करतो. पण अशी नागरी सुविधा उपलब्ध करून न देणे (जनतेकडून भला थोरला कर वसूल करूनही) हे सरकारचे अपयशच आहे. 'धंदा, स्वतःचा व्यवसाय करणार्‍यांसाठी सरकारने अनेक नियम केलेले असतात पण त्यांचे काटेकोरपणे पालन करून व्यवसाय करणे कधी शक्य होऊ नये अशाच पद्धतीने ते बनविले असतात.' हे माझे विधान नसून प्रसिद्ध उद्योगपती श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे ७०च्या दशकातले वाक्य आहे. मी फक्त सध्या तसा अनुभव घेतो आहे. माझ्या उपहारगृहासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मला काही 'खर्च ' आला. तो करण्यावाचून गत्यंतरच नसते. कारण अग्निशमन दलाचा अधिकारीच मला सांगतो की असे एकेक नियम आहेत की ते पाळून तुम्ही व्यवसाय करूच शकणार नाही. तिच कथा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची, तिच कथा पोलिस परवान्याची, तिच कथा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची आणि तिच कथा कोर्ट कचेर्‍यातली. एकतर ह्या भ्रष्टाचाराचा भाग बना नाहितर घरी बसा. मी कायद्याला धरूनच वागेन, व्यवसाय करेन असे म्हणाल तर तुमचा व्यवसाय ४ महिनेही चालू देणार नाही ही व्यवस्था. ह्या, वरील उदाहरणांना 'टिप ऑफ द आईस बर्ग' असेही म्हणता येणार नाही, इतका हा 'कर्करोग' भारतभर पसरला आहे. कुणा परदेशस्थ मराठी (किंवा कोणीही भारतियाने) काही कॉमेंट करावी आणि आपण तमाम परदेशस्थांवर उखडण्याला समर्थनिय मानावे तर त्याच मापदंडाने जे काही भारतात चालले आहे त्या ह्या पापाला वाचा फोडून, त्याविरुद्ध चळवळ उभारण्याची प्राथमिकता कितीतरी पटीने अधिक आहे. कुणा एका व्यक्तीच्या वक्तव्याने आपण विद्ध होऊन 'शितावरून भाताची परीक्षा' हा न्याय सर्व पारदेशस्थांना लावित आहात पण भारतभर पसरलेल्या 'भाता'कडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहात. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे कुणा संताने म्हणून ठेवले आहे. त्याचा अर्थ एवढाच कि, 'त्याच्या निंदेतून आपल्याला आपलेच दोष स्वच्छ दिसून येतात. ते दूर करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा आपल्याला वाव मिळतो.' खरे पाहता आपण अशी स्पष्ट टिका करणार्‍यांचे आभारच मानले पाहिजेत. असो. हे माझे विचार आहेत. तुम्हाला ते पटले तर उत्तमच आहे नाही पटले तरी मी माझ्या मार्गावरून मार्गक्रणा करीत राहणारच आहे. धन्यवाद. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
न
नाटक्या गुरुवार, 02/19/2009 - 10:47 नवीन
मानले तुम्हाला. अतिशय संयमी आणि समर्पक प्रतिक्रिया दिलीत. १०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? नेमके वर्मावर बोट ठेवलेत आपण. - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पक्या गुरुवार, 02/19/2009 - 10:58 नवीन
>>१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? पेठकर काकांची प्रतिक्रिया छानच त्याबद्द्ल वाद नाही. फक्त एकच सांगायचे की ९९% मध्ये देश सुधारण्याची जबाबदारी पेलवणारे किती असावेत? बेसुमार लोकसंख्या वाढलेल्या या देशात दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असलेले गरीब जन किती असावेत? सरसकट ९९% आकडा बरोबर नाही वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/19/2009 - 11:15 नवीन
'तो ' प्रॉब्लेम तर १ टक्यातही असणारच. ह्या १ टक्के अनिवासी भारतियात सर्वजण थोडेच शिकले-सवरले असणार आहेत? जे काही शिकले-सवरलेले आहेत त्यांच्यातही ती 'धमक' असेलच असे कशावरून? स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी ज्यांनी उडी घेतली ते सर्व उच्चविद्याविभूषित नव्हते. परिपक्व बुद्धीचा कोणी अशिक्षितही समाजकारण करू शकतो. असो. तसेच, ९९% टक्के म्हंटले म्हणजे अगदी बारावीच्या रिझल्ट सारखे नाही म्हणायचे आहे मला. मुद्दा एवढाच आहे की अनिवासी भारतिय निवासी भारतियांच्या तुलनेत बरेच कमी आहेत. तुमच्या समाधानासाठी १ % आणि ४०% असे प्रमाण घेतले तरी तेही अनिवासींपेक्षा बरेच भारी आहे. सगळेच शिकले/सवरलेले/समर्थ अमेरिकेत गेले आणि अशिक्षित/बावरलेले/असमर्थ भारतात मागे राहिले अशी परिस्थिती नाहीए. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/19/2009 - 13:17 नवीन
हे सा॑गतोय..जे परदेशात बसुन कविता पाठवितात त्या॑च्यासाठी,, काय असत माहीत आहे का ? कचरा असेल ना तर दुरवरून " वास "येतो,त्याचप्रमाणे वाईट बाब लगेच लक्षात येते, अत्तर मात्र बोटाला लावुन नाकाजवळ न्याव लागत्,त्याच प्रमाणे चाग॑ली बाब लक्षात येण्यासाठी त्याच्याजवळ जाव॑ लागत, दुर असणार्‍या॑ना का समजणार. समस्या १)अस्वछता : ही एक सार्वजनीक जबाबदारी आहे,आपण जे काही करताय ते व॑दनीय आहे. मी काय केल आहे : अशीच "नागपुरचाळ" ह्या झोपडट्टीची सुधारणा केली आहे,आता तिथे जाल तर ती झोपडपट्टीची वाटणार नाही,"सुविधा"आणी आमदाराचे हात पाय जोडुन सार्वजनीक स॑डास (एकुण १०) बाधुन घेतेले आहेत.एक जिम (टार्‍या पुण्याला आला की खास निमत्र॑ण आहेच्,सोबत त॑दूरी.ह.घ्या.)गेल्या आठ वर्षापासुन आम्ही(साधारण १५० मे॑बर)तिथे एक फ॑ड चालवितो.२% व्याजाने केवळ शिक्षणासाठी कर्ज देतो,मागील वर्षा॑पासुन१% केला आहे.बरेच जण उच्चपद्स्थ आहेत,भाउ,मित्र,झोपडपट्टीच्या मुली ,मी स्वतः आतापर्यत पर्यत यु.एस्.ला जाउन आलो,दोन जण I.I.T. engineers आहेत,बायका॑बरोबर यु.एसला रहातात.पण मुळ घर अजुन नागपुरचाळीत, अपेक्षा:जिथे असाल तिथे स्वछता असा आग्रह धरा...जालावर खडे फोडण्यापेक्षा..आम्हा परदेशी वास्तव्यात असलेल्या भारतीय बाध॑वाकडुन हिच अपेक्षा करतो.. सुहास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
संदीप चित्रे गुरुवार, 02/19/2009 - 14:57 नवीन
तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
प
प्राजु गुरुवार, 02/19/2009 - 15:34 नवीन
तू आणी तुझ्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या ग्रुप ने काय केलं ते नाही सांगितलंस तू. हा संदीपचा ग्रुप... एक कवडीही न घेता महाराष्ट्र फाऊंडेशन साठी पैसे जमाकरण्या करता त्यांच्या ३ तासाच्या शो चे खेळ करतात. आणि जमलेला सगळा निधी महाराष्ट्र फाऊंडेशन ला पाठवून देतात. नेहमीच्या कामकाजातून.. विकांताला सगळे कार्यक्रम असतात यांचे. आता पर्यंत कित्येक हजार डॉलर्स यांनी पाठवले आहेत महाराष्ट्र फाऊंडेशन साठी. आता काय म्हणाल याला? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
प
पक्या गुरुवार, 02/19/2009 - 17:58 नवीन
>>स्टॅन्ड अप कॉमेडीच्या ग्रुप .....महाराष्ट्र फाऊंडेशन साठी. आता काय म्हणाल याला? देशसेवा, भरीव योगदान. चित्रे साहेब सलाम आपल्या कार्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
य
यशोधरा गुरुवार, 02/19/2009 - 18:13 नवीन
अतिशय उत्तम प्रतिक्रिया पेठकर काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सायली पानसे गुरुवार, 02/19/2009 - 10:56 नवीन
काका सहमत आहे....अगदी छान लिहिल आहे. आम्हि हि आमच्या परिने खारिचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोच ...पण उगाच आम्ही परदेशात राहतो म्हणून कोणी काहीही बोलला कि त्रास होतो. आमचा देशप्रेम खोट त्यांच ते खर अस नसत ना.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/19/2009 - 11:34 नवीन
'उडदा माजी काळे गोरे' हे सर्वत्र असणारच. जास्त मनावर नाही घ्यायचे. समाजकारण करीत राहावे. कोणी काहीही म्हणू देत. 'ऍकला चॉलो रे!' दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
स
सिद्धेश गुरुवार, 02/19/2009 - 12:48 नवीन
१०० कोटी जनतेतील फक्त १ कोटी जनता परदेशात आहे असे धरले तर ९९% टक्के लोकांनी देश सुधारण्याची जबाबदारी घ्यायची की १ कोटी जनतेवर दोषारोप करून आगपाखड करायची? आज भारतातील साक्षरता फक्त६०%आहे. आणि ४०%लोकांना पोटभर खायला पण मिळत नाही. मग त्यांच्याकडून काय डोंबलाची अपेक्षा करणार देश सुधारण्याची? परदेशात असणार्या भारतीयांना उत्तम ज्ञान आहे. जागतिक घडामोडी काय चालू आहेत भारताला प्रगतीसाठी काय करायला पाहिजे याची त्यांना चांगली माहिती आहे. आणि एवढी सगळी साधनं असतानाही ते पूर्ण योगदान देत नाहीत यामुळे च जीव तुटतो. उत्तम ज्ञान असणारे भारतात पण आहेत पण त्यांच्यामध्ये हे १लाख मिसळले तर संख्या नक्कीच वाढेल. आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/19/2009 - 18:08 नवीन
भारतातील साक्षरता फक्त६०%आहे. आणि ४०%लोकांना पोटभर खायला पण मिळत नाही. मग त्यांच्याकडून काय डोंबलाची अपेक्षा करणार देश सुधारण्याची? मुळात देश सुधारणे म्हणजे काय? ह्यावर सखोल अभ्यास झाला पाहिजे. मला वाटते जे अशिक्षित, निरक्षर आहेत त्यांना 'ग्राम स्वच्छता अभियाना'चे महत्त्व पटले आणि त्यांनी ते अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी देशसेवा केली असेच म्हणावे लागेल. दूसरे, ते शिकले नाहित निरक्षर राहिले पण त्यांनी त्यांच्या मुलांना प्राथमिक का होईना शिक्षण देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या हातून देशसेवा घडली असेच म्हणावे लागेल. त्यांनी व्यसनमुक्तीचा प्रयत्न केला तरी देशसेवा घडेल. त्यांनी 'तंटामुक्त गाव' अभियान चालविले तरी देशसेवा घडेल. देशसेवा अनेक मार्गांनी करता येते. शिक्षणाचा, साक्षरतेचा इथे संबंध नाही. जितके सुशिक्षित अनिवासी आहेत त्यांच्या पेक्षा कितीतरी सुशिक्षित निवासी भारतिय आहेत. त्या १ टक्यावाचूनच भारताची सर्व प्रगती अडली आहे अशा आडमुठ्या गैरसमजात राहणे मला तरी रुचत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश
स
सिद्धेश गुरुवार, 02/19/2009 - 12:56 नवीन
भारतात ३० जणांना पोटापाण्याला लावले आहे. पुण्यासारख्या शहरात सुशिक्षित (?) म्हणवणारे वय वर्षे १५ ते ७५ पर्यंत सर्व, स्त्री काय किंवा पुरुष काय, जेंव्हा बेशिस्तपणे वागून रहदारीचे नियम तोडतात तेंव्हा त्यांचा रोष पत्करून मी त्यांना समजविण्याचे, लोकशिक्षणाचे कार्य तिथल्या तिथे रस्त्यातच करीत असतो. भारताची पुढची पिढी महत्त्वाची. माझ्या स्वतःच्या मुलाला तो परदेशात असल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे बद्दल वारंवार मार्गदर्शन केले आहे. आज तागायत विविध स्तरावर त्याला 'घडविण्याचा' प्रयत्न करतो आहे. तसेच गल्लीबोळात क्लासेसच्या बाहेत रस्त्यावर आपापल्या दुचाक्या उभ्या करून गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही 'रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वागू नका' अशी हात जोडून विनंती करीत असतो. रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍यांनाही समजावत असतो. आप्ण केलेल्या या देशसेवेबद्द्ल मी एक भारतीय म्हणून आपला शतशः ऋणी आहे. आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/19/2009 - 18:11 नवीन
मी माझे कर्तव्य करतो. 'ऋणाची' भाषा मी करत नाहिए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश
व
वजीर गुरुवार, 02/19/2009 - 16:45 नवीन
अमेरिकेत गेला कुणी तर चांगलेच आहे की. स्वताच्या हिमतीवर परदेशात कुणी करियर केले तर बाकिच्याना का त्रास? तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात.
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 02/19/2009 - 17:51 नवीन
>>अमेरिकेत गेला कुणी तर चांगलेच आहे की. स्वताच्या हिमतीवर परदेशात कुणी करियर केले तर बाकिच्याना का त्रास? ..तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात. मुद्दे भरकटवू नका हो. परदेशात शिक्षण, करियर - नोकरी , पेसा कमावणे चूक की बरोबर असा वाद नाहिये. आणि तो नसावाही. परदेशी राहून भारतातल्या सिस्टिम ला नावे ठेवणे ह्या विरोधात लेखकाने लिहिले आहे. परदेशी जायला धमक च लागते असे नाही...हुशारी , चांगले शिक्षण असून , नोकरीतला भरभक्कम अनुभव असूनही काही जणांना जायची संधी मिळत नाही. त्यात घरच्या महत्वाच्या जबाबदार्‍या , पैशाची कमतरता, नशीब हे भाग ही असू शकतात. इथे अनिवासिंच्या विरोधात लिहीणारे सर्वच भारतात रहात आहेत, ते कधीही परदेशी गेले नाहीत आणि त्यांच्यात धमक नाहिये हा तुमचा गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वजीर
व
वजीर गुरुवार, 02/19/2009 - 18:01 नवीन
माझ्या म्हणण्याचा विपर्यास करु नका. मी कधीच असे म्हणालि नाही कि जे परदेशी जात नाहीत त्यांच्यात धमक नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की जे जातात ते स्वबळावर जातात दुरदेशी खेळ मांडणे हा काही वाटतो तितका सोपा प्रकार नाही. तरीही उगीचच त्याना हिणवणे, हंटरने मारने वगैरे शब्दप्रयोग योग्य नाहीत. हे लोक काही चोर दरोडेखोर आहेत का? कि तुमच्या वाट्याचं हिसकावुन खात आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
न
नीधप Sat, 02/21/2009 - 23:58 नवीन
>>परदेशी जायला धमक च लागते असे नाही...हुशारी , चांगले शिक्षण असून , नोकरीतला भरभक्कम अनुभव असूनही काही जणांना जायची संधी मिळत नाही. त्यात घरच्या महत्वाच्या जबाबदार्‍या , पैशाची कमतरता, नशीब हे भाग ही असू शकतात. << सहमत. कारणांमधे ठरवून घेतलेले निर्णय हे पण समाविष्ट करा. >>इथे अनिवासिंच्या विरोधात लिहीणारे सर्वच भारतात रहात आहेत, ते कधीही परदेशी गेले नाहीत आणि त्यांच्यात धमक नाहिये हा तुमचा गैरसमज आहे.<< इथेही सहमत. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
पक्या गुरुवार, 02/19/2009 - 18:23 नवीन
वजीरजी, मी स्वतः सध्या परदेशी च रहात आहे. त्यामुळे आपण म्हणताय त्या परिस्थितीबद्द्ल जाणून आहे. विपर्यास नाही केलाय . 'तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तर पण जा ना परदेशात' असे तुम्हीच आधीच्या प्रतिसादात लिहीले आहे ना. त्याला उत्तर दिलंय मी , ते नीट वाचल्यास आपल्याला समजेल. उगाच प्रतिसाद खोडून काढायचा म्हणून लिहू नका. हंटरने मारने असा शब्दप्रयोग मला दिसला नाही कुणी वापरलेला. वाचताना नजरचुकीने सूटला असेल तर माहीत नाही. ज्याने तो वापरला असेल त्याला तिथल्या तिथेच समज द्यायची होती ना मग.
  • Log in or register to post comments
क
कवटी Fri, 02/20/2009 - 07:47 नवीन
बाझवला तिच्यायला..! अनिवासी आहेत असे आहेत. कुणी प्रेम करा किंवा जळा! प्रेम करण्यार्‍यांबद्दल अर्थातच आपुलकी आहे. आणि जळणार्‍यांना अनिवासी साले फाट्यावर मारतात. या सर्व जळूंना हे अनिवासी पुरून उरतील हे नक्की! आणि उरलेही आहेत! कवटी अभ्यंकर अवांतर : सिरीयस लेखाच्या विडंबनात आलेल्या सिरीयस प्रतिक्रीयांचे मुळ लेखात विडंबन करायची नविन प्रथा सुरु करत आहोत.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sun, 02/22/2009 - 12:23 नवीन
ज्यांना जायला मिळत नाही त्यांच्या मनात एक सुप्त असुया असते, ती अशा चर्चेत बाहेर येते. आधी बाहेर का जावे लागते त्याचा विचार करा. इथले सगळे मार्ग तुम्हीच बंद करुन टाकलेत तर ती पोरं काय स्वस्थ बसणार का उपाशी मरणार? ती जाणारच. आधी या देशातले घाणेरडे राजकारण बंद करा, सर्वांना समान संधी उपलब्ध करा आणि तरी कोणी गेले तर बोला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा