महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते |
💬 प्रतिसाद
(8)
व
विकास
गुरुवार, 02/19/2009 - 17:37
नवीन
कविता आवडली. शिवाजीकडे मागणे करणे म्हणजे सावरकरांची, "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा" पटकन आठवते.
तशी कमी माहीत असलेली गदीमांची खालील कविता शिवाजीचे मराठी टिकवण्यासंदर्भात महत्व छान सांगते त्याची देखील आपली कविता वाचताना आठवण झाली.
From Nasata Jhala Jara Shivaraya
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 02/19/2009 - 17:40
नवीन
वा !
सागरलहरींची कविता आवडली..
विकास, तुम्ही दिलेली गदिमांची कविता कधी ऐकली नव्हती. आभार. शेवटचे कडवे फारच छान आहे.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 02/19/2009 - 17:49
नवीन
>>शेवटचे कडवे फारच छान आहे.
वास्तवीक त्यात सर्व मराठी वाचवण्यासंदर्भातील तात्पर्य येते - जसा मराठी, महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्यास एक शिवाजी लागला, तसाच तो निर्माण करायला एक जिजाबाई पण लागली. थोडक्यात अवांतर करत इतकेच म्हणावेसे वाटते की, पालकांनी आपले काम केले तर जे काय टिकवायचे, घडवायचे अथवा बिघडवायचे ते होईल...
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 02/19/2009 - 17:54
नवीन
एकदम बरोबर.
रेड रेड ऍप्पल खायला घालणारे आणि हॅप्पीबर्थडेला एंजोय करायला मुलाला धाडणारे पालक त्या मुलावर भाषेचे काय संस्कार करतात देव जाणे..असो.. जीजाबाई आणि शिवाजी यांना प्रणाम करुन प्रतिसाद आवरतो.
थोडे विषयांतर केल्याबद्दल क्षमा करा.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
स
सुभाष
गुरुवार, 02/19/2009 - 19:58
नवीन
कविता फारच प्रेरणा देणारी आहे.शिवाजी महारा़ज झाले झाले नसते तर ???कल्पनाच करवत नाही ! कवि भुषण म्हणतो...........
वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधर मे !
हिन्दुन की चोटी राखी ,रोटी राखी है सिपाहिनकी,कान्धेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !!
मीडि राखे मुगल मरोहि राखे पातसाह, वैरी पीसि राखे वरदान राख्यो करमे !
राजन की हद्द राखी तेग बल सिवराज्, देव राखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!
अर्थ....शिवाजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यान्चे सरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिन्दूच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिन्दून्ची शेन्डी राखली आणि शिपायान्ची रोटी (ऊपजीविका)चालविली.खान्द्यावरील जानवी आणि गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोन्गलान्चे यथास्थित मर्दन केले व बादशहास मुरगाळून टाकले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव व घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले.
- Log in or register to post comments
स
सागरलहरी
Sun, 02/22/2009 - 18:12
नवीन
माझ्या बोबड्या बोलान्चे कौतुक करणा-या आपणा सर्वान्चे आभार ...
अढीत आंबा पिकू दे तरी, वास जरासा घुमुदे तरी
लहान आहे कविता माझी, वयात तिजला येऊ दे तरी....
माझ्यापेक्षा बापलोक ते, कितीक झाले पूर्व सूरी,
सरस्वती ज्या प्रसन्ना आणिक, शब्दसंपदा पाणी भरी...
रसिक थोर नमितो तुम्हा, कवने माझी आवडली जरी,
काजव्याने या थोर जनांशी, न च करावी बरोबरी ...
--- सागर लहरी
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 02/19/2009 - 17:40
नवीन
सुरेखच. खरंच हे हिंदू नृसिंहा ची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/19/2009 - 17:53
नवीन
कविता छान आहे...
यवन या शब्दाऐवजी म्लेंच्छ हा शब्द जास्त बरोबर झाला असता असे वाटते.
--अवलिया
- Log in or register to post comments